शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
2
"खून का बदला चुकाने के लिए...!"; लंडनवरून परतताच तारिक रहमान यांनी स्पष्ट केला इरादा; काय म्हणाले?
3
ठाण्यात एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! निष्ठावंतांना डावलताच माजी महापौरांकडून पदाचा राजीनामा
4
‘परदेश दौऱ्यावर असताना राहुल गांधींवर पाळत ठेवली जातेय’, काँग्रेसचा केंद्र सरकारवर गंभीर आरोप
5
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
6
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
7
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
8
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
9
Devayani Farande: डोळ्यात पाणी, आवाजही गहिवरला...! नाशिकमधील पक्षप्रवेशानंतर भाजपा आमदार देवयानी फरांदे भावूक
10
"मूर्ती तोडण्यामागे धार्मिक हेतू नाही, तर...!"; भगवान विष्णू यांची मूर्ती पाडल्याबद्दल भारतानं व्यक्त केली होती चिंता, आता थायलंडनं दिलं असं स्पष्टीकरण
11
"चीन भारतासोबतचे संबंध विकसित करण्यावर भर देतो, कोणत्याही तिसऱ्या देशाला..."; अमेरिकेच्या अहवालावरून चीन भडकला
12
‘मी स्नेहाची हत्या केलेली नाही…’, पँटवर लिहून प्रियकरानं संपवलं जीवन, पोलिसांवर गंभीर आरोप
13
क्रिश का गाना सुनेगा..? अचानक २० वर्षांनी रंगली तुफान चर्चा, 'ले बेटा' वाला Video Viral
14
श्रीमंत व्हायचंय? 'रिच डॅड पुअर डॅड'च्या लेखकाचा गुंतवणुकीचा नवा 'मंत्र', चांदी विषयी केलं मोठं भाकित
15
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
16
"हिंदू वेळीच एकवटला नाही तर भारतात गल्लोगल्ली बांगलादेशसारखा..."; धीरेंद्र शास्त्रींचा इशारा
17
“महानगरपालिकांमध्ये ‘वंचित’बरोबर आघाडी करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न सुरू”: हर्षवर्धन सपकाळ
18
नवीन वर्षात करा नवीन भाषा शिकण्याचा संकल्प, मिळेल आयुष्याला कलाटणी; पाहा सोप्या टिप्स
19
३१ डिसेंबरला अयोध्येतील राम मंदिर खरोखरच बंद राहणार का? महत्त्वाची माहिती आली समोर
20
विधानसभेला संधी हुकली कृष्णराज महाडिक आता महापालिका निवडणूक लढवणार, प्रभागही ठरला!
Daily Top 2Weekly Top 5

नंदनवनात ‘वाहतूक कोंडी’चा बारमाही हंगाम

By admin | Updated: July 2, 2015 00:26 IST

महाबळेश्वरात पर्यटकांची परवड : पालिकेचे दुर्लक्ष; पोलिसांचीही शिट्टी बंद; स्थानिकांमधूनही नाराजी

अजित जाधव -महाबळेश्वर  -महाराष्ट्राचे नंदनवन असणाऱ्या महाबळेश्वरला सध्या वाहतूूक कोंडीची मोठी समस्या भेडसावत आहे. बारमाही हंगाम असल्याने याठिकाणी पर्यटकांची सतत वर्दळ असते. मात्र, शहरातील मुख्य बाजारपेठ, पूनम चौक, वेण्णा लेक अशा सर्वच ठिकाणी वाहतुकीची कोंडी होत असून पर्यटक, प्रवासी व टॅक्सीचालकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. या समस्यांवर पोलीस व पालिका प्रशासनाकडून ठोस उपाययोजना आखल्या जात नसल्याने ‘तेरी भी चूप और मेरी भी चूप’ असे चित्र सध्या दिसत आहे. ही समस्या तत्काळ मार्गी लावण्यात यावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.महाबळेश्वरसह पाचगणीला दरवर्षी सुमारे २० लाख पर्यटक भेट देतात. बारमाही हंगाम असल्यामुळे तिन्ही ऋतूंमध्ये पर्यटकांची या ठिकाणी रेलचेल असते. महाबळेश्वरला आल्यानंतर पर्यटकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे वेळ व पैसा वाया जात असल्यामुळे पर्यटकांमधून नाराजीचे सूर उमटत आहे. वाहतुकीची कोंडी झाल्यानंतर मुख्य बसस्थानकापूसन ते वेण्णा लेक मार्गावर वाहनांच्या मोठी रांग लागते. त्यामुळे पर्यटक व स्थानिक टॅक्सीवाल्यांना तासन्तास रांगेत उभे राहावे लागते. शहरातील मुख्य पूनम चौकात वाहतुकीची कोंडी ही नित्याचीच समस्या बनली आहे. याठिकाणी असणारी दुकाने, विक्रेते यामुळे ही समस्या अधिकच बिकट होत आहे. पालिका, पोलीस प्रशासनाने योंबाबत ठोस उपाययोजना आखाव्यात, अशी मागणी होत आहे. वाट काढण्यात जातो दिवस...महाबळेश्वरातील टॅक्सीचालक वाहतुकीच्या कोंडीमुळे मेटाकुटीला आले आहेत. एक टॅक्सीचालक दिवसातून दोन किंवा त्यापेक्षा अधिक वेळा पर्यटकांना महाबळेश्वरची सफर करवतात. मात्र, वाहतूक कोंडीमुळे एकाच ट्रीपवर त्यांना समाधान मानावे लागत आहे. अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी होत असल्यामुळे वादावादीचे प्रकारही घडत आहेत. वाहतूक कोंडीमुळे एसटीचे वेळापत्रक बदलत असून, याचा प्रवाशांनाही फटका बसत आहे. पर्यटक व स्थानिकाचा या कोंडीतून वाट काढण्यात संपूर्ण दिवस वाया जात असून, काही पर्यटक या त्रासाला कंटाळून परतीचा प्रवासही करीत आहेत.सिग्नल यंत्रणा धूळखात!या समस्यांवर उपाय म्हणनू महाबळेश्वर नगरपालिकेच्या वतीने लाखो रुपये खर्च करून बसविण्यात आलेली सिग्नल यंत्रणा धूळखात पडलेली आहे. हे सिग्नल वेण्णा लेकच्या दिशेने येणारी वाहने, मेढा मार्गे येणारी वाहने, शहरातून येणारी वाहने माखरिया गार्डनजवळ बसविण्यात आली आहे. तर दुसरी सिग्नल यंत्रणा पंचायत समितीसमोर इराणी पेट्रोल पंपजवळ बसविण्यात आली आहे. हे सिग्नल बसविण्यात आल्यानंतर दोन दिवस कारवाई करण्यात आली. मात्र, पुन्हा तिसऱ्या दिवसांपासून याकडे कोणीही लक्ष नाही.