शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
2
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
3
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
4
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
5
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?
6
नेपाळच्या लष्कर प्रमुखांनी भारतात प्रशिक्षण घेतले, देशाला एकसंघ ठेवण्याची आता त्यांच्यावर जबाबदारी
7
“PM मोदींच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त ७५ ST बसस्थानकावर मोफत वाचनालय सुरू करणार”: सरनाईक
8
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...
9
भारतात पारडे पालटले! इन्स्टाने रील्समध्ये युट्यूबला मागे टाकले; मेटाने काय ट्रेडिंग असते ते जाहीर केले
10
२१ लाख लोक रस्त्यावर, आतापर्यंत ९०० जणांचा मृत्यू! पाकिस्तानात पुराचं थैमान 
11
वेफर्स अन् भुजिया बनवणारी कंपनीत हिस्सेदारीसाठी चुरस; पेप्सिको, आयटीसीसह अनेक कंपन्या शर्यतीत
12
शेअर बाजारातील नुकसानीपासून वाचण्याचा सॉलिड फंडा, नितीन कामथ यांनी सांगितली भन्नाट ट्रिक
13
"भविष्यात मुख्यमंत्री होण्याची माझ्याकडे ऑफर", असं कोण म्हणालं? वाचा
14
"ही तर फक्त सुरूवात..." नाशिकमध्ये उद्धवसेना-मनसे संयुक्त जनआक्रोश मोर्चा; भाजपाला दिलं आव्हान
15
'भारताच्या वाढीमुळे घाबरले, म्हणून शुल्क लादला', ट्रम्प टॅरिफवर मोहन भागवतांचे सूचक विधान
16
क्रूरतेचा कळस! गुजरातमधून विमानानं आला, गर्लफ्रेंडवर अत्याचार केला अन् ५१ वेळा स्क्रूड्रायव्हर खुपसला; कोर्टाने सुनावली शिक्षा
17
एकेकाळी ५००० रुपये होता पगार, आता त्यांची कंपनी आणतेय ३८२० कोटींचा IPO; कोण आहे ही व्यक्ती?
18
पितृपक्ष २०२५: ५ रुपयांत मिळणाऱ्या ५ वस्तू पितरांना अर्पण करा; पूर्वज आयुष्यभर आशीर्वाद देतील
19
UPSC ची तयारी करणाऱ्या युवकानं उचललं धक्कादायक पाऊल; स्वत:चा प्रायव्हेट पार्ट कापला, कारण...
20
विजयादशमी २०२५: दसरा कधी आहे? देशभरात होतो साजरा; पाहा, महाराष्ट्रातील वैशिष्ट्य-मान्यता

लोकांची मानसिकता निम्मे आजार बरे करते -- डॉ. ज्ञानेश्वर हिरास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2019 00:26 IST

चर्चेतील व्यक्तीशी थेट संवाद कोणत्याही रुग्णाला औषधोपचाराची गरज असतेच, त्याही पेक्षा त्याला आधाराची गरज असते. त्याची मानसिकता बळकट करण्यासाठी प्रयत्न केले जावेत. आपण यातून बरे होणार, हा आत्मविश्वास त्याला द्यायला हवा - डॉ. ज्ञानेश्वर हिरास

ठळक मुद्देम्हणूनच डॉक्टर रुग्णांना आठ दिवस तरी बेड रेस्टचा सल्ला देतात. मात्र, सध्याच्या धकाधकीच्या जीवनात हे अनेकांना शक्य होत नाही.चर्चेतील व्यक्तीशी थेट संवाद

लोकांची मानसिकता निम्मे आजार बरे करतेसकस आहार, विश्राती अत्यंत गरजेचीचर्चेतील व्यक्तीशी थेट संवादकोणत्याही रुग्णाला औषधोपचाराची गरज असतेच, त्याही पेक्षा त्याला आधाराची गरज असते. त्याची मानसिकता बळकट करण्यासाठी प्रयत्न केले जावेत. आपण यातून बरे होणार, हा आत्मविश्वास त्याला द्यायला हवा - डॉ. ज्ञानेश्वर हिरासदत्ता यादव ।लोकमत न्यूज नेटवर्कस्वाईन फ्लूचं केवळ नाव जरी उच्चारलं तरी अनेकांची पाचावर धारण बसते. या रोगाविषयी आजही समाजात कमालीची भीती आहे. त्यामुळे रुग्णावर योग्य उपचार झाले तर रुग्ण दगावणार नाहीत. यासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयातील डॉ. ज्ञानेश्वर हिरास यांनी जनजागृतीचा वसा घेतला आहे. आरोग्य केंद्र आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टरांना तसेच खासगी हॉस्पिटलमधीलडॉक्टरांनाही मोजक्या शब्दांमध्ये काही महत्त्वाच्या टिप्स देऊन स्वाईन फ्लूला कसे सामोरे जावे, याचे सखोल ज्ञान त्यांनी दिले. या सदंर्भात त्यांच्याशी केलेली बातचित..

प्रश्न : जनजागृतीमुळे स्वाईन फ्लू आटोक्यात येईल का?उत्तर : हो नक्कीच येईल. याची लक्षणे तत्काळ ओळखता आली पाहिजेत. लोकांपर्यंत स्वाईन फ्लूची माहिती पोहोचायला हवी. सर्दी, ताप आणि घसा दुखत असलेली लक्षणे आढळल्यास ४८ तास रुग्णाला देखरेखीखाली ठेवले जाते. त्यानंतरही बरे वाटले नाही तर टॅमी फ्लूच्या गोळ्या दिल्या जातात. याही पेक्षा महत्त्वाचे म्हणजे रुग्णाने घाबरून जाऊ नये. मानसिकता बळकट करणे महत्त्वाचे आहे. तसेच सकस आणि योग्य आहार घेऊन विश्रांती घेणे गरजेचे आहे.

प्रश्न : आतापर्यंत किती डॉक्टरांना स्वाईन फ्लूची प्राथमिक माहिती दिली?उत्तर : जिल्हा परिषदेमध्ये सव्वाशे, सिव्हिलमध्ये ४० डॉक्टरांना तसेच ३३ खासगी डॉक्टरांनाही मार्गदर्शन केले आहे. यामुळे सजगता येईल आणि रुग्णांवर वेळेवर आणि योग्य उपचार होतील, अशी अपेक्षा आहे.

प्रश्न : स्वाईन फ्लूसाठी कोणी व काय काळजी घ्यायला हवी?उत्तर : स्वाईन फ्लू शक्यतो इतर आजार असलेल्या लोकांना पटकन होत असतो. त्यांची प्रतिकार शक्ती कमी असते. ज्यांची प्रतिकार शक्ती चांगले असते. त्यांना स्वाईन फ्लू शक्यतो होत नाही. आजार बरा होणे, हे आपल्या मानसिकतेवर अवलंबून असते. निम्मे आजार हे मानसिकतेमुळे बरे होतात.

बेड रेस्ट गरजेचीच..कोणताही आजार उद्भवल्यास शक्यतो बेड रेस्ट गरजेची असते. या काळात रुग्णाला जेवण जात नाही. परिणामी प्रतिकार शक्ती कमी होते. त्यामुळे आजार जास्त वाढण्याची शक्यता असते. म्हणूनच डॉक्टर रुग्णांना आठ दिवस तरी बेड रेस्टचा सल्ला देतात. मात्र, सध्याच्या धकाधकीच्या जीवनात हे अनेकांना शक्य होत नाही. 

सलग तीन महिनेडॉ. ज्ञानेश्वर हिरास हे एमबीबीएस असून, त्यांनी पॅथॉलॉजीचा डिप्लोमा केला आहे. नाशिक येथून त्यांची जिल्हा शासकीय रुग्णालयात बदली झाली. गेल्या तीन महिन्यांपासून ते इतर रुग्णांना तपासून स्वाईन फ्लूबाबत मार्गदर्शन करत आहेत. केवळ उपचार करून ते रुग्णाला जाऊ देत नाहीत. रुग्णाचे समूपदेशनही करत आहेत. दिवसाला पन्नास रुग्ण तपासण्याची मर्यादा असताना चारशे ते पाचशे रुग्ण तपासावे लागतात.

टॅग्स :docterडॉक्टरhospitalहॉस्पिटल