शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण भारताचा जुना मित्र, दुसरीकडे इस्त्रायल..."; मध्य पूर्वेतील युद्धावर सोनिया गांधी स्पष्ट बोलल्या
2
ऑफिसला न जाताच कर्मचाऱ्याला मिळाले २६ लाख रुपये; कोर्टाने दिला मोठा निर्णय
3
Air India Plane Crash: "१४ वर्षांनी घरी लक्ष्मी जन्मली अन् विमान दुर्घटनेत दुर्दैवाने तिलाच गमावले..."
4
गळफास लावलेल्या स्थितीत सापडला भाजपा नेत्याचा मृतदेह, दोरीने बांधलेले होते दोन्ही हात, संशयास्पद मृत्युमुळे खळबळ
5
भीषण अपघात! नवी मुंबईत मुलीने मर्सिडीजने दुचाकीला उडवले; महिलेचा जागेवर मृत्यू, एकजण गंभीर जखमी
6
"मी शांततेसाठी कितीही प्रयत्न केले तरी...!"; काँगो-रवांडा शांतता करारानंतर ट्रम्प यांचं दुःख, बोलून दाखवली नोबेल पुरस्काराची इच्छा
7
Israel-Iran War: भारतासाठी कायपण ! परतीसाठी इराणने आपले हवाई क्षेत्र उघडले, आणखी दोन विमाने नवी दिल्लीत पोहोचणार
8
पाकिस्तानमध्ये चार हिंदू भावंडांचे अपहरण, जबरदस्तीने धर्म बदलण्यास भाग पाडले; आईकडून न्यायाची मागणी
9
Ashadhi Ekadashi 2025: ईश्वरभेटीची सोपी वाट दाखवणार्‍या गुरुंचे आपल्या आयुष्यातील योगदान जाणून घ्या!
10
अहमदाबादमधील विमान अपघातात वाचलेल्या विश्वासला अभिनेत्रीनं म्हटलं 'खोटारडा', ट्रोल झाल्यावर घेतला युटर्न
11
कर्मचाऱ्याला सॅलरीतून मिळाले १४ कोटी तर झाला अवाक्; नंतर जे काही झालं त्याचा विचारही केला नसेल
12
R Madhavan घरबसल्या कमावणार महिन्याला ६.५ लाख रुपये; भाड्यानं दिला १७.५ कोटींचा फ्लॅट, एकूण किती कमाई करणार?
13
इराणमधील अणुकेंद्रांबाबत ट्रम्प यांचं मोठं विधान, म्हणाले, इस्राइल इराणमधील अणुकेंद्रं... 
14
False Gangrape Case: बलात्काराचा खोटा गुन्हा; महिलेस साडेसात वर्षे शिक्षा, न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय
15
Devendra Fadnavis: "बोल बच्चन भैरवी असणाऱ्यांना मी उत्तरे देत नाही" फडणवीसांची उद्धव ठाकरेंवर टीका
16
"म्हणजे पक्ष फोडून आमदार गोळा करायचे हे मुलांनी पहिलीपासूनच...", हिंदी सक्तीवरुन मराठी लेखकाचा टोला
17
...तर तुमचे अकाउंट होऊ शकते हॅक; कोट्यवधी लोकांची खाजगी माहिती लीक झाल्याची भिती
18
मराठमोळ्या अभिनेत्याने केली आत्महत्या, काम मिळत नसल्याने उचललं टोकाचं पाऊल
19
बिझनेसमन संजय कपूर यांना मैदानावरच देण्यात आलेला CPR, शेवटचा Video समोर
20
आता विका जिकडे विकायचंय.., पाकिस्तान 'याचा' जगातील सर्वात मोठा उत्पादक, भारतानं नाकारलं आता अन्य देशांचे दरवाजे ठोठावतोय

Lok Sabha Election 2019 सत्ताधाऱ्यांना जनता माफ करणार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2019 23:12 IST

वाई : ‘मोदी सरकारच्या काळात कवडीमोल भावाने कृषी माल विकावा लागला. शेतकरी आत्महत्याचे प्रमाण वाढले आहे. सबका विकास सर्वसामान्य ...

वाई : ‘मोदी सरकारच्या काळात कवडीमोल भावाने कृषी माल विकावा लागला. शेतकरी आत्महत्याचे प्रमाण वाढले आहे. सबका विकास सर्वसामान्य जनतेचा सत्यानाश, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. खोटी आश्वासने देऊन तरुणांना देशोधडीला लावणाºया मोदी सरकारला जनता कदापिही माफ करणार नाही,’ अशी टीका खासदार उदयनराजे भोसले यांनी केली.वाई येथील साठे धर्मशाळेत काँग्रेसच्या वतीने आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण होते. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सुनील काटकर, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विराज शिंदे, विकास शिंदे, प्रतापराव देशमुख, व्याजवाडीचे माजी सरपंच संतोषराव पिसाळ, मानसिंग चव्हाण, महिला जिल्हाध्यक्षा धनश्री महाडिक, महिला तालुकाध्यक्षा अल्पना यादव, जिल्हा सरचिटणीस मंजिरी पानसे, खंडाळा पंचायत समितीच्या उपसभापती वंदना धायगुडे, वाई पंचायत समिती माजी सभापती सुनीता शिंदे, भाऊसाहेब शेळके, अतुल पवार, गुरुदेव बरदाडे, अजय धायगुडे, प्रदीप जायगुडे, विजयराव भिलारे, मुन्नाभाई वारुंगकर, मदन ननावरे, रवींद्र भिलारे, जयदीप शिंदे, विक्रम वाघ, विलास पिसाळ, सदाशिव अनपट उपस्थित होते.उदयनराजे भोसले म्हणाले, ‘लोकसभेची निवडणूक वाई विधानसभा मतदार संघाचे भवितव्य ठरविणारी निवडणूक आहे. मोदी सरकारने एक रुपयाचाही निधी सातारा जिल्ह्याला दिला नाही. उलट शेतकऱ्यांच्या मालाला कवडीमोल भाव देऊन शेतकरीच उद्ध्वस्त केला. देशात तरुणांची बेरोजगारी वाढली आहे.’पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, ‘शेतकºयांच्या खोट्या विकासाच्या नावाखाली मत मागण्याचा कोणताही नैतिक अधिकार मोदी सरकारला नाही. त्यांनी केलेल्या नतभ्रष्ट कारभाराचा जाब विचारल्याशिवाय जनता राहणार नाही.’प्रदीप जायगुडे यांनी सूत्रसंचालन केले. जयदीप शिंदे यांनी आभार मानले.विरोध करणाºयांनी आमदार होऊन दाखवावेकिसन वीर कारखाना वाचविण्यासाठी व वैयक्तिक स्वार्थासाठी भाजपमध्ये प्रवेश केलेल्या मदन भोसले यांनी तालुक्यातील काँग्रेस संपविण्याची भाषा बोलत ‘टोलनाक्यावर जाणारे नकोत, संसदेत जाणारे उमेदवार हवेत,’ अशी टीका केली. भाजपमध्ये आमदार होऊन दाखवा, मगच खालच्या पातळीवर जाऊन टीका करा. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे काम मार्गी लावता आले नाही. त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावर मते मागण्याचा नैतिक अधिकार नाही,’ अशी टीका विकास शिंदे यांनी केली.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक