शहरं
Join us  
Trending Stories
1
आता ठाकरेंची वेळ! शिंदेच्या ठाण्यातील बडा नेता उद्धवसेनेत; म्हणाले, “सत्तेसाठी लाचारी...”
2
मिशन 2026! बंगाल, असम, केरळ आणि तामिळनाडूसाठी भाजपचा प्लान तयार..!
3
अयोध्येत होणार आता भव्य राम मंदिर संग्रहालय; सरकारने दिली ५२ एकर जमीन, TATA कंपनी बांधणार
4
इम्रान खान जिवंत की मृत? तुरुंगात भेटायला गेलेली डॉक्टर बहीण बाहेर आली, म्हणाली... 
5
भाजपचे उमेदवार अजय अग्रवाल बोगस मतदान करुन घेत असल्याचा खळबळजनक आरोप ! फार्म हाऊसवर मिळाले महत्वाचे पुरावे
6
रोहित तयार, पण किंग कोहलीच्या मनात वाजतंय "आम्ही नाही जा.." गाणं; गंभीर-आगरकरचा 'तो' डाव फसणार?
7
“नगरपालिका निवडणुकीत आचारसंहितेची पायमल्ली, महायुतीविरोधात हजारो तक्रारी”; काँग्रेसची टीका
8
दिल्लीच्या CM रेखा गुप्ता यांच्या हस्ते पिकलबॉल लीग ट्रॉफीचे अनावरण; मुंबई-चेन्नईसह ६ फ्रँचायझी संघात रंगणार स्पर्धा
9
२०२५ची शेवटची पौर्णिमा: ३ गोष्टी कराच, महालक्ष्मी दोन्ही हातांनी भरभरून देईल; भरभराट होईल!
10
Video: निरागस बाबा..! लेकीनं दाखवलं 'कोरियन हार्ट' पण बापाला वाटलं वेगळंच.. पुढे काय झालं?
11
२०२५ संपताना हवं ते देणार, ८ राशींना सगळं मिळणार; गुरु-बुधाचा षडाष्टक योग, सोन्यासारखे दिवस!
12
“शिंदे मालवणात आले, येताना बॅगेतून काय आणले?”; थेट व्हिडिओ दाखवत संजय राऊतांचा सवाल
13
प्राजक्ता-शंभूराजच्या लग्नाचा अल्बम आला समोर; राजेशाही थाटात पार पडला लग्नसोहळा
14
हसावे की...! मतदान केंद्रातील कर्मचारी बोटाला शाई लावायची सोडून गप्पा हाणत बसला; मतदार मतदान करून...
15
Travel : भारतीयांसाठी व्हिसा फ्री एन्ट्री! पण, मलेशिया फिरायला किती खर्च येतो? जायचा विचार करताय तर जाणून घ्या...
16
आकाशाला गवसणी! चंद्र-ताऱ्यांची स्वप्न पाहणारी भारताची मिसाईल वुमन; पुरस्काराने झाला सन्मान
17
१.१७ कोटींची बोली लावली, प्रसिद्धी मिळविली, आता म्हणतोय...'नको'; HR 88 B 8888 नंबर प्लेटचा पुन्हा लिलाव होणार
18
IPL 2026 Auction: भारताच्या 'या' Top 10 स्टार क्रिकेटपटूंनी लिलावासाठी केली 'रजिस्ट्रेशन'
19
इथे मतदान करा, तिकडचे बटन दाबा...! आमदार संतोष बांगर यांच्याकडून मतदान केंद्रातच महिलेला सूचना, गुन्हा दाखल...
20
आधी फिरून येऊ म्हणाला, मग भांडण उकरून काढलं; संतापलेल्या रिक्षा चालकानं गर्लफ्रेंडला काचेच्या बाटलीनं मारलं!
Daily Top 2Weekly Top 5

Lok Sabha Election 2019 सत्ताधाऱ्यांना जनता माफ करणार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2019 23:12 IST

वाई : ‘मोदी सरकारच्या काळात कवडीमोल भावाने कृषी माल विकावा लागला. शेतकरी आत्महत्याचे प्रमाण वाढले आहे. सबका विकास सर्वसामान्य ...

वाई : ‘मोदी सरकारच्या काळात कवडीमोल भावाने कृषी माल विकावा लागला. शेतकरी आत्महत्याचे प्रमाण वाढले आहे. सबका विकास सर्वसामान्य जनतेचा सत्यानाश, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. खोटी आश्वासने देऊन तरुणांना देशोधडीला लावणाºया मोदी सरकारला जनता कदापिही माफ करणार नाही,’ अशी टीका खासदार उदयनराजे भोसले यांनी केली.वाई येथील साठे धर्मशाळेत काँग्रेसच्या वतीने आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण होते. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सुनील काटकर, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विराज शिंदे, विकास शिंदे, प्रतापराव देशमुख, व्याजवाडीचे माजी सरपंच संतोषराव पिसाळ, मानसिंग चव्हाण, महिला जिल्हाध्यक्षा धनश्री महाडिक, महिला तालुकाध्यक्षा अल्पना यादव, जिल्हा सरचिटणीस मंजिरी पानसे, खंडाळा पंचायत समितीच्या उपसभापती वंदना धायगुडे, वाई पंचायत समिती माजी सभापती सुनीता शिंदे, भाऊसाहेब शेळके, अतुल पवार, गुरुदेव बरदाडे, अजय धायगुडे, प्रदीप जायगुडे, विजयराव भिलारे, मुन्नाभाई वारुंगकर, मदन ननावरे, रवींद्र भिलारे, जयदीप शिंदे, विक्रम वाघ, विलास पिसाळ, सदाशिव अनपट उपस्थित होते.उदयनराजे भोसले म्हणाले, ‘लोकसभेची निवडणूक वाई विधानसभा मतदार संघाचे भवितव्य ठरविणारी निवडणूक आहे. मोदी सरकारने एक रुपयाचाही निधी सातारा जिल्ह्याला दिला नाही. उलट शेतकऱ्यांच्या मालाला कवडीमोल भाव देऊन शेतकरीच उद्ध्वस्त केला. देशात तरुणांची बेरोजगारी वाढली आहे.’पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, ‘शेतकºयांच्या खोट्या विकासाच्या नावाखाली मत मागण्याचा कोणताही नैतिक अधिकार मोदी सरकारला नाही. त्यांनी केलेल्या नतभ्रष्ट कारभाराचा जाब विचारल्याशिवाय जनता राहणार नाही.’प्रदीप जायगुडे यांनी सूत्रसंचालन केले. जयदीप शिंदे यांनी आभार मानले.विरोध करणाºयांनी आमदार होऊन दाखवावेकिसन वीर कारखाना वाचविण्यासाठी व वैयक्तिक स्वार्थासाठी भाजपमध्ये प्रवेश केलेल्या मदन भोसले यांनी तालुक्यातील काँग्रेस संपविण्याची भाषा बोलत ‘टोलनाक्यावर जाणारे नकोत, संसदेत जाणारे उमेदवार हवेत,’ अशी टीका केली. भाजपमध्ये आमदार होऊन दाखवा, मगच खालच्या पातळीवर जाऊन टीका करा. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे काम मार्गी लावता आले नाही. त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावर मते मागण्याचा नैतिक अधिकार नाही,’ अशी टीका विकास शिंदे यांनी केली.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक