शहरं
Join us  
Trending Stories
1
नोकरदारांनो, लक्ष द्या! आजपासून पहिली मेट्रो दीड तास उशिराने! मेट्रो २ अ, ७ मार्गिकेसाठी ७ दिवसांचे तात्पुरते वेळापत्रक
2
भीषण! सुदानमधील अल-फशीरमध्ये पॅरामिलिटरी फोर्सचा हल्ला, ६० हून अधिक लोकांचा मृत्यू
3
मोठी दुर्घटना! टेकऑफनंतर गोल गोल फिरलं, झाडावर आदळलं; हेलिकॉप्टर क्रॅशचा भयंकर Video
4
मृण्मयी देशपांडेची 'मनाचे श्लोक' चित्रपटाबद्दल मोठी घोषणा; पोस्ट शेअर करत म्हणाली-"अतिशय दु:खद..."
5
भारीच! "सणाच्या दिवशी काम नाही, फक्त आराम करा", 'या' कंपनीने दिवाळीला दिली ९ दिवस सुटी
6
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींची दिवाळी गोड, शुभ-लाभ; सौभाग्य-संपन्नता, ३ राशींनी ‘हे’ टाळाच
7
अमेरिका पुन्हा एकदा हादरली! मिसिसिपीमध्ये गोळीबार; ४ जणांचा मृत्यू, १२ जण जखमी
8
Today Daily Horoscope : आजचे राशीभविष्य - १२ ऑक्टोबर २०२५; शुभवार्ता समजणार, प्रतिष्ठा वाढणार, धनलाभ होणार
9
चीनवर १०० टक्के  टॅरिफ, ट्रम्प यांनी दिली पुन्हा धमकी; जागतिक बाजारपेठेत पुन्हा मंदीची शक्यता
10
जागतिक अस्थिरतेने गुंतवणूकदार मालामाल! गेल्या चार वर्षांत किती वाढले सोने-चांदीचे भाव? जाणून डोळे फिरतील
11
उद्धवसेनेच्या हंबरडा मोर्चाने छत्रपती संभाजीनगर दणाणले;  शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी १ लाख रुपये द्या - उद्धव ठाकरे
12
ट्रम्प यांचा चीनवर टॅरिफ बॉम्ब; धमकीनंतर कोसळला बाजार; अमेरिकेच्या शेअर बाजारात एप्रिलनंतरची मोठी घसरण
13
तालिबानचा भेदभाव; काँग्रेसची सरकारवर टीका; महिला पत्रकारांना प्रवेश नाकारल्यावरून राजकारण
14
टाटा सन्सचे आयपीओ जारी व्हावे, टाटा ट्रस्टमधील काही विश्वस्तांचे मत; शापुरजी पालनजींकडून लिस्टिंगची पुन्हा मागणी 
15
‘डिजिटल सोने’ घेत नव्या युगात पाऊल टाका 
16
भारताने जगाला स्वतःची कहाणी प्रभावीपणे सांगावी, अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांचे आवाहन
17
सोनाली सेन गुप्ता आरबीआय कार्यकारी संचालकपदी 
18
 तालिबानचा पलटवार, अफगाणिस्तान-पाकिस्तान बॉर्डरवर भीषण संघर्ष, अनेक पोस्टवर कब्जा, ५ पाकिस्तानी सैनिकांचा मृत्यू 
19
मुंबईकरांचे कुटुंबकबिल्यासह सुट्टीच्या दिवशी मेट्रो पर्यटन, तिसऱ्या दिवशीही तुडुंब गर्दी, मुले उत्साही, मोठ्यांना अप्रूप
20
गाझा शांतता करारावर स्वाक्षरी करण्यास हमासचा नकार, ट्रम्प यांच्या प्रस्तावाची उडवली खिल्ली

Lok Sabha Election 2019 सत्ताधाऱ्यांना जनता माफ करणार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2019 23:12 IST

वाई : ‘मोदी सरकारच्या काळात कवडीमोल भावाने कृषी माल विकावा लागला. शेतकरी आत्महत्याचे प्रमाण वाढले आहे. सबका विकास सर्वसामान्य ...

वाई : ‘मोदी सरकारच्या काळात कवडीमोल भावाने कृषी माल विकावा लागला. शेतकरी आत्महत्याचे प्रमाण वाढले आहे. सबका विकास सर्वसामान्य जनतेचा सत्यानाश, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. खोटी आश्वासने देऊन तरुणांना देशोधडीला लावणाºया मोदी सरकारला जनता कदापिही माफ करणार नाही,’ अशी टीका खासदार उदयनराजे भोसले यांनी केली.वाई येथील साठे धर्मशाळेत काँग्रेसच्या वतीने आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण होते. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सुनील काटकर, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विराज शिंदे, विकास शिंदे, प्रतापराव देशमुख, व्याजवाडीचे माजी सरपंच संतोषराव पिसाळ, मानसिंग चव्हाण, महिला जिल्हाध्यक्षा धनश्री महाडिक, महिला तालुकाध्यक्षा अल्पना यादव, जिल्हा सरचिटणीस मंजिरी पानसे, खंडाळा पंचायत समितीच्या उपसभापती वंदना धायगुडे, वाई पंचायत समिती माजी सभापती सुनीता शिंदे, भाऊसाहेब शेळके, अतुल पवार, गुरुदेव बरदाडे, अजय धायगुडे, प्रदीप जायगुडे, विजयराव भिलारे, मुन्नाभाई वारुंगकर, मदन ननावरे, रवींद्र भिलारे, जयदीप शिंदे, विक्रम वाघ, विलास पिसाळ, सदाशिव अनपट उपस्थित होते.उदयनराजे भोसले म्हणाले, ‘लोकसभेची निवडणूक वाई विधानसभा मतदार संघाचे भवितव्य ठरविणारी निवडणूक आहे. मोदी सरकारने एक रुपयाचाही निधी सातारा जिल्ह्याला दिला नाही. उलट शेतकऱ्यांच्या मालाला कवडीमोल भाव देऊन शेतकरीच उद्ध्वस्त केला. देशात तरुणांची बेरोजगारी वाढली आहे.’पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, ‘शेतकºयांच्या खोट्या विकासाच्या नावाखाली मत मागण्याचा कोणताही नैतिक अधिकार मोदी सरकारला नाही. त्यांनी केलेल्या नतभ्रष्ट कारभाराचा जाब विचारल्याशिवाय जनता राहणार नाही.’प्रदीप जायगुडे यांनी सूत्रसंचालन केले. जयदीप शिंदे यांनी आभार मानले.विरोध करणाºयांनी आमदार होऊन दाखवावेकिसन वीर कारखाना वाचविण्यासाठी व वैयक्तिक स्वार्थासाठी भाजपमध्ये प्रवेश केलेल्या मदन भोसले यांनी तालुक्यातील काँग्रेस संपविण्याची भाषा बोलत ‘टोलनाक्यावर जाणारे नकोत, संसदेत जाणारे उमेदवार हवेत,’ अशी टीका केली. भाजपमध्ये आमदार होऊन दाखवा, मगच खालच्या पातळीवर जाऊन टीका करा. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे काम मार्गी लावता आले नाही. त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावर मते मागण्याचा नैतिक अधिकार नाही,’ अशी टीका विकास शिंदे यांनी केली.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक