शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
2
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
3
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
4
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
5
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
6
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
7
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
8
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
9
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
10
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
11
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
12
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
13
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
14
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
15
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना
16
"शरद पवारांना हिंदू धर्मालाच शरण यावं लागलं, स्वत:ची मुंज झाल्याचंही दाखवतील"; प्रकाश महाजन यांचा टोला
17
आईला डॉक्टरकडे नेण्यासाठी येणाऱ्या ड्रायव्हरच्या पडली प्रेमात, त्यानंतर घडलं भयानक... 
18
ट्रॉफी नसेल तर ६००-७०० धावा करुन उपयोग काय? रोहित शर्मानं विराटला टोमणा मारल्याची चर्चा, पण...
19
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
20
Pakistani Citizens Deadline: पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्यासाठी नवी डेडलाइन!

वाटाण्याचा भाव क्विंटलमागे ३०० रुपयाने उतरला...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2021 04:24 IST

सातारा : जिल्ह्यात तीन आठवड्यांपासून खाद्यतेलाचा दर स्थिर असल्याने सामान्यांना दिलासा मिळाला आहे. तर वाटाण्याचा भाव क्विंटलमागे ३०० रुपयांनी ...

सातारा : जिल्ह्यात तीन आठवड्यांपासून खाद्यतेलाचा दर स्थिर असल्याने सामान्यांना दिलासा मिळाला आहे. तर वाटाण्याचा भाव क्विंटलमागे ३०० रुपयांनी उतरला आहे. बाजार समितीत क्विंटलला ७ हजारापर्यंत दर मिळाला. त्याचबरोबर कोबी, टोमॅटो आणि वांग्याला भाव कमी मिळत असल्याचे दिसून आले.

सातारा बाजार समितीत जिल्ह्यातील सातारा, कोरेगाव, खंडाळा, जावळी, कोरेगाव, माण, फलटण या तालुक्यांतून भाजीपाला येत असतो. आवक आणि मागणीच्या प्रमाणात बाजार समितीत दर ठरतो. रविवारी ६२७ क्विंटल फळभाज्यांची आवक झाली. तर कांद्याची १३० क्विंटलची आवक झाली. कांद्याला क्विंटलला ५०० पासून २ हजारांपर्यंत दर मिळाला. तर वांग्याचा दर कमी झाल्याचे दिसून आले. वांग्याला १० किलोला १५० ते २५० रुपये दर मिळाला. टोमॅटोला ६० ते १०० रुपये आणि फ्लॉवरला १० किलोला १५० ते २०० रुपये भाव आला. आल्याला क्विंटलला १५०० पर्यंत तर लसणाला ६ हजारांपर्यंत दर मिळाल्याचे दिसून आले. आले अन् लसणाचा दर आणखी कमी झाला. त्याचबरोबर वाटाण्याला क्विंटलला ६ ते ७ हजारापर्यंत दर मिळाला.

खाद्यतेल बाजारभाव...

मागील सवा महिन्यापासून खाद्यतेलाचे दर कमी झाले आहेत. सध्या खाद्यतेलाचा सूर्यफूल डबा २३०० ते २४०० पर्यंत मिळत आहे. तर पामतेलाचा १८५०, शेंगदाणा तेल डबा २२५० ते २४०० आणि सोयाबीनचा २१०० ते २२५० रुपयांपर्यंत मिळत आहे. तर सोयाबीन तेल पाऊच १३५ ते १५०, सूर्यफूलो १७० रुपयांना मिळत आहे.

आंब्याची आवक...

बाजार समितीत आंबा आणि डाळिंबाची आवक चांगली झाली. आंबा ५० तर डाळिंब आवक १६ क्विंटल झाली. तसेच पपई व सफरचंदचीही आवक झाली होती.

बटाटा स्वस्तच...

बाजार समितीत अनेक भाज्यांचे दर कमी झाले. पण बटाट्याला अद्यापही दर एकदम कमी आहे. क्विंटलला १२०० ते १३०० रुपये दर मिळाला. तर दोडक्याला १० किलोला २५० ते ३००, ढबू २०० ते २५०, शेवगा शेंग ४०० ते ५००, गवारला २०० ते ३०० रुपये १० किलोला मिळाल्याचे दिसून आले.

प्रतिक्रिया...

मागील एक महिन्यापासून खाद्यतेल दरात उतार आला आहे. डब्याबरोबरच पाऊचचेही दर उतरले आहेत. यामुळे अनेक महिन्यांनंतर सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे.

- संभाजी आगुंडे, विक्री प्रतिनिधी

तीन महिन्यांपासून भाज्यांचे दर वाढलेले होते. पण, या आठवड्यात थोडा उतार आला आहे. वांगी, कोबी, टोमॅटो, फ्लॉवर आवाक्यात आला आहे. पण, अजूनही गवार शेंग आणि वाटाणा महागच मिळत आहे.

- प्रमोद पाटील, ग्राहक

मागील दीड महिन्यापासून वाटाण्याला चांगला दर मिळत होता. पण, आता थोडा कमी झाला आहे. त्यातच कोबी, वांगी, टोमॅटोलाही भाव कमी आहे. यामुळे भाजीपाल्यावर केलेला खर्चही निघत नाही अशी स्थिती निर्माण झाली आहे.

- संतोष पवार, शेतकरी

.............................................................................................................................................................................................