शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

पांगारे, पळसावडे धरणांना धोक्याची घंटा !

By admin | Updated: September 14, 2014 23:54 IST

सांडव्यांची दुरवस्था : धोका कायम; ठिकठिकाणी पाझर

परळी : सातारा तालुक्यातील ठोसेघर पठारावर असणारी पांगारे व पळसावडे ही धरणे पूर्ण क्षमतेने भरून वाहत आहेत. असे असले तरी सांडव्यांच्या दुरवस्थेमुळे या धरणांना कायमचा धोका निर्माण झालेला आहे. सांडव्याला भगदाड पडले असून, भराव खचून धरणाच्या भिंतीवर काही ठिकाणाहून पाझर फुटले आहेत. वेस्ट वेअर विमोचन विहिरीतूनही पाण्याचे पाट वाहत आहेत. पांगारे व पळसावडे या धरणांच्या सांडव्याबाबत धोक्याची घंटा वाजत आहे. याबाबत संबंधित अधिकाऱ्यांशी बोलल्यावर प्रकल्पाच्या कामात काही त्रुटी असल्याचे सांगत त्यांनी उपाययोजना करण्याचे नियोजन असल्याचे सांगितले. मात्र, हे नियोजन कागदावर राहिले आहे. तसेच पळसावडे धरण प्रकल्पास गळती असल्याचे पाटबंधारे विभागाने लेखी पत्र पळसावडे ग्रामपंचायतीस दिले आहे. मात्र, त्यावरही काहीच उपाययोजना झालेली नाही. पांगारे प्रकल्पाची घळभरणी २००० साली पूर्ण झाली. घळभरणीदरम्यान तांत्रिक बाबी पूर्ण न केल्यानेच या प्रकल्पास गळती लागत आहे. प्रकल्पाच्या मुख्य पायात पायाभरणी व इतर काही बाबी आवश्यक असतात. तसेच भूस्तरावरील वैज्ञानिक चाचणी व्यवस्थित न झाल्याने या प्रकल्पाला धोका पोहोचू शकतो, असे सांगण्यात येत आहे. २००६-०७ यावर्षीच्या कालावधीत झालेले दगडी पिचिंगचे कामही निकृष्ट दर्जाचे झाल्याच्या तक्रारी ग्रामस्थ करीत आहेत. दगडी पिचिंगचे काम वाहून गेलेले आहे. प्रकल्प व सांडव्यास धोका निर्माण होऊ नये म्हणून टाकलेला मातीचा भराव पूर्णपणे खचलेला आहे. पांगारे प्रकल्पात २.७२ दशलक्ष घ. मी. पाणीसाठी आहे. या परिसरात २५०० ते २७०० मिमी पावसाची नोंद होते. प्रकल्पाचे निकृष्ट दर्जाचे काम होऊनही ठेकेदारांची बिले संबंधित विभागाने काढलीच कशी ? याबाबत संबंधित अधिकारी, ठेकेदारांची चौकशी करण्याची मागणी ग्रामस्थ करीत आहेत. सद्य:स्थितीत धरणाचा वॉल, कॅनॉल, सांडव्याच्या धराच्या भिंतीबाजूचा भाग यामधून पाणी वाहत आहे. धरणाच्या भिंतीवरील पिचिंगचा दगड-मातीचा भराव खचला आहे. भिंतीवर मोठी झुडपे उगवली आहेत. १९९६ साली या प्रकल्पाचे काम सुरू होऊन २००१ मध्ये पाणीसाठा झाला. सज्जनगड, वाघवाडी, कारी या गावांना यामधून पाणीपुरवठा होतो. मात्र, पांगारे गावाची एक गुंठा जमीनही ओलिताखाली येत नाही. प्रकल्पासाठी जमीन संपादित करून १७ वर्षांनंतरही नुकसान भरपाई मिळालेली नाही. पळसावडे धरणाच्याही अशा अवस्थेमुळे सांडव्याला भगदाड पडलेले आहे. त्यामुळे अनेक हेक्टर क्षेत्र वाहून गेलेले आहे. २००४ पासून विमोचन विहिरीचा व्हॉल्व्हच उघडला असून, तो आजही तसाच आहे. या धरण प्रकल्पाची १८२४.४५ दशलक्ष घ.मी. इतकी पाणीसाठ्याची क्षमता आहे. या प्रकल्पाच्या विमोचन विहिरीत अहोरात्र १२ महिने पाणसाठा असल्याने आॅक्टोबर, नोव्हेंबरमध्ये पाणी न सोडताच धरणाचा तळ दिसतो. या प्रकल्पाच्या भिंतीवर सोलिंग पिचिंगचे काम निम्मे केले आहे. सांडव्याचे काम अर्धवट आहे. (वार्ताहर) निधी पोसण्यासाठीच का ?पांगारे प्रकल्पाच्या कालव्याला गळती असून, पाणी न सोडताच उन्हाळ्यात हा प्रकल्प निम्मा रिकामा होतो. या प्रकल्पाच्या दुरुस्तीसाठी जलसंपदा विभागाकडे पैसे नसताना बंदिस्त पाईपसाठी सव्वातीन कोटींचा निधी उपलब्ध केल्याचे सांगण्यात येते. धरणात पाणी नाही मग बंदिस्त पाईपलाइन कशासाठी? असा प्रश्न स्थानिकांनी उपस्थित केला आहे. हा निधी शेतीला पाणी मिळण्यासाठी की ठेकेदार, अधिकाऱ्यांना पोसण्यासाठी? असा संतापजनक सवालही नागरिकांनी केला आहे.