शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

पांगारे, पळसावडे धरणांना धोक्याची घंटा !

By admin | Updated: September 14, 2014 23:54 IST

सांडव्यांची दुरवस्था : धोका कायम; ठिकठिकाणी पाझर

परळी : सातारा तालुक्यातील ठोसेघर पठारावर असणारी पांगारे व पळसावडे ही धरणे पूर्ण क्षमतेने भरून वाहत आहेत. असे असले तरी सांडव्यांच्या दुरवस्थेमुळे या धरणांना कायमचा धोका निर्माण झालेला आहे. सांडव्याला भगदाड पडले असून, भराव खचून धरणाच्या भिंतीवर काही ठिकाणाहून पाझर फुटले आहेत. वेस्ट वेअर विमोचन विहिरीतूनही पाण्याचे पाट वाहत आहेत. पांगारे व पळसावडे या धरणांच्या सांडव्याबाबत धोक्याची घंटा वाजत आहे. याबाबत संबंधित अधिकाऱ्यांशी बोलल्यावर प्रकल्पाच्या कामात काही त्रुटी असल्याचे सांगत त्यांनी उपाययोजना करण्याचे नियोजन असल्याचे सांगितले. मात्र, हे नियोजन कागदावर राहिले आहे. तसेच पळसावडे धरण प्रकल्पास गळती असल्याचे पाटबंधारे विभागाने लेखी पत्र पळसावडे ग्रामपंचायतीस दिले आहे. मात्र, त्यावरही काहीच उपाययोजना झालेली नाही. पांगारे प्रकल्पाची घळभरणी २००० साली पूर्ण झाली. घळभरणीदरम्यान तांत्रिक बाबी पूर्ण न केल्यानेच या प्रकल्पास गळती लागत आहे. प्रकल्पाच्या मुख्य पायात पायाभरणी व इतर काही बाबी आवश्यक असतात. तसेच भूस्तरावरील वैज्ञानिक चाचणी व्यवस्थित न झाल्याने या प्रकल्पाला धोका पोहोचू शकतो, असे सांगण्यात येत आहे. २००६-०७ यावर्षीच्या कालावधीत झालेले दगडी पिचिंगचे कामही निकृष्ट दर्जाचे झाल्याच्या तक्रारी ग्रामस्थ करीत आहेत. दगडी पिचिंगचे काम वाहून गेलेले आहे. प्रकल्प व सांडव्यास धोका निर्माण होऊ नये म्हणून टाकलेला मातीचा भराव पूर्णपणे खचलेला आहे. पांगारे प्रकल्पात २.७२ दशलक्ष घ. मी. पाणीसाठी आहे. या परिसरात २५०० ते २७०० मिमी पावसाची नोंद होते. प्रकल्पाचे निकृष्ट दर्जाचे काम होऊनही ठेकेदारांची बिले संबंधित विभागाने काढलीच कशी ? याबाबत संबंधित अधिकारी, ठेकेदारांची चौकशी करण्याची मागणी ग्रामस्थ करीत आहेत. सद्य:स्थितीत धरणाचा वॉल, कॅनॉल, सांडव्याच्या धराच्या भिंतीबाजूचा भाग यामधून पाणी वाहत आहे. धरणाच्या भिंतीवरील पिचिंगचा दगड-मातीचा भराव खचला आहे. भिंतीवर मोठी झुडपे उगवली आहेत. १९९६ साली या प्रकल्पाचे काम सुरू होऊन २००१ मध्ये पाणीसाठा झाला. सज्जनगड, वाघवाडी, कारी या गावांना यामधून पाणीपुरवठा होतो. मात्र, पांगारे गावाची एक गुंठा जमीनही ओलिताखाली येत नाही. प्रकल्पासाठी जमीन संपादित करून १७ वर्षांनंतरही नुकसान भरपाई मिळालेली नाही. पळसावडे धरणाच्याही अशा अवस्थेमुळे सांडव्याला भगदाड पडलेले आहे. त्यामुळे अनेक हेक्टर क्षेत्र वाहून गेलेले आहे. २००४ पासून विमोचन विहिरीचा व्हॉल्व्हच उघडला असून, तो आजही तसाच आहे. या धरण प्रकल्पाची १८२४.४५ दशलक्ष घ.मी. इतकी पाणीसाठ्याची क्षमता आहे. या प्रकल्पाच्या विमोचन विहिरीत अहोरात्र १२ महिने पाणसाठा असल्याने आॅक्टोबर, नोव्हेंबरमध्ये पाणी न सोडताच धरणाचा तळ दिसतो. या प्रकल्पाच्या भिंतीवर सोलिंग पिचिंगचे काम निम्मे केले आहे. सांडव्याचे काम अर्धवट आहे. (वार्ताहर) निधी पोसण्यासाठीच का ?पांगारे प्रकल्पाच्या कालव्याला गळती असून, पाणी न सोडताच उन्हाळ्यात हा प्रकल्प निम्मा रिकामा होतो. या प्रकल्पाच्या दुरुस्तीसाठी जलसंपदा विभागाकडे पैसे नसताना बंदिस्त पाईपसाठी सव्वातीन कोटींचा निधी उपलब्ध केल्याचे सांगण्यात येते. धरणात पाणी नाही मग बंदिस्त पाईपलाइन कशासाठी? असा प्रश्न स्थानिकांनी उपस्थित केला आहे. हा निधी शेतीला पाणी मिळण्यासाठी की ठेकेदार, अधिकाऱ्यांना पोसण्यासाठी? असा संतापजनक सवालही नागरिकांनी केला आहे.