शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
2
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
3
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शहा यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
4
भारत, चीन की...., कंडोमच्या वापरात कुठला देश आहे नंबर १, कुठल्या देशात आहे अधिक मागणी?
5
घरातच सूत जुळलं! काकीचा जडला पुतण्यावर जीव, ३ वर्षांपासून प्रेम; पोलीस ठाण्यातच केलं लग्न
6
ओबीसींच्या विकासासाठी योगी सरकारचा मजबूत 'प्लॅन', उचललं क्रांतिकारी पाऊल
7
Navratri Astro 2025: नवरात्रीत 'या' राशींवर होणार अंबाबाईची कृपा, धन-समृद्धी, आनंदाला नसेल तोटा
8
उधमपूरमध्ये काय घडलं? दहशतवाद्यांशी लढताना एक जवान शहीद, सुरक्षा दलांची मोठी कारवाई
9
काय म्हणता! इंटर्नला मिळालं महिन्याला १२.५ लाखांचं पॅकेज; अमेरिका, युरोप नाही तर मुंबईत आहे कंपनी, नाव काय?
10
बिग बजेट सिनेमांमधून दाखवला बाहेरचा रस्ता, दीपिका पादुकोणने सोडलं मौन; पोस्ट करत म्हणाली...
11
जीएसटीतील बदलानंतर स्कूटर आणि बाईकच्या किंमती १८ हजारांपर्यंत झाल्या कमी!
12
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
13
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत
14
मुलाच्या शाळेतच वडिलांनी सोडला जीव, अर्जावर सही करताना खुर्चीवरून कोसळले आणि...  
15
हाफिज सईदच्या भेटीनंतर पंतप्रधानांनी आभार मानले; दहशतवादी यासीन मलिकच्या शपथपत्रातील अनेक दाव्यांमुळे खळबळ
16
सोडून गेलेले परत आले तरी उमेदवारी नाही, उद्धव ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांसाठी मार्गदर्शक सूचना जाहीर
17
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
18
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
19
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
20
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार

पंपाला हात मारणार; पाणी नाही तर अ‍ॅक्टिंग सोडणार अमीर खानचा डॉयलॉग यशस्वी: वेळू ग्रामस्थांशी साधला संवाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2018 01:33 IST

रहिमतपूर : ‘सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेच्या सुरुवातीला या स्पर्धेत वेळू ग्रामस्थ सहभागी झाले. ग्रामस्थांनी ताकतीने काम करून आमच्या विश्वासाला बळकटी निर्माण करून दिली.

ठळक मुद्देवॉटर कप स्पर्धेची जिल्ह्यात जोरदार तयारी, अमीर खानचा डॉयलॉग यशस्वी

 रहिमतपूर : ‘सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेच्या सुरुवातीला या स्पर्धेत वेळू ग्रामस्थ सहभागी झाले. ग्रामस्थांनी ताकतीने काम करून आमच्या विश्वासाला बळकटी निर्माण करून दिली. महाराष्ट्र पाणीदार करण्याचे तुमचे-आमचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी वेळूकरांची शेवटपर्यंत साथ हवी आहे,’ असे भावनिक आवाहन अभिनेते अमीर खान यांनी केले.कोरेगाव तालुक्यातील वेळू येथे वडजाई देवी मंदिरात पाणी फाउंडेशन आयोजित परिसंवादात अमीर खान यांनी ग्रामस्थांशी संवाद साधला. यावेळी डॉ. अविनाश पोळ, स्वाती भटकळ, सरपंच लक्ष्मीबाई भोसले, सतीश भोसले, माजी सरपंच लहुराज भोसले, सुखदेव भोसले, शरद भोसले आदी मान्यवर उपस्थित होते.अमीर खान पुढे म्हणाले, ‘सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा सुरू केली तेव्हा या स्पर्धेमध्ये लोक सहभागी होतील का ? आम्ही जे सांगतोय ते योग्य आहे का ? ग्रामस्थ यामध्ये काम करतील का ? असे अनेक प्रश्न आमच्या मनामध्ये निर्माण झाले होते. या स्पर्धेत वेळू गाव सहभागी झाले. ग्रामस्थांनी ताकदीने काम करून आमच्या विश्वासाला बळकटी दिली. तुम्हीच वेळ दिला, मेहनत घेतली. त्यामुळे वेळू गावाचा पाणी प्रश्न सुटला, ही फार मोठी गोष्ट आहे. या गावाकडे बघून इतर गावांना प्रेरणा मिळते. त्यामुळे तुम्ही इतर गावांना या कामाबाबत माहिती द्या.’दरम्यान, प्रास्ताविकांमध्ये दुर्योधन ननावरे यांनी वॉटर कप स्पर्धेमध्ये गाव सहभागी झाल्याने दोनच वर्षांत गावाचा कायापालट झाला आहे. तसेच गाव टँकरमुक्त झाले आहे, असे सांगितले.त्यावेळी मी थोडासा घाबरलो होतो : खान‘डॉक्युमेंट्रीचे चित्रीकरण वेळू गावामधील एका हातपंपावर झाले. हातपंपाला एकच हात मारणार, जर पाणी नाही आले तर मी अ‍ॅक्टिंग सोडणार, असा माझा डायलॉग होता. त्यावेळी मी थोडा घाबरलो होतो. जर पाणी नाही आले तर... माझ्या अ‍ॅक्टिंगच काय ? असा प्रश्न पडला. परंतु वेळूमध्ये चांगलं काम झाल्यामुळे पाणी निश्चितपणे येणार, असा विश्वास होता. त्यामुळेच मी एक हात मारला अन् हातपंपातून पाणी बाहेर आले,’ अशी माहिती अमीर खान यांनी परिसंवादादरम्यान ग्रामस्थांना दिली.घास उगाना है....पेड लगाना है !पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून वेळू गाव पाणीदार झाले आहे. आणखी पाणलोटचे काम करायचे आहे. मात्र, याबरोबरच सेंद्रिय शेतीच्या माध्यमातून मातीचा कस वाढवायचा आहे. या मातीमध्येच पाण्याच्या उपलब्धतेनुसार घास उगाना है, पेड लगाना है ! ही सर्व कामे केल्यानंतर गाव एका वेगळ्याच उंचीवर जाऊन पोहोचणार असल्याचे अमीर खान यांनी सांगितले.कोरेगाव तालुक्यातील वेळूतील याच हातपंपावर अमीर खान यांच्या डॉक्युमेंट्रीचे चित्रीकरण झाले. यावेळी अमीर खान यांनी एकदाच पंप मारताच पाणी आले.

टॅग्स :Aamir Khanआमिर खानSatara areaसातारा परिसर