शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
2
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
3
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
4
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
5
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
6
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
7
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
8
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
9
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
10
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
11
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
12
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
13
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
14
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
15
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
16
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
17
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
18
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
19
'वन नाइट स्टॅण्ड'मधून पैसे कमावतेय ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, डिटेक्टिव्हचा खुलासा, म्हणाली-"तासानुसार..."
20
Video: ऑन कॅमेरा उपमुख्यमंत्री अन् आमदारात खडाजंगी; एकमेकांवर वाहिली शिव्यांची लाखोळी...

पालखी मार्गाचे काम कासव गतीने, नागरिक संतप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2020 14:08 IST

padhrpur, Alandi, roadsefty, satara आळंदी-पंढरपूर-मोहोळ या केंद्र सरकारच्या महत्त्वकांक्षी श्री संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर पालखी महामार्गाचे काम कासवगतीने सुरू आहे. यामुळे परिसरातील शेतकरी त्रस्त झाले आहेत. या कामाची गती न वाढल्यास १० नोव्हेंबर रोजी रास्ता रोको करण्यात येईल, असा इशारा बाधित शेतकऱ्यांनी एका निवेदनाद्वारे दिला आहे.

ठळक मुद्दे पालखी मार्गाचे काम कासव गतीने, नागरिक संतप्तआळंदी-पंढरपूर-मोहोळ महत्त्वकांक्षी रस्त्यासाठी रास्ता रोकोचा इशारा

फलटण : आळंदी-पंढरपूर-मोहोळ या केंद्र सरकारच्या महत्त्वकांक्षी श्री संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर पालखी महामार्गाचे काम कासवगतीने सुरू आहे. यामुळे परिसरातील शेतकरी त्रस्त झाले आहेत. या कामाची गती न वाढल्यास १० नोव्हेंबर रोजी रास्ता रोको करण्यात येईल, असा इशारा बाधित शेतकऱ्यांनी एका निवेदनाद्वारे दिला आहे.श्री संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर पालखी महामार्गाच्या समन्वय समितीने फलटणचे उपविभागीय अधिकारी डॉ. शिवाजीराव जगताप यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, रस्ते वाहतूक महामार्ग मंत्रालय भारत सरकार यांनी २६ मे २०१५ रोजी पालखी महामार्गाची अधिसूचना काढली होती.

फलटण तालुक्यातील २६ गावांतील ६४१८ शेतकऱ्यांची १००.३८ हेक्टर जमीन यासाठी संपादित होणार आहे. त्याशिवाय या क्षेत्रात येणारी राहती घरे, विहीर, बोअरवेल, गोठा, पत्राशेड, झाडे, हॉटेल, दुकाने व इतर उद्योग व्यवसाय बाधित होत आहेत, त्याची मोजदाद होणे बाकी आहे. संपादित जमीन नुकसान भरपाई वाटप जानेवारी २०२० मध्ये सुरू केले.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मार्च ते जून कालावधित कामकाज बंद राहिले. त्यानंतर कामकाज सुरू झाले. परंतु भारत सरकारने मंजूर करूनही प्रत्यक्ष बाधित शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची रक्कम मिळण्यात भरपाई मिळण्यात अडचणी येत आहेत. उपजिल्हाधिकारी, भूसंपादन क्रमांक १६ यांचे सातारा येथील कार्यालयामध्ये कायमस्वरुपी पूर्णवेळ अधिकारी नियुक्त करावा. विद्यमान अधिकारी कार्यालयामध्ये पूर्णवेळ उपस्थित नसतात, त्यामुळे नुकसान भरपाई वितरण प्रक्रिया थंडावली आहे. फेर सर्व्हेक्षण व अवॉर्ड प्रसिद्ध होत नाहीत. भूसंपदनाशिवाय या क्षेत्रातील राहती घरे, विहीर, बोअरवेल, गोठा किंवा हॉटेल, दुकाने, उद्योग वगैरेंचे नुकसान भरपाईबाबत अवॉर्ड नोटीस संबंधित शेतकऱ्यांना मिळाली नाही.ज्या संपादित जमिनींमध्ये मालक व कूळ, वाहिवाटदार यांना जमीन संपादन नुकसान भरपाई नोटीस मिळालेल्या नाहीत त्या मिळाव्यात, पूर्वीच्या अवॉर्डमध्ये एकत्रित नावाचा उल्लेख आहे, त्याऐवजी वैयक्तिक खातेदारानुसार वहिवाटीनुसार जेएमसीचा आधार घेऊन फेर नोटिसा काढा.

वास्तविक राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ९६५ बाबत चौथा टप्पा धर्मपुरी ते बाळूपाटलाचीवाडी या कामाच्या निविदा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांच्यामार्फत प्रसिद्ध केली असताना बाधित शेतकऱ्यांपैकी ४० टक्के शेतकऱ्यांनाही नुकसान भरपाई मिळाली नाही.

टॅग्स :road transportरस्ते वाहतूकSatara areaसातारा परिसरAlandiआळंदी