शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

पालखी मार्गाचे काम कासव गतीने, नागरिक संतप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2020 14:08 IST

padhrpur, Alandi, roadsefty, satara आळंदी-पंढरपूर-मोहोळ या केंद्र सरकारच्या महत्त्वकांक्षी श्री संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर पालखी महामार्गाचे काम कासवगतीने सुरू आहे. यामुळे परिसरातील शेतकरी त्रस्त झाले आहेत. या कामाची गती न वाढल्यास १० नोव्हेंबर रोजी रास्ता रोको करण्यात येईल, असा इशारा बाधित शेतकऱ्यांनी एका निवेदनाद्वारे दिला आहे.

ठळक मुद्दे पालखी मार्गाचे काम कासव गतीने, नागरिक संतप्तआळंदी-पंढरपूर-मोहोळ महत्त्वकांक्षी रस्त्यासाठी रास्ता रोकोचा इशारा

फलटण : आळंदी-पंढरपूर-मोहोळ या केंद्र सरकारच्या महत्त्वकांक्षी श्री संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर पालखी महामार्गाचे काम कासवगतीने सुरू आहे. यामुळे परिसरातील शेतकरी त्रस्त झाले आहेत. या कामाची गती न वाढल्यास १० नोव्हेंबर रोजी रास्ता रोको करण्यात येईल, असा इशारा बाधित शेतकऱ्यांनी एका निवेदनाद्वारे दिला आहे.श्री संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर पालखी महामार्गाच्या समन्वय समितीने फलटणचे उपविभागीय अधिकारी डॉ. शिवाजीराव जगताप यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, रस्ते वाहतूक महामार्ग मंत्रालय भारत सरकार यांनी २६ मे २०१५ रोजी पालखी महामार्गाची अधिसूचना काढली होती.

फलटण तालुक्यातील २६ गावांतील ६४१८ शेतकऱ्यांची १००.३८ हेक्टर जमीन यासाठी संपादित होणार आहे. त्याशिवाय या क्षेत्रात येणारी राहती घरे, विहीर, बोअरवेल, गोठा, पत्राशेड, झाडे, हॉटेल, दुकाने व इतर उद्योग व्यवसाय बाधित होत आहेत, त्याची मोजदाद होणे बाकी आहे. संपादित जमीन नुकसान भरपाई वाटप जानेवारी २०२० मध्ये सुरू केले.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मार्च ते जून कालावधित कामकाज बंद राहिले. त्यानंतर कामकाज सुरू झाले. परंतु भारत सरकारने मंजूर करूनही प्रत्यक्ष बाधित शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची रक्कम मिळण्यात भरपाई मिळण्यात अडचणी येत आहेत. उपजिल्हाधिकारी, भूसंपादन क्रमांक १६ यांचे सातारा येथील कार्यालयामध्ये कायमस्वरुपी पूर्णवेळ अधिकारी नियुक्त करावा. विद्यमान अधिकारी कार्यालयामध्ये पूर्णवेळ उपस्थित नसतात, त्यामुळे नुकसान भरपाई वितरण प्रक्रिया थंडावली आहे. फेर सर्व्हेक्षण व अवॉर्ड प्रसिद्ध होत नाहीत. भूसंपदनाशिवाय या क्षेत्रातील राहती घरे, विहीर, बोअरवेल, गोठा किंवा हॉटेल, दुकाने, उद्योग वगैरेंचे नुकसान भरपाईबाबत अवॉर्ड नोटीस संबंधित शेतकऱ्यांना मिळाली नाही.ज्या संपादित जमिनींमध्ये मालक व कूळ, वाहिवाटदार यांना जमीन संपादन नुकसान भरपाई नोटीस मिळालेल्या नाहीत त्या मिळाव्यात, पूर्वीच्या अवॉर्डमध्ये एकत्रित नावाचा उल्लेख आहे, त्याऐवजी वैयक्तिक खातेदारानुसार वहिवाटीनुसार जेएमसीचा आधार घेऊन फेर नोटिसा काढा.

वास्तविक राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ९६५ बाबत चौथा टप्पा धर्मपुरी ते बाळूपाटलाचीवाडी या कामाच्या निविदा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांच्यामार्फत प्रसिद्ध केली असताना बाधित शेतकऱ्यांपैकी ४० टक्के शेतकऱ्यांनाही नुकसान भरपाई मिळाली नाही.

टॅग्स :road transportरस्ते वाहतूकSatara areaसातारा परिसरAlandiआळंदी