शहरं
Join us  
Trending Stories
1
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले
2
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
3
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
4
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
5
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
6
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
7
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
8
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
9
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
10
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
11
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
12
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
13
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
14
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
15
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली
16
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
17
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
18
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
19
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
20
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...

गावाबाहेरून गावकारभारी पाहतायत कारभार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2019 00:17 IST

रवींद्र माने । ढेबेवाडी : खुर्ची आणि सत्तेच्या मोहापायी लाखो रुपयांचा चुराडा करून ग्रामपंचायतींच्या सरपंचपदी विराजमान झालेल्या गावकारभाऱ्यांनीच गावाकडे ...

रवींद्र माने ।ढेबेवाडी : खुर्ची आणि सत्तेच्या मोहापायी लाखो रुपयांचा चुराडा करून ग्रामपंचायतींच्या सरपंचपदी विराजमान झालेल्या गावकारभाऱ्यांनीच गावाकडे पाठ फिरवल्याचे चित्र पाटण तालुक्यातील अनेक गावांमध्ये दिसत आहे. तालुक्यातील बहुतेक ग्रामपंचायतींचे सरपंच आणि पदाधिकारीही गावापासून कोसोदूर वास्तव्यास असल्याने गावकारभारासह ग्रामस्थांच्या वैयक्तिक अडचणींची सोडवणूक करणार कोण? असा प्रश्न अनेक गावांतील ग्रामस्थांतून उपस्थित केला जात आहे.गावापासून बाहेर राहून कारभाराची सूत्रे हाताळणाºया अशा सरपंचांकडून मासिक सभा, ग्रामसभांनाही वर्षानुवर्षे दांडी मारली जात आहे. अशा दांडीबहाद्दर गावकारभाऱ्यांमुळेच गावांच्या विकासाला खीळ बसल्याच्या संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.दुर्गम, डोंगराळ आणि नैसर्गिक आपत्तींचा तालुका म्हणून पाटणची ओळख आहे. तालुक्याची भौगोलिक रचना अत्यंत अडचणींची असल्याने अजूनही अनेक गावे वाड्या-वस्त्या दळणवळणासह अन्य मूलभूत सोयी सुविधांपासून वंचित असल्याने अपेक्षित रोजगार येथे निर्माण होण्यास मोठी अडचण झाली आहे. परिणामी २४१ ग्रामपंचायतीचे कार्यक्षेत्र असलेल्या पाटण तालुक्यातील बहुतेक सरपंच आपल्या कुटुंबीयांसह शहरात वास्तव्यास आहेत.तालुका जरी दुर्गम आणि डोंगराळ असला तरी राजकीयदृष्ट्या अत्यंत जागृत आणि संवेदनशील असल्याची या पाटण तालुक्याची ओळख आहे. त्यामुळे राजकीय निवडणूक मग ती कोणतीही असो अगदी गल्लीपासून दिल्लीपर्यंतच्या सर्वच निवडणुकांची सूत्रे ही गावापेक्षा परगावी वास्तव्यास असणाºया मंडळींनी स्वत:कडेच ठेवली आहेत. राजधानीतून गावाचा गाडा हाकणाºया या मंडळींमुळेच आजही गावांमध्ये मागासलेपण जाणवत आहे. पदाधिकारी मंडळीच मासिक बैठका तसेच ग्रामसभांना उपस्थित राहत नसतील तर गावाच्या विकासाची आणि अडीअडचणींंची चर्चा कोण करणार? असा प्रश्न निर्माण होत आहे.खुर्चीसाठी केलाजातो हा सर्व अट्टाहासनिवडणुकीत होतो साम, दाम, दंडाचा वापर.लाखो रुपयांचा केला जातो चुराडा.एक वेळ सेवा करण्याची मागितली जाते संधी.मुंबईसह परगावी असलेल्या मतदारांवर केला जातो खर्च.सत्तेसाठी घेतला जातो वरिष्ठ नेत्यांचा आधार.निवडणूक काळात मिळते ढाबा संस्कृतीला बळसब कुछ ‘अण्णासाहेबांच्या’ हाती..!ग्रामपंचायतीच्या विकासात्मक बाबींसाठी जेवढी सरपंचांची भूमिका महत्त्वाची तेवढीच ग्रामसेवकही महत्त्वाचा घटक. दोघांच्या समन्वयाबरोबरच गावकºयांचे सहकार्य लाभले तरच गावाचा गाडा योग्य दिशेने मार्गस्थ होण्यास मदत होते. मात्र गावचे गावनेतेच गावाची सर्व सूत्रे अण्णासाहेब म्हणजे तलाठ्यांच्या हाती देऊन गावाबाहेरून कारभार करू लागल्याने गावागावात अनेक समस्या निर्माण होऊ लागल्या आहेत.गावकारभाºयांविरोधात संतापज्या विश्वासाने गावातील मतदारांनी पदाधिकाºयांना निवडून दिलेले असते. त्याच विश्वासाने सरपंच आणि सदस्य, पदाधिकाºयांनी काम करणे गरजेचे असते. गावातील अडचणी लक्षात घेऊन त्या सोडविण्यासाठी प्रयत्न करायला हवा. मात्र दुर्दैवाने ज्यांना निवडून दिले तेच गावकारभारी गावात राहत नसतील तर ते गावाचेच दुर्दैव म्हणावे लागेल, अशा संतप्त प्रतिक्रिया डोंगरपठारावर राहत असलेल्या ग्रामस्थांतून व्यक्त केल्या जात आहेत.