शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध; कतारने क्षेपणास्त्रे हवेतच रोखली, जीवितहानी झाली नसल्याचा दावा
2
आखाती देशांत तणाव वाढण्याची चिन्हे, अनेक ठिकाणी एअरस्पेस बंद; एअर इंडिया, इंडिगोकडून सूचना जारी
3
इराणचा पलटवार...! कतारमधील अमेरिकेच्या सर्वात मोठ्या एअरबेसवर डागली 6 क्षेपणास्त्रे
4
IND vs ENG मालिके दरम्यान दु:खद बातमी! भारताच्या दिग्गज फिरकीपटूचं निधन; लंडनमध्ये घेतला अखेरचा श्वास
5
“त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय घेणार”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
6
ENG vs IND : फलंदाजांनी आपलं काम केलं! टीम इंडियानं हा मंत्र जपला तर विजय पक्का, पण...
7
“स्वसंरक्षणाचा इराणला पूर्ण अधिकार”; रशियाने स्पष्टच सांगितले, तणाव वाढण्याची चिन्हे
8
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार
9
कुर्ला-सायनदरम्यान ओव्हरहेड वायर तुटली; मध्य रेल्वेच्या जलद फेऱ्या ठप्प, प्रवाशांचे हाल
10
"...तेलाच्या किमती कमी ठेवा, मी बघतोय!" इराण-इस्रायल युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान
11
ENG vs IND: KL राहुल-पंतच्या सेंच्युरीनंतर जड्डूची उपयुक्त खेळी! इंग्लंडसमोर ३७१ धावांचे टार्गेट
12
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, ५० हून अधिक लढाऊ विमानांचा कहर; महत्त्वाच्या लष्करी तळांवर तुफान बॉम्बिंग
13
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
14
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
15
२८ जुलैचा दावा खरा होणार? तिसरे महायुद्ध अटळ? बाबा वेंगा-नास्त्रेदमस यांची मोठी भविष्यवाणी
16
"तमीज से खेलने के चक्कर में..." कडक खेळी शिवाय पंतची 'मन की बात' चर्चेत (VIDEO)
17
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
18
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
19
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
20
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार

गावाबाहेरून गावकारभारी पाहतायत कारभार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2019 00:17 IST

रवींद्र माने । ढेबेवाडी : खुर्ची आणि सत्तेच्या मोहापायी लाखो रुपयांचा चुराडा करून ग्रामपंचायतींच्या सरपंचपदी विराजमान झालेल्या गावकारभाऱ्यांनीच गावाकडे ...

रवींद्र माने ।ढेबेवाडी : खुर्ची आणि सत्तेच्या मोहापायी लाखो रुपयांचा चुराडा करून ग्रामपंचायतींच्या सरपंचपदी विराजमान झालेल्या गावकारभाऱ्यांनीच गावाकडे पाठ फिरवल्याचे चित्र पाटण तालुक्यातील अनेक गावांमध्ये दिसत आहे. तालुक्यातील बहुतेक ग्रामपंचायतींचे सरपंच आणि पदाधिकारीही गावापासून कोसोदूर वास्तव्यास असल्याने गावकारभारासह ग्रामस्थांच्या वैयक्तिक अडचणींची सोडवणूक करणार कोण? असा प्रश्न अनेक गावांतील ग्रामस्थांतून उपस्थित केला जात आहे.गावापासून बाहेर राहून कारभाराची सूत्रे हाताळणाºया अशा सरपंचांकडून मासिक सभा, ग्रामसभांनाही वर्षानुवर्षे दांडी मारली जात आहे. अशा दांडीबहाद्दर गावकारभाऱ्यांमुळेच गावांच्या विकासाला खीळ बसल्याच्या संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.दुर्गम, डोंगराळ आणि नैसर्गिक आपत्तींचा तालुका म्हणून पाटणची ओळख आहे. तालुक्याची भौगोलिक रचना अत्यंत अडचणींची असल्याने अजूनही अनेक गावे वाड्या-वस्त्या दळणवळणासह अन्य मूलभूत सोयी सुविधांपासून वंचित असल्याने अपेक्षित रोजगार येथे निर्माण होण्यास मोठी अडचण झाली आहे. परिणामी २४१ ग्रामपंचायतीचे कार्यक्षेत्र असलेल्या पाटण तालुक्यातील बहुतेक सरपंच आपल्या कुटुंबीयांसह शहरात वास्तव्यास आहेत.तालुका जरी दुर्गम आणि डोंगराळ असला तरी राजकीयदृष्ट्या अत्यंत जागृत आणि संवेदनशील असल्याची या पाटण तालुक्याची ओळख आहे. त्यामुळे राजकीय निवडणूक मग ती कोणतीही असो अगदी गल्लीपासून दिल्लीपर्यंतच्या सर्वच निवडणुकांची सूत्रे ही गावापेक्षा परगावी वास्तव्यास असणाºया मंडळींनी स्वत:कडेच ठेवली आहेत. राजधानीतून गावाचा गाडा हाकणाºया या मंडळींमुळेच आजही गावांमध्ये मागासलेपण जाणवत आहे. पदाधिकारी मंडळीच मासिक बैठका तसेच ग्रामसभांना उपस्थित राहत नसतील तर गावाच्या विकासाची आणि अडीअडचणींंची चर्चा कोण करणार? असा प्रश्न निर्माण होत आहे.खुर्चीसाठी केलाजातो हा सर्व अट्टाहासनिवडणुकीत होतो साम, दाम, दंडाचा वापर.लाखो रुपयांचा केला जातो चुराडा.एक वेळ सेवा करण्याची मागितली जाते संधी.मुंबईसह परगावी असलेल्या मतदारांवर केला जातो खर्च.सत्तेसाठी घेतला जातो वरिष्ठ नेत्यांचा आधार.निवडणूक काळात मिळते ढाबा संस्कृतीला बळसब कुछ ‘अण्णासाहेबांच्या’ हाती..!ग्रामपंचायतीच्या विकासात्मक बाबींसाठी जेवढी सरपंचांची भूमिका महत्त्वाची तेवढीच ग्रामसेवकही महत्त्वाचा घटक. दोघांच्या समन्वयाबरोबरच गावकºयांचे सहकार्य लाभले तरच गावाचा गाडा योग्य दिशेने मार्गस्थ होण्यास मदत होते. मात्र गावचे गावनेतेच गावाची सर्व सूत्रे अण्णासाहेब म्हणजे तलाठ्यांच्या हाती देऊन गावाबाहेरून कारभार करू लागल्याने गावागावात अनेक समस्या निर्माण होऊ लागल्या आहेत.गावकारभाºयांविरोधात संतापज्या विश्वासाने गावातील मतदारांनी पदाधिकाºयांना निवडून दिलेले असते. त्याच विश्वासाने सरपंच आणि सदस्य, पदाधिकाºयांनी काम करणे गरजेचे असते. गावातील अडचणी लक्षात घेऊन त्या सोडविण्यासाठी प्रयत्न करायला हवा. मात्र दुर्दैवाने ज्यांना निवडून दिले तेच गावकारभारी गावात राहत नसतील तर ते गावाचेच दुर्दैव म्हणावे लागेल, अशा संतप्त प्रतिक्रिया डोंगरपठारावर राहत असलेल्या ग्रामस्थांतून व्यक्त केल्या जात आहेत.