शहरं
Join us  
Trending Stories
1
अरविंद केजरीवाल कधीही भाजपासोबत जातील; BJP च्या जुन्या मित्राचा दावा, काँग्रेसचाही आरोप
2
मोठी बातमी! मोदी-राज यांच्या सभेनंतर उद्धव ठाकरे मुंबईत एकाच दिवशी घेणार ४ सभा
3
...तेव्हापासून संजय राऊत पिसाळलेत; राज ठाकरेंवरील टीकेवरून मनसेचा खोचक पलटवार
4
Arvind Kejriwal : "मी 4 जूनला जेलमध्ये असेन, TV पाहत असताना..."; अरविंद केजरीवाल यांचं मोठं विधान
5
SC, ST, OBC आरक्षणाचा सर्वात मोठा समर्थक कोण? अमित शाह यांनी स्पष्टच सांगितलं, उत्तर-दक्षिण विभाजनावरही बोलले
6
कॅफे म्हैसूरच्या मालकावर फिल्मी स्टाईल दरोडा; पोलिसांची व्हॅन वापरुन पळवले २५ लाख
7
Investment Tips : निवृत्तीनंतर हात पसरायचे नसतील तर काय कराल? 'या' योजनांमध्ये गुंतवणुकीचा करू शकता विचार
8
३ राजयोग, दुप्पट लाभ: ७ राशींना शुभ फलदायी, नोकरीत प्रगती; धनलाभ योग, उत्तम अनुकूल काळ!
9
धक्कादायक! घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेत कार्तिक आर्यनच्या मामा-मामीचा मृत्यू, ३ दिवसांनी सापडले मृतदेह
10
Priyanka Gandhi : "राहुल गांधींनी लग्न करावं, त्यांना मुलं व्हावीत"; भावासाठी प्रियंका गांधींनी जाहीर केली इच्छा
11
अजित पवारांचे माहित नाही, पण भुजबळ नाराज असल्याचे ऐकले, त्यांना अंदाज आलाय; जयंत पाटलांचे स्पष्ट संकेत
12
उद्धव ठाकरे तुम्ही पंज्याला मत द्यायला जाताय, काहीच वाटत नाही का? गुलाबराव पाटलांचा बोचरा सवाल
13
"मी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा कार्यकर्ता, पण शेतकरी म्हणून मोदींच्या सभेला गेलो"
14
या निवडणुकीनंतर राज्यातील काही दुकाने बंद होतील, त्यात राज ठाकरेंचेही दुकान; राऊतांची टीका
15
८४ वर्षांपूर्वी दोन भावांनी McDonald'sची केलेली सुरुवात; आज ११९ देशांत ४२००० पेक्षा अधिक आऊटलेस्ट
16
सावधान! इंटरनेटलाच डॉक्टर मानता?; तर तुम्हीही ठरू शकता Idiot Syndrome चे बळी
17
Kangana Ranaut Edcuation : निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या बॉलिवूडच्या 'क्वीन'चं शिक्षण ऐकून बसेल धक्का
18
Swati Maliwal : "माझं चारित्र्य हनन करण्याचा प्रयत्न..."; स्वाती मालीवाल यांनी मारहाण प्रकरणावर मांडली व्यथा
19
ठाणे, अहमदाबाद अन् शेवटी हॉटेल बदलण्यासाठी तयारी...; भावेश भिंडे पोलिसांना कसा सापडला?
20
Narendra Modi : "मुलाला 99 गुण मिळाले तर..."; 400 पार करण्याच्या टार्गेटवर नरेंद्र मोदींनी स्पष्टच सांगितलं

अन्यथा सरकारने तलाठी पदे रद्द करावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2021 4:45 AM

कराड ई-पीक पाणी तलाठ्यांनी करावी अन्यथा सरकारने तलाठी पदे रद्द करावी, अशी मागणी रयत क्रांती संघटनेचे नेते सचिन ...

कराड

ई-पीक पाणी तलाठ्यांनी करावी अन्यथा सरकारने तलाठी पदे रद्द करावी, अशी मागणी रयत क्रांती संघटनेचे नेते सचिन नलवडे यांनी प्रांताधिकारी उत्तम दिघे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. या वेळी शिवाजी पाटील, योगेश झाम्बरे, शिवाजी पवार, शिवाजी गायकवाड, समाधान पवार आदींची उपस्थिती होती.

शेतकऱ्यांना पीक पाणी नोंद करणे सोयीचे व्हावे यासाठी राज्य शासनाने ई-पीक पाणी करण्याचा आदेश काढला आहे. शेतकऱ्यांनी स्वतःच्या मोबाइलवरून शेतात जाऊन ऑनलाइन पीक नोंद करायची आहे. यासाठी प्रत्येक शेतकऱ्यांकडे स्मार्ट फोन असणे गरजेचे आहे.

राज्यातील बहुतांश ग्रामीण भागात मोबाइल टॉवर नसल्याने मोबाइलला रेंज येत नाही. इंटरनेटला स्पीड कमी आहे. त्यामुळे पीक पाणी अपलोड करताना फ़ोटो काढताना अनंत अडचणींचा सामना करावा लागत आहे. पीक नोंद होत नाही. आजही बऱ्याच शेतकऱ्यांकडे स्मार्ट फोन नाहीत तर काही शेतकरी स्मार्ट मोबाइल वापरण्याबाबत अडाणी आहेत. त्यामुळे त्यांना कुणाची तरी मदत घ्यावी लागत आहे.

शासनाने ई-पीक पाणी नोंदीं दिलेल्या मुदतीत झाल्या नाहीत तर शेतकऱ्यांचा सातबारा कोरा राहणार आहे. शेतकऱ्यांना पीक कर्ज सोसायटी मिळणार नाही. साखर कारखान्याला ऊस नोंद होणार नाही. दुष्काळ, महापूर, इतर नैसर्गिक आपत्तीमुळे मिळणारी नुकसानभरपाई मिळणार नाही. आपली व्यवस्था पूर्ण डिजिटल झाली नसताना ई-पीक नोंदीच्या निर्णयाने शेतकऱ्यांचा फायदा कमी, नुकसान जास्त होईल. यासाठी लवकर योग्य तो निर्णय घेऊन शेतकऱ्यांच्या ई-पीक पाण्याची समस्या सोडवावी.

सरकारने या सर्व बाबींकडे लक्ष देऊन एक तर एखाद्या एजन्सीला ई-पीक पाणी नोंदीचे काम द्यावे, अथवा तलाठ्यांनी शेतकऱ्यांना सोबत घेऊन ई-पीक नोंदी करण्याचा निर्णय घ्यावा. जर नोंदीची कामे शेतकऱ्यांनीच करायची असतील तर तलाठी पदे रद्द करून त्यांच्या पगारावर शासनाचा, पर्यायाने जनतेच्या पैशाचा अपव्यय थांबवावा, असेही निवेदनात म्हटले आहे.