शहरं
Join us  
Trending Stories
1
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
2
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
3
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
4
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
5
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
6
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
7
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
8
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
9
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
10
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
11
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
12
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
13
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
14
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
15
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
16
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ
17
Ladki Bahin Yojana: 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'च्या ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी येणार? आदिती तटकरेंनी दिली माहिती
18
Asia Cup 2025: IND vs PAK सामन्यात 'अशी' असेल टीम इंडियाची Playing XI; माजी क्रिकेटरचा दावा
19
आरोग्य सांभाळा! जीभेचे चोचले पडतील महागात; मीठ, साखर, तेल... रोज किती खाणं योग्य?
20
तालिबानचे नवे फर्मान! इस्लामविरोधी असल्याचे सांगत अफगाण शाळांमधून काढून टाकले ५१ विषय

संरक्षित पाणीसाठ्याने बहरल्या फळबागा ! सातारा जिल्ह्यात १३०७ शेततळी पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2018 23:08 IST

जिल्ह्यात गेल्या काही वर्षांपासून जलक्रांती होत असतानाच राज्य शासनाची मागेल त्याला शेततळे ही योजनाही महत्त्वपूर्ण ठरू लागली आहे. कारण या शेततळ्यामुळे संरक्षित पाणी उपलब्ध होत असल्याने टंचाईतही फळबागा घेणे फायदेशीर ठरले आहे.

ठळक मुद्दे५ कोटी ३६ लाखांचे अनुदान वाटप

नितीन काळेल ।सातारा : जिल्ह्यात गेल्या काही वर्षांपासून जलक्रांती होत असतानाच राज्य शासनाची मागेल त्याला शेततळे ही योजनाही महत्त्वपूर्ण ठरू लागली आहे. कारण या शेततळ्यामुळे संरक्षित पाणी उपलब्ध होत असल्याने टंचाईतही फळबागा घेणे फायदेशीर ठरले आहे. तर या योजनेंतर्गंत जिल्ह्यात आतापर्यंत १३०७ शेततळी पूर्ण झाली असून, संबंधित शेतकºयांना ५ कोटी ३६ लाखांचे अनुदान प्राप्त झाले आहे. मार्च २०१९ अखेरपर्यंत २ हजार शेततळ्यांचे जिल्ह्याला उद्दिष्ट आहे.

शेती हाच जिल्ह्याचा केंद्रबिंदू ठरला आहे. जिल्ह्याच्या पश्चिम भागात समृद्धी असली तरी पूर्वेकडील माण, खटाव, कोरेगाव, फलटण आदी तालुक्यांत पाण्याचे दुर्भिक्ष जाणवते. तसेच वारंवारच्या दुष्काळाने चारा आणि पाणी टंचाईची समस्या निर्माण होते. माण, खटाव तालुक्यांत तर अद्यापही हजारो हेक्टर शेती पाण्याविना पडून आहे.

जिल्ह्यातील अनेक तालुक्यांत कमी-अधिक फरकाने अशीच परिसिथती असल्याने पावसाचा आधारच अशावेळी महत्त्वपूर्ण ठरतो. त्यातच अलीकडील काळात दुष्काळी तालुक्यातील चित्र पालटू लागले आहे. याला कारण, जलसंधारण व वॉटर कपच्या माध्यमातून झालेले काम. तसेच राज्य शासनाच्या मागेल त्याला शेततळे यामधूनही शास्वत पाणी उपलब्ध होत आहे. हे पाणी फळबागांसाठी उपयुक्त ठरत आहे; पण यासाठी पाऊस आवश्यक असून, या तळ्यातील पाणी टंचाई व उन्हाळ्यात गरजेनुसार वापरात येते.

राज्यात २०१६ पासून मागेल त्याला शेततळे, ही योजना सुरू झाली आहे. मार्च २०१९ अखेर जिल्ह्यात २ हजार शेततळी पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. आतापर्यंत जिल्ह्यात १३०७ शेततळी पूर्ण झाली आहेत. तर ५२ शेततळ्यांची कामे प्रगतिपथावर आहेत. शासनाकडून १३०७ शेतकºयांना अनुदानापोटी ५ कोटी ३६ लाख १५ हजार ४३७ रुपये देण्यात आले आहेत. तर या योजनेसाठी तब्बल ५०६३ अर्ज आॅनलाईन आले होते. या शेततळ्याला आकारानुसार २६ हजारांपासून ५० हजारांपर्यंत अनुदान मिळते. शेतकºयाच्या नावावर किमान ६० गुंठे जमीन असणे आवश्यक आहे. मात्र, जादा खर्च शेतकºयांना करावा लागतो.

दुष्काळी तालुक्यात अधिक फायदा...या शेततळ्यांचा फायदा विशेषत: करून माण, खटाव, फलटणसारख्या दुष्काळी तालुक्यांत अधिक करून होताना दिसतो. पावसाळ्यात शेततळ्यात पाणी साठते. हे पाणी टंचाईच्या काळात वापरात येते. फळबागांना हे पाणी फायदेशीर ठरते. कारण ठिबकवर असणाऱ्या बागांना हे पाणी पुरवून वापरता येते. त्यामुळे अनेक शेतकºयांनी या शेततळ्यावरच उन्हाळ्यातही फळबागा जोपासल्या आहेत. त्यामुळे संपूर्ण अर्थकारणच बदलून गेले आहे. 

शेततळी पूर्ण आकडेवारी तालुकानिहायमाण- ३००, फलटण- २६९, खटाव- २२८, कोरेगाव- १७८, खंडाळा- ८१, वाई- ७४, सातारा- ७२, कºहाड-७३, जावळी- १७, पाटण- १२ आणि महाबळेश्वर- ३.

टॅग्स :water shortageपाणीटंचाईSatara areaसातारा परिसर