शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
3
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
4
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
5
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
6
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
7
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
8
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
9
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
10
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
11
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
12
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
13
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
14
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
15
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
16
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
17
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
18
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
19
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
20
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या

संरक्षित पाणीसाठ्याने बहरल्या फळबागा ! सातारा जिल्ह्यात १३०७ शेततळी पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2018 23:08 IST

जिल्ह्यात गेल्या काही वर्षांपासून जलक्रांती होत असतानाच राज्य शासनाची मागेल त्याला शेततळे ही योजनाही महत्त्वपूर्ण ठरू लागली आहे. कारण या शेततळ्यामुळे संरक्षित पाणी उपलब्ध होत असल्याने टंचाईतही फळबागा घेणे फायदेशीर ठरले आहे.

ठळक मुद्दे५ कोटी ३६ लाखांचे अनुदान वाटप

नितीन काळेल ।सातारा : जिल्ह्यात गेल्या काही वर्षांपासून जलक्रांती होत असतानाच राज्य शासनाची मागेल त्याला शेततळे ही योजनाही महत्त्वपूर्ण ठरू लागली आहे. कारण या शेततळ्यामुळे संरक्षित पाणी उपलब्ध होत असल्याने टंचाईतही फळबागा घेणे फायदेशीर ठरले आहे. तर या योजनेंतर्गंत जिल्ह्यात आतापर्यंत १३०७ शेततळी पूर्ण झाली असून, संबंधित शेतकºयांना ५ कोटी ३६ लाखांचे अनुदान प्राप्त झाले आहे. मार्च २०१९ अखेरपर्यंत २ हजार शेततळ्यांचे जिल्ह्याला उद्दिष्ट आहे.

शेती हाच जिल्ह्याचा केंद्रबिंदू ठरला आहे. जिल्ह्याच्या पश्चिम भागात समृद्धी असली तरी पूर्वेकडील माण, खटाव, कोरेगाव, फलटण आदी तालुक्यांत पाण्याचे दुर्भिक्ष जाणवते. तसेच वारंवारच्या दुष्काळाने चारा आणि पाणी टंचाईची समस्या निर्माण होते. माण, खटाव तालुक्यांत तर अद्यापही हजारो हेक्टर शेती पाण्याविना पडून आहे.

जिल्ह्यातील अनेक तालुक्यांत कमी-अधिक फरकाने अशीच परिसिथती असल्याने पावसाचा आधारच अशावेळी महत्त्वपूर्ण ठरतो. त्यातच अलीकडील काळात दुष्काळी तालुक्यातील चित्र पालटू लागले आहे. याला कारण, जलसंधारण व वॉटर कपच्या माध्यमातून झालेले काम. तसेच राज्य शासनाच्या मागेल त्याला शेततळे यामधूनही शास्वत पाणी उपलब्ध होत आहे. हे पाणी फळबागांसाठी उपयुक्त ठरत आहे; पण यासाठी पाऊस आवश्यक असून, या तळ्यातील पाणी टंचाई व उन्हाळ्यात गरजेनुसार वापरात येते.

राज्यात २०१६ पासून मागेल त्याला शेततळे, ही योजना सुरू झाली आहे. मार्च २०१९ अखेर जिल्ह्यात २ हजार शेततळी पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. आतापर्यंत जिल्ह्यात १३०७ शेततळी पूर्ण झाली आहेत. तर ५२ शेततळ्यांची कामे प्रगतिपथावर आहेत. शासनाकडून १३०७ शेतकºयांना अनुदानापोटी ५ कोटी ३६ लाख १५ हजार ४३७ रुपये देण्यात आले आहेत. तर या योजनेसाठी तब्बल ५०६३ अर्ज आॅनलाईन आले होते. या शेततळ्याला आकारानुसार २६ हजारांपासून ५० हजारांपर्यंत अनुदान मिळते. शेतकºयाच्या नावावर किमान ६० गुंठे जमीन असणे आवश्यक आहे. मात्र, जादा खर्च शेतकºयांना करावा लागतो.

दुष्काळी तालुक्यात अधिक फायदा...या शेततळ्यांचा फायदा विशेषत: करून माण, खटाव, फलटणसारख्या दुष्काळी तालुक्यांत अधिक करून होताना दिसतो. पावसाळ्यात शेततळ्यात पाणी साठते. हे पाणी टंचाईच्या काळात वापरात येते. फळबागांना हे पाणी फायदेशीर ठरते. कारण ठिबकवर असणाऱ्या बागांना हे पाणी पुरवून वापरता येते. त्यामुळे अनेक शेतकºयांनी या शेततळ्यावरच उन्हाळ्यातही फळबागा जोपासल्या आहेत. त्यामुळे संपूर्ण अर्थकारणच बदलून गेले आहे. 

शेततळी पूर्ण आकडेवारी तालुकानिहायमाण- ३००, फलटण- २६९, खटाव- २२८, कोरेगाव- १७८, खंडाळा- ८१, वाई- ७४, सातारा- ७२, कºहाड-७३, जावळी- १७, पाटण- १२ आणि महाबळेश्वर- ३.

टॅग्स :water shortageपाणीटंचाईSatara areaसातारा परिसर