शहरं
Join us  
Trending Stories
1
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
2
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
3
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
4
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
5
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
6
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
7
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
8
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
9
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
10
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
11
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
12
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
13
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
14
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
15
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
16
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
17
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
18
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
19
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
20
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज

संरक्षित पाणीसाठ्याने बहरल्या फळबागा ! सातारा जिल्ह्यात १३०७ शेततळी पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2018 23:08 IST

जिल्ह्यात गेल्या काही वर्षांपासून जलक्रांती होत असतानाच राज्य शासनाची मागेल त्याला शेततळे ही योजनाही महत्त्वपूर्ण ठरू लागली आहे. कारण या शेततळ्यामुळे संरक्षित पाणी उपलब्ध होत असल्याने टंचाईतही फळबागा घेणे फायदेशीर ठरले आहे.

ठळक मुद्दे५ कोटी ३६ लाखांचे अनुदान वाटप

नितीन काळेल ।सातारा : जिल्ह्यात गेल्या काही वर्षांपासून जलक्रांती होत असतानाच राज्य शासनाची मागेल त्याला शेततळे ही योजनाही महत्त्वपूर्ण ठरू लागली आहे. कारण या शेततळ्यामुळे संरक्षित पाणी उपलब्ध होत असल्याने टंचाईतही फळबागा घेणे फायदेशीर ठरले आहे. तर या योजनेंतर्गंत जिल्ह्यात आतापर्यंत १३०७ शेततळी पूर्ण झाली असून, संबंधित शेतकºयांना ५ कोटी ३६ लाखांचे अनुदान प्राप्त झाले आहे. मार्च २०१९ अखेरपर्यंत २ हजार शेततळ्यांचे जिल्ह्याला उद्दिष्ट आहे.

शेती हाच जिल्ह्याचा केंद्रबिंदू ठरला आहे. जिल्ह्याच्या पश्चिम भागात समृद्धी असली तरी पूर्वेकडील माण, खटाव, कोरेगाव, फलटण आदी तालुक्यांत पाण्याचे दुर्भिक्ष जाणवते. तसेच वारंवारच्या दुष्काळाने चारा आणि पाणी टंचाईची समस्या निर्माण होते. माण, खटाव तालुक्यांत तर अद्यापही हजारो हेक्टर शेती पाण्याविना पडून आहे.

जिल्ह्यातील अनेक तालुक्यांत कमी-अधिक फरकाने अशीच परिसिथती असल्याने पावसाचा आधारच अशावेळी महत्त्वपूर्ण ठरतो. त्यातच अलीकडील काळात दुष्काळी तालुक्यातील चित्र पालटू लागले आहे. याला कारण, जलसंधारण व वॉटर कपच्या माध्यमातून झालेले काम. तसेच राज्य शासनाच्या मागेल त्याला शेततळे यामधूनही शास्वत पाणी उपलब्ध होत आहे. हे पाणी फळबागांसाठी उपयुक्त ठरत आहे; पण यासाठी पाऊस आवश्यक असून, या तळ्यातील पाणी टंचाई व उन्हाळ्यात गरजेनुसार वापरात येते.

राज्यात २०१६ पासून मागेल त्याला शेततळे, ही योजना सुरू झाली आहे. मार्च २०१९ अखेर जिल्ह्यात २ हजार शेततळी पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. आतापर्यंत जिल्ह्यात १३०७ शेततळी पूर्ण झाली आहेत. तर ५२ शेततळ्यांची कामे प्रगतिपथावर आहेत. शासनाकडून १३०७ शेतकºयांना अनुदानापोटी ५ कोटी ३६ लाख १५ हजार ४३७ रुपये देण्यात आले आहेत. तर या योजनेसाठी तब्बल ५०६३ अर्ज आॅनलाईन आले होते. या शेततळ्याला आकारानुसार २६ हजारांपासून ५० हजारांपर्यंत अनुदान मिळते. शेतकºयाच्या नावावर किमान ६० गुंठे जमीन असणे आवश्यक आहे. मात्र, जादा खर्च शेतकºयांना करावा लागतो.

दुष्काळी तालुक्यात अधिक फायदा...या शेततळ्यांचा फायदा विशेषत: करून माण, खटाव, फलटणसारख्या दुष्काळी तालुक्यांत अधिक करून होताना दिसतो. पावसाळ्यात शेततळ्यात पाणी साठते. हे पाणी टंचाईच्या काळात वापरात येते. फळबागांना हे पाणी फायदेशीर ठरते. कारण ठिबकवर असणाऱ्या बागांना हे पाणी पुरवून वापरता येते. त्यामुळे अनेक शेतकºयांनी या शेततळ्यावरच उन्हाळ्यातही फळबागा जोपासल्या आहेत. त्यामुळे संपूर्ण अर्थकारणच बदलून गेले आहे. 

शेततळी पूर्ण आकडेवारी तालुकानिहायमाण- ३००, फलटण- २६९, खटाव- २२८, कोरेगाव- १७८, खंडाळा- ८१, वाई- ७४, सातारा- ७२, कºहाड-७३, जावळी- १७, पाटण- १२ आणि महाबळेश्वर- ३.

टॅग्स :water shortageपाणीटंचाईSatara areaसातारा परिसर