शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
4
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
5
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
6
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
7
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
8
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
9
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
10
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
11
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
12
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
13
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
14
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
15
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
16
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
17
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
18
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
19
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
20
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त

सातारा जिल्ह्याला शनिवारपर्यंत ऑरेंज अलर्ट; कोयनेतून विसर्ग सुरुच, धरणाचे दरवाजे नऊ फुटांवर स्थिर

By नितीन काळेल | Updated: August 1, 2024 19:04 IST

धोम धरणांतून विसर्ग वाढला..

सातारा : जिल्ह्यात पाऊस वाढत असून हवामान विभागानेही शनिवारपर्यंत आॅरेंज अलर्ट दिला आहे. त्यामुळे पावसाच्या प्रमाणात वाढ होणार आहे. तर गुरूवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत नवजा येथे १२४ मिलिमीटर पर्जन्यमानाची नोंद झाली. कोयना धरणातही पाण्याची आवक कायम आहे. त्यामुळे धरणसाठा ८६ टीएमसीजवळ पोहोचला आहे. तसेच धरणातून विसर्ग कायम असल्याने दरवाजे ९ फुटांवर स्थिर आहेत.जिल्ह्याला मागील आठवड्यात जोरदार पावसाने झोडपून काढले. सलग दहा दिवस धो-धो पाऊस कोसळत होता. पूर्व भागातील माण, खटाव, फलटण, कोरेगाव आदी तालुक्यांतही चांगला पाऊस पडला. यामुळे खरीप हंगामातील पिकांना फायदा झाला आहे. तर पश्चिम भागात धुवाॅधार पाऊस झाला. कोयना, नवजा, तापोळा, महाबळेश्वरसह संपूर्ण कांदाटी खोऱ्यात पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले. तसेच धोम, बलकवडी, कण्हेर, उरमोडी, तारळी, कोयनासारख्या प्रमुख धरणांतही मोठ्या प्रमाणात पाणीसाठा झाला. त्यामुळे विसर्ग सुरू करावा लागला. मात्र, पाच दिवसांपासून पावसाचे प्रमाण कमी झाले होते. दोन दिवस उघडझाप सुरू राहिली. पण, बुधवारपासून पाऊस पुन्हा वाढू लागला आहे. गुरूवारीही सकाळपासून पाऊस सुरूच होता.

गुरूवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत कोयनानगर येथे ८८ मिलिमीटर पर्जन्यमान झाले. तर एक जूनपासून आतापर्यंत ३ हजार ७६३ मिलिमीटर पाऊस झाला आहे. नवजा येथे आतापर्यंत ४ हजार ४३६ मिलिमीटर पाऊस पडला. जिल्ह्यात पाथरपूंज नंतर नवजा येथेच सर्वाधिक पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. तर महाबळेश्वरला २४ तासांत ८४ तर दोन महिन्यांत ४ हजार ९८ मिलिमीटर पाऊस पडला आहे. पाऊस वाढल्याने कोयना धरणात येणाऱ्या पाण्याचीही आवक वाढत चालली आहे.सकाळच्या सुमारास सुमारे ४५ हजार क्यूसेक वेगाने पाणी येत होते. तर धरणातील पाणीसाठा ८५.८१ टीएमसी झाला होता. त्यातच मागील काही दिवसांपासून धरणातून विसर्ग सुरू आहे. पायथा वीजगृहातून २ हजार १०० क्यूसेक वेगाने पाणी सोडले जाते. त्याचबरोबर धरणाच्या सर्व सहा दरवाजातूनही ४० हजार क्यूसेक विसर्ग कायम आहे. सध्या धरणाचे दरवाजे नऊ फुटांवर स्थिर आहेत.

धोम धरणांतून विसर्ग वाढला..वाई तालुक्यातील धोम धरण पाणलोट क्षेत्रात पाऊस वाढला आहे. त्यामुळे धरणातही मोठ्या प्रमाणात पाणी आवक आहे. धरणातील पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी विसर्ग वाढविण्यात येणार आहे. सकाळच्या सुमारास ३ हजार ३६४ क्यूसेक वेगाने पाणी सोडण्यात येत होते. दुपारपासून सांडव्यावरुन सुमारे ४ हजार ३०० क्यूसेकपर्यंत विसर्ग करण्याचे नियोजन करण्यात आलेले होते. त्यामुळे कृष्णा नदीच्या पाणीपातळीत वाढ होणार आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरRainपाऊसKoyana Damकोयना धरण