शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
2
'ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांविरोधात जाऊ नये, हाच शरद पवारांच्या मंडळ यात्रेचा हेतू'; प्रकाश आंबेडकरांचा टोला
3
'मतचोरी' विरोधात इंडिया आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार
4
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
5
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
6
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
7
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
8
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
9
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
10
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
11
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
12
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
13
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
14
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
15
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
16
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
17
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
18
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
19
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
20
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...

चाऱ्याच्या साठवणुकीला ‘मुरघास’चा पर्याय उन्हाळ्यातील वैरणीची समस्या दूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2019 00:58 IST

योगेश घोडके। मुरघासची पद्धत ही गेल्या अनेक वर्षांपासून आम्ही करत आहोत. मुरघासमुळे जनावरांच्या दुधातही वाढ होते. तसेच उन्हाळ्यात चारा ...

योगेश घोडके।मुरघासची पद्धत ही गेल्या अनेक वर्षांपासून आम्ही करत आहोत. मुरघासमुळे जनावरांच्या दुधातही वाढ होते. तसेच उन्हाळ्यात चारा नसताना मुरघासचा उपयोग फायदेशीर ठरतो. त्यामुळे चाऱ्याची गंभीर समस्या जाणवत नाही. सर्व शेतकऱ्यांनी या पद्धतीचा अवलंब केला तर चाºयाचा प्रश्न उपस्थित होणार नाही.- शेखर अडसूळ, कापशी

 

सातारा : ग्रामीण भागामध्ये उन्हाळ्यात चारा प्रश्न गंभीर होत असतो. त्यामुळे बळीराजा गंजी स्वरुपात चाºयाची साठवणूक करत असतो. मात्र, ही गंजी डोंगराच्या पाथ्याशी असल्याने डोंगराला या ना त्या कारणाने वणवा लागतो. त्यामुळे गंजीला पर्याय ‘मुरघास’ आहे.सध्या डोंगरांना वणवा लागण्याचे प्रमाण मोठे आहे आणि गंजी या डोंगराच्या पाथ्याशी असतात. गंजीतील एका काडीने पेट घेतला तर संपूर्ण गंज पेटते. त्यामुळे जनावरांच्या चाºयाचा प्रश्न गंभीर होतो. मात्र, आता त्याला पर्याय म्हणून मुरघास या नवीन पद्धतीत चाºयाची साठवणूक केली जाते. यात वणव्याचाही प्रश्न राहात नाही.

मुरघास म्हणजे मुरलेला चारा असतो. हा चारा हिरवा असतो. मुरघास बनविण्यासाठी मका, ज्वारी, बाजरी व काही गवती चारा पिके वापरली जातात. यामध्ये मका या पिकाचा सर्वात जास्त वापर जगभरात केला जातो. मुरघास तयार करण्यापूर्वी सकाळी शेतातून मका चार तासांपूर्वी तोडावा; पण तोडण्यापूर्वी मक्याची कणसे हुरड्यात असणे गरचेचे आहे. त्यामुळे तो मका तोडण्यास योग्य असतो. शेतातून मका आणून, कुटी मशीनवर दोन ब्लेडने कुटी करून घेणे आवश्यक असते.

तसेच मुरघास करण्यासाठी प्लास्टिकची हजार किलोची मोठी पिशवी तयार असणे गरजेचे आहे. त्यामध्ये मशीनवर कुटी केलेला मका त्या पिशवीत टाकावा. पिशवीत टाकताना प्रत्येक एक फुटावर मुरघास पावडर पसरावी. त्यामुळे त्याला कोणत्याही प्रक ारची कीड लागत नाही. पिशवीमध्ये कुटलेला मका टाकल्यावर प्रेस करून घड्ड बसवणे आवश्यक आहे. तसेच चारा पौष्टिक अवस्थेत असताना त्यातील अन्नघटकांचा नाश ना होऊ देता किमान ४५ दिवस हवा बंद करून ठेवावी. ही पिशवी भरल्यानंतर पॅक करून त्यावर चाळीस किलो वजन ठेवणे गरजेचे आहे.चारा पिके चिकाच्या किंवा फुलोºयाच्या अवस्थेत आली की कापावीत. पीक कापणीनंतर थोड्यावेळासाठी चारा सुकू द्यावा. त्यानंतर कुट्टी मशीनच्या साह्याने चाºयाचे एक-दोन इंच लांबीचे तुकडे करावेत. कुट्टी केल्यानंतर शक्यतो ती एका जागेवर साठवून न ठेवता त्वरित बॅगेत टाकावीत.

कुट्टी टाकल्यानंतर ती पसरून पायाने तुडवावी. त्यातील हवा बाहेर निघून जाते. कुट्टी दाबून घ्यावी.एकावर एक चाºयाचा थर टाकून व्यवस्थित दाबून शेवटचा थर देखील चांगला दाबून घ्यावा. त्यावर त्वरित प्लास्टिकचे आच्छादन घालावे. यामुळे हिरवा चारा हवाबंद होतो. त्यानंतर प्लास्टिक आच्छादनावर सहा इंच जाडीचा मातीचा थर द्यावा. त्यावर पावसाचे पाणी साठून राहणार नाही, याची काळजी घ्यावी.एक चौरस फूट जागेत १५ ते १६ किलो चारा तयार होतो. गरज ओळखून खड्डे किंवा बांधकाम केले जावे.मुरघास बनविताना प्रत्येक थरावर काही जीवाणू असलेले द्रवण, मीठ फवारले जाते. त्यामुळे हिरवा चारा टिकून राहतो, मुरघास लवकर तयार होतो. बुरशीही लागत नाही.पहिल्या वेळी मुरघास बनविताना त्यात काहीही टाकू नये. प्रायोगिक तत्त्वावर मुरघास करून पाहावा, शिकून घ्यावे. शक्य असल्यास जीवाणूंचे द्र्रावण फवारावे, त्यामुळे खराब होण्याची शक्यता कमी होते.