शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

चाऱ्याच्या साठवणुकीला ‘मुरघास’चा पर्याय उन्हाळ्यातील वैरणीची समस्या दूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2019 00:58 IST

योगेश घोडके। मुरघासची पद्धत ही गेल्या अनेक वर्षांपासून आम्ही करत आहोत. मुरघासमुळे जनावरांच्या दुधातही वाढ होते. तसेच उन्हाळ्यात चारा ...

योगेश घोडके।मुरघासची पद्धत ही गेल्या अनेक वर्षांपासून आम्ही करत आहोत. मुरघासमुळे जनावरांच्या दुधातही वाढ होते. तसेच उन्हाळ्यात चारा नसताना मुरघासचा उपयोग फायदेशीर ठरतो. त्यामुळे चाऱ्याची गंभीर समस्या जाणवत नाही. सर्व शेतकऱ्यांनी या पद्धतीचा अवलंब केला तर चाºयाचा प्रश्न उपस्थित होणार नाही.- शेखर अडसूळ, कापशी

 

सातारा : ग्रामीण भागामध्ये उन्हाळ्यात चारा प्रश्न गंभीर होत असतो. त्यामुळे बळीराजा गंजी स्वरुपात चाºयाची साठवणूक करत असतो. मात्र, ही गंजी डोंगराच्या पाथ्याशी असल्याने डोंगराला या ना त्या कारणाने वणवा लागतो. त्यामुळे गंजीला पर्याय ‘मुरघास’ आहे.सध्या डोंगरांना वणवा लागण्याचे प्रमाण मोठे आहे आणि गंजी या डोंगराच्या पाथ्याशी असतात. गंजीतील एका काडीने पेट घेतला तर संपूर्ण गंज पेटते. त्यामुळे जनावरांच्या चाºयाचा प्रश्न गंभीर होतो. मात्र, आता त्याला पर्याय म्हणून मुरघास या नवीन पद्धतीत चाºयाची साठवणूक केली जाते. यात वणव्याचाही प्रश्न राहात नाही.

मुरघास म्हणजे मुरलेला चारा असतो. हा चारा हिरवा असतो. मुरघास बनविण्यासाठी मका, ज्वारी, बाजरी व काही गवती चारा पिके वापरली जातात. यामध्ये मका या पिकाचा सर्वात जास्त वापर जगभरात केला जातो. मुरघास तयार करण्यापूर्वी सकाळी शेतातून मका चार तासांपूर्वी तोडावा; पण तोडण्यापूर्वी मक्याची कणसे हुरड्यात असणे गरचेचे आहे. त्यामुळे तो मका तोडण्यास योग्य असतो. शेतातून मका आणून, कुटी मशीनवर दोन ब्लेडने कुटी करून घेणे आवश्यक असते.

तसेच मुरघास करण्यासाठी प्लास्टिकची हजार किलोची मोठी पिशवी तयार असणे गरजेचे आहे. त्यामध्ये मशीनवर कुटी केलेला मका त्या पिशवीत टाकावा. पिशवीत टाकताना प्रत्येक एक फुटावर मुरघास पावडर पसरावी. त्यामुळे त्याला कोणत्याही प्रक ारची कीड लागत नाही. पिशवीमध्ये कुटलेला मका टाकल्यावर प्रेस करून घड्ड बसवणे आवश्यक आहे. तसेच चारा पौष्टिक अवस्थेत असताना त्यातील अन्नघटकांचा नाश ना होऊ देता किमान ४५ दिवस हवा बंद करून ठेवावी. ही पिशवी भरल्यानंतर पॅक करून त्यावर चाळीस किलो वजन ठेवणे गरजेचे आहे.चारा पिके चिकाच्या किंवा फुलोºयाच्या अवस्थेत आली की कापावीत. पीक कापणीनंतर थोड्यावेळासाठी चारा सुकू द्यावा. त्यानंतर कुट्टी मशीनच्या साह्याने चाºयाचे एक-दोन इंच लांबीचे तुकडे करावेत. कुट्टी केल्यानंतर शक्यतो ती एका जागेवर साठवून न ठेवता त्वरित बॅगेत टाकावीत.

कुट्टी टाकल्यानंतर ती पसरून पायाने तुडवावी. त्यातील हवा बाहेर निघून जाते. कुट्टी दाबून घ्यावी.एकावर एक चाºयाचा थर टाकून व्यवस्थित दाबून शेवटचा थर देखील चांगला दाबून घ्यावा. त्यावर त्वरित प्लास्टिकचे आच्छादन घालावे. यामुळे हिरवा चारा हवाबंद होतो. त्यानंतर प्लास्टिक आच्छादनावर सहा इंच जाडीचा मातीचा थर द्यावा. त्यावर पावसाचे पाणी साठून राहणार नाही, याची काळजी घ्यावी.एक चौरस फूट जागेत १५ ते १६ किलो चारा तयार होतो. गरज ओळखून खड्डे किंवा बांधकाम केले जावे.मुरघास बनविताना प्रत्येक थरावर काही जीवाणू असलेले द्रवण, मीठ फवारले जाते. त्यामुळे हिरवा चारा टिकून राहतो, मुरघास लवकर तयार होतो. बुरशीही लागत नाही.पहिल्या वेळी मुरघास बनविताना त्यात काहीही टाकू नये. प्रायोगिक तत्त्वावर मुरघास करून पाहावा, शिकून घ्यावे. शक्य असल्यास जीवाणूंचे द्र्रावण फवारावे, त्यामुळे खराब होण्याची शक्यता कमी होते.