शहरं
Join us  
Trending Stories
1
चार पॅराशूटच्या मदतीने यान समुद्रात उतरले, भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्ला पृथ्वीवर सुखरूप परतले
2
भारतीय लष्कराच्या मानहानी प्रकरणात राहुल गांधी लखनौ न्यायालयात सरेंडर, तत्काळ मिळाला जामीन; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
3
शुभांशू शुक्ला परतले, पंतप्रधान मोदींनी स्वागत केले; गगनयान मोहिमेचा उल्लेख करत म्हणाले...
4
राहुल गांधींना वाचन करण्याचा आदेश कसा द्यायचा? सावरकरांवरील याचिका हायकोर्टाने फेटाळली
5
फक्त २० रुपयांमध्ये २ लाखांचा विमा! मोदी सरकारची 'ही' योजना संकटात बनेल आधार! कसा करायचा अर्ज?
6
"तुमच्यापेक्षा जास्त बोलता येते..."; विधानसभेत ठाकरेंचे आमदार आणि शिंदेसेनेचे मंत्री भिडले
7
"मराठी माणसानेच मराठी भाषेचं नुकसान केलं...", आपल्याच भाषेबद्दल हे काय बोलून गेला आस्ताद काळे? भडकले चाहते
8
"खाण्यासाठीच कमावतोय..."; मॅनेजरने लंच ब्रेक घेण्यापासून रोखलं, कर्मचाऱ्याने सडेतोड उत्तर दिलं
9
४ दिवसांच्या घसरणीनंतर बाजाराची जोरदार मुसंडी! हिरो मोटो ते सन फार्मा... 'या' शेअर्सने केलं मालामाल
10
Pune Porsche Accident Update: दोघांना उडवणाऱ्या आरोपीला दिलासा, पोलिसांना मोठा झटका; न्याय मंडळाचा निर्णय काय?
11
बेडरुमचा दरवाजा वाजवला, आईला संशय आला; दार तोडताच रक्ताच्या थारोळ्यात दिसले पती-पत्नी
12
विकली जाणार ५४ वर्ष जुनी 'ही' कंपनी, तुम्ही नक्कीच नाव ऐकलं असणार; ४५ देशांत आहे ६,४८२ कोटींचा व्यवसाय 
13
सरकार नेमके कोणाला, कशाला 'अर्बन नक्षलवाद' ठरवणार आहे?; जनसुरक्षा कायद्यावरून प्रकाश आंबेडकरांचा सवाल
14
'कुठल्या दलित व्यक्तीला का पाठवलं नाही?', शुभांशू शुक्ला यांच्या अंतराळ यात्रेवर काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याची टीका!
15
चॅरिटेबल ट्रस्टच्या नावाखाली 'प्रोजेक्ट' धर्मांतर सुरू होते, काम करणाऱ्या मुलींना पैसे दिले जात होते
16
डाएटिंग, व्यायाम... सर्व करुन दमलात पण वजन कमीच होईना; रोजच्या 'या' ६ सवयी जबाबदार
17
Ritual: स्त्रियांनी साष्टांग नमस्कार घालू नये असे म्हणतात; पण का? जाणून घ्या शास्त्रार्थ!
18
जुन्या घरात सापडला सांगाडा, नोकियाच्या फोनने असं उघड केलं १० वर्षांपूर्वी झालेल्या मृत्यूचं गुपित, पोलिसही अवाक्
19
Bank of Baroda मध्ये जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१५,११४ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
20
Manglagauri 2025 Date: यंदा मंगळागौर कधी? ही घ्या तारखांची यादी, 'अशी' करा सुंदर तयारी लवकर..

देशातल्या विरोधी पक्षांना ‘पॅरेलिसीस’ झालाय--प्रकाश आंबेडकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2018 21:31 IST

‘सध्या देशातले वातावरण हे भाजप सरकारच्या विरोधात आहे; पण देशातल्या मोठ्या राजकीय विरोधी पक्षांना पॅरेलिसीस झालाय; काँगे्रस तर लोक स्वत:हून आपल्या हातात सत्ता देतील,

कऱ्हाड : ‘सध्या देशातले वातावरण हे भाजप सरकारच्या विरोधात आहे; पण देशातल्या मोठ्या राजकीय विरोधी पक्षांना पॅरेलिसीस झालाय; काँग्रेस तर लोक स्वत:हून आपल्या हातात सत्ता देतील, याची वाट बघत बसले आहेत,’ अशी टीका भारिप बहुजन महासंघाचे राष्ट्रीय नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केली.

पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असलेले प्रकाश आंबेडकर गुरुवारी कोल्हापूरहून साताऱ्याला जात असताना कऱ्हाडात थांबून काही कार्यकर्त्यांशी संवाद साधला. त्यावेळी ते माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलत होते. यावेळी दलित महासंघाचे संस्थापक प्रा. डॉ. मच्छिंद्र सकटे, प्रा. पुष्पलता सकटे, प्रकाश वायदंडे, जावेद नायकवडी, अप्पा बडेकर आदींची प्रमुख उपस्थिती होती.आंबेडकर म्हणाले, ‘देशाची एकंदरीत परिस्थिती पाहता ती हाताबाहेर चालल्याचे दिसते. संविधानच अडचणीत आले आहे. त्यामुळे संविधान वाचविण्यासाठी आमचा लढा आहे. त्यासाठी सर्वत्र फिरत असून, त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून आपण लोकांच्या समोर जात असून, गेल्या सत्तर वर्षांत ज्यांनी लोकसभेत पायही ठेवला नाही, अशा जाती-जमातीतील लोकांना लोकसभेत उमेदवारी देण्याचा आपला निर्धार आहे. जे आजवर सत्तेपासून वंचित राहिले आहेत. त्यांना सत्तेत आणण्यासाठीच आपली ही नवीन लढाई आहे.’त्यामुळेच कर्नाटकात काँगे्रसचा पराभव !‘कर्नाटक राज्यात शिवम आयोग लागू करून त्याची अंमलबजावणी तातडीने करा, अशी आमची मागणी होती. मात्र कर्नाटकातील काँगे्रसच्या मुख्यमंत्र्यांनी त्याकडे लक्ष दिले नाही. त्याचाच परिणाम म्हणून कर्नाटकात काँगे्रसचा पराभव झाला,’ असेही आंबेडकर एका प्रश्नाला उत्तर देताना म्हणाले.ते आहेत तेथेच सुखी आहेतबहुजन आघाडीत आपण सर्वांना बरोबर घेण्याचा प्रयत्न करताय, ही बाब चांगली आहे. मग दलितांचे नेतृत्व करणाºया तुमच्या जुन्या मित्रांना बरोबर घेणार का? याबाबत छेडले असता, ‘ते आहेत तेथेच सुखी आहेत,’ असा टोला रामदास आठवलेंचे नाव न घेता प्रकाश आंबेडकरांनी लगावला....तर हा सुद्धा बदल कराआपल्याला राज्यात अन् देशात राजकीय बदल घडवून आणायचा आहे. त्यामुळे आपण स्वत:सुद्धा काही बदल केले पाहिजेत, असे सांगत स्वागतला पुष्पगुच्छ, बुके देत बसू नका, हा सुद्धा बदल तुम्ही स्वत:त करा, असे म्हणत त्यांनी कार्यकर्त्यांनी स्वागतासाठी आणलेले बुके, हार स्वीकारणे टाळले.

 

टॅग्स :Satara areaसातारा परिसरPoliticsराजकारण