शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
6
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
7
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
8
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
9
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
10
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
11
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
12
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
13
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
14
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
15
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
16
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
17
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
18
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
19
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
20
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
Daily Top 2Weekly Top 5

पॅनेलबंदी कायद्याबाबत विधी विभागाचे मागवले मत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2021 04:40 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : पॅनेलबंदी कायदा तसेच सरपंचावर सहा महिन्यांऐवजी अडीच वर्षापर्यंत अविश्वास ठराव आणता येणार नाही, ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : पॅनेलबंदी कायदा तसेच सरपंचावर सहा महिन्यांऐवजी अडीच वर्षापर्यंत अविश्वास ठराव आणता येणार नाही, हे दोन कायदे मंजूर करून घेण्याच्या हालचाली सुरू आहेत. राज्याच्या ग्रामविकास विभागाने विधी विभागाचे मत मागवले आहे.

सरपंच यांच्यावर अविश्वास ठराव कालावधी सहा महिने होता, तो कालावधी वाढवून अडीच वर्षे केल्याबाबतची घोषणा राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी नुकतीच केली होती तसेच निवडणुकीमध्ये पॅनेलबंदी कायदा करण्याबाबतची घोषणादेखील त्यांनी केली होती; परंतु सध्या राज्यांमधील १४ हजार ग्रामपंचायतींच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्या. अनुषंगाने राज्य सरकारने हालचाली सुरू केल्या आहेत.

हे कायदे ग्रामपंचायतीच्या कामकाजासाठी अतिमहत्त्वाचे आहेत, तसेच गेल्या अधिवेशनामध्ये हे कायदे मंजूर करून घ्यावे व त्याची अंमलबजावणी आता होणाऱ्या निवडणुकीमध्ये व्हावी, ही सरपंच परिषद पुणे यांची मागणी आहे. याच मुद्द्यावर विधान परिषद निवडणुकीमध्ये सरपंच परिषदेने महाविकास आघाडीला जाहीर पाठिंबा दिला होता.

सरपंच परिषदेच्यावतीने राज्याचे सहकार मंत्री तथा पालकमंत्री बाळासाहेब पाटील, महाविकास आघाडीमधील प्रमुख नेते माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांची भेट घेऊन त्यांच्याकडे या दोन्ही मुद्द्यांवर अधिवेशनामध्ये चर्चा घडवून आणावी, हे दोन कायदे अधिवेशनात मंजूर करून घ्यावे व त्याची अंमलबजावणी आगामी निवडणुकांमध्ये करण्यात यावी, यासाठी आग्रह धरण्यात आला.

ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा इतिहास पाहिला तर ही निवडणूक गावातील स्थानिक गटांमध्ये होत असते. पक्षातील नेते मंडळी दोन तीन गटांमध्ये विभागून निवडणुकीसाठी पॅनेल उभे करतात. त्यानंतर सरपंच, उपसरपंच निवडीमध्ये मोठी रस्सीखेच होत असते. आर्थिक प्रलोभन दाखवून निवडून आलेल्या सदस्यांची ओढाओढ केली जाते. यामध्ये गावातील राजकारण ढवळून निघते तसेच अनेकदा मारामारीच्या गंभीर घटनादेखील घडतात. अस्थिर राजकारणाचा स्थानिक जनतेलादेखील त्रास होत असतो.

ग्रामपंचायतीची उमेदवारी अर्ज दाखल करून घेत असताना स्थानिक पॅनल व त्यांचे उमेदवार यांची माहिती निवडणूक विभागाकडून घेतली जात असते. समिती आणि जिल्हा परिषद यांना पॅनलबंदी कायदा आहे मात्र ग्रामपंचायतीला तो ना, त्यामुळे पॅनेलच्या माध्यमातून निवडणूक लढवायची आणि निवडून आल्यानंतर कोलांटउड्या मारायच्या, असे प्रकार गावोगावी ग्रामपंचायत सदस्यांकडून केले जात असतात. करायला पॅनलबंदी कायद्यामुळे शह बसणार आहे. हे दोन्ही कायदे आगामी काळात मंजूर करून त्याची अंमलबजावणी करावी, अशी गावोगावच्या नेत्यांची मागणी आहे.

कोट

सरपंच परिषद पुणे महाराष्ट्रचे पदाधिकारी व सरपंच यांनी घेतली होती आणि प्रत्येक जिल्ह्यातील पदाधिकारी यांनी त्यांच्या मंत्रिमहोदय यांच्याकडे मागणी केली होती. प्रथमच ही मागणी आणि कायद्यात सुधारणा होणे कसे जरुरीचे आहे, हे पटवून दिले होते. त्याबाबतचा पाठपुरावा केला, त्याला यश आले.

- जितेंद्र भोसले, अध्यक्ष, सरपंच परिषद पुणे, महाराष्ट्र