शहरं
Join us  
Trending Stories
1
शक्तिपीठ महामार्गाला मंजुरी, २० हजार कोटींची तरतूद; GSTत बदल होणार, मंत्रिमंडळाचे मोठे निर्णय
2
Rahul Gandhi :'निवडणुका नियमांनुसार होतात', राहुल गांधींच्या आरोपांवर निवडणूक आयोगाचे उत्तर; चर्चेसाठी बोलावले
3
विहिरीत पडलेल्या वासराला वाचवण्यासाठी उतरलेले तरुण एका पाठोपाठ एक बेशुद्ध पडले, पाच जणांचा मृत्यू, संपूर्ण गावावर शोककळा  
4
"हात लावशील तर ३५ तुकडे करेन"; मधुचंद्राच्या रात्रीच नवरीने दिली थेट धमकी! म्हणाली...
5
अहमदाबाद विमान अपघात: ब्लॅक बॉक्सची माहिती कधीपर्यंत मिळेल? केंद्रीय मंत्री नायडू म्हणाले...
6
हिंदी मोफत शिकवत असतील तर त्यात गैर काय?; राष्ट्रवादी आमदार संग्राम जगतापांचा सवाल
7
ज्या कतारवर हल्ला केला, त्याच कतारच्या शेखने फोन केला...; अन् इराण सीझफायरसाठी तयारही झाला...
8
"अमेरिकेला गुडघे टेकायला लावले, इराण बनला मुस्लिम जगताचा नेता’’, महबूबा मुफ्ती यांनी केलं कौतुक  
9
यंदा जूनमध्येच 'अलमट्टी' ६१ टक्के भरले; कृष्णा नदीकाठच्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
10
युद्धबंदीच्या बातमीनंतर सेन्सेक्स-निफ्टी वधारले, पण 'या' कंपन्यांचे शेअर्स धडाधड कोसळले; काय आहे कारण?
11
Raj Thackeray : 'दोन्ही ठाकरे एकत्र न आल्यास मराठी माणूस हताश होईल'; मनसे नेत्याचं मोठं विधान
12
लग्नानंतर दरमहा १०,००० फिक्स! पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत फक्त एकदाच करा गुंतवणूक!
13
"शूट करुन मग सर्जरी करायची...", अपघातानंतर अलका कुबल यांना निर्मात्यांकडून आला कटू अनुभव
14
"आधार कार्ड अपडेट करून येते"; बहाणा सांगून लग्नाच्या १०व्या दिवशी पत्नी झाली फरार! सोबत नवऱ्याचे पैसेही नेले
15
ENG vs IND : भारतीय क्रिकेटमध्ये दुखवटा! मैदानात दोन्ही संघांतील खेळाडूंनी दिग्गज फिरकीपटूला वाहिली श्रद्धांजली
16
Gold Silver Price 24 June: एका झटक्यात सोनं झालं ₹२ हजारांपेक्षाही स्वस्त; Iran-Israel युद्ध थांबलं तर चांदीचीही चमक झाली कमी
17
मुख्यमंत्री फडणवीसांच्या मतदारसंघात ५ महिन्यात ८ टक्के मतदार वाढ ही मतचोरीच- हर्षवर्धन सपकाळ
18
पत्नीच्या हत्येचा आरोपी NSG कमांडो, 'ऑपरेशन सिंदूर'च्या नावाखाली बचाव करत होता, सुप्रीम कोर्ट काय म्हणाले?
19
'गब्बर सिंगला डायलॉग शिकवले', यावरून ट्रोल होतायेत सचिन पिळगावकर; नक्की काय म्हणाले होते? पाहा Video
20
Jyeshtha Amavasya 2025: घरातले आजारपण, भांडणतंटा कमी होत नसेल तर ज्येष्ठ अमावास्येला करा 'हे' उपाय!

सरकारचे खरे रुप जनतेसमोर उघड

By admin | Updated: July 4, 2015 00:03 IST

चव्हाण : मसूरला मेळावा; बाजार समितीची निवडणूक आघाडीतून लढण्याचे दिले संकेत

मसूर : सोशल मीडियाचा वापर करून सत्तेवर आलेल्यो भाजपा सरकारचे खरे रूप जनतेपुढे येऊ लागले आहे. हुकूमशाही पद्धतीने देशाचा कारभार चालला असून, केंद्रातील आणि राज्यातील मंत्र्यांच्या बनावट पदव्या व बाहेर पडत असलेले विविध घोटाळ्यांचे आरोप होऊन अठरा दिवस उलटले तरी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एकही ‘ब्र’ शब्द काढला नाही. माझ्या पक्षातील मंत्री दोषी नाहीत, हे म्हणण्याची ताकद मोदींच्याकडे नाही, हे मोठे दुर्दैव आहे. कऱ्हाड शेती उत्पन्न बाजार समितीने गत पाच वर्षांत उत्कृष्ट कारभार केला असल्याचे सांगून आगामी निवडणुकीत आघाडी होणार असल्याचे संकेत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिले.मसूर, ता. कऱ्हाड येथे कऱ्हाड शेती उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसंदर्भात कऱ्हाड उत्तरमधील कार्यकर्त्यांची मते जाणून घेण्यासाठी आयोजित मेळाव्यात ते बोलत होते.यावेळी आमदार आनंदराव पाटील, कऱ्हाड उत्तर काँग्रेसचे अध्यक्ष अविनाश नलवडे, धैर्यशील कदम, नंदकुमार डुबल, बाळासाहेब साळुंखे, मारुती जाधव, सुनील पाटील, जितेंद्र भोसले, अमित जाधव, सुदाम दीक्षित, डॉ. शंकरराव पवार, प्रतिभा जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती.चव्हाण म्हणाले, महाराष्ट्रातील सरकारमध्ये पदवी चोरणारी माणसे मंत्रिमंडळात असून, खुद्द शिक्षणमंत्र्यांचीच पदवी बनावट आहे. हे मोठे दुर्भाग्य आहे. परदेशातून काळा पैसा देशात आणू, असे म्हणून सत्तेवर आलेल्या सरकारने एकवीस हजार कोटींचा देशद्रोह केलेल्यांना पाठिंबा देत मौन का पाळले आहे. सोळा महिन्यांत सोळा देशांना भेटी देणारे मोदी हे पहिले पतंप्रधान आहेत. देशातील माल निर्यात करायचा सोडून बाहेरचे उद्योग आयात करून भारतातील उद्योगपतींना देशोधडीला लावण्याचा उद्योग सुरू आहे. राज्याचे मुख्यमंत्री सुद्धा सात देशाला भेट देऊन आले. शिक्षणंमत्र्यांनी निवडणूक आयोगाच्या शपथ पत्रात पदवी लिहिली आहे. त्यांनी बारावीनंतर कोणता तरी कोर्स मान्यता नसलेल्या संस्थेतून केला आहे. सहकारी संस्था चांगल्या चालल्या पाहिजेत. कऱ्हाड बाजार समितीचे पाच वर्षांत चांगला कारभार केला आहे. निवडणुकीसंदर्भात योग्य ती निर्णय घेतला जाईल. राज्यात पुन्हा काँग्रेसचे सरकार सत्तेवर येईल, मरगळ झटकून निवडणुकांना ताकदीने समोर जावा,’ असे आवाहन केले.यावेळी आनंदराव पाटील, धैर्यशील कदम, सुरेश घोलप, जितेंद्र भोसले, जयसिंग जाधव, वसंत पवार, यांची भाषणे झाली. गोल्डन पवार यांनी सूत्रसंचालन केले. उमेश साळुंखे यांनी आभार मानले. मेळाव्यास कऱ्हाड उत्तरमधील कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते. (वार्ताहर)चुकीच्या धोरणामुळे साखर उद्योग अडचणीतचुकीच्या धोरणामुळे साखर उद्योग अडचणीत सापडला आहे. ऊस तसेच दूध उत्पादक व दुष्काळग्रस्तांना पॅकेज देण्याची घोषणा केवळ अश्वासनच ठरले आहे. ऊस व दूध उत्पादक हवालदिल झाले आहेत. ई-टेंडरमधून पारदर्शकता येत आहे, तरी ही ई-टेंडरशिवाय २०६ कोटींची खरेदी कशी झाली याचे स्पष्टीकरण दिले नाही. असेही यावेळी पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.