शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

सरकारचे खरे रुप जनतेसमोर उघड

By admin | Updated: July 4, 2015 00:03 IST

चव्हाण : मसूरला मेळावा; बाजार समितीची निवडणूक आघाडीतून लढण्याचे दिले संकेत

मसूर : सोशल मीडियाचा वापर करून सत्तेवर आलेल्यो भाजपा सरकारचे खरे रूप जनतेपुढे येऊ लागले आहे. हुकूमशाही पद्धतीने देशाचा कारभार चालला असून, केंद्रातील आणि राज्यातील मंत्र्यांच्या बनावट पदव्या व बाहेर पडत असलेले विविध घोटाळ्यांचे आरोप होऊन अठरा दिवस उलटले तरी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एकही ‘ब्र’ शब्द काढला नाही. माझ्या पक्षातील मंत्री दोषी नाहीत, हे म्हणण्याची ताकद मोदींच्याकडे नाही, हे मोठे दुर्दैव आहे. कऱ्हाड शेती उत्पन्न बाजार समितीने गत पाच वर्षांत उत्कृष्ट कारभार केला असल्याचे सांगून आगामी निवडणुकीत आघाडी होणार असल्याचे संकेत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिले.मसूर, ता. कऱ्हाड येथे कऱ्हाड शेती उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसंदर्भात कऱ्हाड उत्तरमधील कार्यकर्त्यांची मते जाणून घेण्यासाठी आयोजित मेळाव्यात ते बोलत होते.यावेळी आमदार आनंदराव पाटील, कऱ्हाड उत्तर काँग्रेसचे अध्यक्ष अविनाश नलवडे, धैर्यशील कदम, नंदकुमार डुबल, बाळासाहेब साळुंखे, मारुती जाधव, सुनील पाटील, जितेंद्र भोसले, अमित जाधव, सुदाम दीक्षित, डॉ. शंकरराव पवार, प्रतिभा जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती.चव्हाण म्हणाले, महाराष्ट्रातील सरकारमध्ये पदवी चोरणारी माणसे मंत्रिमंडळात असून, खुद्द शिक्षणमंत्र्यांचीच पदवी बनावट आहे. हे मोठे दुर्भाग्य आहे. परदेशातून काळा पैसा देशात आणू, असे म्हणून सत्तेवर आलेल्या सरकारने एकवीस हजार कोटींचा देशद्रोह केलेल्यांना पाठिंबा देत मौन का पाळले आहे. सोळा महिन्यांत सोळा देशांना भेटी देणारे मोदी हे पहिले पतंप्रधान आहेत. देशातील माल निर्यात करायचा सोडून बाहेरचे उद्योग आयात करून भारतातील उद्योगपतींना देशोधडीला लावण्याचा उद्योग सुरू आहे. राज्याचे मुख्यमंत्री सुद्धा सात देशाला भेट देऊन आले. शिक्षणंमत्र्यांनी निवडणूक आयोगाच्या शपथ पत्रात पदवी लिहिली आहे. त्यांनी बारावीनंतर कोणता तरी कोर्स मान्यता नसलेल्या संस्थेतून केला आहे. सहकारी संस्था चांगल्या चालल्या पाहिजेत. कऱ्हाड बाजार समितीचे पाच वर्षांत चांगला कारभार केला आहे. निवडणुकीसंदर्भात योग्य ती निर्णय घेतला जाईल. राज्यात पुन्हा काँग्रेसचे सरकार सत्तेवर येईल, मरगळ झटकून निवडणुकांना ताकदीने समोर जावा,’ असे आवाहन केले.यावेळी आनंदराव पाटील, धैर्यशील कदम, सुरेश घोलप, जितेंद्र भोसले, जयसिंग जाधव, वसंत पवार, यांची भाषणे झाली. गोल्डन पवार यांनी सूत्रसंचालन केले. उमेश साळुंखे यांनी आभार मानले. मेळाव्यास कऱ्हाड उत्तरमधील कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते. (वार्ताहर)चुकीच्या धोरणामुळे साखर उद्योग अडचणीतचुकीच्या धोरणामुळे साखर उद्योग अडचणीत सापडला आहे. ऊस तसेच दूध उत्पादक व दुष्काळग्रस्तांना पॅकेज देण्याची घोषणा केवळ अश्वासनच ठरले आहे. ऊस व दूध उत्पादक हवालदिल झाले आहेत. ई-टेंडरमधून पारदर्शकता येत आहे, तरी ही ई-टेंडरशिवाय २०६ कोटींची खरेदी कशी झाली याचे स्पष्टीकरण दिले नाही. असेही यावेळी पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.