शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

निवडून आलात तरच जातपडताळणी दाखला

By admin | Updated: July 27, 2015 00:22 IST

उमेदवारांचे कष्ट पाण्यात : कोल्हापूरच्या जातपडताळणी विभागाचा नियम

पाटण : ग्रामपंचायत निवडणुकीसाठी जाती-जमाती प्रवर्गासाठी निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांनी जातपडताळणीसाठी अर्ज केल्याची पावती जोडण्याची अट घातल्यामुळे पाटण तालुक्यासह जिल्ह्यातील अशा उमेदवारांनी जातपडताळणीसाठी कोल्हापूरची वारी केली. आता मात्र निवडून आलेल्या उमेदवारांनाच जातपडताळणी दाखला देण्यात येईल, असा निर्णय घेतल्यामुळे हजारो उमेदवारांचे कष्ट पाण्यात जाणार की काय, अशी शक्यता निर्माण झाली आहे.ग्रामपंचायत निवडणुकांसाठी विविध जाती-जमातींच्या प्रवर्गासाठी जे निवडणूक लढविणार आहेत. त्यांना कोल्हापूर येथील जातपडताळणीसाठी अर्ज केल्याची पावती जोडल्याशिवाय उमेदवारी अर्ज भरता येणार नाही, अशी अट लादल्यामुळे गेल्या वीस दिवसांमध्ये पाटण तालुक्यासहीत इतर जिल्ह्यातील हजारो इच्छुक उमेदवारांनी कोल्हापूर येथे जाऊन जातपडताळणी पावती मिळविली. त्यासाठी कागदपत्रांची पूर्तता करता करता उमेदवारांची चांगलीच दमछाक झाली. आता मात्र निवडून आलेल्यांनाच जातपडताळणी दाखला देण्यात येईल, असा नियम केल्यामुळे उमेदवार बुचकळ्यात पडले आहेत.ग्रामपंचायत निवडणुका जाहीर झाल्यानंतर विविध जातींच्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी दाखल्यांची मोठी डोकेदुखी निर्माण झाली. त्यासाठी तहसील कार्यालयातील सेतू केंद्र, मुद्रांक विक्रेते आणि तहसीलदार व प्रांताधिकारी अशी प्रक्रिया पार पाडताना अनेकांना नाकीनऊ आले. महिलांना तर कोल्हापूरला जातपडताळणीसाठी जावे लागल्याने मोठा त्रास सहन करावा लागला. त्यातच जाईल तिथे आर्थिक पिळवणूक सहन करावी लागली. शेवटी जातपडताळणी करण्यासाठी अर्ज केल्याची पावती मिळेपर्यंत प्रत्येकाचे हजार ते दोन हजार रुपये खर्च झाले. आता कोल्हापूरच्या जातपडताळणी केंद्राने जे ग्रामपंचायतीत निवडून येतील, अशांनाच दाखले दिले जातील, असा नियम काढला आहे. त्यामुळे जातपडताळणीसाठी अर्ज केलेल्या इतरांना दाखले मिळणार नाहीत. पैसा, वेळ व झालेला त्रास याची भरपाई कोण देणार? कोल्हापूर येथील केंद्रात जातपडताळणीची पावती देताना प्रत्येकी १०० रुपये घेतले गेले, मग सातारा जिल्ह्यातील हजारो उमेदवारांचे पैसे घेतले, त्याचे काय होणार, असा सवाल उपस्थित होत आहे. (प्रतिनिधी) जातपडताळणी केल्याशिवाय निवडणूक लढविता येणार नाही, अशी निवडणूक आयोगाने अट घातली. आता जातपडताळणी केली तर फक्त निवडून येणाऱ्यांनाच दाखले देणार, असा नियम काढला आहे. यास आमचा विरोध असून जातपडताळणी केलेल्या प्रत्येकाला दाखले द्यावेत अन्यथा तीव्र आंदोलन करू. - नानासो गुरव, माजी सभापती, पंचायत समिती, पाटण