शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

ग्राहकांपाठोपाठ कांद्याने आता शेतकऱ्यांनाही रडवले!

By admin | Updated: November 30, 2015 01:17 IST

दर कोसळले : शेतकऱ्यांची चिंता वाढली; ढगाळ हवामान, अवकाळी पावसाचा फटका

राहिद सय्यद-- लोणंद--ढगाळ हवामान व अवकाळी पाऊस असे दुहेरी अस्मानी संकट कांदा उत्पादक शेतकऱ्यांसमोर ‘आ’ वासून उभे असतानाच दिवाळीनंतर चार-पाच हजार रूपये प्रति क्विंटलवरून कांद्याचे दर एक-दोन हजार प्रतिक्विंटलवर कोसळले असून कांद्याच दरातील घसरणीचा मोठा फटका कांदा उत्पादक शेतकऱ्यांना बसत आहे.शेतकऱ्यांचा उत्पादनखर्च देखील निघत नसल्याने ग्राहकांना दीपावलीपूर्वी रडविणाऱ्या कांद्यामुळे आता कांदा उत्पादकांच्या डोळ्यात पाणी येऊ लागले आहे.चालू कांदा उत्पादन हंगामामध्ये पावसाने चांगलीच दडी मारल्यामुळे कांदा उत्पादनामध्ये मोठी घट झाली असून आॅगस्ट महिन्याच्या सुरुवातीपर्यंत राज्यामध्ये ३४,४७८ हेक्टर म्हणजेच फक्त २८ टक्के कांदा लागवड झाली होती. उत्पादनामध्येच मोठ्या प्रमाणात घट झाल्याने हंगामाच्या सुरुवातीलाच कांदा उत्पादकांना कांद्यास सोन्याचा भाव मिळू लागला होता. कांद्याच्या दराने बाजार समित्यांमध्ये ६४०० रूपयांपर्यंत विक्रमी मजल मारली होती. तर किरकोळ बाजारात कांदा ८० रूपये किलोपर्यंत दिवाळीपूर्वी विकला जात होता. नेहमी कोसळणारे कांद्याचे दर, अवकाळी पाऊस व ढगाळ हवामानाचा कांदा उत्पादकांना बसणारा फटका, सरकारचे कांदा आयात-निर्यात धोरण, वाढती शेतमजुरी आदी बाबींचा नेहमीच कांदा उत्पादकांना फटका बसतो. त्यामुळे कांदा उत्पादक कांदा उत्पादनाकडे पाठ करून इतर पिकांकडे वळले आहेत. गेल्या हंगामामध्ये समाधानकारक पावसामुळे एक लाख हेक्टर क्षेत्रावर कांद्याची लागवड करण्यात आली होती. राज्यामध्ये खरीप कांद्याचे (लाल हळदी), सरासरी १ लाख २३ हजार ६२३ हेक्टर क्षेत्र आहे. एका आठवड्यात कांद्याचे दर दीड ते दोन हजार रूपयांनी कोसळले असून उत्पादन व लागवड कमी असताना देखील अनपेक्षितपणे एवढे दर कोसळल्याने कांदा उत्पादकांना याचा मोठा फटका बसत आहे. कांद्याची लागवड व उत्पादन कमी झाल्याने कांदा ग्राहकांना गेली दोन महिने रडवित होता तोच आता उत्पादकांनादेखील रडविताना दिसत आहे. पुढील काळात नेमकी कांद्याच्या दराची काय स्थिती राहणार याबाबत कांदा उत्पादकांना चिंता लागली आहे. वातावरणातील अनियमितपणा व अनियोजित शेतीत घेण्याची पिके त्यामुळे कांद्याची आवक वाढली आहे. तसेच ढगाळ वातावरण व पावसाच्या भीतीने कांदा उत्पादकांनी जास्त प्रमाणात कांदा विक्रीला आणल्यामुळे दर कमी झाले आहेत. तरी पुढील एक दोन बाजारात दर स्थिर होऊन शेतकऱ्यांना चांगले दर मिळतील. - राजेंद्र तांबे, सभापती.