शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाममध्ये दहशतवाद्यांना केली मदत, दिला आश्रय, दोघे अटकेत, तपासातून धक्कादायक माहिती समोर
2
बॉम्ब फोडूनही अमेरिका काही करू शकली नाही! ३७ तास हवेतच होते ६ बी२ बॉम्बर..., इराण म्हणतेय...
3
आतापर्यंत इस्रायली हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा जाणून थक्क व्हाल! खामेनेई सैनिकांकडूनही जोरदार प्रत्युत्तर
4
ट्रम्प यांच्या 'या' निर्णयाने जागतिक अर्थव्यवस्थेला धक्का? तुमच्या खिशावर काय परिणाम होणार?
5
जगाचे 'लॉजिस्टिक्स' बदलणाऱ्या अवलियाचे निधन! मालवाहतुकीसाठी पहिल्यांदाच केला असा प्रयोग
6
पुढच्या ५ वर्षांत इराण अणुबॉम्ब बनवेल! अमेरिकेच्या हल्ल्यानंतर औवेसी म्हणाले, "तिथले कोट्यवधी भारतीय..."
7
"अमेरिकेच्या हल्ल्यानंतरही आमचे अणुऊर्जा प्रकल्प सुरक्षित"; इराणने दिली माहिती, ट्रम्प यांचा दावा फेटाळला
8
अमेरिकेने अणुकेंद्रांवर केलेल्या हल्ल्याचा इराण कसा घेणार बदला, केवळ इस्राइललाच लक्ष्य करणार की...
9
खोट्या बातम्यांवर बसणार आळा; कर्नाटक सरकारने आणला 'फेक न्यूज' कायदा, ७ वर्षांपर्यंतची शिक्षा
10
Iran Israel Conflict Explained: युद्धाच्या आगीत तेल पेटणार, भारतावर कसा परिणाम होणार?
11
भगवे झेंडे घेऊन रस्त्यावर उतरणे म्हणजे हिंदुत्व नव्हे; नितीन गडकरींची भूमिका
12
अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराण संतापला; इस्रायलवर डागली 30 क्षेपणास्त्रे, अनेक शहरांमध्ये भीतीचे वातावरण
13
VIDEO: इराणवर हल्ले सुरुच; अमेरिकेने दिलेली लढाऊ विमाने इस्रायलने केली नष्ट
14
"जंगल का कानून..."; अणुकेंद्रांवरीर हल्ल्यानंतर, इराणचा भारतमार्गे अमेरिकेला 'मेसेज'; घेतली मोठी शपथ!
15
NEET परीक्षा का बरे होत नसेल हो नीट?
16
इस्रायल सोडा अमेरिका-युरोपलाही घाबरत नाही; पण 'या' गटासमोर इराणला झुकावेच लागते!
17
‘त्या’ बेकायदा कृत्यांमध्ये कायद्याचे रक्षकच सहभागी; वसई-विरारमधील बांधकामप्रकरणी उच्च न्यायालयाने राज्य सरकारला झापले
18
इराणच्या अणुकेंद्रांवर अमेरिकेने टाकलेले बंकर बस्टर बॉम्ब एवढे आहेत विध्वंसक, अशी आहेत त्यांची वैशिष्ट्ये
19
तीन भाषा शिकण्यासाठी खेळाच्या तासात कपात; हिंदी शिकवण्यावरुन सुप्रिया सुळेंची CM फडणवीसांकडे मागणी
20
पुढच्या आठवड्यात बाजारात १२ कंपन्यांचे IPO, १५,८०० कोटींची उलाढाल! तुमच्यासाठी 'ही' सुवर्णसंधी!

ग्राहकांपाठोपाठ कांद्याने आता शेतकऱ्यांनाही रडवले!

By admin | Updated: November 30, 2015 01:17 IST

दर कोसळले : शेतकऱ्यांची चिंता वाढली; ढगाळ हवामान, अवकाळी पावसाचा फटका

राहिद सय्यद-- लोणंद--ढगाळ हवामान व अवकाळी पाऊस असे दुहेरी अस्मानी संकट कांदा उत्पादक शेतकऱ्यांसमोर ‘आ’ वासून उभे असतानाच दिवाळीनंतर चार-पाच हजार रूपये प्रति क्विंटलवरून कांद्याचे दर एक-दोन हजार प्रतिक्विंटलवर कोसळले असून कांद्याच दरातील घसरणीचा मोठा फटका कांदा उत्पादक शेतकऱ्यांना बसत आहे.शेतकऱ्यांचा उत्पादनखर्च देखील निघत नसल्याने ग्राहकांना दीपावलीपूर्वी रडविणाऱ्या कांद्यामुळे आता कांदा उत्पादकांच्या डोळ्यात पाणी येऊ लागले आहे.चालू कांदा उत्पादन हंगामामध्ये पावसाने चांगलीच दडी मारल्यामुळे कांदा उत्पादनामध्ये मोठी घट झाली असून आॅगस्ट महिन्याच्या सुरुवातीपर्यंत राज्यामध्ये ३४,४७८ हेक्टर म्हणजेच फक्त २८ टक्के कांदा लागवड झाली होती. उत्पादनामध्येच मोठ्या प्रमाणात घट झाल्याने हंगामाच्या सुरुवातीलाच कांदा उत्पादकांना कांद्यास सोन्याचा भाव मिळू लागला होता. कांद्याच्या दराने बाजार समित्यांमध्ये ६४०० रूपयांपर्यंत विक्रमी मजल मारली होती. तर किरकोळ बाजारात कांदा ८० रूपये किलोपर्यंत दिवाळीपूर्वी विकला जात होता. नेहमी कोसळणारे कांद्याचे दर, अवकाळी पाऊस व ढगाळ हवामानाचा कांदा उत्पादकांना बसणारा फटका, सरकारचे कांदा आयात-निर्यात धोरण, वाढती शेतमजुरी आदी बाबींचा नेहमीच कांदा उत्पादकांना फटका बसतो. त्यामुळे कांदा उत्पादक कांदा उत्पादनाकडे पाठ करून इतर पिकांकडे वळले आहेत. गेल्या हंगामामध्ये समाधानकारक पावसामुळे एक लाख हेक्टर क्षेत्रावर कांद्याची लागवड करण्यात आली होती. राज्यामध्ये खरीप कांद्याचे (लाल हळदी), सरासरी १ लाख २३ हजार ६२३ हेक्टर क्षेत्र आहे. एका आठवड्यात कांद्याचे दर दीड ते दोन हजार रूपयांनी कोसळले असून उत्पादन व लागवड कमी असताना देखील अनपेक्षितपणे एवढे दर कोसळल्याने कांदा उत्पादकांना याचा मोठा फटका बसत आहे. कांद्याची लागवड व उत्पादन कमी झाल्याने कांदा ग्राहकांना गेली दोन महिने रडवित होता तोच आता उत्पादकांनादेखील रडविताना दिसत आहे. पुढील काळात नेमकी कांद्याच्या दराची काय स्थिती राहणार याबाबत कांदा उत्पादकांना चिंता लागली आहे. वातावरणातील अनियमितपणा व अनियोजित शेतीत घेण्याची पिके त्यामुळे कांद्याची आवक वाढली आहे. तसेच ढगाळ वातावरण व पावसाच्या भीतीने कांदा उत्पादकांनी जास्त प्रमाणात कांदा विक्रीला आणल्यामुळे दर कमी झाले आहेत. तरी पुढील एक दोन बाजारात दर स्थिर होऊन शेतकऱ्यांना चांगले दर मिळतील. - राजेंद्र तांबे, सभापती.