शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पणत्या, मेणबत्त्यांवर खर्च कशाला? नाताळाकडून शिका’, अयोध्येतील दीपोत्सवावरून अखिलेश यादवांचा टोला 
2
Fake News: रेल्वेबद्दल 'फेक न्यूज' पोस्ट करताय? सावधान! रेल्वेने उचलले मोठे पाऊल
3
"हा भ्याड हल्ला!" अफगाण क्रिकेटपटूंच्या मृत्युवर बीसीसीआयची संतप्त प्रतिक्रिया
4
Ind Vs Aus: पर्थवर विराट-रोहित कमाल दाखवणार? रेकॉर्ड रचणार? हे ७ विक्रम RO-KOच्या निशाण्यावर
5
Birhad Morcha: बिर्हाड मोर्चा मुंबईच्या वेशीवर, कसारा घाटात ठिय्या आंदोलन, प्रमुख मागण्यांसाठी एल्गार!
6
काँग्रेसच्या माजी मुख्यमंत्र्यांच्या कारला अपघात, एस्कॉर्ट वाहनावर आदळली कार
7
Mumbai Crime: तुम्ही खरेदी केलेलं सोनं पितळ तर नाही ना? मुंबईतील घटनेनं सर्वांना हादरवून सोडलं!
8
Diwali Sale: दिवाळी ऑफर! मारुतीच्या गाड्यांवर दीड लाखांपर्यंत सूट; येथे पाहा संपूर्ण लिस्ट
9
Nagpur Railway: विघातक शक्तींवर सूक्ष्म नजर; नागपूर स्थानकावर 'वॉर रूम'
10
'बापजाद्यांची पायवाट मोडू नका!'; मनोज जरांगेंचा पंकजा मुंडे,अजित पवारांना आपुलकीचा सल्ला!
11
दिवाळीसाठी गावी निघाले अन् एका क्षणात संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त! 'थार'च्या धडकेत पती-पत्नी आणि दोन मुलांचा मृत्यू
12
ICC Women’s World Cup 2025 : PAK vs NZ मॅचमध्ये पावसाची बॅटिंग! दक्षिण आफ्रिकेला मिळालं सेमीचं तिकीट
13
Bihar Election 2025 India Alliance: हेमंत सोरेन यांचा इंडिया आघाडीला 'टाटा', 'या' जागा स्वबळावर लढणार
14
नाशिकमधील भयंकर घटना! डोक्यात फरशी, तोंडात बंदूक घालून युवकास ठार मारण्याचा प्रयत्न
15
Bihar Election: म्हशीवरून मिरवणूक आणि भरला उमेदवारी अर्ज, तेज प्रताप यादवांच्या उमेदवाराची चर्चा
16
'अदीना मशीद नाही, आदिनाथ मंदिर', खासदार युसूफ पठाणच्या पोस्टवर भाजपचा निशाणा; प्रकरण काय?
17
Bihar Election: ती चूक  भोवली, मतदानापूर्वीच एक जागा गमावली, बिहारमध्ये NDA ला मोठा धक्का
18
Gold News: भारतीय महिला आहेत हजारो टन सोन्याच्या 'मालक', अमेरिकेसह पाच देशांकडेही नाही इतका साठा
19
भाजपाने देव आणि महापुरुषांचा मांडला बाजार, मेट्रो स्टेशनच्या नावांवरून काँग्रेसची बोचरी टीका
20
Kalyan Crime: गर्लफ्रेंडचा मोबाईल हॅक केला, अश्लील व्हिडीओ अन् आईवडिलांना धमक्या, २९ वर्षीय तरुणीवर प्रियकरानेच केला बलात्कार

ग्राहकांपाठोपाठ कांद्याने आता शेतकऱ्यांनाही रडवले!

By admin | Updated: November 30, 2015 01:17 IST

दर कोसळले : शेतकऱ्यांची चिंता वाढली; ढगाळ हवामान, अवकाळी पावसाचा फटका

राहिद सय्यद-- लोणंद--ढगाळ हवामान व अवकाळी पाऊस असे दुहेरी अस्मानी संकट कांदा उत्पादक शेतकऱ्यांसमोर ‘आ’ वासून उभे असतानाच दिवाळीनंतर चार-पाच हजार रूपये प्रति क्विंटलवरून कांद्याचे दर एक-दोन हजार प्रतिक्विंटलवर कोसळले असून कांद्याच दरातील घसरणीचा मोठा फटका कांदा उत्पादक शेतकऱ्यांना बसत आहे.शेतकऱ्यांचा उत्पादनखर्च देखील निघत नसल्याने ग्राहकांना दीपावलीपूर्वी रडविणाऱ्या कांद्यामुळे आता कांदा उत्पादकांच्या डोळ्यात पाणी येऊ लागले आहे.चालू कांदा उत्पादन हंगामामध्ये पावसाने चांगलीच दडी मारल्यामुळे कांदा उत्पादनामध्ये मोठी घट झाली असून आॅगस्ट महिन्याच्या सुरुवातीपर्यंत राज्यामध्ये ३४,४७८ हेक्टर म्हणजेच फक्त २८ टक्के कांदा लागवड झाली होती. उत्पादनामध्येच मोठ्या प्रमाणात घट झाल्याने हंगामाच्या सुरुवातीलाच कांदा उत्पादकांना कांद्यास सोन्याचा भाव मिळू लागला होता. कांद्याच्या दराने बाजार समित्यांमध्ये ६४०० रूपयांपर्यंत विक्रमी मजल मारली होती. तर किरकोळ बाजारात कांदा ८० रूपये किलोपर्यंत दिवाळीपूर्वी विकला जात होता. नेहमी कोसळणारे कांद्याचे दर, अवकाळी पाऊस व ढगाळ हवामानाचा कांदा उत्पादकांना बसणारा फटका, सरकारचे कांदा आयात-निर्यात धोरण, वाढती शेतमजुरी आदी बाबींचा नेहमीच कांदा उत्पादकांना फटका बसतो. त्यामुळे कांदा उत्पादक कांदा उत्पादनाकडे पाठ करून इतर पिकांकडे वळले आहेत. गेल्या हंगामामध्ये समाधानकारक पावसामुळे एक लाख हेक्टर क्षेत्रावर कांद्याची लागवड करण्यात आली होती. राज्यामध्ये खरीप कांद्याचे (लाल हळदी), सरासरी १ लाख २३ हजार ६२३ हेक्टर क्षेत्र आहे. एका आठवड्यात कांद्याचे दर दीड ते दोन हजार रूपयांनी कोसळले असून उत्पादन व लागवड कमी असताना देखील अनपेक्षितपणे एवढे दर कोसळल्याने कांदा उत्पादकांना याचा मोठा फटका बसत आहे. कांद्याची लागवड व उत्पादन कमी झाल्याने कांदा ग्राहकांना गेली दोन महिने रडवित होता तोच आता उत्पादकांनादेखील रडविताना दिसत आहे. पुढील काळात नेमकी कांद्याच्या दराची काय स्थिती राहणार याबाबत कांदा उत्पादकांना चिंता लागली आहे. वातावरणातील अनियमितपणा व अनियोजित शेतीत घेण्याची पिके त्यामुळे कांद्याची आवक वाढली आहे. तसेच ढगाळ वातावरण व पावसाच्या भीतीने कांदा उत्पादकांनी जास्त प्रमाणात कांदा विक्रीला आणल्यामुळे दर कमी झाले आहेत. तरी पुढील एक दोन बाजारात दर स्थिर होऊन शेतकऱ्यांना चांगले दर मिळतील. - राजेंद्र तांबे, सभापती.