शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

परवानगीने आले : महिन्यात एक लाखजणांची घरवापसी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2020 22:31 IST

यामध्ये महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातून साताऱ्यात येणाऱ्यांची संख्या १ लाख ७ हजार ४२० एवढी आहे. तर गुजरातमधून ४८७ जण आले आहेत. तसेच कर्नाटकमधून ४७९, उत्तरप्रदेश १४८, तामिळनाडू ३०६, मध्यप्रदेश १६४, राजस्थानमधून १९१ तसेच इतर राज्यांतूनही अनेकांची घरवपासी झालेली आहे.

ठळक मुद्देमुंबई, ठाणे अन् रायगडमधून ६६ हजारजण गावी; अनेकजण परतू लागले

सातारा : कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर देशात विविध ठिकाणी असलेले लोक आपापल्या गावी परतु लागले आहेत. गेल्या सव्वा महिन्याच्या काळात देशातून १ लाख ९ हजार जणांची सातारा जिल्ह्यातील आपल्या गावी घरवापसी झाली आहे. हे सर्वजण परवाना व तपासणी नाक्यावरून आलेले आहेत. यामध्ये मुंबई, ठाणे आणि रायगड जिल्ह्यातून सर्वाधिक ६६ हजारजणांनी गाव जवळ केले आहे.

कोरोना विषाणूमुळे देशातच २४ मार्चपासून लॉकडाऊन सुरू झाले. त्यामुळे नागरिकांवर बंधने आली. शासन नियम पाळावे लागेल. तर कोरोनामुळे अनेक कंपन्या बंद पडल्या, व्यवसायही थांबले. परिणामी लोकांना घरातच थांबून राहावे लागले. अशातच सातारा जिल्ह्यातून इतर राज्यात नोकरी, व्यवसायासाठी गेलेले. तसेच महाराष्ट्रातही नोकरीच्या निमित्ताने गेलेल्या सातारा जिल्ह्यातील लोकांना गावी परतण्याचे वेध लागले होते. कारण कोरोनामुळे दूरगावी किती राहायचे, असा प्रश्न होता. यातून अनेकांनी घर जवळ केले; पण बहुतांशजणांना घरवापसी करता आली नाही. मात्र, शासनाने परवानगी दिल्याने अनेकजण आता जिल्ह्यात येऊ लागले आहेत.

१८ एप्रिलपासून २४ मेपर्यंत १ लाख ९ हजार ६०४ जणांनी सातारा जिल्ह्यात घरवापसी केली आहे. ई-पास आणि चेक पोस्टवरून हे सर्वजण आले आहेत. यामध्ये महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातून साताऱ्यात येणाऱ्यांची संख्या १ लाख ७ हजार ४२० एवढी आहे. तर गुजरातमधून ४८७ जण आले आहेत. तसेच कर्नाटकमधून ४७९, उत्तरप्रदेश १४८, तामिळनाडू ३०६, मध्यप्रदेश १६४, राजस्थानमधून १९१ तसेच इतर राज्यांतूनही अनेकांची घरवपासी झालेली आहे.

राज्याचा विचार करता मुंबई, ठाणे आणि रायगड जिल्ह्यातून ६५ हजार ७९५ जण सातारा जिल्ह्यात आले आहेत. यामध्ये

मुंबईतून २८ हजार ९१३, ठाणे १९ हजार ७६ आणि रायगडमधील १७ हजार ८०६जणांचा समावेश आहे. तसेच पुणे जिल्ह्यातून ११ हजार १३७, सांगलीतून ५ हजार ४१९, कोल्हापूरमधून ३ हजार ३५ जण आले आहेत. अशाप्रकारे राज्यातील विविध जिल्ह्यांत वास्तव्यास असलेल्या साताºयातील लोकांनी घरवापसी केली आहे. यापुढेही अनेकजण येणार आहेत. त्यामुळे हा आकडा वाढतच जाणार आहे.

सातारा तालुक्यात २० हजारजण आलेकोरोनामुळे बाहेरून सातारा जिल्ह्यात १ लाख ९ हजार जणांनी घरवापसी केली आहे. यामधील २० हजार ३१४ जण हे सातारा शहर व तालुक्यात आले आहेत. तर कºहाड तालुक्यात १२ हजार ६१७, पाटण १२ हजार ४६३, खटाव ११ हजार ६७६, माण तालुक्यात १० हजार ३४१ जण आले आहेत. तसेच वाई तालुक्यात ८ हजार ९८५, जावळी ८ हजार १९२, फलटण ७ हजार ४५७, महाबळेश्वर ६ हजार ५८८, कोरेगाव ६ हजार ११३ आणि खंडाळा तालुक्यात ४ हजार ८९४ जण आले आहेत.

प्रशासनाचे आवाहनसातारा जिल्ह्यात अधिकृतरीत्या १ लाख ९ हजारजण आले आहेत. हे सर्वजण आपापल्या गावी आहेत; पण बाहेरून आलेल्यांनी स्वत:बरोबरच इतरांचीही काळजी घ्यावी. होम क्वॉरंटाईन व्हावे. आरोग्याबाबत काही तक्रार असल्यास आरोग्य विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.

 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसMedicalवैद्यकीय