शहरं
Join us  
Trending Stories
1
बलुचिस्तानात पाकिस्तानी सैन्यावर युक्रेनसारखे हल्ले; बलुच लिबरेशन आर्मीचा मोठा दावा 
2
...म्हणून तर आज सीमेवर शांतता नव्हती ना? भारत-पाकिस्तान युद्धविरामावर DGMO आज चर्चा करणार
3
विरुद्ध दिशेने येणाऱ्या भरधाव हायवाने कारला उडविले; भीषण अपघातात दोन ठार, पाच गंभीर
4
India Pakistan War :"हमने भेजे कश्मीर में मुजाहिद...", दहशतवाद्यांच्या अंत्यसंस्कारावेळी नमाज पठण करणाऱ्या अब्दुल रौफच्या व्हिडिओने पाकिस्तानचा पर्दाफाश
5
Stock Market Today: शस्त्रसंधीच्या घोषणेनंतर शेअर बाजार सुस्साट.., बाजारमूल्य १० लाख कोटी रुपयांहून अधिक वाढलं
6
मृत्यूने गाठण्यापूर्वी 'ती' "मला जगायचंय" एवढेच म्हणत राहिली अन् अखेरचा घेतला श्वास
7
ट्रम्पनी म्हटलं खूप छान, चीननं केलं उलट काम; असं काय चाललंय ज्याचा भारतावर थेट होऊ शकतो परिणाम?
8
India Pakistan War:भारत - पाकिस्तानमधील तणाव निवळतोय, रात्री कोणताही हल्ला झाला नाही; लष्कराने दिली माहिती
9
वडिलांना लग्नाला का बोलावलं नाही? प्रतीकने अखेर खरं कारण सांगितलंच, म्हणाला- "आईची इच्छा होती की..."
10
भारत-पाकिस्तान तणाव कमी करण्यासाठी अमेरिकेनं खरंच मध्यस्थी केली? जाणून घ्या, पडद्यामागे नेमकं काय घडलं?
11
९ हवाई तळ उद्ध्वस्त, ४० सैनिक ठार; पाकचा विजयाचा दावा, पण भारताने जिरवली, पुराव्यासह उत्तर
12
मुलांसाठी Post Office ची खास स्कीम, गॅरंटीड रिटर्न; विमा कव्हरसह बोनसही, अनेकांना याबद्दल कल्पनाही नाही
13
कुठलाही भारतीय पायलट ताब्यात नाही, आमच्या एका विमानाचं नुकसान; पाक लष्कराची कबुली
14
आजचे राशीभविष्य १२ मे २०२५ : हरवलेली वस्तू अचानकपणे सापडेल, कोणाच्या नशिबात काय...
15
वहां से गोली चलेगी, तो यहां से गोला चलेगा: PM मोदी; लष्कराला मुभा, ऑपरेशन सिंदूर संपले नाही
16
भारताने बदला घेतला अन् पाकला ‘औकात’ दाखवली; पहलगामनंतर आतापर्यंत काय घडले? संपूर्ण घटनाक्रम
17
हेअर ट्रान्सप्लांट करणं इंजिनिअरच्या जीवावर बेतलं; इंफेक्शनमुळे मृत्यू, डॉक्टरवर गुन्हा दाखल
18
ऑपरेशन सिंदूर: रात्र शांततेत गेली, पण तणाव कायम; सीमाभागात जनतेस सतर्कतेचे आदेश
19
शस्त्रसंधीचे उल्लंघन करणे महागात; पाकचे १६ सैनिक ठार, ८ बंकर व ६ चौक्याही गमावल्या
20
गणपती बाप्पाच्या पुष्टिपती विनायक अवताराबाबत तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या कथा

परवानगीने आले : महिन्यात एक लाखजणांची घरवापसी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2020 22:31 IST

यामध्ये महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातून साताऱ्यात येणाऱ्यांची संख्या १ लाख ७ हजार ४२० एवढी आहे. तर गुजरातमधून ४८७ जण आले आहेत. तसेच कर्नाटकमधून ४७९, उत्तरप्रदेश १४८, तामिळनाडू ३०६, मध्यप्रदेश १६४, राजस्थानमधून १९१ तसेच इतर राज्यांतूनही अनेकांची घरवपासी झालेली आहे.

ठळक मुद्देमुंबई, ठाणे अन् रायगडमधून ६६ हजारजण गावी; अनेकजण परतू लागले

सातारा : कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर देशात विविध ठिकाणी असलेले लोक आपापल्या गावी परतु लागले आहेत. गेल्या सव्वा महिन्याच्या काळात देशातून १ लाख ९ हजार जणांची सातारा जिल्ह्यातील आपल्या गावी घरवापसी झाली आहे. हे सर्वजण परवाना व तपासणी नाक्यावरून आलेले आहेत. यामध्ये मुंबई, ठाणे आणि रायगड जिल्ह्यातून सर्वाधिक ६६ हजारजणांनी गाव जवळ केले आहे.

कोरोना विषाणूमुळे देशातच २४ मार्चपासून लॉकडाऊन सुरू झाले. त्यामुळे नागरिकांवर बंधने आली. शासन नियम पाळावे लागेल. तर कोरोनामुळे अनेक कंपन्या बंद पडल्या, व्यवसायही थांबले. परिणामी लोकांना घरातच थांबून राहावे लागले. अशातच सातारा जिल्ह्यातून इतर राज्यात नोकरी, व्यवसायासाठी गेलेले. तसेच महाराष्ट्रातही नोकरीच्या निमित्ताने गेलेल्या सातारा जिल्ह्यातील लोकांना गावी परतण्याचे वेध लागले होते. कारण कोरोनामुळे दूरगावी किती राहायचे, असा प्रश्न होता. यातून अनेकांनी घर जवळ केले; पण बहुतांशजणांना घरवापसी करता आली नाही. मात्र, शासनाने परवानगी दिल्याने अनेकजण आता जिल्ह्यात येऊ लागले आहेत.

१८ एप्रिलपासून २४ मेपर्यंत १ लाख ९ हजार ६०४ जणांनी सातारा जिल्ह्यात घरवापसी केली आहे. ई-पास आणि चेक पोस्टवरून हे सर्वजण आले आहेत. यामध्ये महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातून साताऱ्यात येणाऱ्यांची संख्या १ लाख ७ हजार ४२० एवढी आहे. तर गुजरातमधून ४८७ जण आले आहेत. तसेच कर्नाटकमधून ४७९, उत्तरप्रदेश १४८, तामिळनाडू ३०६, मध्यप्रदेश १६४, राजस्थानमधून १९१ तसेच इतर राज्यांतूनही अनेकांची घरवपासी झालेली आहे.

राज्याचा विचार करता मुंबई, ठाणे आणि रायगड जिल्ह्यातून ६५ हजार ७९५ जण सातारा जिल्ह्यात आले आहेत. यामध्ये

मुंबईतून २८ हजार ९१३, ठाणे १९ हजार ७६ आणि रायगडमधील १७ हजार ८०६जणांचा समावेश आहे. तसेच पुणे जिल्ह्यातून ११ हजार १३७, सांगलीतून ५ हजार ४१९, कोल्हापूरमधून ३ हजार ३५ जण आले आहेत. अशाप्रकारे राज्यातील विविध जिल्ह्यांत वास्तव्यास असलेल्या साताºयातील लोकांनी घरवापसी केली आहे. यापुढेही अनेकजण येणार आहेत. त्यामुळे हा आकडा वाढतच जाणार आहे.

सातारा तालुक्यात २० हजारजण आलेकोरोनामुळे बाहेरून सातारा जिल्ह्यात १ लाख ९ हजार जणांनी घरवापसी केली आहे. यामधील २० हजार ३१४ जण हे सातारा शहर व तालुक्यात आले आहेत. तर कºहाड तालुक्यात १२ हजार ६१७, पाटण १२ हजार ४६३, खटाव ११ हजार ६७६, माण तालुक्यात १० हजार ३४१ जण आले आहेत. तसेच वाई तालुक्यात ८ हजार ९८५, जावळी ८ हजार १९२, फलटण ७ हजार ४५७, महाबळेश्वर ६ हजार ५८८, कोरेगाव ६ हजार ११३ आणि खंडाळा तालुक्यात ४ हजार ८९४ जण आले आहेत.

प्रशासनाचे आवाहनसातारा जिल्ह्यात अधिकृतरीत्या १ लाख ९ हजारजण आले आहेत. हे सर्वजण आपापल्या गावी आहेत; पण बाहेरून आलेल्यांनी स्वत:बरोबरच इतरांचीही काळजी घ्यावी. होम क्वॉरंटाईन व्हावे. आरोग्याबाबत काही तक्रार असल्यास आरोग्य विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.

 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसMedicalवैद्यकीय