शहरं
Join us  
Trending Stories
1
₹1000 कोटींच्या सायबर फ्रॉड रॅकेटचा भांडाफोड; 58 कंपन्यांविरुद्ध CBI ने दाखल केले आरोपपत्र
2
'ममता बॅनर्जींना अटक करा'; मेस्सी स्टेडिअम गोंधळावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांची थेट मागणी
3
Palghar Crime: वसईत पाच वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून हत्या; १८ वर्षांनंतर आरोपी सापडला उत्तर प्रदेशात
4
'मंत्री झाला म्हणजे जास्त कळते, असा गैरसमज करून घेऊ नये', जयंत पाटील मंत्री सावकारेंवर भडकले, 'हजामती' शब्दावरून चकमक
5
आता '४ दिवसीय आठवडा' शक्य! कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा; नवीन कामगार कायद्यात '३ दिवस सुट्टी'ची तरतूद
6
नाईट क्लबमध्ये आग, दिल्लीत मेसेज पोहोचला अन् लुथरा ब्रदर्स थांयलंडमध्ये; पडद्यामागे काय घडलं? Inside Story
7
'डिजिटल अरेस्ट' च्या जाळ्यात अडकली, ३३ लाखांची आरटीजीएसही करायला बँकेती गेली; मॅनेजरच्या लक्षात आले...
8
विमानात अमेरिकन महिलेचा श्वास गुदमरू लागला, देवदूत बनून धावली काँग्रेसची महिला नेता आणि वाचवले प्राण   
9
रेपो रेट कपातीनंतरही FD वर बंपर रिटर्न! SBI मध्ये २ लाख जमा करून मिळेल ८३,६५२ रुपये निश्चित व्याज
10
टेक इंडस्ट्री हादरली! AI मुळे २०२५ मध्ये १.२० लाख नोकऱ्या संपुष्टात; कर्मचारी कपातीत कोणती कंपनी पुढे?
11
डाव्यांच्या गडाला हादरे! माजी आयपीएस आर. श्रीलेखा तिरुवनंतपुरमच्या महापौर होण्याची शक्यता, केरळमध्ये भाजपला मोठे यश  
12
इंडिगोचे संकट वाढले! ८२९ प्रवासी सामुहिक खटला दाखल करणार, एअरलाईन्सवर नामुष्की...
13
मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदे यांचे संघस्थानी नमन, अजित पवार गटासह काही आमदार-मंत्र्यांची मात्र दांडी
14
हवा बिघडली अन् वारे फिरले; धुराने कोंडला मुंबईकरांचा श्वास! धूळ, धुके, धुराच्या संयुक्त मिश्रणाने प्रदूषणात वाढ
15
'१९ डिसेंबरला देशात सर्वात मोठा राजकीय भूकंप होणार, भारताचा पंतप्रधान मराठी माणूस बनणार', पृथ्वीराज चव्हाणांचे भाकीत!
16
जॉन सीनाने शेवटचा सामना 'मुद्दाम' गमावला? गुंथरकडून पराभव, रिंगला किस करून घेतला WWE चा निरोप...
17
काँग्रेसचं पुनरागमन, भाजपाचा चंचुप्रवेश आणि डाव्यांना धक्का, केरळमधील राजकीय हवा बदलतेय?
18
'या' छोट्या देशाचा चीन-भारतासारख्या बलाढ्या देशांना धोबीपछाड! फंड उभारण्यात आशियात १ नंबरला
19
सुदानमध्ये संयुक्त राष्ट्राच्या तळावर क्रूर ड्रोन हल्ला; ६ बांगलादेशी पीसकीपर्स ठार, ८ गंभीर जखमी; युनो महासचिवकडून तीव्र निषेध
Daily Top 2Weekly Top 5

परवानगीने आले : महिन्यात एक लाखजणांची घरवापसी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2020 22:31 IST

यामध्ये महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातून साताऱ्यात येणाऱ्यांची संख्या १ लाख ७ हजार ४२० एवढी आहे. तर गुजरातमधून ४८७ जण आले आहेत. तसेच कर्नाटकमधून ४७९, उत्तरप्रदेश १४८, तामिळनाडू ३०६, मध्यप्रदेश १६४, राजस्थानमधून १९१ तसेच इतर राज्यांतूनही अनेकांची घरवपासी झालेली आहे.

ठळक मुद्देमुंबई, ठाणे अन् रायगडमधून ६६ हजारजण गावी; अनेकजण परतू लागले

सातारा : कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर देशात विविध ठिकाणी असलेले लोक आपापल्या गावी परतु लागले आहेत. गेल्या सव्वा महिन्याच्या काळात देशातून १ लाख ९ हजार जणांची सातारा जिल्ह्यातील आपल्या गावी घरवापसी झाली आहे. हे सर्वजण परवाना व तपासणी नाक्यावरून आलेले आहेत. यामध्ये मुंबई, ठाणे आणि रायगड जिल्ह्यातून सर्वाधिक ६६ हजारजणांनी गाव जवळ केले आहे.

कोरोना विषाणूमुळे देशातच २४ मार्चपासून लॉकडाऊन सुरू झाले. त्यामुळे नागरिकांवर बंधने आली. शासन नियम पाळावे लागेल. तर कोरोनामुळे अनेक कंपन्या बंद पडल्या, व्यवसायही थांबले. परिणामी लोकांना घरातच थांबून राहावे लागले. अशातच सातारा जिल्ह्यातून इतर राज्यात नोकरी, व्यवसायासाठी गेलेले. तसेच महाराष्ट्रातही नोकरीच्या निमित्ताने गेलेल्या सातारा जिल्ह्यातील लोकांना गावी परतण्याचे वेध लागले होते. कारण कोरोनामुळे दूरगावी किती राहायचे, असा प्रश्न होता. यातून अनेकांनी घर जवळ केले; पण बहुतांशजणांना घरवापसी करता आली नाही. मात्र, शासनाने परवानगी दिल्याने अनेकजण आता जिल्ह्यात येऊ लागले आहेत.

१८ एप्रिलपासून २४ मेपर्यंत १ लाख ९ हजार ६०४ जणांनी सातारा जिल्ह्यात घरवापसी केली आहे. ई-पास आणि चेक पोस्टवरून हे सर्वजण आले आहेत. यामध्ये महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातून साताऱ्यात येणाऱ्यांची संख्या १ लाख ७ हजार ४२० एवढी आहे. तर गुजरातमधून ४८७ जण आले आहेत. तसेच कर्नाटकमधून ४७९, उत्तरप्रदेश १४८, तामिळनाडू ३०६, मध्यप्रदेश १६४, राजस्थानमधून १९१ तसेच इतर राज्यांतूनही अनेकांची घरवपासी झालेली आहे.

राज्याचा विचार करता मुंबई, ठाणे आणि रायगड जिल्ह्यातून ६५ हजार ७९५ जण सातारा जिल्ह्यात आले आहेत. यामध्ये

मुंबईतून २८ हजार ९१३, ठाणे १९ हजार ७६ आणि रायगडमधील १७ हजार ८०६जणांचा समावेश आहे. तसेच पुणे जिल्ह्यातून ११ हजार १३७, सांगलीतून ५ हजार ४१९, कोल्हापूरमधून ३ हजार ३५ जण आले आहेत. अशाप्रकारे राज्यातील विविध जिल्ह्यांत वास्तव्यास असलेल्या साताºयातील लोकांनी घरवापसी केली आहे. यापुढेही अनेकजण येणार आहेत. त्यामुळे हा आकडा वाढतच जाणार आहे.

सातारा तालुक्यात २० हजारजण आलेकोरोनामुळे बाहेरून सातारा जिल्ह्यात १ लाख ९ हजार जणांनी घरवापसी केली आहे. यामधील २० हजार ३१४ जण हे सातारा शहर व तालुक्यात आले आहेत. तर कºहाड तालुक्यात १२ हजार ६१७, पाटण १२ हजार ४६३, खटाव ११ हजार ६७६, माण तालुक्यात १० हजार ३४१ जण आले आहेत. तसेच वाई तालुक्यात ८ हजार ९८५, जावळी ८ हजार १९२, फलटण ७ हजार ४५७, महाबळेश्वर ६ हजार ५८८, कोरेगाव ६ हजार ११३ आणि खंडाळा तालुक्यात ४ हजार ८९४ जण आले आहेत.

प्रशासनाचे आवाहनसातारा जिल्ह्यात अधिकृतरीत्या १ लाख ९ हजारजण आले आहेत. हे सर्वजण आपापल्या गावी आहेत; पण बाहेरून आलेल्यांनी स्वत:बरोबरच इतरांचीही काळजी घ्यावी. होम क्वॉरंटाईन व्हावे. आरोग्याबाबत काही तक्रार असल्यास आरोग्य विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.

 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसMedicalवैद्यकीय