शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प प्रशासनाचा नवा नियम! नवीन व्हिसा ऑर्डरनुसार, लठ्ठपणा किंवा मधुमेहामुळे अमेरिकेत प्रवेश मिळणार नाही; इतर आजारांचाही उल्लेख
2
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
3
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
4
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
5
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
6
Women's World Cup : भारताच्या लेकींसह प्रेक्षकांनीही रचला इतिहास; ते पाहून ICC चा ऐतिहासिक निर्णय!
7
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
8
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
9
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
10
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
11
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
12
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
13
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
14
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
15
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
16
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
17
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
18
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
19
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
20
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट

यंदा सर्वच शाळांचा निकाल शंभर टक्के!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2021 04:29 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : दहावीच्या मूल्यांकनासाठी नववीच्या गुणांचा आधार घेण्याच्या निर्णयासह शिक्षण विभागाच्या निर्णयाने शाळा प्रशासन, मुख्याध्यापक आणि ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : दहावीच्या मूल्यांकनासाठी नववीच्या गुणांचा आधार घेण्याच्या निर्णयासह शिक्षण विभागाच्या निर्णयाने शाळा प्रशासन, मुख्याध्यापक आणि शिक्षक गोंधळले आहेत. शाळा व्यवस्थापनावर निकाल लावण्याचा ताण येणार असला तरीही जिल्ह्यात पहिल्यादांच सर्व शाळांचा निकाल शंभर टक्के लागणार आहे.

शासनाच्या या निकालाबाबत विविध स्तरांवर मतमतांतरे आहेत. सुमोर ४० टक्के शाळांची लेखी परीक्षा झालेली नाही. मग या गुणांचे समानीकरण कसे होणार हा प्रश्न आहे. तोंडी परीक्षा झाली नाही, गुण देण्यासाठी आता या परीक्षा कशा घ्यायच्या हेही शाळांना समेजना. अकरावी प्रवेशासाठी दहावीच्या अभ्यासक्रमावर आधारित ‘सीईटी’ परीक्षा होणार आहे. त्याशिवाय दहावीच्या अंतर्गत मूल्यमापनातून जाहीर झालेल्या निकालाबाबत विद्यार्थी समाधानी नसतील तर त्यांच्यासाठी स्वतंत्र परीक्षा होणार आहे. मग सर्वच विद्यार्थ्यांसाठी दहावीची परीक्षा घेण्याला काय हरकत आहे? असा सूर काही पालक आणि तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.

एकूणच शिक्षण विभागाच्या नवीन मूल्यमापन धोरणामुळे दहावीच्या निकालाची सर्वच्या सर्व जबाबदारी शिक्षक, मुख्याध्यापक आणि शाळा प्रशासनावर येऊन पडल्याने आता तेही गोंधळले आहेत. त्यात न्यायालयीन प्रक्रिया अशीच सुरू राहिली तर जूनअखेरपर्यंत निकाल लावणेही अवघड होईल, असं शिक्षक आणि शाळा व्यवस्थापनाचे म्हणणे आहे. त्यामुळे शिक्षण विभागाने हा गोंधळ मार्गी लावून तातडीने अंतिम निर्णय जाहीर करावा, अशी मागणी होत आहे.

चौकट

असे असेल नवे सूत्र

शासनाने जाहीर केल्याप्रमाणे ५०-३०-२० असा दहावी निकालाचा नवा फॉर्म्युला असणार आहे. याअंतर्गत नववीत मिळालेल्या गुणांचे ५० टक्के गुण, वर्षभरात दहावीच्या विविध लेखी परीक्षांमध्ये मिळणाऱ्या गुणांचे ३० गुणांकनाने लेखी अन् २० गुणांकनाने तोंडी परीक्षेच्या गुणांची बेरीज करण्यात येणार आहे. या सर्वांची गोळाबेरीज करून विद्यार्थ्यांना दहावीचे गुण देण्यात येतील, असे शासनाने न्यायालयात म्हणणे सादर केले आहे. यावर न्यायालयाचा निकाल मंगळवार दि. १ जून रोजी येणार आहे.

पुढील प्रवेशाचे काय होणार?

दहावी निकालाचा गोंधळ सुरू असतानाच सीईटी ऐच्छिक करण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला. त्यामुळे आपल्या आवडीच्या ठिकाणी गुणवत्तेच्या आधारावर जाण्यासाठी विद्यार्थी करत असलेल्या प्रयत्नांवरही पाणी फिरणार आहे. सीईटी न देता विद्यार्थ्यांना कोणत्या आधारे प्रवेश दिला जाईल याची कुठेच स्पष्टता नसल्याने पुढील प्रवेशाचेही गोंधळ सुरू राहणार आहेत.

शिक्षणतज्ज्ञ काय म्हणतात

१. नववीच्या गुणांवर दहावीचे मूल्यमापन करणं काही विद्यार्थ्यांवर अन्यायकारक होऊ शकते. दुसरं म्हणजे दहावीत विद्यार्थी शाळेतच आले नाहीत तर त्यांच्या लेखी परीक्षा झाल्या केव्हा? हा सगळाच गोंधळ आहे. यामुळे विद्यार्थ्यांबरोबरच शैक्षणिक विश्वाचे नुकसान होणार आहे.

- डॉ. चंद्रकांत माने, पाटण

२. दहावीसाठी अभ्यासक्रमात २५ टक्के कपात केली होती. तो अभ्यासक्रम सीईटीसाठी असणार आहे का? शिवाय सीबीएसई, आयसीएसईच्या मुलांसोबत सीईटी देताना त्यांचा अभ्यासक्रम, आमचा अभ्यासक्रम वेगळा असताना गुणांची समानता कशी राखणार हा प्रश्न आहेच. याबाबत खुलासा होणं अपेक्षित आहे.

- डॉ. सुधीर इंगळे, फलटण

३. शिक्षण विभागाने जो निर्णय दहावी मूल्यांकनाबाबत घेतला आहे, तो नक्कीच चांगला आहे. मात्र, अकरावी प्रवेशासाठी ऐच्छिक सीईटी सदंर्भातील निर्णय बंधनकारक ठेवावा असे वाटते. समान गुणवत्तेवरील प्रवेशासाठी ते आवश्यक आहे.

- प्रा. माधवी बर्गे, सातारा

विद्यार्थी गोंधळलेलेच

१. नववीच्या गुणांचे पन्नास टक्के घेणार म्हटल्यावर आमचं उत्तीर्ण होणं निश्चित आहे. पण अद्यापही सीईटीचा प्रारूप आराखडा, अभ्यासक्रम काहीच उपलब्ध नसताना आम्ही पुढच्या वर्गात जायची तयारी कशी करावी हेच समजत नाही.

- नम्रता जाधव, विद्यार्थिनी

२. आमच्या परीक्षांवर सुरू असलेल्या चर्चेने आता भीतीच वाटू लागली आहे. कधी परीक्षा द्या कधी रद्द असं अनिश्चिततेचे वातावरण त्रासदायक आहे. एकच काय ते ठरवा आणि आम्हाला कळवा, पण सकाळ-संध्याकाळ या चर्चांनी खच्चीकरण होतंय.

- वरुण पवार, विद्यार्थी

पालक काय म्हणतात?

१. कोविडमुळे सर्वत्रच गोंधळाची परिस्थिती मान्य आहे. शासनाने घेतलेला कोणताही निर्णय एकाच वेळी सगळ्यांना मान्य होईल असे अजिबात नाही. पण सामूहिक हिताचा निर्णय आणि तोही लवकर घेऊन मुलांच्या मनातील गोंधळ संपवावा. म्हणजे त्यांना पुढच्या तयारीसाठी वेळ देता येईल.

- अश्विनी जंगम, पालक

२. अंतर्गत मूल्यमापनात चांगले गुण मिळालेल्यांच्या गुणांचा अकरावीसाठी उपयोग होणार नाही का? सीईटी महत्त्वाची असेल तर ती ऐच्छिक का? ठेवली? ती सक्तीची किंवा मग रद्दच करणं योग्य होते. यातून फक्त संभ्रम वाढला आहे.

- असिफ खान, पालक