शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
2
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
3
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
4
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
5
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
6
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
7
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
8
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
9
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
10
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
11
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
12
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
13
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
14
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
15
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट
16
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
17
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
18
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
19
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोना महामारीचा मेंदूवर भयंकर परिणाम, संसर्ग झाला नसला तरी...
20
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!

एक दिवसाच्या पावसाने सत्तर विहिरी तुडुंब!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2017 17:02 IST

म्हसवड : पाचवीला पुजलेल्या दुष्काळाचा शिक्का पुसण्यासाठी माण तालुक्यातील कारखेल ग्रामस्थांनी यंदा चांगलीच कंबर कसली. वॉटर कप स्पर्धेत सहभागी होऊन ग्रामस्थांनी ४५ दिवस श्रमदान करुन जलसंधारणाची कामे उभारली. या हंगामात एक दिवसच गावात पाऊस झाला. पण या पावसाने परिसरातील सत्तरहून अधिक विहिरी तुडुंब भरल्या. पन्नास दिवसानंतरही त्या विहिरी भरलेल्या आहेत.

ठळक मुद्देपन्नास दिवसानंतरही पाणी वॉटर कप स्पर्धेअंतर्गत कारखेल ग्रामस्थांच्या श्रमदानाचे फळ

म्हसवड : पाचवीला पुजलेल्या दुष्काळाचा शिक्का पुसण्यासाठी माण तालुक्यातील कारखेल ग्रामस्थांनी यंदा चांगलीच कंबर कसली. वॉटर कप स्पर्धेत सहभागी होऊन ग्रामस्थांनी ४५ दिवस श्रमदान करुन जलसंधारणाची कामे उभारली. या हंगामात एक दिवसच गावात पाऊस झाला. पण या पावसाने परिसरातील सत्तरहून अधिक विहिरी तुडुंब भरल्या. पन्नास दिवसानंतरही त्या विहिरी भरलेल्या आहेत. 

कारखेल ग्रामस्थांनी उभारलेल्या जलसंधारण कामातून व त्याला मिळालेल्या निसर्गाच्या साथीतून चांगले चित्र दिसत आहे. पाणी फाउंडेशनमध्ये सहभागी होत ग्रामस्थांनी ४५ दिवस श्रमदान केले. त्यानंतर एकच पाऊस झाला त्यामुळे ४५ दिवसांच्या श्रमाची आणि एक दिवसाच्या पावसाच्या कमालीचे यश कारखेल ग्रामस्थ अनुभवत आहेत.

 म्हसवडच्या उत्तरेला सोलापूर जिल्ह्यााच्या सीमेवर डोंगराच्या कुशीत १, ५७७ लोकसंख्येचं कारखेल गांव वसलेले आहे. कायम दुष्काळी परिस्थितीशी झगडत अनेक पिढ्या संपल्या तरी येथील दुष्काळ संपला नाही.

‘सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा’ सुरू झाली. गावाने स्पर्धेत सहभागी होत श्रमदानाला सुरुवात केली. ८ एप्रिलला सुरू झालेलं श्रमदान २२ मेपर्यंत सुरू होतं. सलग ४५ दिवस श्रमदानाच काम करून या लोकांनी गावासाठी एक आगळावेगळा इतिहास रचला. मायभूमीचे ऋण फेडण्यासाठी आणि तिला सुजलाम् सुफलाम् बनविण्यासाठी गाव एकवटला, आणि एक वेगळच तुफान आलं.

घराघरात फक्त पाणी फाउंडेशनच्या गोष्टी होऊ लागल्या. लोकं पाण्याबाबत जागृत झाली आणि एकमेकांना पाण्याचे महत्त्व पटवून दिले. इतर ठिकाणी स्थायिक झालेली सगळी लोकं गावासाठी पुन्हा एकत्र आली. पाण्यासाठी सुरू केलेल्या लढ्यात तेवढ्याच तळमळीने सहभागी झाली. पन्नास दिवसांपूर्वी पडलेल्या पावसाने डोंगरावरून येणाºया पाण्याची धार सुरूच असल्याने गावातील पाझर तलाव, सत्तर विहिरींमध्ये तुडुंब पाणी आहे.

केवळ २२ टक्केच काम

स्पर्धेदरम्यान अनेक मान्यवरांनी याठिकाणी भेट देऊन प्रोत्साहन दिलं. यातूनच ४५ दिवस न थकता काम करण्याचं बळ मिळालं. आणि ते कामही तेवढ्याच उत्साहात पूर्ण झालं. हे काम झाले असले तरी गावच्या एकूण क्षेत्रातील २२ टक्के च काम झाले. उर्वरीत भागातील मृदसंधारण व जलसंधारणाचे काम झाल्यास येथील सतत पडणाºया दुष्काळावर मात करता येणार आहे.

खूप काही कामं

२४ नालाबांध१७ जुन्या नालाबांधची दुरुस्ती२ तलावांची गळती काढली१७ किलोमीटर डीपसीसीटी२० लुज बोल्डर१६५ हेक्टरवर कंपाटमेंट बंडींगप्रत्येक कुटुंबाला पाच झाडे यामध्ये आंबा, सिताफळ, जांभूळ, कवट या फळांची झाडे देऊन ती जगवण्यासाठीची हमी घेतली.विद्यार्थ्यांना एक झाड दिले तसेच गावात येणाºया रस्त्याच्या दुतर्फा वृक्षारोपणही केले. 

 

आजपतूर आम्ही राणात बाजरी, मूग अशीच पिकं घेयचू, पण काम झालं आनं पाणी आल्याने आमी आता कापूस लावला. मला पन्नास वर्षात येवढं जिवंत पाणी बघायला मिळालं नव्हतं.

- सुशिला तात्यासाहेब गायकवाड,वय ८० रा. कारखेल

पडणाºया पावसाचे सोलापूर जिल्ह्यात वाहून जाणारे पाणी अडविण्यात यशस्वी झालो. ते पाणी ओढा जोड प्रकल्पाच्या माध्यमातून गावातील शेतीसाठी आणण्यात यशस्वी झालो असलो तरी अजूनही खूप काम बाकी आहेत. ते करुन आमच्या गावची ओळख दुष्काळी म्हणून न राहता बागायती गाव म्हणून होण्यासाठी यापुढील काळात प्रयत्नशील राहणार आहे.

- रमेश गायकवाड,उपसरपंच कारखेल