शहरं
Join us  
Trending Stories
1
'हवाई हलकल्लोळ' सुरूच! आधी दिल्ली-लेह फ्लाइट... नंतर हैदराबाद-तिरूपती विमानाचा 'यू टर्न'
2
अहमदाबाद विमान अपघात एक गूढच राहणार? ब्लॅक बॉक्समधून माहिती मिळेना; अमेरिकेला पाठवणार
3
Pandharpur Wari 2025: वारकऱ्यांसाठी टोलमाफी! पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांना कसे मिळणार टोलमाफीचे पास?
4
६२ टक्क्यांच्या प्रीमिअमसह लिस्टिंग, नंतर लागलं अपर सर्किट; पहिल्याच दिवशी गुंतणूकदार मालामाल
5
Sonam Raghuvanshi : बनावट मृतदेह, संजय वर्मा...; राजा रघुवंशीच्या हत्येसाठी सोनम आणि राजचं खतरनाक प्लॅनिंग
6
एक पैशाचा खर्च नाही, ‘हा’ उपाय एकदा करून पाहा; स्वामी कायम पाठीशी असतील, अशक्यही शक्य होईल!
7
Israel Rran War: अमेरिका आणि इस्रायलला इराणच्या अयातुल्लाह खामेनींनाच का संपवायचं आहे?
8
मायक्रोसॉफ्टमध्ये पुन्हा नोकरकपात: हजारो कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार! AI खाणार का तुमच्या नोकऱ्या?
9
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, दोघांचा मृत्यू, सात जण जखमी
10
नोबेलच्या शिफारशीबदल्यात लंच! मोठं स्वप्न बघतायत डोनाल्ड ट्रम्प; व्हाइट हाऊसनं आसिम मुनीरला आमंत्रण का दिलं? बिंग फुटलं
11
ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इराणनं केली हल्ल्याची तयारी; आता अमेरिकाही युद्धात उतरणार?
12
सब्सक्रिप्शनवर मिळणार Hero ची नवीन EV स्कूटर; पुढील महिन्यात होणार लॉन्च, पाहा फिचर्स...
13
सई ताम्हणकरला 'या' अभिनेत्याशी करायचं होतं लग्न, म्हणाली- "मी आईलाही सांगितलं होतं..."
14
"आधी युक्रेनसोबतचा तुमचा वाद निस्तरा, मग…’’, मध्य पूर्वेची चिंता करणाऱ्या पुतीन ट्रम्प यांचा टोला  
15
युनिफाईड पेन्शन स्कीमवर मोठी अपडेट; सरकारनं जोडले 'हे' फायदे, काय परिणाम होणार?
16
इराणमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणले; ११० विद्यार्थ्यांना घेऊन विमान सकाळीच पोहोचले
17
Guru Purnima 2025: २० जूनपासून गुरुपौर्णिमेपर्यंत सलग २१ दिवस करा 'ही' स्वामी उपासना!
18
अनिल अंबानींकडे असलेली सर्वात महागडी वस्तू कोणती? किंमत ऐकून अवाक व्हाल!
19
Israel Iran: इस्रायलचे हल्ले, इराणमध्ये मृत्यूचे तांडव! आतापर्यंत किती लोकांचा झाला मृत्यू? 
20
बाबा भरतशेठ, अघोरी विद्या अन्...; पालकमंत्रीपदासाठी गोगावलेंकडून पूजा? राष्ट्रवादी काँग्रेसचा आरोप

अवकाळीमुळे दीड लाख शेतकऱ्यांना अवकळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2019 12:56 IST

अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील बळीराजा पुरता कोलमडला असून, याचा फटका जवळपास दीड लाखजणांना बसला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा आर्थिक कणाच मोडलाय. तर पंचनाम्यानुसार सुमारे ६० हजार हेक्टर क्षेत्र बाधित झाल्याचे समोर आले आहे. यामध्ये सर्वाधिक नुकसानग्रस्त शेतकरी हे माण, फलटण आणि खटाव या तालुक्यांतीलच आहेत.

ठळक मुद्देअवकाळीमुळे दीड लाख शेतकऱ्यांना अवकळापंचनाम्यानुसार सुमारे ६० हजार हेक्टर क्षेत्र बाधित

नितीन काळेलसातारा : अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील बळीराजा पुरता कोलमडला असून, याचा फटका जवळपास दीड लाखजणांना बसला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा आर्थिक कणाच मोडलाय. तर पंचनाम्यानुसार सुमारे ६० हजार हेक्टर क्षेत्र बाधित झाल्याचे समोर आले आहे. यामध्ये सर्वाधिक नुकसानग्रस्त शेतकरी हे माण, फलटण आणि खटाव या तालुक्यांतीलच आहेत.जिल्ह्यात गेल्यावर्षी दुष्काळी स्थिती होती. जूनपासून आॅक्टोबरपर्यंत दुष्काळी तालुक्यात एकही दमदार पाऊस झाला नव्हता. तर पश्चिमेकडेही पर्जन्यमान कमी राहिलेले. तसेच गेल्यावर्षी दीडशेहून अधिक गावे आणि एक हजारच्या वर वाड्यावस्त्यांवरील लोकांना पाणी पुरविण्यासाठी टँकर धुरळा उडवत होते.

गेल्यावर्षी दुष्काळी तालुक्यातील खरीप आणि रब्बी हंगामही शेतकऱ्यांच्या पदरी पडला नव्हता. तसेच इतर तालुक्यातील शेतकऱ्यांनाही दुष्काळाचा चांगलाच फटका बसलेला. मात्र, यावर्षी ही स्थिती बदलली. सुकाऐवजी सततच्या पावसामुळे ओला दुष्काळ निर्माण झाल्याची भावना शेतकºयांची झालीय. त्यामुळे जिल्ह्यातीलच शेतकरी कोलमडून पडलाय.आॅक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यातील अवकाळी पावसाचा विविध पिके आणि फळबागांना मोठा फटका बसला आहे. जिल्ह्यातील १४५० हून अधिक गावांतील शेतकरी अवकाळीच्या फेऱ्यात सापडलेत. शासकीय अधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील पीक आणि फळबागा नुकसानीचे पंचनामे पूर्ण केले आहेत.

जिल्ह्यातील सर्वच ११ तालुक्यांतील मिळून ५६ हजार ९४६ हेक्टर क्षेत्र बाधित झाल्याचे स्पष्ट झाले आहे. तर बाधित शेतकऱ्यांचा आकडा हा १ लाख ४६ हजार ५९२ आहे. अवकाळी पावसात नुकसान झालेली पिके आणि फळबागांचे पंचनामे पूर्ण झाल्याचे सांगण्यात येत असलेतरी अजूनही काही शेतकरी हे नुकसानीचे अर्ज भरून देत आहेत.पूर्ण झालेल्या पंचनाम्यानुसार सर्वाधिक नुकसानग्रस्त क्षेत्र हे फलटण तालुक्यात १५ हजार ५६६ हेक्टर असल्याचे दिसून आले आहे. तर त्यानंतर माण तालुक्यात १० हजार ४२८, खटावमध्ये १० हजार १३० हेक्टरवरील पिके आणि फळबागांना फटका बसलाय. तसेच सातारा तालुक्यात ४ हजार ८८८, खंडाळा ४ हजार ६२३, कोरेगाव ३ हजार ६३५, पाटण २ हजार ९९९, कऱ्हाड १ हजार ४४४, महाबळेश्वर १ हजार ३५३, वाई १ हजार २८८ आणि जावळी तालुक्यातील बाधित क्षेत्र हे ५८५ हेक्टर इतके राहिले आहे. नुकसानीचे पंचनामे नुकतेच पूर्ण केले आहेत.जिल्ह्यात नुकसान झालेल्या क्षेत्रात सर्वाधिक पीक हे सोयाबीनचे आहे. त्या खालोखाल भात, भुईमूग, ज्वारी, घेवडा आदीचे आहे. तसेच माण, फलटण, खटाव आणि कोरेगावमधील द्राक्ष आणि डाळिंब बागांनाही अवकाळीचा मोठा फटका बसला आहे. खरीपबरोबरच रब्बी हंगामात पेरणी केलेल्या ज्वारीच्यालाही फटका बसला असून, दुबार पेरणी करावी लागणार आहे.बाधित शेतकरी संख्या अशी...जिल्ह्यातील अवकाळीने बाधित झालेल्या शेतकऱ्यांची संख्या सर्वाधिक फलटण तालुक्यात ३८ हजार ४८० इतकी आहे. त्यानंतर खटाव २२ हजार ५९, माण तालुक्यात १८ हजार ४३९, सातारा तालुका १७ हजार ९४०, खंडाळा १३ हजार ९३०, पाटण १२ हजार ३३२, कऱ्हाड ६ हजार ४६१, महाबळेश्वर ५ हजार ६९, जावळी तालुका ४ हजार ८४२, कोरेगाव ३ हजार ५९३ आणि वाई ३ हजार ४४७ असा आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीSatara areaसातारा परिसरfloodपूर