शहरं
Join us  
Trending Stories
1
Thane Video: पतीला मारहाण करत शिवीगाळ, मनसे पदाधिकारी असलेल्या पत्नीने परप्रांतीय महिलेच्या लगावली कानशिलात; ठाण्यातील घटना
2
चाबहार बंदर, वाघा बॉर्डर आणि..; भारत-अफगाणिस्तानात 'या' मुद्द्यांवर चर्चा, मुत्ताकी यांची माहिती
3
IND vs WI 2nd Test Day 3 Stumps : फॉलोऑनची नामुष्की ओढावल्यावर या दोघांची बॅट तळपली, अन्...
4
अफगाणिस्तानच्या हल्ल्यात पाकिस्तानचे ५८ सैनिक ठार; तालिबान सरकारने ISIS बद्दल काय सांगितलं?
5
IND vs WI: यशस्वी जयस्वालवर चेंडू फेकणं जेडेन सील्सला महागात पडलं; आयसीसीनं ठोठावला 'इतका' दंड!
6
संतापजनक! बहिणीला भेटायला चाललेल्या अल्पवयीन विद्यार्थिनीवर रस्त्यातच सामूहिक बलात्कार
7
AI नाही, भारतीयांच्या टॅलेंटची कमाल! या तरुणाच्या क्रिएटिव्हिटीने लावले सर्वांना वेड; व्हिडीओ एकदा बघा
8
'मुलींनी रात्री बाहेर पडू नये', दुर्गापूर सामूहिक बलात्कार प्रकरणावर ममता बॅनर्जींचे वादग्रस्त वक्तव्य
9
घरात घुसली ८ फूट लांब आणि ८० किलोंची मगर; पठ्ठ्याने एकट्यानेच नेली उचलून
10
धक्कादायक! कपडे उतरवून पोलिसांनी हैवानासारखं मारलं, धमन्या फुटल्या; तरुणाचा मृत्यू
11
'वनडे क्वीन' स्मृतीनं रचला नवा इतिहास; ७ वेळच्या वर्ल्ड चॅम्पियन विरुद्ध साधला मोठा डाव
12
“कोकणाच्या भूमीतील या न्याय मंदिरातून स्थानिकांना जलद गतीने न्याय मिळेल”: एकनाथ शिंदे
13
‘लंच पे चर्चा’! राज ठाकरे आईसोबत पुन्हा मातोश्रीवर; उद्धव ठाकरेंसोबत स्नेहभोजनाचा कार्यक्रम
14
गृह कर्जाचा हप्ता भरणं जड जातंय? ईएमआय कमी करण्यासाठी 'या' ५ स्मार्ट ट्रिक्स वापरा आणि मोठी बचत करा!
15
“दादा भुसेंचे ट्रम्प यांच्याशी घनिष्ट संबंध असतील, पालकमंत्रीपद...”; गिरीश महाजनांचा टोला
16
अर्धा संघ तंबूत धाडत कुलदीप यादवनं रचला इतिहास; दिल्लीच्या मैदानात मारला विश्वविक्रमी 'पंजा'
17
तुम्हालाही मस्त नेलपेंट लावायला आवडते? ठरेल जीवघेणं, वाढू शकतो स्किन कॅन्सरचा धोका
18
तुम्हीही होऊ शकता कोट्यधीश! विद्यार्थी, गिग वर्कर्ससाठी 'मायक्रो SIP' चा नवा सुपरहिट ट्रेंड
19
"जर तुम्ही कॉफी बनवायला शिकला असाल तर...", राहुल गांधींच्या दक्षिण अमेरिका दौऱ्यावर भाजपचा निशाणा
20
“तरे म्हणाले होते हा माणूस दगा देईल, तेच झाले, आता पश्चाताप झाला नसता”; ठाकरेंची शिंदेवर टीका

अवकाळीमुळे दीड लाख शेतकऱ्यांना अवकळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2019 12:56 IST

अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील बळीराजा पुरता कोलमडला असून, याचा फटका जवळपास दीड लाखजणांना बसला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा आर्थिक कणाच मोडलाय. तर पंचनाम्यानुसार सुमारे ६० हजार हेक्टर क्षेत्र बाधित झाल्याचे समोर आले आहे. यामध्ये सर्वाधिक नुकसानग्रस्त शेतकरी हे माण, फलटण आणि खटाव या तालुक्यांतीलच आहेत.

ठळक मुद्देअवकाळीमुळे दीड लाख शेतकऱ्यांना अवकळापंचनाम्यानुसार सुमारे ६० हजार हेक्टर क्षेत्र बाधित

नितीन काळेलसातारा : अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील बळीराजा पुरता कोलमडला असून, याचा फटका जवळपास दीड लाखजणांना बसला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा आर्थिक कणाच मोडलाय. तर पंचनाम्यानुसार सुमारे ६० हजार हेक्टर क्षेत्र बाधित झाल्याचे समोर आले आहे. यामध्ये सर्वाधिक नुकसानग्रस्त शेतकरी हे माण, फलटण आणि खटाव या तालुक्यांतीलच आहेत.जिल्ह्यात गेल्यावर्षी दुष्काळी स्थिती होती. जूनपासून आॅक्टोबरपर्यंत दुष्काळी तालुक्यात एकही दमदार पाऊस झाला नव्हता. तर पश्चिमेकडेही पर्जन्यमान कमी राहिलेले. तसेच गेल्यावर्षी दीडशेहून अधिक गावे आणि एक हजारच्या वर वाड्यावस्त्यांवरील लोकांना पाणी पुरविण्यासाठी टँकर धुरळा उडवत होते.

गेल्यावर्षी दुष्काळी तालुक्यातील खरीप आणि रब्बी हंगामही शेतकऱ्यांच्या पदरी पडला नव्हता. तसेच इतर तालुक्यातील शेतकऱ्यांनाही दुष्काळाचा चांगलाच फटका बसलेला. मात्र, यावर्षी ही स्थिती बदलली. सुकाऐवजी सततच्या पावसामुळे ओला दुष्काळ निर्माण झाल्याची भावना शेतकºयांची झालीय. त्यामुळे जिल्ह्यातीलच शेतकरी कोलमडून पडलाय.आॅक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यातील अवकाळी पावसाचा विविध पिके आणि फळबागांना मोठा फटका बसला आहे. जिल्ह्यातील १४५० हून अधिक गावांतील शेतकरी अवकाळीच्या फेऱ्यात सापडलेत. शासकीय अधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील पीक आणि फळबागा नुकसानीचे पंचनामे पूर्ण केले आहेत.

जिल्ह्यातील सर्वच ११ तालुक्यांतील मिळून ५६ हजार ९४६ हेक्टर क्षेत्र बाधित झाल्याचे स्पष्ट झाले आहे. तर बाधित शेतकऱ्यांचा आकडा हा १ लाख ४६ हजार ५९२ आहे. अवकाळी पावसात नुकसान झालेली पिके आणि फळबागांचे पंचनामे पूर्ण झाल्याचे सांगण्यात येत असलेतरी अजूनही काही शेतकरी हे नुकसानीचे अर्ज भरून देत आहेत.पूर्ण झालेल्या पंचनाम्यानुसार सर्वाधिक नुकसानग्रस्त क्षेत्र हे फलटण तालुक्यात १५ हजार ५६६ हेक्टर असल्याचे दिसून आले आहे. तर त्यानंतर माण तालुक्यात १० हजार ४२८, खटावमध्ये १० हजार १३० हेक्टरवरील पिके आणि फळबागांना फटका बसलाय. तसेच सातारा तालुक्यात ४ हजार ८८८, खंडाळा ४ हजार ६२३, कोरेगाव ३ हजार ६३५, पाटण २ हजार ९९९, कऱ्हाड १ हजार ४४४, महाबळेश्वर १ हजार ३५३, वाई १ हजार २८८ आणि जावळी तालुक्यातील बाधित क्षेत्र हे ५८५ हेक्टर इतके राहिले आहे. नुकसानीचे पंचनामे नुकतेच पूर्ण केले आहेत.जिल्ह्यात नुकसान झालेल्या क्षेत्रात सर्वाधिक पीक हे सोयाबीनचे आहे. त्या खालोखाल भात, भुईमूग, ज्वारी, घेवडा आदीचे आहे. तसेच माण, फलटण, खटाव आणि कोरेगावमधील द्राक्ष आणि डाळिंब बागांनाही अवकाळीचा मोठा फटका बसला आहे. खरीपबरोबरच रब्बी हंगामात पेरणी केलेल्या ज्वारीच्यालाही फटका बसला असून, दुबार पेरणी करावी लागणार आहे.बाधित शेतकरी संख्या अशी...जिल्ह्यातील अवकाळीने बाधित झालेल्या शेतकऱ्यांची संख्या सर्वाधिक फलटण तालुक्यात ३८ हजार ४८० इतकी आहे. त्यानंतर खटाव २२ हजार ५९, माण तालुक्यात १८ हजार ४३९, सातारा तालुका १७ हजार ९४०, खंडाळा १३ हजार ९३०, पाटण १२ हजार ३३२, कऱ्हाड ६ हजार ४६१, महाबळेश्वर ५ हजार ६९, जावळी तालुका ४ हजार ८४२, कोरेगाव ३ हजार ५९३ आणि वाई ३ हजार ४४७ असा आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीSatara areaसातारा परिसरfloodपूर