शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
2
“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही
3
सरकार शेतकऱ्यांचे आहे, चिंता करू नका! एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला धीर
4
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ
5
"प्रत्येकाला स्वाभिमान असतो, त्याने..."; शाहीन शाह आफ्रिदीकडून हॅरिस रौफच्या कृतीचे समर्थन
6
“बॅगवरचा फोटो कसला पाहता, मदत पाहा”; एकनाथ शिंदे शेतकऱ्यांच्या बांधावर, केली नुकसानीची पाहणी
7
बापासमोरच दोन वर्षाच्या मुलाला जबड्यात धरून बिबट्या पसार; १५० जवानांकडून शोधमोहिम, मृतदेह सापडला
8
आपली मुलगी राजकारणात येणार? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले, म्हणाले...
9
लवकरच बाजारात येतेय Toyota ची Mini Fortuner! महाराष्ट्रातल्या 'या' शहरात होणार उत्पादन; किती असू शकते किंमत? जाणून घ्या
10
तंत्रज्ञानाची किमया! सॅमसंगने AI Home केलं लाँच; आता घर होईल स्मार्ट, फक्त एक क्लिक अन्...
11
तांत्रिक बिघाड की मोसादचा हात? संयुक्त राष्ट्रांत पॅलेस्टाईनवर चर्चा होताच ४ बड्या नेत्यांचा माईक बंद  
12
पद्मश्री ज्येष्ठ लेखक एस. एल. भैरप्पा काळाच्या पडद्याआड; पंतप्रधान मोदींसह राष्ट्रपतींनी वाहिली श्रद्धांजली
13
लडाखमधील आंदोलनाला हिंसक वळण, जाळपोळ, लेहमध्ये ४ जणांचा मृत्यू, ७० जण जखमी 
14
हलगर्जीपणाचा कळस! सरकारी रुग्णालयात दुसऱ्याच पायाची सर्जरी, ऑक्सिजन मास्क काढला अन्...
15
"फायनलमध्ये बघून घेऊ’’, दोन वेळा मार खाल्यानंतर शाहीन शाह आफ्रिदीचं भारताला आव्हान    
16
समस्या संपतील, स्वामी कायम सोबत असतील; ९ गुरुवार व्रताने बदल नक्की दिसतील, अशक्य शक्य होईल!
17
जीएसटीमुळे वाहनांच्या किंमतीच नाही, RTO Tax देखील कमी झाला; तिहेरी फायदा कोणालाच कळला नाही...
18
समृद्धी महामार्गावर दुहेरी उत्पन्नाचा स्रोत; सौरऊर्जा निर्मिती करणारा देशातील पहिला 'एक्सप्रेसवे' !
19
Swami Chaitanya Saraswati: 'माझ्या खोलीत ये, तुला...'; स्वामी चैतन्यानंद सरस्वतीचे 'अश्लील कारनामे', व्हॉटसअप चॅटमध्ये काय?
20
आयटी-मेटलसह 'या' क्षेत्रातील शेअर्समध्ये मोठी पडझड; गुंतवणूकदारांचे ३ लाख कोटी रुपये बुडाले

उन्हाळ्यात दीडशे गावांना टंचाईच्या झळा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2021 04:38 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : जिल्ह्यात उन्हाळ्याच्या काळात अनेक गावांना टंचाईचा सामना करावा लागतो. त्यामुळे याबाबतचा संभाव्य पाणीटंचाई कृती ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : जिल्ह्यात उन्हाळ्याच्या काळात अनेक गावांना टंचाईचा सामना करावा लागतो. त्यामुळे याबाबतचा संभाव्य पाणीटंचाई कृती आराखडा तयार करण्यात येतो. आताही आराखडा तयार करण्यात आला असून, जूनपर्यंत १३८ गावांना टंचाईचा सामना करावा लागेल, असा अंदाज आहे. या टंचाई निवारणासाठी सुमारे साडेपाच कोटी खर्च येऊ शकतो.

सातारा जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडून जानेवारी ते मार्च आणि एप्रिल ते जून महिना असा दोन प्रकारांत संभाव्य पाणीटंचाईचा आराखडा तयार करण्यात येतो. आताही हे दोन्ही आराखडे तयार करण्यात आले आहेत. त्यानुसार जानेवारी ते मार्च या तीन महिन्यांत टंचाई भासणाऱ्या गावांची संख्या २०२ आणि वाड्यांचा आकडा १८२ निश्चित करण्यात आला आहे. अशा ठिकाणी विंधन विहीर घेणे, विहिरींचे अधिग्रहण करणे, नळपाणी पुरवठा योजनांची दुरुस्ती व इतर खर्च असा पाणीटंचाईवर अंदाजे तीन कोटी नऊ लाखांचा खर्च होऊ शकतो, तर या तीन महिन्यांत ४९ गावांना टँकरने पाणीपुरवठा करावा लागू शकतो. यासाठी १३ टँकर लागण्याची शक्यता गृहीत धरण्यात आली आहे. या तीन महिन्यांत कोरेगाव, पाटण आणि कऱ्हाड तालुक्यात टँकर सुरू करावे लागतील, असा अंदाज आहे.

एप्रिल ते जून या महिन्यांत कडक उन्हाळा असतो. त्यामुळे टंचाई भासणाऱ्या गावे आणि वाड्यांची संख्या वाढतच जाते. याचा विचार करून ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने या तीन महिन्यांत १६९ गावे आणि २२६ वाड्यांत टंचाई भासू शकते, असा निष्कर्ष काढला आहे, तर यामधील १३८ गावांना टंचाईचा सामना करावा लागेल. यासाठी ४६ टँकर लागू शकतात. टंचाई निवारणाची विविध कामे आणि टँकरवर अंदाजे दोन कोटी ४५ लाख खर्च येऊ शकतो, असे अंदाजे ठरविण्यात आले आहे.

चौकट :

माण, खटावमधील अधिक गावे टंचाईत...

माण आणि खटाव हे दोन तालुके दुष्काळी. या तालुक्यात सध्या काही योजनांचे पाणी आले आहे. त्यामुळे टंचाईची स्थिती कमी झाली आहे. असे असले तरी यावर्षी संभाव्य टंचाई आराखड्यात या दोन तालुक्यांतीलच गावे अधिक आहेत. एप्रिल ते जून या तीन महिन्यांत माणमधील २२, तर खटाव तालुक्यातील २० गावांना टँकर सुरू करावा लागेल, असा अंदाज आहे. तर जावळी, फलटण, कोरेगाव, सातारा, वाई या तालुक्यांतही टँकर सुरू करावे लागणाऱ्या गावांची संख्या कमी राहील, असे अंदाजे निश्चित करण्यात आले आहे.

..........................................................