शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
3
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
4
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
5
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
6
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
7
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
8
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
9
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
10
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
11
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
12
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
13
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
14
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
15
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
16
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
17
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
18
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
19
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

उन्हाळ्यात दीडशे गावांना टंचाईच्या झळा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2021 04:38 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : जिल्ह्यात उन्हाळ्याच्या काळात अनेक गावांना टंचाईचा सामना करावा लागतो. त्यामुळे याबाबतचा संभाव्य पाणीटंचाई कृती ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : जिल्ह्यात उन्हाळ्याच्या काळात अनेक गावांना टंचाईचा सामना करावा लागतो. त्यामुळे याबाबतचा संभाव्य पाणीटंचाई कृती आराखडा तयार करण्यात येतो. आताही आराखडा तयार करण्यात आला असून, जूनपर्यंत १३८ गावांना टंचाईचा सामना करावा लागेल, असा अंदाज आहे. या टंचाई निवारणासाठी सुमारे साडेपाच कोटी खर्च येऊ शकतो.

सातारा जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडून जानेवारी ते मार्च आणि एप्रिल ते जून महिना असा दोन प्रकारांत संभाव्य पाणीटंचाईचा आराखडा तयार करण्यात येतो. आताही हे दोन्ही आराखडे तयार करण्यात आले आहेत. त्यानुसार जानेवारी ते मार्च या तीन महिन्यांत टंचाई भासणाऱ्या गावांची संख्या २०२ आणि वाड्यांचा आकडा १८२ निश्चित करण्यात आला आहे. अशा ठिकाणी विंधन विहीर घेणे, विहिरींचे अधिग्रहण करणे, नळपाणी पुरवठा योजनांची दुरुस्ती व इतर खर्च असा पाणीटंचाईवर अंदाजे तीन कोटी नऊ लाखांचा खर्च होऊ शकतो, तर या तीन महिन्यांत ४९ गावांना टँकरने पाणीपुरवठा करावा लागू शकतो. यासाठी १३ टँकर लागण्याची शक्यता गृहीत धरण्यात आली आहे. या तीन महिन्यांत कोरेगाव, पाटण आणि कऱ्हाड तालुक्यात टँकर सुरू करावे लागतील, असा अंदाज आहे.

एप्रिल ते जून या महिन्यांत कडक उन्हाळा असतो. त्यामुळे टंचाई भासणाऱ्या गावे आणि वाड्यांची संख्या वाढतच जाते. याचा विचार करून ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने या तीन महिन्यांत १६९ गावे आणि २२६ वाड्यांत टंचाई भासू शकते, असा निष्कर्ष काढला आहे, तर यामधील १३८ गावांना टंचाईचा सामना करावा लागेल. यासाठी ४६ टँकर लागू शकतात. टंचाई निवारणाची विविध कामे आणि टँकरवर अंदाजे दोन कोटी ४५ लाख खर्च येऊ शकतो, असे अंदाजे ठरविण्यात आले आहे.

चौकट :

माण, खटावमधील अधिक गावे टंचाईत...

माण आणि खटाव हे दोन तालुके दुष्काळी. या तालुक्यात सध्या काही योजनांचे पाणी आले आहे. त्यामुळे टंचाईची स्थिती कमी झाली आहे. असे असले तरी यावर्षी संभाव्य टंचाई आराखड्यात या दोन तालुक्यांतीलच गावे अधिक आहेत. एप्रिल ते जून या तीन महिन्यांत माणमधील २२, तर खटाव तालुक्यातील २० गावांना टँकर सुरू करावा लागेल, असा अंदाज आहे. तर जावळी, फलटण, कोरेगाव, सातारा, वाई या तालुक्यांतही टँकर सुरू करावे लागणाऱ्या गावांची संख्या कमी राहील, असे अंदाजे निश्चित करण्यात आले आहे.

..........................................................