शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
2
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
3
अभिनेत्री मुक्ता बर्वे व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्काराने सन्मानित, भावना व्यक्त करत म्हणाली...
4
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
5
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
6
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
7
Dharali floods: 43 किमी वेग... 1230 उंच डोंगरावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
8
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
9
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
10
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
11
VIDEO: साडी नेसून.. डोक्यावर पदर घेऊन... 'देसी भाभी'चा शकिराच्या 'हिप्स डोन्ट लाय' वर भन्नाट डान्स
12
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
13
₹500 नोट एटीएममधून मिळणे बंद होणार? मोदी सरकारने संसदेत दिले उत्तर
14
मुलगा वापरायचा मृत आईचं बँक खातं, अचानक खात्यात आले १०० कोटी रुपये, त्यानंतर...
15
निळेशार डोळे असलेल्या मॉडेलचं डोनाल्ड ट्रम्प का करतायत तोंडभरून कौतुक? कारण खूपच खास
16
Vivo Y400 5G: एमोलेड डिस्प्ले, ६००० mAh बॅटरी आणि बरेच काही; विवो व्हाय ४०० भारतात लॉन्च!
17
Video - "पळ भावा पळ..."; ढिगाऱ्यात अडकलेल्या दोघांनी मृत्यूला दिला चकवा, पुरात चमत्कार
18
कबुतरांना खाद्य मिळण्याचा मार्ग मोकळा; कबुतरखान्यांबद्दल CM फडणवीसांचा महत्त्वाचा निर्णय
19
भारताला धमकी मिळाल्यानंतर रशिया संतापला; अमेरिकेला सांगितलं, 'धमकी देऊ नका'
20
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?

उन्हाळ्यात दीडशे गावांना टंचाईच्या झळा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2021 04:38 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : जिल्ह्यात उन्हाळ्याच्या काळात अनेक गावांना टंचाईचा सामना करावा लागतो. त्यामुळे याबाबतचा संभाव्य पाणीटंचाई कृती ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : जिल्ह्यात उन्हाळ्याच्या काळात अनेक गावांना टंचाईचा सामना करावा लागतो. त्यामुळे याबाबतचा संभाव्य पाणीटंचाई कृती आराखडा तयार करण्यात येतो. आताही आराखडा तयार करण्यात आला असून, जूनपर्यंत १३८ गावांना टंचाईचा सामना करावा लागेल, असा अंदाज आहे. या टंचाई निवारणासाठी सुमारे साडेपाच कोटी खर्च येऊ शकतो.

सातारा जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडून जानेवारी ते मार्च आणि एप्रिल ते जून महिना असा दोन प्रकारांत संभाव्य पाणीटंचाईचा आराखडा तयार करण्यात येतो. आताही हे दोन्ही आराखडे तयार करण्यात आले आहेत. त्यानुसार जानेवारी ते मार्च या तीन महिन्यांत टंचाई भासणाऱ्या गावांची संख्या २०२ आणि वाड्यांचा आकडा १८२ निश्चित करण्यात आला आहे. अशा ठिकाणी विंधन विहीर घेणे, विहिरींचे अधिग्रहण करणे, नळपाणी पुरवठा योजनांची दुरुस्ती व इतर खर्च असा पाणीटंचाईवर अंदाजे तीन कोटी नऊ लाखांचा खर्च होऊ शकतो, तर या तीन महिन्यांत ४९ गावांना टँकरने पाणीपुरवठा करावा लागू शकतो. यासाठी १३ टँकर लागण्याची शक्यता गृहीत धरण्यात आली आहे. या तीन महिन्यांत कोरेगाव, पाटण आणि कऱ्हाड तालुक्यात टँकर सुरू करावे लागतील, असा अंदाज आहे.

एप्रिल ते जून या महिन्यांत कडक उन्हाळा असतो. त्यामुळे टंचाई भासणाऱ्या गावे आणि वाड्यांची संख्या वाढतच जाते. याचा विचार करून ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने या तीन महिन्यांत १६९ गावे आणि २२६ वाड्यांत टंचाई भासू शकते, असा निष्कर्ष काढला आहे, तर यामधील १३८ गावांना टंचाईचा सामना करावा लागेल. यासाठी ४६ टँकर लागू शकतात. टंचाई निवारणाची विविध कामे आणि टँकरवर अंदाजे दोन कोटी ४५ लाख खर्च येऊ शकतो, असे अंदाजे ठरविण्यात आले आहे.

चौकट :

माण, खटावमधील अधिक गावे टंचाईत...

माण आणि खटाव हे दोन तालुके दुष्काळी. या तालुक्यात सध्या काही योजनांचे पाणी आले आहे. त्यामुळे टंचाईची स्थिती कमी झाली आहे. असे असले तरी यावर्षी संभाव्य टंचाई आराखड्यात या दोन तालुक्यांतीलच गावे अधिक आहेत. एप्रिल ते जून या तीन महिन्यांत माणमधील २२, तर खटाव तालुक्यातील २० गावांना टँकर सुरू करावा लागेल, असा अंदाज आहे. तर जावळी, फलटण, कोरेगाव, सातारा, वाई या तालुक्यांतही टँकर सुरू करावे लागणाऱ्या गावांची संख्या कमी राहील, असे अंदाजे निश्चित करण्यात आले आहे.

..........................................................