शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
2
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
3
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
4
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
5
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
6
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
7
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
8
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
9
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
10
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
11
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
12
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
13
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
14
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

Satara- पुसेसावळी दंगल: संबंध नसलेल्यांना सोडा, अन्यथा..; व्यापाऱ्यांचा इशारा

By दीपक शिंदे | Updated: September 14, 2023 13:53 IST

निष्पापांवर पोलिसांनी कारवाई केल्याचा आरोप

पुसेसावळी : आक्षेपार्ह पोस्टनंतर उसळलेल्या दंगलप्रकरणी पोलिसांनी काही जणांना ताब्यात घेऊन अटक केली आहे. मात्र, पोलिसांच्या कारवाईवर आक्षेप घेत काही जणांनी बाजारपेठ उघडण्यास विरोध दर्शविला आहे. जोपर्यंत युवकांना या गुन्ह्यातून वगळले जात नाही, तोपर्यंत बाजारपेठ सुरू होणार नसल्याची भूमिका संबंधितांनी घेतली आहे.पुसेसावळी येथे आक्षेपार्ह पोस्टच्या कारणावरून रविवारी रात्री दंगल उसळली. या दंगलीनंतर तेथील बाजारपेठ पूर्णपणे ठप्प झाली. मंगळवारी सायंकाळी बाजारपेठ सुरू करण्यासाठी प्रशासनाकडून आवाहन करण्यात आले. तसेच प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत काही दुकाने सुरू करण्यात आली होती. त्यामुळे बुधवारपासून सर्वकाही सुरळीत होईल, अशी अपेक्षा असताना बुधवारी सकाळीच काही व्यापाऱ्यांनी दुकाने उघडण्यास विरोध दर्शवला.

चर्चा निष्फळगुन्ह्यात अटक केलेल्यांपैकी काही युवकांचा या घटनेशी कसलाच संबंध नाही. त्यामुळे त्यांच्यावरील कायदेशीर कारवाई अन्यायकारक असल्याचा आरोप करून संबंधित व्यापाऱ्यांनी आपली दुकाने बंदच ठेवली. ग्रामपंचायत प्रशासन तसेच पोलिसांकडून यावेळी व्यापाऱ्यांशी चर्चा करण्यात आली. मात्र, ही चर्चा निष्फळ ठरली. व्यापारी आपल्या भूमिकेवर ठाम राहिले. प्रशासनाने वारंवार आवाहन करूनही कोणीही दुकान उघडले नाही. त्यामुळे गावात शांतता असली तरी बाजारपेठेत पूर्णतः शुकशुकाट जाणवत आहे.

कोणावरही अन्याय होणार नाही: बापू बांगरदरम्यान, दंगल प्रकरणात दोन वेगवेगळे गुन्हे दाखल असून गुन्हा निष्पन्न होणाऱ्यांवरच कारवाई केल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. कायदेशीर प्रक्रियेनुसार तपास सुरू असताना कोणावरही अन्याय होणार नाही, याची खबरदारी घेतली जात असल्याचे अप्पर पोलिस अधीक्षक बापू बांगर यांनी सांगितले.

अप्पर पोलिस अधीक्षक तळ ठोकूनदंगलीच्या घटनेनंतर संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष पुसेसावळीतील हालचालींवर लागून राहिले आहे. या सर्व घटनेत पोलिस प्रशासनावर प्रचंड ताण आहे. गावात शांतता राहावी, यासाठी पोलिसांकडून प्रयत्न केले जात आहेत. अप्पर पोलिस अधीक्षक बापू बांगर, पोलिस उपअधीक्षक अश्विनी शेंडगे यांच्यासह अधिकारी पुसेसावळीत तळ ठोकून आहेत. गावात अद्यापही कडक पोलिस बंदोबस्त तैनात आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसर