शहरं
Join us  
Trending Stories
1
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
2
“भारत महाशक्ती, लादलेले टॅरिफ असंविधानिक”; ट्रम्प यांना अमेरिकन अर्थशास्त्रज्ञांचा घरचा अहेर
3
"जे देश सध्या दादागिरी करताहेत ते..."; भारत-अमेरिका तणावावर नितीन गडकरी यांचे रोखठोक विधान
4
लवकरच भडकणार पुढचं युद्ध! लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी यांचा सूचक आणि गंभीर इशारा  
5
जगदीप धनखड गायब? राऊतांना वेगळाच संशय; म्हणाले, “रशिया-चीनची पद्धत भारतात सुरू केली का?”
6
“शरद पवारांनंतर ते लोक उद्धव ठाकरेंनाही भेटले, लोकसभा अन् विधानसभेला...”; संजय राऊतांचा दावा
7
“RSS शिस्तबद्ध संघटना, ७५ वर्षे अटीचे पालन करेल”; शरद पवारांचा नाव न घेता PM मोदींकडे रोख!
8
अमेरिका-भारत नव्हे, 'या' देशाने बनवला जगातील सगळ्यात घातक ड्रोन! ११ टन वजन अन् AIवर चालणार
9
रोहित शर्माने खरेदी केली Lamborghini, नंबरने वेधले चाहत्यांचे लक्ष; काय आहे ३०१५ चा अर्थ?
10
ट्रम्प टॅरिफचा पहिला फटका, अनेक कारखान्यांत काम बंद, भारतातील व्यापार गेला पाकिस्तानात
11
गडकरींचे ३.५० लाख मतदार वगळले, कुटुंबीयांचाही समावेश; अजून पुरावे मागणार की माफी?; काँग्रेसचा सवाल
12
Video : भर पावसात बाबांचा स्वयंपाक, चिमुकल्यांनी डोक्यावर धरलं 'असं' छत, पाहून डोळ्यांत येईल पाणी! 
13
साप्ताहिक राशीभविष्य: मोठी जोखीम टाळा, पैसे उसने देऊ नये; ८ राशींना लाभ, सुख-सुबत्ता-कल्याण!
14
कियारा अडवाणीच्या बिकिनी सीन्सवर कात्री? 'वॉर २'ला प्रमाणपत्र देताना सेन्सॉर बोर्डाचे निर्देश
15
RCBच्या यश दयालवर बंदीची कारवाई; अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी 'या' स्पर्धेतून बाद
16
पाकिस्तानला झाले तब्बल 'इतक्या' कोटींचे नुकसान; भारतीय विमानांसाठी हवाई क्षेत्र बंद करणे पडले महागात!
17
सर्वाधिक धावा कुटल्या, मग कर्णधाराला माघारी धाडलं, २२ वर्षांच्या ऑलराउंडरने जिंकवला सामना
18
सोशल मीडियावर मैत्री केली; चार तरुणींच्या जाळ्यात अडकलेल्या आजोबांनी आयुष्यभराची कमाई गमावली!
19
५ लाख देण्याचे आश्वासन अन् हातात पडले अवघ्या ५ हजाराचे धनादेश; उत्तरकाशीतील नागरिकांचा संताप
20
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये कोण जिंकलं? सेना प्रमुखांनी पाकिस्तानला थेट उत्तर दिलं! म्हणाले...

केंद्र सरकारविरोधात ओबीसी समाज रस्त्यावर उतरणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2021 04:27 IST

पत्रकात म्हटले आहे की, सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार महानगरपालिका ,नगरपालिका, जिल्हा परिषदा आणि ग्रामपंचायतमध्ये देण्यात आलेले अतिरिक्त आरक्षण रद्द ...

पत्रकात म्हटले आहे की, सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार महानगरपालिका ,नगरपालिका, जिल्हा परिषदा आणि ग्रामपंचायतमध्ये देण्यात आलेले अतिरिक्त आरक्षण रद्द झाले आहे. हे आरक्षण रद्द होण्यास केंद्र सरकार सर्वस्वी जबाबदार आहे. जनगणना करणे ही मुळात राज्य सरकारच्या अखत्यारीत येत नाही. जनगणना केंद्र सरकारकडून करण्यात येते. जर केंद्र सरकारने वेळेत ओबीसींची वेगळी जनगणना केली असती, तर आज ही परिस्थिती ओबीसी समाजावर ओढवली नसती. त्यासाठी ओबीसींची जनगणना होणे खूप आवश्यक आहे. त्याशिवाय हा अतिरिक्त आरक्षणाचा तिढा सुटणार नाही.

सुप्रीम कोर्टाने दिलेल्या आदेशाचे आम्ही स्वागत करत असून, राज्य सरकारने लवकरात लवकर कर्नाटकच्या धर्तीवर ओबीसींसाठी स्वतंत्र आयोगाची स्थापना करणे गरजेचे आहे. त्यामुळे भविष्यात ओबीसी आरक्षणास कुठलाही धोका निर्माण होणार नाही. राज्य सरकारकडून ओबीसींसाठी स्वतंत्र आयोगाची स्थापना करण्यात येईल. परंतु केंद्र सरकारने संपूर्ण देशातील ओबीसींची वेगळी जनगणना करणे हे खूप महत्त्वाचे आहे आणि यासाठी केंद्र सरकारने ताबडतोब ओबीसींंची जनगणना करावी, अन्यथा महाराष्ट्रातील सर्व ओबीसी समाज रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही.