शहरं
Join us  
Trending Stories
1
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
2
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
3
भाजपचा विजयी चौकार की काँग्रेस ठरणार ‘गेमचेंजर’? शिवसेना, राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाची लढाई
4
IPL 2026 Auction Live Streaming : क्रिकेटर्सवर होणार पैशांची 'बरसात'! कधी अन् कुठे पाहता येईल लिलाव?
5
कुख्यात गँगस्टर सुभाषसिंह ठाकूरचा ताबा मिरा भाईंदर पोलिसांकडे; मंगळवारी कोर्टात हजर करणार
6
कोंबड्यांचा व्यवसायाआड चालणारा अमली पदार्थांचा कारखाना पोलिसांकडून उद्ध्वस्त, ११ अटकेत
7
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
8
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला रस्ता वळवताना नियोजनाचा अभाव; शिक्षिकेचा उपचाराअभावी मृत्यू
9
बालविवाह थांबवला..! नवरदेव लग्न मंडपात जाणार होता, पण त्यापूर्वीच दामिनी पथकाची धडक अन्...
10
डोंबिवलीत ४० वार करून खून करणारे आरोपी १२ तासात गजाआड, पाच दिवसांची पोलिस कोठडी
11
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
12
फुटबॉल जगतातील दिग्गजाला जय शाह यांनी दिलं खास निमंत्रण; मेस्सी म्हणाला, "मी नक्कीच पुन्हा येईन!"
13
रणजित गायकवाड यांची हल्ल्यानंतर १० दिवसांनी मृत्यूशी झुंज अपयशी, त्याच दिवशी आरोपी गजाआड
14
उधमपूरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांसोबत चकमक; सुरक्षा दलाने संपूर्ण परिसराला घेरले
15
IPL 2026 Auction : खर्चासाठी MI च्या पर्समध्ये फक्त पावणे तीन कोटी; तरीही ते निवांत कारण...
16
शाब्बास पोरा! ४० लाखांचं पॅकेज सोडून वडिलांचं स्वप्न केलं साकार; आधी IPS, मग झाला IAS
17
"बांग्लादेशींना महाराष्ट्रात आणून सत्ताधाऱ्यांच्या जवळचे लोक ड्रग्स कारखाने चालवत आहेत..."
18
उद्धव-राज ठाकरे एकत्र आले अन् काँग्रेसही सोबत गेली तर..? देवेंद्र फडणवीसांचे स्पष्ट उत्तर
19
सुट्टी नाही! रोहित-विराटसाठीच नव्हे तर BCCI नं गिल आणि सूर्यासाठीही केली 'या' गोष्टीची सक्ती
Daily Top 2Weekly Top 5

वाहनांच्या संख्येत घोळ; टोलमध्ये झोल ! : टोलनाक्यावरील चलाखी -बोगस पास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2019 23:16 IST

एका खासगी सर्वेक्षण करणा-या कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, ४३ लाख वाहने टोलनाक्यावरून प्रत्यक्षात जातात, पण कागदावर केवळ १७ लाख वाहने गेल्याची नोंद असते. याविषयी अधिकृत माहिती देण्यास शासकीय यंत्रणा असमर्थ असल्याचं सांगिंतलं जातं.

ठळक मुद्देविनापावतीची वसुली नित्याचीच; माहिती मागितल्यास अरेरावीची भाषा असुविधांचा ‘महा’मार्ग

प्रगती जाधव-पाटील।सातारा/सांगली : पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर दिवसभरात लाखो वाहनांची वर्दळ असते. मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे आणि तासवडे, किणी टोलनाक्यावरून जाणाऱ्या गाड्यांचा आकडा शासनाच्या संकेतस्थळावर दर महिन्याचा उपलब्ध आहे. मात्र, खेडशिवापूर आणि आनेवाडी टोलनाक्यावरील आकडेवारी दिसत नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

राष्ट्रीय महामार्ग विकास प्राधिकरणाच्या (न्हाई) अखत्यारित येणारा खेडशिवापूर ते आनेवाडी टोलनाका असुविधांच्या गर्तेत आहे. पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर दिवसाला लाखो गाड्या प्रवास करतात. मात्र, मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरून पुढं खेडशिवापूरकडे येणाºया गाड्यांच्या संख्येत प्रचंड तफावत दिसते. याविषयी माहिती हा फरक आनेवाडी टोलनाक्यावरही दिसतो. पुढं तासवडे आणि किणी या दोन्ही टोलनाक्यांकडे जाताना वाहनांची संख्या वाढल्याचे दिसते.

एका खासगी सर्वेक्षण करणा-या कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, ४३ लाख वाहने टोलनाक्यावरून प्रत्यक्षात जातात, पण कागदावर केवळ १७ लाख वाहने गेल्याची नोंद असते. याविषयी अधिकृत माहिती देण्यास शासकीय यंत्रणा असमर्थ असल्याचं सांगिंतलं जातं.

आनेवाडी आणि खेडशिवापूर टोलनाका परिसरातील ५ किलोमीटर अंतराच्या परिघातील गावे टोलमुक्त करण्यात आली आहेत. अनेकदा या अंतराच्या पलीकडे असणाºया वाहनांनाही टोल न घेता सोडलं जातं. काहीवेळा पावतीशिवाय टोल घेतला जातो; मोठी रांग असताना पैसे गोळा करून अनेक पद्धतीने घोळ घातले जातात. अनेकवेळा वाहनधारकांनी जाब विचारण्याचा प्रयत्न केला असता त्यांना टोलवरील कर्मचाऱ्यांकडून दमदाटी करण्याचा प्रयत्न होतो. प्रसंगी मारहाणही होते. टोल भरूनही होणारा हा त्रास चालकांना असह्य होतो.

क-हाड परिसर बनतोय अपघातप्रवण क्षेत्रतुटलेल्या जाळ्या : महामार्गावर क-हाडच्या नवीन कोयना पुलापासून नांदलापूरपर्यंत महामार्ग आणि उपमार्गात संरक्षक जाळ्या आहेत. मात्र, या जाळ्या ठिकठिकाणी तुटल्या आहेत. त्यामुळे अनेकजण त्यातून महामार्ग ओलांडण्याचा प्रयत्न करतात आणि जीव गमावतात.

छेदरस्ताच नाही : तासवडे टोलनाका ते वाठारपर्यंत ठराविक ठिकाणीच छेदरस्ता आहे. या छेदरस्त्यानजीक आवश्यक त्या उपाययोजना नाहीत. त्यामुळे छेदरस्त्यातून महामार्ग ओलांडताना वाहनांना अपघाताचा सामना करावा लागतो.येथे होतात अपघात... : कºहाड परिसराचा विचार करता, कोल्हापूर नाका, नांदलापूर बसथांबा, गोटे बसथांबा, गंधर्व हॉटेलसमोरील थांबा व जाखीणवाडी ही ठिकाणे अपघातास निमंत्रण देणारी आहेत. संबंधित ठिकाणी बसथांबे आहेत. मात्र, तेथे कसलीच सुरक्षा नाही.

ट्रॅफिक सर्व्हे करून ठरते ‘पे बॅक’ची रक्कम!एखाद्या ठिकाणी टोलनाका उभा करायचा असेल, तर त्या रस्त्यावरून एका दिवसात सरासरी किती वाहने प्रवास करतात, याचा अंदाज घेतला जातो, त्याला ट्रॅफिक सर्व्हे असं म्हणतात. हा सर्व्हे केल्यानंतर किती टोल आकारायचा आणि किती वर्षांसाठी टोलनाका सुरू ठेवायचा हे निश्चित करण्यात येतं, याला ‘पे बॅक’ सिस्टीम असं म्हणतात. आनेवाडी आणि खेडशिवापूर टोलनाक्यावर झालेला ट्रॅफिक सर्व्हे रिपोर्ट आणि ‘पे बॅक’ अहवाल नेमका काय सांगतो, हे अद्याप गुलदस्त्यातच आहे.

क-हाडच्या कोल्हापूर नाक्यावर धोका कायमकºहाडचा कोल्हापूर नाका हा अपघातप्रवण क्षेत्र. याठिकाणी दिवसाला दोन-तीन लहान-मोठे अपघात होतातच. आवश्यक त्या उपाययोजना नसल्यामुळे आणि धोकादायक स्थितीमुळे नाक्यावर ही परिस्थिती आहे.

  • कोल्हापूर नाक्यावर उड्डाण पूल उभारण्यासाठी दहा वर्षांपूर्वी भूगर्भातील थर परीक्षण केले गेले. मात्र, नंतर कोणतीच कार्यवाही झाली नाही. अनेकवेळा एमएसआरडी व विविध विभागाकडून पाहणी करून नकाशे तयार केले. ते नकाशे केवळ कागदोपत्रीच राहिले.

महामार्गावरील रस्त्यांबाबत ‘न्हाई’ची भूमिका कायमच असंवेदनशील राहिली आहे. याप्रश्नी कधीही लोक एकत्र येऊन उठाव करत नाहीत, याचा अंदाज त्यांनी घेतलाय. त्यामुळे जोपर्यंत त्यांना आर्थिक फटका बसत नाही, तोवर ते सुविधा उपलब्ध करून देणार नाहीत, हे सत्य आहे.- विवेक वेलणकर,माहिती अधिकार कार्यकर्ता, पुणे

 

टॅग्स :Satara areaसातारा परिसरtollplazaटोलनाकाfraudधोकेबाजी