शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

झेडपीमधील कोरोनाबाधित कर्मचारी संख्या ८०० जवळ...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 05:15 IST

सातारा : जिल्हा परिषदेअंतर्गत कार्यरत कर्मचाऱ्यांत कोरोना संसर्ग सुरूच असून, बाधित आकडा ७७१ झाला आहे, तर ७३८ जणांनी कोरोनावर ...

सातारा : जिल्हा परिषदेअंतर्गत कार्यरत कर्मचाऱ्यांत कोरोना संसर्ग सुरूच असून, बाधित आकडा ७७१ झाला आहे, तर ७३८ जणांनी कोरोनावर मात केली असून, आतापर्यंत १७ कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे.

जिल्ह्यात कोरोनाचा पहिला रुग्ण मार्च महिन्याच्या उत्तरार्धात आढळला. त्यानंतर विविध गावांबरोबरच शासकीय विभागातही कोरोनाचा शिरकाव झाला; तर जिल्हा परिषदेत जुलै महिन्यात प्रथम कोरोना रुग्ण सापडले. त्यानंतर टप्प्याटप्प्याने अनेक विभागात कोरोनाचा शिरकाव झाला. आतापर्यंत अर्थ, रोजगार हमी योजना, बांधकाम, समाजकल्याण, शिक्षण, आरोग्य आदी विभागांत कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. कर्मचारी आणि अधिकारीही कोरोनाबाधित झाले आहेत. आतापर्यंत जिल्हा परिषदेच्या एकूण ७७१ कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

सातारा तालुक्यात कार्यरत १३६ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. तर कऱ्हाडमध्ये १०९, कोरेगाव तालुका १३१, खटाव ६९, खंडाळा तालुका ३७, जावळी २७, पाटण तालुक्यात ८३, फलटण ४९, महाबळेश्वर ३३, माण ४१ आणि वाई तालुक्यात कार्यरत असणाऱ्या ५६ कर्मचाऱ्यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे; तर कोरोनाने आतापर्यंत १७ कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये खटाव तालुक्यात कार्यरत सर्वाधिक ५ कर्मचाऱ्यांचा कोरोनाने बळी गेला आहे. पाटण तालुक्यातील तिघांचा, तर सातारा, कोरेगाव, जावळी आणि फलटण तालुक्यात कार्यरत प्रत्येकी २ कर्मचाऱ्यांचा कोरोना विषाणूमुळे मृत्यू झाला आहे. माण तालुक्यातीलही एका कर्मचाऱ्याचाही कोरोनाने बळी गेला आहे.

चौकट :

सातारा तालुक्यातील १३३ कोरोनामुक्त...

जिल्हा परिषदेच्या ७७१ कर्मचाऱ्यांना कोरोना झाला आहे. त्यामधील ७३८ जणांनी कोरोनावर मात केली. यामध्ये कोरेगाव तालुक्यातील १२४ जणांचा समावेश आहे. तसेच सातारा तालुक्यातील १३३, पाटण ८०, कऱ्हाड १०९, महाबळेश्वर ३३, खटाव ६१, वाई ५६, फलटण ४६, खंडाळा ३७, जावळी २५ आणि माण तालुक्यात कार्यरत ३४ जणांनी कोरोनावर मात केली आहे.

................................................................