शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यातील जिल्हा परिषदांमधील अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या सविस्तर
2
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
3
नेपाळच्या लष्कर प्रमुखांनी भारतात प्रशिक्षण घेतले, देशाला एकसंघ ठेवण्याची आता त्यांच्यावर जबाबदारी
4
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...
5
२१ लाख लोक रस्त्यावर, आतापर्यंत ९०० जणांचा मृत्यू! पाकिस्तानात पुराचं थैमान 
6
वेफर्स अन् भुजिया बनवणारी कंपनीत हिस्सेदारीसाठी चुरस; पेप्सिको, आयटीसीसह अनेक कंपन्या शर्यतीत
7
शेअर बाजारातील नुकसानीपासून वाचण्याचा सॉलिड फंडा, नितीन कामथ यांनी सांगितली भन्नाट ट्रिक
8
"भविष्यात मुख्यमंत्री होण्याची माझ्याकडे ऑफर", असं कोण म्हणालं? वाचा
9
"ही तर फक्त सुरूवात..." नाशिकमध्ये उद्धवसेना-मनसे संयुक्त जनआक्रोश मोर्चा; भाजपाला दिलं आव्हान
10
'भारताच्या वाढीमुळे घाबरले, म्हणून शुल्क लादला', ट्रम्प टॅरिफवर मोहन भागवतांचे सूचक विधान
11
क्रूरतेचा कळस! गुजरातमधून विमानानं आला, गर्लफ्रेंडवर अत्याचार केला अन् ५१ वेळा स्क्रूड्रायव्हर खुपसला; कोर्टाने सुनावली शिक्षा
12
एकेकाळी ५००० रुपये होता पगार, आता त्यांची कंपनी आणतेय ३८२० कोटींचा IPO; कोण आहे ही व्यक्ती?
13
पितृपक्ष २०२५: ५ रुपयांत मिळणाऱ्या ५ वस्तू पितरांना अर्पण करा; पूर्वज आयुष्यभर आशीर्वाद देतील
14
UPSC ची तयारी करणाऱ्या युवकानं उचललं धक्कादायक पाऊल; स्वत:चा प्रायव्हेट पार्ट कापला, कारण...
15
विजयादशमी २०२५: दसरा कधी आहे? देशभरात होतो साजरा; पाहा, महाराष्ट्रातील वैशिष्ट्य-मान्यता
16
५ राशींचे शनि आयुष्यभर कल्याण करतो, सुख-सुबत्ता-समृद्धी देतो; पैशांची चणचण नसते, शुभच होते!
17
'मी अशिक्षित असूनही रडकुंडीला आणलं', भुजबळांच्या टीकेवर मनोज जरांगेंचे जोरदार प्रत्युत्तर
18
छत्तीसगडच्या बिजापूरमध्ये २ नक्षलवादी ठार; गेल्या २४ तासांत दुसरी मोठी कारवाई
19
दिल्लीनंतर मुंबई हायकोर्टालाही बॉम्बने उडवून देण्याची धमकी; दोन्ही कोर्टात गोंधळ
20
"सरकारने ओबीसींचा विश्वासघात केला, आतातरी तो अन्यायकारी शासन निर्णय रद्द करा’’, काँग्रेसची मागणी 

आता विकेंड घरातच; हॉटेलिंग राहणार बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2021 04:25 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : कोरोना महामारीमुळे हॉटेल व्यवसायावर दुष्परिणाम झाले आहेत. लोक घराबाहेर फिरत नाहीत. अन प्रशासनाच्या नियमांचे ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : कोरोना महामारीमुळे हॉटेल व्यवसायावर दुष्परिणाम झाले आहेत. लोक घराबाहेर फिरत नाहीत. अन प्रशासनाच्या नियमांचे पालन केले नाही तर कारवाईची टांगती तलवार अशा दुहेरी संकटात हॉटेल व्यावसायिक सापडले असून आता विकेंड लॉकडाऊनमध्ये हॉटेलिंगही बंद राहणार असल्याने त्यांची मोठी पंचाईत झालेली आहे.

जिल्हाधिकाऱ्यांनी शनिवार, रविवार दोन दिवस जिल्ह्यात पूर्ण संचारबंदीचा निर्णय घेतलेला आहे. या निर्णयामुळे महाबळेश्वर, पाचगणी, कोयना परिसरात शुक्रवारीच पर्यटक दाखल होतात. शनिवार, रविवार तेथीलच हॉटेलमध्ये मुक्काम करतात. त्यामुळे त्यांना जेवण मिळते. मात्र साताऱ्यात हॉटेलचालकांची पंचाईत झालेली आहे. कासची फुले पाहता येणार नसल्याने पर्यटक साताऱ्याकडे फिरकतदेखील नाहीत. कोयना, महाबळेश्वर, पाचगणी या परिसरात भटकंती करून ते आपल्या घराकडे परततात. या परिस्थितीत सातारा शहर व उपनगरातील हॉटेल व्यावसायिकांपुढे प्रश्नचिन्ह आहे.

साताऱ्यातील एकूण हॉटेल्स : ५१४

हॉटेलवर अवलंबून असलेले कर्मचारी : १ हजार

हॉटेल कर्मचाऱ्यांचे आणखी हाल

कोट...

गेल्या दोन वर्षांपासून कोरोनामुळे हॉटेल बंद आहेत. आमच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. खेडेगावातून पोटासाठी शहरात आलो, आता घरभाडेही देणे शक्य नाही. शासनाने यासाठी स्वतंत्र अनुदान देऊन मुलाबाळांच्या शिक्षणाचा तरी खर्च उचलावा.

प्रकाश बाबर, हॉटेल कामगार

कोट...

मी उत्तम आचारी आहे. मात्र गावाकडे काम मिळत नाही, म्हणून उत्तर प्रदेशातून मी साताऱ्यात आलाे. सोबत कुटुंबही आणले. मुलांना येथीलच शाळेत घातले. मात्र गेल्या दोन वर्षांपासून आमच्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे. हॉटेल मालकांनी काही दिवस मदत केली. आता त्यांनाही मदत करणे शक्य नाही.

सूरजमल शिसोदिया, हॉटेल कामगार

हॉटेल व्यावसायिकांच्या प्रतिक्रिया

कोट..

कोरोना महामारीत महाबळेश्वरातील पर्यटनावर विपरीत परिणाम झालेला आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून हॉटेल्स बंद आहेत. त्यामुळे हॉटेल व्यावसायिकांना हातावर हात धरून बसावे लागले आहे. हॉटेल्सचा देखभाल खर्च कसा करायचा, हा प्रश्न असून मी तर या काळात गॅरेज चालवून उदरनिर्वाह चालवला आहे.

राहुल उत्तेकर, हॉटेल व्यावसायिक महाबळेश्वर

कोट...

कोरोनामुळे हॉटेल्स बंद ठेवण्याचे आदेश प्रशासनाने दिले. मात्र या व्यवसायासाठी लाखो रुपयांची उचललेली बँकांचे कर्ज माफ केलेले नाही. कोरोना काळात व्याजावर व्याज लागत आहे. तर कामगारांचा पगार करणे देखील मुश्कील असून मिळणाऱ्या कर्जातूनच त्यांचे पगार केले जात आहेत. शासनाने कोरोना काळातील बँकाच्या कर्जाचे व्याज माफ करणे आवश्यक आहे.

साेमनाथ शिराळ, हॉटेल व्यावसायिक सातारा