शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

आता विकेंड घरातच; हॉटेलिंग राहणार बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2021 04:25 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : कोरोना महामारीमुळे हॉटेल व्यवसायावर दुष्परिणाम झाले आहेत. लोक घराबाहेर फिरत नाहीत. अन प्रशासनाच्या नियमांचे ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : कोरोना महामारीमुळे हॉटेल व्यवसायावर दुष्परिणाम झाले आहेत. लोक घराबाहेर फिरत नाहीत. अन प्रशासनाच्या नियमांचे पालन केले नाही तर कारवाईची टांगती तलवार अशा दुहेरी संकटात हॉटेल व्यावसायिक सापडले असून आता विकेंड लॉकडाऊनमध्ये हॉटेलिंगही बंद राहणार असल्याने त्यांची मोठी पंचाईत झालेली आहे.

जिल्हाधिकाऱ्यांनी शनिवार, रविवार दोन दिवस जिल्ह्यात पूर्ण संचारबंदीचा निर्णय घेतलेला आहे. या निर्णयामुळे महाबळेश्वर, पाचगणी, कोयना परिसरात शुक्रवारीच पर्यटक दाखल होतात. शनिवार, रविवार तेथीलच हॉटेलमध्ये मुक्काम करतात. त्यामुळे त्यांना जेवण मिळते. मात्र साताऱ्यात हॉटेलचालकांची पंचाईत झालेली आहे. कासची फुले पाहता येणार नसल्याने पर्यटक साताऱ्याकडे फिरकतदेखील नाहीत. कोयना, महाबळेश्वर, पाचगणी या परिसरात भटकंती करून ते आपल्या घराकडे परततात. या परिस्थितीत सातारा शहर व उपनगरातील हॉटेल व्यावसायिकांपुढे प्रश्नचिन्ह आहे.

साताऱ्यातील एकूण हॉटेल्स : ५१४

हॉटेलवर अवलंबून असलेले कर्मचारी : १ हजार

हॉटेल कर्मचाऱ्यांचे आणखी हाल

कोट...

गेल्या दोन वर्षांपासून कोरोनामुळे हॉटेल बंद आहेत. आमच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. खेडेगावातून पोटासाठी शहरात आलो, आता घरभाडेही देणे शक्य नाही. शासनाने यासाठी स्वतंत्र अनुदान देऊन मुलाबाळांच्या शिक्षणाचा तरी खर्च उचलावा.

प्रकाश बाबर, हॉटेल कामगार

कोट...

मी उत्तम आचारी आहे. मात्र गावाकडे काम मिळत नाही, म्हणून उत्तर प्रदेशातून मी साताऱ्यात आलाे. सोबत कुटुंबही आणले. मुलांना येथीलच शाळेत घातले. मात्र गेल्या दोन वर्षांपासून आमच्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे. हॉटेल मालकांनी काही दिवस मदत केली. आता त्यांनाही मदत करणे शक्य नाही.

सूरजमल शिसोदिया, हॉटेल कामगार

हॉटेल व्यावसायिकांच्या प्रतिक्रिया

कोट..

कोरोना महामारीत महाबळेश्वरातील पर्यटनावर विपरीत परिणाम झालेला आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून हॉटेल्स बंद आहेत. त्यामुळे हॉटेल व्यावसायिकांना हातावर हात धरून बसावे लागले आहे. हॉटेल्सचा देखभाल खर्च कसा करायचा, हा प्रश्न असून मी तर या काळात गॅरेज चालवून उदरनिर्वाह चालवला आहे.

राहुल उत्तेकर, हॉटेल व्यावसायिक महाबळेश्वर

कोट...

कोरोनामुळे हॉटेल्स बंद ठेवण्याचे आदेश प्रशासनाने दिले. मात्र या व्यवसायासाठी लाखो रुपयांची उचललेली बँकांचे कर्ज माफ केलेले नाही. कोरोना काळात व्याजावर व्याज लागत आहे. तर कामगारांचा पगार करणे देखील मुश्कील असून मिळणाऱ्या कर्जातूनच त्यांचे पगार केले जात आहेत. शासनाने कोरोना काळातील बँकाच्या कर्जाचे व्याज माफ करणे आवश्यक आहे.

साेमनाथ शिराळ, हॉटेल व्यावसायिक सातारा