शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
9
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
10
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
11
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
12
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
13
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
14
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
15
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
16
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
17
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
18
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
19
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
20
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार

...त्यांनी चुकीचे काम केले, हे आता आपल्याला ठरवायचं आहे -: शरद पवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2019 21:04 IST

त्यामुळे आता विचार करण्याची वेळ आली आहे. त्यांनी राजीनामा देऊन जे चुकीचे काम केले आहे, ते दुरुस्त करण्याची वेळ आली आहे.

ठळक मुद्देकोरेगावमधील सभेत उदयनराजेंचा नामोल्लेख टाळून टीका

कोरेगाव : ‘साताऱ्यातून राष्टवादी काँग्रेस पक्षाचा खासदार पाच वर्षांसाठी निवडून दिला होता. त्याने पावणेपाच वर्षे शिल्लक असताना राजीनामा दिला आहे. ज्यांना निवडून दिले, त्यांनी चुकीचे काम केले आहे. ते आता आपल्याला ठरवायचं आहे,’ अशी टीका राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी उदयनराजे भोसले यांचा नामोल्लेख टाळून केली.

कोरेगावमध्ये शुक्रवारी राष्टवादी काँग्रेसचे उमेदवार शशिकांत शिंदे यांच्या उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी बाजार समिती आवारात झालेल्या सभेत ते बोलत होते. यावेळी सातारा लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार श्रीनिवास पाटील, सातारा-जावळीचे उमेदवार दीपक पवार यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

पवार म्हणाले की, ‘त्यांनी खासदारकीचा राजीनामा दिल्याने आता पोटनिवडणूक होत आहे. त्यासाठी सरकारचे २२ ते २५ कोटी रुपये खर्च होतात, ही रक्कम सरकार खर्च करत असले तरी सरकारकडे ही रक्कम सामान्य जनतेकडूनच जमा होते. त्यामुळे आता विचार करण्याची वेळ आली आहे. त्यांनी राजीनामा देऊन जे चुकीचे काम केले आहे, ते दुरुस्त करण्याची वेळ आली आहे.’

‘राज्यात ज्यांच्याकडे आपण सत्ता सोपविली त्यांनी सर्वसामान्यांचे हित कधीच पाहिलेच नाही. शेतकरी आत्महत्यांकडे पाहण्यास सरकारकडे वेळ नाही. मात्र नेतेमंडळींच्या वित्तीय संस्थांना हातभार लावण्यास ते मागे-पुढे पाहत नाहीत, हे दुर्दैव आहे. त्यामुळे राज्यातील सरकार उलथवून टाकण्यासाठी आता तरुणांनीच निवडणूक हाती घ्यायची वेळ आली आहे,’ असेही पवार यांनी स्पष्ट केले.

श्रीनिवास पाटील व शशिकांत शिंदे हे सर्वसामान्य कुटुंबातील असून, त्यांनी आजवर सामान्य जनतेसाठीच विकासाभिमुख काम केले आहे. त्यांनी आपल्या कार्याचा ठसा लोकसभा आणि विधानसभेमध्ये उमटवला आहे. त्यांनी केलेल्या कामाची दखल घेऊनच संधी दिली असल्याचे त्यांनी नमूद केले. 

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारSatara areaसातारा परिसर