शहरं
Join us  
Trending Stories
1
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
2
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
3
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
4
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
5
लग्नाआधी सरकारी नोकरी! नववी नापास रिंकू सिंह होणार थेट 'शिक्षण अधिकारी'
6
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
7
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
8
तारीख ठरली! इंडिया चॅम्पियन्स पुन्हा एकदा पाकचा धुव्वा उडवण्यासाठी उतरणार मैदानात
9
अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?
10
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
11
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
12
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
13
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
14
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
15
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
16
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
17
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
18
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
19
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...
20
"परेश रावल यांच्याशिवाय...", 'हेरा फेरी ३'च्या वादावर सोनाक्षी सिन्हा म्हणाली असं काही...

आता गाड्या नाहीत जाणार ठाण्यात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2016 22:19 IST

पोलिस महानिरीक्षकांचे आदेश : अपघातातील गाड्या पंचनाम्यानंतर थेट मालकांकडे

सातारा : जिल्हा कार्यक्षेत्रात होणारे अपघात यांच्यासह पोलिसांनी कारवाई केलेली वाहने पंचनामा आणि आरटीओ तपासणी झाल्यानंतर आता थेट मालकांच्या ताब्यात देण्याचे आदेश पोलिस महानिरीक्षकांनी दिले आहेत. याची तातडीने अंमलबजावणी करण्यासाठी सातारा पोलिस कार्यरत झाले आहेत. या आदेशामुळे पोलिस ठाणे आवारात धूळखात पडलेल्या गाड्यांची संख्या आता कमी होईल.जिल्ह्यातील २९ पोलिस ठाण्यांमध्ये विविध गुन्ह्यांमध्ये वापरण्यात आलेल्या आणि मालकांनी दावा न केलेल्या तब्बल ६०६ वाहनांवर दोन वर्षांत कोणीच हक्क सांगायला आले नाही. त्यामुळे वर्षानुवर्षे पोलिस ठाणे परिसरात शेकडो गाड्या आवारात धूळखात पडून आहेत. ही वाहने बेवारसस्थितीत असल्यामुळे अनेकदा त्यांचे सुटे भाग चोरीला जाणे, यासारखे प्रकार घडतात. याविषयी ‘लोकमत’ ने १९ मे रोजी वृत्त प्रसिद्ध केले होते. त्यानंतर पोलिस महानिरीक्षक यांनी याविषयीचे लेखी आदेश जिल्हा पोलिस अधीक्षकांना दिले आहेत. त्यानुसार यापुढे अपघातातील गाडी पंचनामा झाल्यानंतर तातडीने मालकांच्या स्वाधीन करण्यात यावी, असे सूचित केले आहे. याविषयी सर्वोच्च न्यायालयाने चलसंपत्ती पडून राहण्यापेक्षा त्याचा वापर व्हावा, अशा सूचना केल्या होत्या. त्यानुसार राज्यात पहिल्यांदाच सातारा पोलिसांनी याविषयी कार्यवाही करण्यास सुरुवात केली आहे.सातारा जिल्ह्यातील २९ पोलिस ठाणे परिसरात बेवारस स्थितीत एकूण ५६७ दुचाकी वाहने, तीनचाकी ४ तर चारचाकी ३५ वाहने व त्यांचे सांगाडे पडून आहेत.या वाहनांच्या मालकांविषयी वेळोवेळी आवाहन करूनही पोलिसांना वाहनांच्या मालकी हक्काबाबत कोणीच दावा केला नाही. त्यामुळे ही वाहने अद्यापही बेवारसस्थितीत पोलिस ठाणे आवारात पडून आहेत.यासाठी सातारा पोलिसांच्या वतीने या वाहनांचा मेळावाही आयोजित करण्यात आला होता; पण त्यालाही फारसा प्रतिसाद मिळाला नाही. आवाहन करूनही जर मालकांनी या गाड्यांवर दावा सांगितला नाही तर लिलावपद्धतीने या गाड्यांची विक्री करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. (प्रतिनिधी) वाहन ही देशाची चलसंपत्ती आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ही चलसंपत्ती गंजत पडणं म्हणजे राष्ट्रीय नुकसान आहे. पोलिस कायद्यातील कलम ८५ व ८७ यांचा वापर करून सातारा जिल्ह्यातील सर्वच पोलिस ठाण्यातील वाहने मूळ मालकापर्यंत पोहोचावीत व या यंत्रसामुग्रीचा योग्य वापर व्हावा, यासाठी लवकरच पुढील कारवाई सुरू होईल.- अभिनव देशमुख, पोलिस अधीक्षक, सातारा