शहरं
Join us  
Trending Stories
1
जगदीप धनखड गायब? राऊतांना वेगळाच संशय; म्हणाले, “रशिया-चीनची पद्धत भारतात सुरू केली का?”
2
Video : भर पावसात बाबांचा स्वयंपाक, चिमुकल्यांनी डोक्यावर धरलं 'असं' छत, पाहून डोळ्यांत येईल पाणी! 
3
“RSS शिस्तबद्ध संघटना, ७५ वर्षे अटीचे पालन करेल”; शरद पवारांचा नाव न घेता PM मोदींकडे रोख!
4
ट्रम्प टॅरिफचा पहिला फटका, अनेक कारखान्यांत काम बंद, भारतातील व्यापार गेला पाकिस्तानात
5
RCBच्या यश दयालवर बंदीची कारवाई; अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी 'या' स्पर्धेतून बाद
6
गडकरींचे ३.५० लाख मतदार वगळले, कुटुंबीयांचाही समावेश; अजून पुरावे मागणार की माफी?; काँग्रेसचा सवाल
7
पाकिस्तानला झाले तब्बल 'इतक्या' कोटींचे नुकसान; भारतीय विमानांसाठी हवाई क्षेत्र बंद करणे पडले महागात!
8
सर्वाधिक धावा कुटल्या, मग कर्णधाराला माघारी धाडलं, २२ वर्षांच्या ऑलराउंडरने जिंकवला सामना
9
सोशल मीडियावर मैत्री केली; चार तरुणींच्या जाळ्यात अडकलेल्या आजोबांनी आयुष्यभराची कमाई गमावली!
10
साप्ताहिक राशीभविष्य: मोठी जोखीम टाळा, पैसे उसने देऊ नये; ८ राशींना लाभ, सुख-सुबत्ता-कल्याण!
11
५ लाख देण्याचे आश्वासन अन् हातात पडले अवघ्या ५ हजाराचे धनादेश; उत्तरकाशीतील नागरिकांचा संताप
12
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये कोण जिंकलं? सेना प्रमुखांनी पाकिस्तानला थेट उत्तर दिलं! म्हणाले...
13
जिला गर्लफ्रेंड म्हटलं तिनेच राखी बांधली! मोहम्मद सिराज आणि आशा भोसलेंच्या नातीचं रक्षाबंधन, फोटो समोर
14
'धकधक गर्ल' माधुरीचं सौंदर्य पाहून घायाळ झालेला अभिनेता, एकही रुपया मानधन न घेता केला सिनेमा
15
तुरुंगात असलेल्या सोनम रघुवंशीच्या आजीचे निधन; नातीच्या क्रूर कृत्यामुळे बसलेला धक्का
16
आजचे राशीभविष्य, १० ऑगस्ट २०२५: ७ राशींना शुभ दिवस, सरकारी कामात यश; धनलाभ योग
17
Bigg Boss 19: पहलगाम हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीला 'बिग बॉस'ची ऑफर! शोमध्ये दिसणार असल्याची चर्चा
18
लाडकी बहीण योजनेचे पैसे योग्य वेळी वाढवणार; योजनेत भ्रष्टाचार असल्याचा मुख्यमंत्र्यांनी केला इन्कार
19
भारत-पाकिस्तान युद्ध मीच थांबवले, डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा एकदा दावा, पाच विमाने पाडल्याच्या दाव्याची पुनरावृत्ती
20
वाराणसीच्या मंदिरात पूजेदरम्यान आग; पूजाऱ्यासह ९ जण होरपळले, ४ जणांची प्रकृती गंभीर  

आता गाड्या नाहीत जाणार ठाण्यात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2016 22:19 IST

पोलिस महानिरीक्षकांचे आदेश : अपघातातील गाड्या पंचनाम्यानंतर थेट मालकांकडे

सातारा : जिल्हा कार्यक्षेत्रात होणारे अपघात यांच्यासह पोलिसांनी कारवाई केलेली वाहने पंचनामा आणि आरटीओ तपासणी झाल्यानंतर आता थेट मालकांच्या ताब्यात देण्याचे आदेश पोलिस महानिरीक्षकांनी दिले आहेत. याची तातडीने अंमलबजावणी करण्यासाठी सातारा पोलिस कार्यरत झाले आहेत. या आदेशामुळे पोलिस ठाणे आवारात धूळखात पडलेल्या गाड्यांची संख्या आता कमी होईल.जिल्ह्यातील २९ पोलिस ठाण्यांमध्ये विविध गुन्ह्यांमध्ये वापरण्यात आलेल्या आणि मालकांनी दावा न केलेल्या तब्बल ६०६ वाहनांवर दोन वर्षांत कोणीच हक्क सांगायला आले नाही. त्यामुळे वर्षानुवर्षे पोलिस ठाणे परिसरात शेकडो गाड्या आवारात धूळखात पडून आहेत. ही वाहने बेवारसस्थितीत असल्यामुळे अनेकदा त्यांचे सुटे भाग चोरीला जाणे, यासारखे प्रकार घडतात. याविषयी ‘लोकमत’ ने १९ मे रोजी वृत्त प्रसिद्ध केले होते. त्यानंतर पोलिस महानिरीक्षक यांनी याविषयीचे लेखी आदेश जिल्हा पोलिस अधीक्षकांना दिले आहेत. त्यानुसार यापुढे अपघातातील गाडी पंचनामा झाल्यानंतर तातडीने मालकांच्या स्वाधीन करण्यात यावी, असे सूचित केले आहे. याविषयी सर्वोच्च न्यायालयाने चलसंपत्ती पडून राहण्यापेक्षा त्याचा वापर व्हावा, अशा सूचना केल्या होत्या. त्यानुसार राज्यात पहिल्यांदाच सातारा पोलिसांनी याविषयी कार्यवाही करण्यास सुरुवात केली आहे.सातारा जिल्ह्यातील २९ पोलिस ठाणे परिसरात बेवारस स्थितीत एकूण ५६७ दुचाकी वाहने, तीनचाकी ४ तर चारचाकी ३५ वाहने व त्यांचे सांगाडे पडून आहेत.या वाहनांच्या मालकांविषयी वेळोवेळी आवाहन करूनही पोलिसांना वाहनांच्या मालकी हक्काबाबत कोणीच दावा केला नाही. त्यामुळे ही वाहने अद्यापही बेवारसस्थितीत पोलिस ठाणे आवारात पडून आहेत.यासाठी सातारा पोलिसांच्या वतीने या वाहनांचा मेळावाही आयोजित करण्यात आला होता; पण त्यालाही फारसा प्रतिसाद मिळाला नाही. आवाहन करूनही जर मालकांनी या गाड्यांवर दावा सांगितला नाही तर लिलावपद्धतीने या गाड्यांची विक्री करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. (प्रतिनिधी) वाहन ही देशाची चलसंपत्ती आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ही चलसंपत्ती गंजत पडणं म्हणजे राष्ट्रीय नुकसान आहे. पोलिस कायद्यातील कलम ८५ व ८७ यांचा वापर करून सातारा जिल्ह्यातील सर्वच पोलिस ठाण्यातील वाहने मूळ मालकापर्यंत पोहोचावीत व या यंत्रसामुग्रीचा योग्य वापर व्हावा, यासाठी लवकरच पुढील कारवाई सुरू होईल.- अभिनव देशमुख, पोलिस अधीक्षक, सातारा