शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याण-नगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
2
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
3
Latest Marathi News LIVE: कल्याण- अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ८ जण ठार झाल्याची माहिती
4
"हृदयात काबा आणि डोळ्यांत मदिना..."; कोण आहेत सभांमध्ये गाणे गाणाऱ्या TMC खासदार सायनी घोष?
5
घराची सफाई करताना सापडलं 'सर्वात सुंदर' नाणं; १.३७ कोटी रुपयांना झाली विक्री, काय आहे खास?
6
VIDEO: लाडक्या 'आशाताईं'ना शेवटचा निरोप देताना सचिन तेंडुलकरला अश्रू अनावर
7
कागदावर २५ हजार सॅलरी अन् प्रत्यक्षात १५००० देतात...; कंपन्यांकडून शोषण, कर्मचारी भडकले
8
IPLमध्ये भाऊबंदकी, पांड्या बंधूंमध्ये बेबनाव? MI Vs RCB लढतीत दिसलं असं दृश्य, चाहत्यांना धक्का
9
"शरद पवारांनी बारामती उभी केली नसती, तर महाराष्ट्रात..."; संजय राऊतांचे रोखठोक विधान
10
फक्त ७ वर्ष...! चीन आणि अमेरिकेलाही मागे टाकणार भारताची ऑटो इंडस्ट्री, नितीन गडकरींनी सांगितला 'मास्टर प्लॅन'
11
Swapna Shastra: सावधान! स्वप्नात 'या' गोष्टी दिसणे म्हणजे संकटाची चाहूल? वाईट प्रभाव रोखण्यासाठी करा 'हे' प्रभावी उपाय!
12
Middle East War: खर्ग बेट, बंदर अब्बासवर अमेरिकेचा डोळा; इराणची कोंडी करण्यासाठी ट्रम्प यांचा मास्टरप्लॅन
13
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
14
UPI अ‍ॅप्समध्येही असतं का 'Undo' बटण, चुकीच्या UPI ID वर पैसे गेल्यास कसे मिळवाल परत?
15
प्रशासनाचा प्रस्ताव धुडकारला, वाहनांना लावली आग; नोएडात ३ दिवसांपासून रस्त्यावर का उतरले कर्मचारी?
16
पिंपरी: धक्कादायक! प्राध्यापकाच्या छळामुळे विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल, एकाला अटक
17
Aditya Dhar Net Worth: ‘धुरंधर’च्या दिग्दर्शकाकडे किती आहे संपत्ती? मुंबई ते हिमाचलपर्यंत आहे प्रॉपर्टी
18
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; खरेदी करणार असाल तर पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K Gold चे नवे दर
19
IPL 2026 Points Table : गत चॅम्पियन RCB टॉप ३ मध्ये; पाचवेळच्या विजेत्या MI अन् CSK ची अवस्था बिकट
20
CET Exam: 'सीईटी'ची केंद्रे दूर; विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल, पालकांमध्ये तीव्र नाराजी
Daily Top 2Weekly Top 5

घोटातला घोट आता पदपथावरच्या झाडांना!

By admin | Updated: May 27, 2016 21:57 IST

राजपथावर सौंदर्य : साताऱ्यातील मारवाडी भवन गणेशोत्सव मंडळ-मोरगाव गु्रपचा पथदर्शी प्रकल्प-लोकमत जलमित्र अभियान

सातारा : तीव्र उन्हाळ्याच्या झळा सोसताना आता पाणीटंचाईचा प्रश्न नव्याने सर्वांपुढे आ वासून उभा आहे, याच प्रश्नावर उत्तर शोधताना येथील मारवाडी भवन गणेशोत्सव मंडळ व मोरगाव गु्रप यांच्या वतीने राजपथावर मोती चौक ते मारवाडी भवन या परिसरात पाम व फायकस या झाडांची कुंड्यांमध्ये लागवड केली आहे. या कुंड्यांमुळे हा परिसर आणखी सुंदर तर झाला आहेच, त्यासोबत पाणी बचतीचा एक पथदर्शी प्रयोग राबविला गेला आहे. राजपथावर मोठी व्यापारी पेठ आहे, हा परिसर नेहमीच गजबजलेला असतो. या परिसरात वृक्षांची संख्या अत्यल्प आहे. यंदाच्या तीव्र उन्हाळ्यामध्ये या परिसरात सावलीचा आधारच नसल्याचे अनेकांना लक्षात आला. व्यापारी पेठेत खरेदीसाठी ग्राहकवर्गाची नेहमी लगबग असते. तीव्र उन्हाळ्यामुळे व्यापाऱ्यांनी ग्राहकांना पाण्याची सोय केली आहे; परंतु अनेकदा लोक पाणी पितात आणि भांड्यात उरलेले पाणी रस्त्यावर ओतून देतात, हे लक्षात आल्यानंतर मारवाडी भवन गणेशोत्सव मंडळ व मोरगाव गु्रपच्या कार्यकर्त्यांनी राजपथावर मोती चौक ते मारवाडी भवन या अंतरात पाम व फायकस या दोन प्रकारच्या झाडांच्या तब्बल ३६ कुंड्या ठेवल्या. ‘पिल्यानंतर भांड्यात उरलेले पाणी या झाडांना घाला, पाणी वाया घालवू नका,’ अशी विनंती या व्यापाऱ्यांनी ग्राहकांना काही दिवस केली. मात्र, त्यानंतर झाड पाहिल्यानंतर पाणी रस्त्यावर ओतून न देता, ते झाडाला ओतू लागले. सकाळी फिरायला येणारे लोक तर बाटलीत पाणी घेऊन येतात आणि या कुंड्यांतील झाडांना घालतात. अष्टविनायकांपैकी एक असणाऱ्या मोरगावच्या मोरेश्वरावर श्रद्धा ठेवून याठिकाणी मोरगाव गु्रप स्थापन झाला. दर चतुर्थीला या गु्रपचे सर्व सदस्य मोरगावला दर्शनासाठी जात असतात. या गु्रपमध्ये २५ वर्षांच्या तरुणापासून ७० वर्षांपर्यंतच्या वृद्धांचाही समावेश आहे. मोरेश्वराच्याच प्रेरणेने या लोकांनी हा परिसर सुंदर केला. पाणी बचतीचा नवा अध्याय निर्माण केला. पालिकेचे मुख्याधिकारी अभिजित बापट यांनी स्वत: या ठिकाणाला भेट देऊन या उपक्रमाचे कौतुक केले. पालिका काही दिवसांत ग्रीन सिटीची संकल्पना राबविणार आहे, यात सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी केले. या उपक्रमात आम्ही सर्व ताकदीनिशी सहभागी होणार असल्याचे व्यापाऱ्यांनी स्पष्ट केले.‘लोकमत’ने सुरू केलेल्या ‘जलमित्र अभियाना’ला सर्वच स्तरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. अगदी युवकांपासून ते गृहिणी, छोटे-मोठे व्यावसायिकही ‘जलमित्र’ बनून पाणीबचत करून समाजापुढे आदर्श निर्माण करत आहेत.(प्रतिनिधी)मारवाडी भवन गणेशोत्सव मंडळ व मोरगाव ग्रुप यांच्या वतीने वैविध्यपूर्ण उपक्रम राबविले जात आहेत. देवी चौक ते राजवाडा हा संपूर्ण परिसर हिरवागार करण्यासाठी नगरपालिकेच्या ग्रीन सिटी प्रकल्पाला आमचा कायमच हातभार राहील.- संतोष लुणावत, व्यापारी