शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
3
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
4
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
5
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
6
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
7
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
8
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
9
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
10
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
11
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
12
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
13
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
14
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
15
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
16
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
17
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
18
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
19
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

आता जातपंचायतच बहिष्काराच्या विळख्यात!

By admin | Updated: March 7, 2016 00:20 IST

अनिष्ट रिवाजाला कडाडून विरोध : भुर्इंज आणि भिरडाचीवाडी येथील गोपाळ बांधवांचाही निर्णय -लोकमत विशेष

भुर्इंज : आजपर्यंत झालं ते झालं; पण यापुढं जातपंचायतीच्या वाटंला जाणार नाय. आमचाबी जातपंचायतीवर बहिष्कार असून आमी पण काय झालं तर पोलीस ठाण्यातच दाद मागू, असे सांगत भुर्इंज आणि भिरडाचीवाडी या दोन्ही ठिकाणच्या गोपाळवस्तीतील समाजबांधवांनी जातपंचायतीला मूठमाती देण्याचा निर्णय घेतला. पाचवड, ता. वाई येथे जातपंचायत भरवून दोघांना शिक्षा केल्याप्रकरणी पोलीस कारवाई झाल्यानंतर पाचवड येथील गोपाळ समाजाने सर्वप्रथम जातपंचायतीला मूठमाती देण्याचा निर्णय घेतला. याबाबतचे वृत्त ‘लोकमत’मध्ये वाचल्यानंतर भुर्इंज आणि भिरवाचीवाडी या दोन्ही गोपाळवस्तीतही हा निर्णय घेण्यात आला. जातपंचायत भरवणाऱ्या पंचांवर आता कायद्यानुसार कारवाई सुरु आहे. मात्र आता अशा कारवाईची गरज भासू नये, अशा दिशेने सकारात्मक पाऊल गोपाळ समाजाने टाकायला सुरुवात केली असून त्यामध्ये युवकांचा पुढाकार लक्षणीय आहे.दारिद्र्य, शिक्षणाचा अभाव, व्यसनाधिनता, मटका व जुगाराचे वेड यातून आलेला कर्जबाजारीपणा आदी कारणांमुळे गोपाळ समाजात प्रचंड अज्ञान आहे. या अज्ञानामुळेच हा समाज जग ज्या वेगाने आणि ज्या वाटेवर धावत आहे, त्यापासून कोसो मैल दूर आहे. त्याचाच परिपाक म्हणून या समाजातील छोट्या-मोठ्या तक्रारींवर जातपंचायतीत दाद मागितली जाते. मटका आणि जुगारात या समाजातील अनेक जणांच्या आयुष्याची अक्षरश: वाट लागली आहे. त्यामुळे जातपंचायतीला प्रतिबंध करण्यासोबत, अशा जातपंचायती भरवणाऱ्यांवर कारवाई करण्यासोबत या समाजाच्या दैनावस्थेला जी प्रमुख कारणे आहेत त्यावरही इलाज करणे आवश्यक आहे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. भुर्इंज आणि भिरडाचीवाडी येथील गोपाळ समाजाने जातपंचायतीकडे आता पाठ फिरवण्याचा निर्णय घेतला आहे, ही त्यांच्यासाठी नव्या बदलाची सुरुवात आहे. (प्रतिनिधी) पोलिसांची भीती वाटतेसमाजातील लोकांना पोलिसांची भीती वाटते. त्यामुळे आजपर्यंत पोलिसांकडे न जाता लोक जातपंचायत बोलवायचे. यापुढील काळात पोलिसांनी समाजातील लोकांच्या अडचणी, समस्यांबाबत काळजीने लक्ष घातल्यास पोलिसांबाबत भीती दूर होऊन लोक विश्वासाने त्यांच्याकडे जातील. - सचिन जाधवमटका, जुगारापायी कर्जबाजारीबँडपथकात वाद्य वाजवण्यासोबत, मजुरीची कामे करुन हा समाज जगतो. हातावर पोट असले तरी या समाजातील अनेकांवर लाखांचे कर्ज आहे. मटका, जुगार, आॅनलाईन लॉटरी यामध्ये हा समाज कर्जबाजारी झाला आहे. या समाजातील महिलाही मटका खेळण्यामध्ये आघाडीवर आहेत. विशेष म्हणजे त्यासाठी खासगी सावकारांकडून त्यांना वर्षाला दामदुप्पट अशा भरभक्कम व्याजदाराने कर्ज पुरवले जाते. कर्जाची परतफेड न झाल्यास संबंधित कर्जदाराच्या घरातील मुलगी उचलून नेण्यापर्यंतचे प्रकार घडतात. आता पोलिसांकडेच जाणारभुर्इंज व भिरडाचीवाडी येथे गोपाळ समाजातील शंभरहून अधिक कुुटुंबे आहेत. या दोन्ही ठिकाणच्या लोकांनी जातपंचायतीत न जाता पोलिसांकडे जायचे, असा निर्णय घेतला आहे. हा निर्णय पाळला जाणार असून यापुढे जातपंचायतीचा प्रकार घडणार नाही. - तेजस मोरेजातपंचायतीचे नावही घेणार नाहीआम्हाला आमचा वाढदिवस कधी असतो ते माहिती नाही. आमचे शिक्षणही झाले नाही. मोलमजुरी करुन आम्ही जगतोय. जातपंचायतीवर झालेल्या कारवाईमुळे समाजात भीतीचे वातावरण आहे. लग्नसराईचा हंगाम असून आमचे लोक वाजवायला जायलासुद्धा घाबरत आहेत. यापुढे जातपंचायतीचे नाव घ्यायचे नाही, असे सर्वांनी ठरवले आहे.- सागर चव्हाणगोपाळ समाजासाठी योजना राबविणारभुर्इंजमधील गोपाळ समाजाला राहण्यासाठी जाधवराव कुटुंबीयांनी जागा दिली आहे. भुर्इंजसारख्या प्रगत गावातील हा समाजदेखील प्रगतीच्या वाटेवर यावा, यासाठी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून विशेष योजना राबवल्या जातील. या समाजाच्या अज्ञानाचा आणि दारिद्र्याचा फायदा घेऊन त्यांना नाडणाऱ्यांवर कारवाई करण्यासोबत, जातपंचायतीसारख्या अनिष्ठ प्रथांना पोलिसांनी आळा घालावा.- राजनंदा जाधवराव, सदस्या, जिल्हा परिषद