शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये सर्वाधिक जागा जिंकूनही भाजपाची वाढली डोकेदुखी; मंत्रिपदाचा फॉर्म्युला बदलावा लागणार?
2
“तुम्ही चांगल्या योजना आणल्या नाहीत, जो जीता वहीं सिकंदर”; CM फडणवीसांचे शरद पवारांना उत्तर
3
अमेरिकेत महागाईनं हाहाकार! ट्रम्प यांनी अनेक वस्तूंवरील टॅरिफ केलं कमी, स्वस्त होणार 'या' गोष्टी
4
Shubman Gill Injury Update : शुभमन गिलनं मैदान सोडलं! पंत झाला कॅप्टन, नेमकं काय घडलं?
5
बिहार निवडणुकीत विरोधात काम, माजी केंद्रीय मंत्री पक्षातून निलंबित; भाजपाची मोठी कारवाई
6
लाल किल्ल्याजवळील स्फोटाने जमीन हादरली; मेट्रो स्टेशनवरील सीसीटीव्ही फुटेज आले समोर
7
बिहारमध्ये सर्वाधिक १ कोटी १५ लाख मते मिळवणारा RJD ठरला नंबर वन पक्ष; भाजपा-जेडीयूला किती मते?
8
कुणी २७, कुणी ९५ मतांनी, तर..., बिहारमधील या मतदारसंघांत माफक फरकाने झाला जय-पराजयाचा फैसला
9
'मारुती सुझुकी'च्या या कारमध्ये मोठा बिघाड, ३९ हजारांहून अधिक गाड्या परत मागवल्या
10
धक्कादायक...! मध्यरात्रीचा थरार...! पूर्वजांना मोक्ष मिळावा म्हणून आईनं पोटच्या २ चिमुकल्यांची केली हत्या, सासरे थोडक्यात बचावले
11
मुदतीपूर्वीच Gen Z कर्मचाऱ्यांना कंपनीतून का काढलं जातंय?; स्टडी रिपोर्टमधून समोर आलं कारण
12
धर्मेंद्र यांच्या ९० व्या वाढदिवसाचं जोरदार सेलिब्रेशन होणार! हेमा मालिनी म्हणाल्या- "आता प्रत्येक दिवस..."
13
New Fastag Rule: आजपासून फास्टॅगच्या नियमांत झाला मोठा बदल; याकडे लक्ष दिलं नाही तर भरावा लागेल दुप्पट टोल
14
"पैसे वाटून निवडणुका होत असतील आयोगाने विचार करावा"; बिहार निकालावर शरद पवारांचे गंभीर भाष्य
15
बिहार निकालानंतर काँग्रेसचा 'एकला चलो रे'चा नारा; मुंबई महापालिका स्वबळावर लढवण्याचे संकेत
16
Astro Tips: मनासारखा जोडीदार नशिबात आहे की नाही हे कसे ओळखावे? ज्योतिष शास्त्रानुसार... 
17
“भाजपाने आता अमेरिकेत राष्ट्रपतीपदाची निवडणूक लढवावी अन् टॅरिफचा घोळ संपवावा”: आदित्य ठाकरे
18
SBI चा ग्राहकांना झटका! १ डिसेंबरपासून बंद होणार 'ही' लोकप्रिय सेवा; बँकेच्या कामांवर होणार परिणाम
19
"विवाहित मुलांना वडिलांच्या मालमत्तेत राहण्याचा कोणताही अधिकार नाही"; उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
20
Rishabh Pant Record : टेस्टमध्ये टी-२० चा तडका! सेहवागचा १२ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडत पंतनं रचला इतिहास
Daily Top 2Weekly Top 5

श्रमदानासाठी आता ‘कॉल टू अ‍ॅक्शन’ उपक्रम पाणी फाउंडेशन : ७५ हजार जलमित्रांचा सहभाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2018 23:57 IST

सातारा : पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून राज्य सुरू असलेल्या वॉटर कप स्पर्धेत सहभागी झालेल्या ५३६ गावांमधील लोकांनी श्रमदानाला सुरुवात केली. तर दुसरीकडे या दुष्काळाच्या लढाईत ग्रामस्थांसोबत वेगवेगळ्या क्षेत्रातील ७५ हजार

ठळक मुद्देदुष्काळग्रस्तांसाठी घेणार पुढाकार

सातारा : पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून राज्य सुरू असलेल्या वॉटर कप स्पर्धेत सहभागी झालेल्या ५३६ गावांमधील लोकांनी श्रमदानाला सुरुवात केली. तर दुसरीकडे या दुष्काळाच्या लढाईत ग्रामस्थांसोबत वेगवेगळ्या क्षेत्रातील ७५ हजार लोक जलमित्र बनून गावांना वेगवेगळ्या स्वरुपाची मदत करण्यात पुढाकार घेत आहेत.दुष्काळी गावात श्रमदानासाठी सिनेस्टार, प्रशासकीय अधिकारी मैदानात उतरले असताना शहरी भागात राहणारे मात्र ज्यांना दुष्काळीची कधी झळ पोहोचलेली नाही, असे समाजातल्या विविध क्षेत्रांतले लोकसुद्धा यात उतरण्यास इच्छुक होते. त्यांच्यासाठी जलमित्र कॉल टू अ‍ॅक्शन हा उपक्रम सुरू करण्यात आला. यासाठी ७५ हजार लोकांनी नोंदणी करून या गावांना वेगवेगळ्या स्वरुपाची मदत करण्यात पुढाकार घेत आहेत. नुकतेच या जलमित्रांसाठीचे सर्वात पहिले प्रशिक्षण सत्र तासगाव, कोरेगाव आणि सिन्नर या तीन तालुक्यांमध्ये दिले गेले.जलमित्र ग्रामस्थांना करणार मार्गदर्शनजलमित्रांना पाणी फाउंडेशनचे अ‍ॅप कसे वापरायचे? (हे अ‍ॅप गावातील किती भाग पाणलोटाखाली आला आहे, याची नोंद करते आणि मागोवा घेते), हे गावकऱ्यांना शिकविणार आहेत. याच्या पाठोपाठ जमिनीच्या परीक्षणासाठी देखील अशाच प्रशिक्षण कार्यक्रमांचे नियोजन केले गेलेले आहे. याशिवाय अनेक जलमित्रांनी आर्थिक मदत देऊ केली आहे.

महाराष्ट्र दिनी महाश्रमदानआता १ मे रोजी आयोजित महाश्रमदानाच्या उपक्रमाला अवघ्या काही दिवसांचा अवधी आहे. तुमच्यापैकी अनेकांनी त्यासाठी आपली नावनोंदणीसुद्धा केलेली असेल. त्यामुळे महाराष्ट्रदिन हा महाश्रमदिन होणार आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरWater Cup Competitionवॉटर कप स्पर्धा