शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघात एक गूढच राहणार? ब्लॅक बॉक्समधून माहिती मिळेना; अमेरिकेला पाठवणार
2
नोबेलच्या शिफारशीबदल्यात लंच! मोठं स्वप्न बघतायत डोनाल्ड ट्रम्प; व्हाइट हाऊसनं आसिम मुनीरला आमंत्रण का दिलं? बिंग फुटलं
3
ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इराणनं केली हल्ल्याची तयारी; आता अमेरिकाही युद्धात उतरणार?
4
"आधी युक्रेनसोबतचा तुमचा वाद निस्तरा, मग…’’, मध्य पूर्वेची चिंता करणाऱ्या पुतीन ट्रम्प यांचा टोला  
5
युनिफाईड पेन्शन स्कीमवर मोठी अपडेट; सरकारनं जोडले 'हे' फायदे, काय परिणाम होणार?
6
इराणमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणले; ११० विद्यार्थ्यांना घेऊन विमान सकाळीच पोहोचले
7
Guru Purnima 2025: २० जूनपासून गुरुपौर्णिमेपर्यंत सलग २१ दिवस करा 'ही' स्वामी उपासना!
8
अनिल अंबानींकडे असलेली सर्वात महागडी वस्तू कोणती? किंमत ऐकून अवाक व्हाल!
9
Anaya Bangar: संजय बांगरची ट्रान्सजेंडर मुलगी अनाया बांगरची BCCI कडे खास मागणी, म्हणाली- 'मला सहानुभूती नकोय, पण..."
10
Israel Iran: इस्रायलचे हल्ले, इराणमध्ये मृत्यूचे तांडव! आतापर्यंत किती लोकांचा झाला मृत्यू? 
11
बाबा भरतशेठ, अघोरी विद्या अन्...; पालकमंत्रीपदासाठी गोगावलेंकडून पूजा? राष्ट्रवादी काँग्रेसचा आरोप
12
इराणच्या अयातुल्ला खामेनीला घरातूनच विरोध; पुतण्या म्हणतो- शांततेसाठी या हुकुमशाही शासनाचा अंत आवश्यक!
13
"तुमच्या अंगाशी येईल, वाचवायला येणार नाही"; स्क्रीनशॉट दाखवत नितेश राणे म्हणाले, "निलेशजी, धमकवणे बरोबर नाही"
14
रायगडात धो धो पाऊस, शाळा, कॉलेजनां सुट्टी, अलिबाग-रोहा , पाली खोपोली रस्ता वाहतुकीस बंद
15
मुकेश अंबानी बनले ट्रम्प यांचे नवे बिझनेस पार्टनर; सर्वात श्रीमंत भारतीयानं किती गुंतवलेत पैसे?
16
सोनमने २५ दिवसांत ११२ वेळा फोन केला तो संजय वर्मा कोण? अखेर झालं उघड, धक्कादायक माहिती आली समोर 
17
बाजारात नवा 'लव्ह स्कॅम'! प्रेमाच्या जाळ्यात ओढून तरुणांना लुबाडतायत, तुम्ही तर बळी नाही ना?
18
करिश्मा कपूरची लेक समायरा नक्की काय करते? वडिलांच्या निधनानंतर समायरा कपूर चर्चेत
19
Karisma Kapoor : संजय कपूरसोबत घटस्फोट घेतल्यानंतर करिश्मा कपूरने का केलं नाही लग्न? जाणून घ्या याबद्दल
20
Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi 2025: "ज्ञानोबा तुकारामांचा" अखंड जयघोष! आळंदीतून माऊलींच्या पालखीचे यंदा रात्री प्रस्थान

कोयना नदी नव्हे.. सर्व्हिसिंग सेंटर : धुलाईसाठी वाहनांच्या रांगा ,आॅईल, ग्रीसमुळे होतेय जलप्रदूषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2018 23:20 IST

पाटण : तालुक्यात टंचाईच्या झळा जाणवत आहेत. नदीपात्रामध्येही अत्यल्प पाणी आहे. मात्र,

ठळक मुद्देपाण्याचा रंग, चवही बदलली

प्रवीण जाधव।पाटण : तालुक्यात टंचाईच्या झळा जाणवत आहेत. नदीपात्रामध्येही अत्यल्प पाणी आहे. मात्र, त्यातच काहीजण वाहने धूत असल्यामुळे पाण्याचे प्रदूषण होत आहे. काजळी, ग्रीस, आॅईल पाण्यात मिसळल्यामुळे काही ठिकाणी पाण्याचा रंग व चवही बदलली असून, या पाण्यामुळे ग्रामस्थांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनत आहे.पाटण तालुक्यात उष्णतेचे प्रमाण वाढले आहे. पाणी-पाणी म्हणून संपूर्ण जिल्हा टाहो फोडत असतानाच अतिपावसाचा तालुका म्हणून परिचित असलेल्या पाटण तालुक्यालाही टंचाईच्या झळा जाणवायला लागल्या आहेत. तालुक्याला मोठ्या प्रमाणावर डोंगरभाग लाभलेला असतानाही याठिकाणी पाणी टंचाई जाणवते, हे दुर्दैव. तालुक्यातील बहुतांश भाग मार्चपासूनच टंचाईशी लढा देत आहे. तर काही गावे डिसेंबरपासूनच पाण्यासाठी वणवण करीत आहेत. अन्य काही गावांत सध्या तरी टंचाई जाणवत नसली तरी उपलब्ध पाणीसाठा अल्प आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत हा साठा संपून संबंधित गावांनाही पाण्यासाठी झऱ्याचा आधार घ्यावा लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. कोयना नदीकाठावर असूनही अनेक गावांवर सध्या पाणी टंचाईची टांगती तलवार आहे. तालुक्यातील अनेक नद्या, विहिरी आटल्या असून, कोयना नदीमधील पाण्याची पातळीही कमी झाली आहे. डोंगरदºयांनी वेढलेल्या आणि धरणांनी व्यापलेल्या तालुक्यात कोयना नदीच अनेक गावांसाठी प्रमुख जलश्रोत आहेत. ही कोयनामाई या तालुक्यातील अनेक वाड्या-वस्तीवरील लोकांची तहान भागवत आहे; पण काही वाहनधारक गावातील जनतेचा विचार करत नाहीत. ते आपली वाहने नदीपात्रामध्ये वाहत्या पाण्यात धुताना दिसत आहेत. पाटण परिसरात सर्रास हे चित्र दिसून येते. दुचाकी, चारचाकी वाहनाबरोबरच ट्रक, टॅव्हल्स, ट्रॅक्टर यासारखी वाहनेही नदीपात्रात बिनधास्तपणे धुवत आहेत.नदीपात्रात दुचाकी आणि चारचाकी वाहने धुण्याचे प्रकार सर्रास घडत आहेत. यामुळे जलप्रदूषण होत असून, हे थांबविण्यासाठी केवळ जनजागृती करून चालणार नाही. प्रत्येक नागरिकाने जलप्रदूषण रोखण्यासाठी आपले कर्तव्य बजावले पाहिजे. नगरपंचायतीच्या माध्यमातून लवकरच कोयना नदीपात्रात गाडी धुणाºयांवर चाप लावला जाईल. दंडात्मक कारवाई केली जाईल.- दीपक शिंदे, उपनगराध्यक्ष, पाटणराज्यभरात जल शुद्धीकरणासाठी कोट्यवधी रुपये खर्च केले जातायत. कोयना नदी ही पाटणसारख्या शहराला निसर्गाने दिलेले वरदान आहे. त्यामुळे या नदीचे पावित्र्य राखणे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. नगरपंचायतीने नदीपात्रात वाहने धुण्यास बंदी घातली पाहिजे. तसेच वाहने धुणाºयांना कायद्यानेच जरब बसविली पाहिजे. नदीपात्रात गाडी धुण्यास बंदी ही आता काळाची गरज आहे.- लक्ष्मण चव्हाण, नागरिक

 

टॅग्स :Satara areaसातारा परिसरriverनदी