शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
2
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
4
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
5
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
6
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
7
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
8
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
11
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
12
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
13
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
14
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
15
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
16
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
17
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
18
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
19
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
20
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...

कोयना नदी नव्हे.. सर्व्हिसिंग सेंटर : धुलाईसाठी वाहनांच्या रांगा ,आॅईल, ग्रीसमुळे होतेय जलप्रदूषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2018 23:20 IST

पाटण : तालुक्यात टंचाईच्या झळा जाणवत आहेत. नदीपात्रामध्येही अत्यल्प पाणी आहे. मात्र,

ठळक मुद्देपाण्याचा रंग, चवही बदलली

प्रवीण जाधव।पाटण : तालुक्यात टंचाईच्या झळा जाणवत आहेत. नदीपात्रामध्येही अत्यल्प पाणी आहे. मात्र, त्यातच काहीजण वाहने धूत असल्यामुळे पाण्याचे प्रदूषण होत आहे. काजळी, ग्रीस, आॅईल पाण्यात मिसळल्यामुळे काही ठिकाणी पाण्याचा रंग व चवही बदलली असून, या पाण्यामुळे ग्रामस्थांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनत आहे.पाटण तालुक्यात उष्णतेचे प्रमाण वाढले आहे. पाणी-पाणी म्हणून संपूर्ण जिल्हा टाहो फोडत असतानाच अतिपावसाचा तालुका म्हणून परिचित असलेल्या पाटण तालुक्यालाही टंचाईच्या झळा जाणवायला लागल्या आहेत. तालुक्याला मोठ्या प्रमाणावर डोंगरभाग लाभलेला असतानाही याठिकाणी पाणी टंचाई जाणवते, हे दुर्दैव. तालुक्यातील बहुतांश भाग मार्चपासूनच टंचाईशी लढा देत आहे. तर काही गावे डिसेंबरपासूनच पाण्यासाठी वणवण करीत आहेत. अन्य काही गावांत सध्या तरी टंचाई जाणवत नसली तरी उपलब्ध पाणीसाठा अल्प आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत हा साठा संपून संबंधित गावांनाही पाण्यासाठी झऱ्याचा आधार घ्यावा लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. कोयना नदीकाठावर असूनही अनेक गावांवर सध्या पाणी टंचाईची टांगती तलवार आहे. तालुक्यातील अनेक नद्या, विहिरी आटल्या असून, कोयना नदीमधील पाण्याची पातळीही कमी झाली आहे. डोंगरदºयांनी वेढलेल्या आणि धरणांनी व्यापलेल्या तालुक्यात कोयना नदीच अनेक गावांसाठी प्रमुख जलश्रोत आहेत. ही कोयनामाई या तालुक्यातील अनेक वाड्या-वस्तीवरील लोकांची तहान भागवत आहे; पण काही वाहनधारक गावातील जनतेचा विचार करत नाहीत. ते आपली वाहने नदीपात्रामध्ये वाहत्या पाण्यात धुताना दिसत आहेत. पाटण परिसरात सर्रास हे चित्र दिसून येते. दुचाकी, चारचाकी वाहनाबरोबरच ट्रक, टॅव्हल्स, ट्रॅक्टर यासारखी वाहनेही नदीपात्रात बिनधास्तपणे धुवत आहेत.नदीपात्रात दुचाकी आणि चारचाकी वाहने धुण्याचे प्रकार सर्रास घडत आहेत. यामुळे जलप्रदूषण होत असून, हे थांबविण्यासाठी केवळ जनजागृती करून चालणार नाही. प्रत्येक नागरिकाने जलप्रदूषण रोखण्यासाठी आपले कर्तव्य बजावले पाहिजे. नगरपंचायतीच्या माध्यमातून लवकरच कोयना नदीपात्रात गाडी धुणाºयांवर चाप लावला जाईल. दंडात्मक कारवाई केली जाईल.- दीपक शिंदे, उपनगराध्यक्ष, पाटणराज्यभरात जल शुद्धीकरणासाठी कोट्यवधी रुपये खर्च केले जातायत. कोयना नदी ही पाटणसारख्या शहराला निसर्गाने दिलेले वरदान आहे. त्यामुळे या नदीचे पावित्र्य राखणे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. नगरपंचायतीने नदीपात्रात वाहने धुण्यास बंदी घातली पाहिजे. तसेच वाहने धुणाºयांना कायद्यानेच जरब बसविली पाहिजे. नदीपात्रात गाडी धुण्यास बंदी ही आता काळाची गरज आहे.- लक्ष्मण चव्हाण, नागरिक

 

टॅग्स :Satara areaसातारा परिसरriverनदी