शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाची नव्हे; लस संपण्याची धास्ती!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2021 04:40 IST

सातारा: कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे प्रशासनाने लसीकरणाचा वेग वाढवला आहे. मात्र, अधून-मधून लसीचा साठा अपुरा पडत असल्याने नागरिकांना कोरोनाऐवजी आता ...

सातारा: कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे प्रशासनाने लसीकरणाचा वेग वाढवला आहे. मात्र, अधून-मधून लसीचा साठा अपुरा पडत असल्याने नागरिकांना कोरोनाऐवजी आता लस संपेल, याची धास्ती लागली आहे. त्यामुळे नागरिक लसीकरण केंद्रांवर प्रचंड गर्दी करत आहेत. रांगेमध्ये दोन हजारांहून अधिक लोक तब्बल तीन तास उभे राहत आहेत पण ऐनवेळी लस संपल्याचे सांगण्यात आल्यानंतर नागरिक हताश होऊन परताना दिसतात.

राज्य शासनाने १ मेपासून १८ वर्षांवरील सर्वांना लस देण्याचा निर्णय घेतला आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने सध्या सुरू असलेल्या लसीकरण केंद्रांवर मनुष्यबळ वाढविले आहे का, नेमके कसे नियोजन केले आहे, याचा ‘लोकमत’ने सोमवारी रियालिटी चेक केल्यानंतर प्रशासनाच्या अनेक त्रुटी आणि नागरिकांच्या समस्या समोर आल्या.

लसीकरण केंद्रामध्ये लसीचे डोस केवळ दीड हजार तर बाहेर अडीच हजार लोक रांगेत उभे असल्याचे पाहायला मिळाले. ज्यांना लस घ्यायची आहे अशा लोकांकडून जर आधारकार्ड घेऊन त्यांना तसे नंबर लिहून दिले तर त्यांना ताटकळत उभे राहावे लागायचे नाही. मात्र, असे न करता जोपर्यंत लस उपलब्ध आहे. तोपर्यंत नागरिकांना लस दिली जात होती. मात्र, लस अजूनही शिल्लक आहे, असे रांगेमध्ये उभे असलेल्या लोकांना वाटत होते. परंतु नंबर जवळ येताच लस संपली असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे तब्बल दोन तासांहून अधिक वेळ रांगेत उभे राहूनही लोकांना लस न मिळाल्याने अनेक जणांचा हिरमोड झाला. लसीचा वारंवार तुटवडा होत असल्याने नागरिकांना लस संपेल याची धास्ती लागली आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत आज घरातून बाहेर आलोय तर लस घेऊनच घरी जाणार, असा ठाम निश्चय अनेकांनी केला होता; परंतु लसच नाही म्हटल्यावर त्यांचाही नाईलाज झाला.

तर दुसरीकडे नागरिकांच्या अनेक समस्या समोर आल्या. घरातून बाहेर पडताना पोलिसांना आम्हाला कारणे द्यावी लागत असल्याचे अनेकांनी सांगितले. ई पास लगेच मिळत नाही. त्यामुळे लसीकरणाला जातानाही ई पास सक्तीचा करू नये, अशी मागणी नागरिक करताहेत. भरउन्हात उभे राहून काहींना भोवळही आली. साताऱ्यातील विसावा नाका परिसरात राहणारे सदाशिव साळुंखे हे ७२ वर्षाचे ग्रस्त सिव्हीलमध्ये लस घेण्यासाठी आले होते. एका तासाहून अधिक वेळ ते रांगेत उभे होते. त्यांच्यासोबत घरातील कोणीही आले नव्हते अचानक त्यांना भोवळ आली. रांगेत उभ्या असलेल्या एका युवकाने त्यांना धीर दिला. स्वतः जवळ असलेले पाणी त्यांना प्यायला दिले. असाच प्रकार राजवाडा परिसरातील लसी केंद्रावरही पाहायला मिळाला. नागरिकांना भरउन्हात उभे राहावे लागत असल्याने लोक आणखीनच अस्वस्थ होत होते.

चौकट : सिव्हीलमध्ये ११ जणांवर मदार

जिल्ह्यामध्ये एकूण ४४६ लसीकरण केंद्रे आहेत. यामध्ये सर्वांत जास्त गर्दीचे केंद्र म्हणून सिव्हील ओळखले जात आहे. या केंद्रावर रोज अडीच ते तीन हजार लोकांची रांग लागल्याचे पाहायला मिळते. या केंद्रांमध्ये ५ डेटा ऑपरेटर, ४ परिचारिका आणि २ डॉक्टर यांच्यावरच या लसी केंद्राची मदार आहे. सकाळी नऊला केंद्र सुरू होते. सायंकाळी सात तर कधी आठ नाहीतर लस संपेपर्यंत रात्री उशिरापर्यंत सुरू राहते.

चौकट :

ना तयारी, ना नोंद!

एक तारखेपासून १८ वर्षांवरील सर्वांना लस देण्यात येणार आहे. त्यामुळे लसीकरणासाठी प्रचंड गर्दी होण्याची शक्यता आहे. मात्र, प्रशासनाकडून अद्याप या लसीकरणाची कोणतीही तयारी करण्यात आली नाही. सध्याची गर्दी आवरेना, तर आता १ तारखेनंतर काय होणार, या विवंचनेत आरोग्य विभाग आहे. किती लोकांना लस देण्यात येईल, याची माहितीही प्रशासनाजवळ नाही. वास्तविक सध्या सुरू असलेली लसीकरण मोहीमच अधूनमधून बारगळत आहे. त्यामुळे एक तारखेपासून होणारी लसीकरण मोहीम कशी असेल हे आताच सांगता येणार नसल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

चौकट:

मास्क घाला, सांगावं लागत नव्हतं

साताऱ्यातील जिल्हा शासकीय रुग्णालय आणि राजवाडा परिसरातील कस्तुरबा रुग्णालयांमध्ये लसीकरण सुरू असताना बाहेर रांगेत उभ्या असलेल्या नागरिकांनी सोशल डिस्टन्सिंग ठेवले होते तसेच प्रत्येकाने तोंडाला मास्क लावला होता. त्यामुळे सुरक्षारक्षकांना मास्क लावा हे सांगावं लागत नव्हतं.

कोट : चार दिवसांपासून मी लसीकरणसाठी येत होतो. मात्र प्रत्येकवेळी मला लस संपली आहे, सांगण्यात येत होते. आज सकाळी घरातून लवकर आलो त्यामुळे माझा चौथा नंबर होता. पहिला डोस घेतला आहे. आता बरं वाटतंय

प्रताप मोहिते, शाहूपुरी, सातारा