शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत
2
IND vs PAK Final : अडचणीत आणणाऱ्या पाकला नडला! तिलक वर्माची कडक फिफ्टी!
3
VIDEO: हिशेब चुकता... हॅरिस रौफची दांडी गुल केल्यावर जसप्रीत बुमराहचं 'मिसाईल' सेलिब्रेशन
4
Suryakumar Yadav Out Or Not Out : सूर्याचा कॅच नीट पकडला की, पाक कॅप्टनकडून चिटींग? (VIDEO)
5
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बाल व शिशू स्वयंसेवकांचा विजयादशमी उत्सव उत्साहात संपन्न
6
सांगलीत चारित्र्याच्या संशयातून पत्नीची गळा चिरून हत्या, मग पती स्वत:हून पोलिस ठाण्यात हजर
7
खेड: भीमा नदीपात्रात कार बुडून एकाचा मृत्यू; पाण्याचा अंदाज न आल्याने घटना घडल्याचा अंदाज
8
IND vs PAK Final : कुलदीपची कमाल! ओव्हर हॅटट्रिकसह मारला 'चौकार'; जोमात सुरुवात करून पाक कोमात
9
कर्तव्यनिष्ठ! वडिलांचे अंत्यसंस्कार झाले, दुसऱ्याच दिवशी धाराशिवचे 'सीईओ' मदतीसाठी बांधावर धावले!
10
तुमच्या कॅप्टनचं तुम्ही बघा, आमच्याच आम्ही बघतो! IND vs PAK Final मध्ये टॉस वेळी काय घडलं? (VIDEO)
11
“नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना महायुती सरकारने तत्काळ भरीव मदत द्यावी, अन्यथा...”: हर्षवर्धन सपकाळ
12
युवराज, उथप्पा, रैनाची मालमत्ता ED जप्त करणार? मनी लॉड्रिंग प्रकरणात आली महत्त्वाची अपडेट
13
“पाक लिंक खोटी, जेलमध्ये भेटायला दिले नाही, ते गांधीवादी...”; सोनम वांगचूकच्या पत्नीचा दावा
14
रेल्वे इंजिनमध्ये आता टँकरने डिझेल भरता येणार; शेडमध्ये जाण्याची गरज भासणार नाही!
15
जळगावमध्ये माजी महापौरांच्या फार्म हाऊसवर सुरू होतं धक्कादायक काम, पोलिसांची धाड, ८ जण अटकेत
16
IND vs PAK Final, Asia Cup 2025 : सूर्यानं टॉस जिंकला; हार्दिक पांड्या 'आउट'! रिंकूला संधी; कारण...
17
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान, शरद पवार यांनी सरकारकडे केल्या पाच मागण्या
18
OBC आंदोलने, पण कुठेत नाना पटोले; पदावरून दूर केल्याचा मूक निषेध की नव्या योजनेची तयारी? 
19
BCCIचे अध्यक्ष बदलताच आगरकरच्या निवड समितीत मोठा बदल, दोन स्टार क्रिकेटर बनले 'सिलेक्टर्स'
20
"संघाने आता नथुराम आणि मनुस्मृतीला तिलांजली देऊन गांधी विचार आणि संविधान स्वीकारावे’’, काँग्रेसने दिला सल्ला  

भटके विमुक्त विकास संस्था संघर्षातून उभी राहिली, शरद पवार यांचं विधान

By सचिन काकडे | Updated: May 9, 2025 20:35 IST

Sharad Pawar News: भटक्या विमुक्तांना शिक्षणाची द्वारे खुली झाली. त्यांना त्यांच्या अधिकाराची जाणीव झाली. त्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी भारतीय भटके विमुक्त व विकास संशोधन संस्थेचे योगदान मोलाचे आहे. पद्मश्री लक्ष्मण माने यांनी केलेल्या संघर्षातून ही संस्था उभी राहिली, असे मत संस्थेचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले.

- सचिन काकडेसातारा - एक काळ असा होता की भटक्या विमुक्तांकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोन अत्यंत वेगळा होता. मात्र काळ बदलला तशी परिस्थिती बदलत गेली. भटक्या विमुक्तांना शिक्षणाची द्वारे खुली झाली. त्यांना त्यांच्या अधिकाराची जाणीव झाली. त्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी भारतीय भटके विमुक्त व विकास संशोधन संस्थेचे योगदान मोलाचे आहे. पद्मश्री लक्ष्मण माने यांनी केलेल्या संघर्षातून ही संस्था उभी राहिली, असे मत संस्थेचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले.

भारतीय भटके विमुक्त विकास व संशोधन संस्था आणि फुले-आंबेडकर साहित्य पंचायत, सातारा यांच्या वतीने शुक्रवारी दुपारी जकातवाडी (सातारा) येथे शारदा आश्रमाच्या प्रांगणात आयोजित करण्यात आलेल्या पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते. या वेळी संस्थेचे कार्याध्यक्ष पद्मश्री लक्ष्मण माने, खासदार सुप्रिया सुळे, नारायण जावलीकर, रामभाऊ जाधव आदी उपस्थित होते.

शरद पवार पुढे म्हणाले, लक्ष्मण माने यांनी पुरोगामी विचार रुजविण्यासाठी आयुष्याचा मोठा काळ खर्ची घालवला आहे. भटक्या विमुक्तांसाठी त्यांनी सुरू केलेल्या संस्थेला माजी मुख्यमंत्री दिवंगत यशवंतराव चव्हाण यांनी प्रोत्साहन दिले. या संस्थेला पुढील काळातही सर्वतोपरी सहकार्य केले जाईल.

लक्ष्मण माने म्हणाले, फुले-आंबेडकर विचारधारेला अनुसरून परिवर्तनाच्या चळवळीत योगदान देणारे लेखक, साहित्यिक व सामाजिक कार्यकर्त्यांना पुरस्कार देण्याची परंपरा संस्थेने जपली आहे. ही संस्था शून्यातून उभी राहिली. संस्था उभी करण्यात शरद पवार यांचे योगदान अमूल्य आहे. संस्थेच्या छत्रछायेखाली आजवर ५० हजारांहून अधिक विद्यार्थी शिकून बाहेर पडले. शरद पवार यांनी आम्हाला इतकं भरभरून दिलं आहे की आता आम्हाला त्यांच्याकडून काहीही नको. श्वासात श्वास असेपर्यंत आम्ही त्यांच्यासोबत राहू.निधी कोणाच्या घरात जात नाही - सुप्रिया सुळेजगात क्रांती होत आहे, नवे तंत्रज्ञान विकसित होत आहे. असे असताना आजही भटक्या विमुक्त समाजाला त्यांच्या अधिकारासाठी, शिक्षणासाठी लढावे लागत असेल तर याच्यासारखं दुर्दैवी दुसरं काही नाही. आश्रमशाळांसाठी निधी का दिला जात नाही? हा पैसा कोणाच्या घरात जात नाही तर विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी जातोय. याचा महाराष्ट्र सरकारने कुठेतरी विचार करायला हवा. ही वेळ सरकारवर टीका करण्याची नाही कारण आज देश अडचणीत आहे. जो सरकार निर्णय घेईल त्याच्या पाठीमागे आम्ही ताकदीने उभे राहू, असे मत यावेळी खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केले.

या मान्यवरांचा गौरव यंदाचा फुले-आंबेडकर साहित्य पुरस्कार अर्थशास्त्रज्ञ, शिक्षणतज्ज्ञ डॉ. सुखदेव थोरात यांना, वैचारिक चळवळीतील लेखक नारायण जावलीकर यांना यल्लाप्पा वैदू स्मृती युवा साहित्य पुरस्कार व भटक्या विमुक्त चळवळीत काम करणारे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते रामभाऊ जाधव यांना जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारSatara areaसातारा परिसर