शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
2
हिंदीची सक्ती महाराष्ट्रात होऊ देणार नाही; मनसे प्रमुख राज ठाकरेंचा सरकारला इशारा
3
IND vs ENG: गौतम गंभीर कुठेच दिसेना... टीम इंडियासोबत 'कोच' म्हणून VVS लक्ष्मण इंग्लंडमध्ये, पण का?
4
Sonam Raghuvanshi : चक्की चालवणारे सोनमचे बाबा कसे झाले करोडपती? कमाई एवढी की नातेवाईकांच्या नावावर खाती
5
अहमदाबाद विमान अपघाताबाबत मोठा खुलासा; तीन महिन्यांपूर्वी बदलले होते विमानाचे इंजिन...
6
पाकिस्तानच्या सिंधमध्ये जाफर एक्सप्रेसवर हल्ला, रेल्वे ट्रॅकवर भीषण स्फोट; ट्रेन रुळावरून घसरली
7
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
8
Ahmedabad plane crash: जीव वाचविण्यासाठी बाल्कनीतून मारल्या उड्या, अहमदाबाद विमान दुर्घटनेबाबत नवी माहिती समोर
9
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
10
Sonam Raghuwanshi: नागा तलवारीने वार! रक्तबंबाळ राजा ओरडायला लागताच सोनम गेली पळून; त्याचा जीव गेल्यावरच आली परत
11
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
12
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
13
"भारताचे तुकडे पाडून १९७१ च्या पराभवाचा बदला घेऊ’’, पाकिस्तानचे लष्करप्रमुख आसिम मुनीर यांची धमकी
14
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
15
Life Lesson: सगळं काही छान सुरळीत सुरु असताना अचानक आयुष्यात संकटं का येतात?
16
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
17
अहमदाबादचा दुर्देवी विमान अपघात अन् घटस्फोट कॅन्सल! बॉलिवूड अभिनेत्रीने सांगितलं यामागचं नेमकं कनेक्शन
18
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
19
India- Pakistan: पाकने धमक्या देऊ नये; भारताकडे त्यांच्यापेक्षा १० अधिक अण्वस्त्रे

घुंगराचा आवाज खेची दुष्काळग्रस्तांचे पाय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2019 23:06 IST

वरकुटे-मलवडी : माण तालुक्यात सूर्यनारायण आग ओकत आहेत. गेल्या आठवड्यात सरासरी ४३ अंश सेल्सिअसच्या घरात तापमानाचा पारा पोहोचला होता. ...

वरकुटे-मलवडी : माण तालुक्यात सूर्यनारायण आग ओकत आहेत. गेल्या आठवड्यात सरासरी ४३ अंश सेल्सिअसच्या घरात तापमानाचा पारा पोहोचला होता. त्यामुळे माणदेशी माणसाचा जीव कासावीस होत आहे. या जीवाला थंड करण्यासाठी गावोगावी फिरते रसवंतीगृह येऊ लागले आहेत. त्यातील घुंगराचा आवाज आला की, आपसूक जीवाला थंड करण्यासाठी माणसांची पावले त्याकडे वळत आहेत.माण तालुक्यातील वरकुटे-मलवडी येथे आठवडा बाजारातील खळखळाट करून मंत्रमुग्ध करणाऱ्या घुंगराचा आवाज ऐकवत चालत्या फिरत्या टमटममध्ये ताजा उसाचा रस मिळत असल्याने नागरिकांची पावले आपोआप त्या दिशेने वळत आहेत. आधीच दुष्काळ त्यातच कडक उन्हाच्या झळा वाढल्याने नागरिकांची दमछाक होत आहे. अशातच उसाचा रस पिल्याने मनाला व शरीराला थंडावा मिळत आहे.ग्रामीण भागातील भरणाºया आठवडा बाजारात शरीराला थंडावा देणाºया कलिंगड, काकडीसह उसाच्या रसाची विक्री जोमाने सुरू आहे. कडक उन्हातून दमून भागून आलेले बाजारकरी उसाचा रस पिऊन मन शांत करत आहेत.मे महिन्यात सूर्यनारायण कोपला असल्याने वातावरणात उष्णता मोठ्या प्रमाणात वाढली आहे. उन्हाच्या तडाख्यामुळे घशाला कोरड पडत असल्याने अशातच कानावर रसवंतीगृहाच्या घुंगराचा आवाज कानावर पडला की, थंडगार उसाचा रस पिण्यासाठी बाजारकरू, नागरिकांची धांदल उडत आहे.उन्हाळ्यात शरीराचे तापमान योग्य राखण्यासाठी थंडगार शीतपेयांना खूप मागणी असते. यामध्ये जास्तकरून उसाचा रस व नारळपाणीही पिले जाते. लिंबू, आलेयुक्त उसाचा आयुर्वेदिक रस पिल्याने शरीराचे तापमान योग्य राखण्याचे काम होते. त्याचबरोबर रक्तातील साखरेचे प्रमाणही वाढवून माणसाला टवटवीत आणि ताजेतवाणे करीत असतो. वर्षानुवर्षे भारतीयांच्या आवडीचे असणारे हे पेय आजही लोक मोठ्या आवडीने पीत असतात.गुºहाळांंच्या चाकांना लावलेल्या घुंगराच्या मधूर आवाजाने जाणाºया-येणाऱ्यांचे लक्ष वेधून घेते आणि आपल्या अस्तित्वाची जाणीव करून देत आहे. दूरवरून येणारा आवाज ओळखूनच माणूस आता आपण रस घेऊया, असे म्हणत रसवंतीगृहाकडे त्यांची पावले आपोआप वळताना दिसत आहेत.शीतपेयांवर जालीम उपायउसाचा रस हा उन्हाळ्यात थंड होण्यासाठी वापरला जाणारा पूर्वापार जुना व्यवसाय. याच्या जोडीलाच लिंबू सरबत, नारळाचे पाणी वापरले जात असते. मध्यंतरीच्या काही वर्षांमध्ये शीतपेयांनी बाजारात आक्रमण केले. या कंपन्यांनीही तरुणांना याकडे आकर्षित केल्यामुळे युवकांबरोबरच ज्येष्ठ मंडळीही शेतपेयाकडे वळाली होती; पण आता उसाचा रस पिण्यावर भर दिला जात आहे. त्यामुळे फिरत विक्री करणाºयांनाही चांगले दिवस आले आहेत. त्यांना चांगला रोजगार मिळत आहे.रस ठिकंय; पण बर्फाचे प्रश्नरसवंती गृहावर मिळणारा रस हा सकस आणि आरोग्यवर्धक असतो. मात्र, हा रस थंड करण्यासाठी वापरण्यात येणाºया बर्फाबाबत अनेकांच्या मनात शंका असते. बर्फ गोणपाटामध्ये ठेवण्यात आलेला बर्फ खाण्यासाठी योग्य असेलच असे नाही. सोशल मीडियावरही रस्त्यावर वापरला जात असलेला बर्फ खाण्यायोग्य नसल्याच्या पोस्ट फिरत असतात. त्यामुळे हा बर्फही आरोग्यासाठी चांगला असेलच, याची कोणाला खात्री देता येत नाही. त्यामुळे अनेक ग्राहक बर्फ कमी टाकून किंवा न टाकता देण्याची मागणी करतात.