शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
2
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
3
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
4
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
5
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
6
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
7
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
8
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
9
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
10
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
11
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
12
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
13
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
14
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
15
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
16
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
17
दुबई-अबुधाबी फिरण्याचा विचार करताय? आयआरसीटीसीने आणलंय धमाल पैसा वसूल पॅकेज!
18
India’s Squad vs SA Test : पंत इज बॅक! दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीसाठी कुणाला मिळाली संधी?
19
IND A vs SA A : रोहित-विराट दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 'या' वनडे मालिकेपासून दूरच
20
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला

मास्तरांमध्ये नो भरती, ओन्ली सेवानिवृत्ती!

By admin | Updated: October 13, 2015 00:03 IST

शासनाच्या धोरणाचा फटका : बदलीचे प्रस्तावही प्रशासनाकडे धूळखात पडून--शाळाबाह्य गुरुजी : दोन

प्रगती जाधव-पाटील -- सातारा भरती प्रक्रियेत असणाऱ्या अस्थिरतेमुळे प्रतिभासंपन्न विद्यार्थ्यांनी शिक्षक होण्यापासून स्वत:ला दूर ठेवले आहे. तर भरतीच्या मंदावलेल्या अवस्थेमुळे मास्तरांमध्ये ‘नो भरती... ओन्ली सेवानिवृत्ती’ अशी अवस्था झाली आहे. सोयीच्या ठिकाणी बदली घेण्याचे अधिकार स्थानिक पातळीवरून काढून घेतल्याने बदलीचे हजारो प्रस्ताव प्रशासकीय कार्यालयात पडून आहेत.प्रादेशिक दुय्यम सेवा मंडळाच्या बरखास्तीनंतर शिक्षक भरतीचे पर्याय शासन शोधू लागले. त्यासाठी आर्थिक कारण दाखवून शिक्षण सेवक पदाची निर्मिती, वस्ती शाळा, अनग्रेड शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली. यामुळे प्रचंड अस्थितरता निर्माण झाली. एकाच शाळेत अनग्रेड, शिक्षण सेवक आणि पूर्णवेळ शिक्षक एकत्रिक काम करू लागल्यामुळे गुणवत्तापूर्ण शिक्षणावर प्रश्नचिन्ह उभे राहिले. कधी ‘सीईटी’ तर कधी स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून शिक्षकांची होणारी बदली अनेकांना बुचकळ्यात टाकू लागली. यामुळे अनेकांनी शिक्षण क्षेत्राकडे पाठ फिरविली.पूर्वी वर्षातून एकदा भरती प्रक्रिया सुरू असायची. आता मात्र शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे वर्षोनुवर्षे भरती प्रक्रियाच झालेली नाही. यामुळे शैक्षणिक कामांबरोबरच अशैक्षणिक कामांचा ताणही उपलब्ध संख्येतील शिक्षकांवरच पडू लागला आहे. अलिकडे प्रशासकीय बदल्यांचा अध्यादेश आल्यापासून तर बदली प्रक्रिया पूर्णपणे थांबली आहे. रोष्टर, शाळेचा कमी झालेला पट, न्यायालयीन याचिका, शासनाचे बदल्यांबाबतचे बदलणारे धोरण यामुळे शिक्षकांच्या बदल्या ठप्प आहेत. गेल्या दोन वर्षांत विशेष बाब म्हणून जिल्ह्यात केवळ एखादीच बदली झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.असे आहेत बदल्यांचे प्रकारप्रशासकीय बदली : ज्या शिक्षकाच्या नियुक्तीला पाच वर्षे पुर्ण झाली आहेत, तो शिक्षक बदलीस पात्र असतो. पती-पत्नी एकत्रीकरण : पती पत्नी असलेल्या शिक्षकांना एकाच शाळेत नियुक्ती मिळावी असा आदेश आहे. पण पट संख्या आणि शाळेत शिक्षकांचा कोटा पूर्ण असेल तर तिथे पती पत्नी एकत्र नाहीत.समायोजन : ज्या शाळांमध्ये १५१ पेक्षा पटसंख्या कमी आहे, अशा शाळांमधील शिक्षकाची बदली इतरत्र केली जाते. त्यामुळे शिल्लक राहिलेल्या शिक्षकांवर कामाचा ताण येतो.पदाधिकाऱ्यांचे बदल : अर्थपूर्ण लाभासाठी पूर्वी स्थानिक पातळीवर पदाधिकारी आणि राजकीय नेते शिक्षकांच्या बदलीसाठी सक्रिय सहभाग नोंदवायचे. आता स्थानिक पातळीवरील हे अधिकार काढून घेतल्यामुळे शिक्षकांच्या बदल्यांचा विषय कोणाच्याही गावी नाही.जिल्हा बदली : हजारो तरूण नोकरीच्या शोधात शिक्षक सेवक म्हणून राज्यात विविध ठिकाणी शिक्षण सेवा बजावत असतात. आपला जिल्हा सोडून डोंगरदऱ्या आणि दुर्गम भागात काम करणाऱ्या या शिक्षकांना आपल्या जिल्ह्यात येण्याची आस असते.गेल्या अनेक वर्षांत शिक्षकांची भरती न झाल्यामुळे शैक्षणिक आणि अशैक्षणिक कामांचा ताण शिक्षकांवर पडला आहे. त्याचा परिणाम अध्ययन करणाऱ्यावर होत आहे. अभ्यासक्रम पूर्ण करायचा का शासनाने सोपवलेली अशैक्षणिक कामे करायची, अशा कात्रीत शिक्षक सापडले आहेत. - महेश सुतार, मांटीमुरा, जि.प. शाळा, सातारा