शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेच्या पावसाळी अधिवेशनासाठी सरकारचा भरगच्च आर्थिक अजेंडा
2
"साहेब, तुम्ही जे म्हणता तेच..."; राज ठाकरेंचा व्हिडीओ केला पोस्ट, मनसेचा नेता काय म्हणाला?
3
उत्तर महाराष्ट्रात भाजपाची ताकद वाढणार; पुढील ४८ तासांत २ माजी आमदारांचा पक्षप्रवेश होणार
4
भारताने पाकिस्तानला नकाशावरून हटवले असते; इंडोनेशियात खुलासा, अणुयुद्ध झाले असते तर काय घडलं असते?
5
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
6
‘कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरण माध्यमांतूनच कळाले’
7
पाकिस्तानमध्ये तुफान चालतोय 'सरदार जी ३', दिलजीतची सोशल मीडियावर माहिती; होतेय टीका
8
Today's Horoscope: आर्थिक बाबतीत मात्र सावध राहावे लागेल, काय सांगतेय तुमची राशी? 
9
गुंतवणुकीसाठी सुवर्णसंधी ! बाजारात ७ आयपीओ होणार खुले; योग्य कंपनी निवडल्यास होऊ शकतो फायदा
10
भाजपच्या नव्या अध्यक्षांची निवड लवकरच; प्रधान आघाडीवर, पावसाळी अधिवेशनापूर्वी प्रक्रिया होऊ शकते पूर्ण
11
राज्य सरकारला घेरण्याची विरोधी पक्षांची रणनीती; मविआचा सरकारच्या चहा पानावर बहिष्कार, जनतेला वाऱ्यावर सोडले
12
प्रशासकीय सीमा ३१ डिसेंबरला होणार ‘फ्रीझ’, जनगणना : नंतर होणार नाही नवे गाव, जिल्हा, महापालिका
13
विकले जात राहणे हेच पाकिस्तानचे नशीब
14
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले
15
कार्ला येथील एकवीरा मंदिरात ड्रेसकोड; ७ जुलैपासून नव्या नियमांची अंमलबजावणी
16
लुटालुटीला आरटीओची मूक संमती? अधिकृत रिक्षा स्टॅंडवर दरपत्रकच नाही; कल्याण आरटीओ क्षेत्रातील वास्तव
17
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
18
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
19
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
20
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले

वीज बिलात सवलत नको, पूर्ण माफ करा : थोरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 05:15 IST

राज्य आणि केंद्रात कोणत्याही पक्षाचे सरकार आले तरी शेतकऱ्यांना खोटी आश्वासने देणे, शेतीमाल व दूध, मासे आदी मालाच्या किमती ...

राज्य आणि केंद्रात कोणत्याही पक्षाचे सरकार आले तरी शेतकऱ्यांना खोटी आश्वासने देणे, शेतीमाल व दूध, मासे आदी मालाच्या किमती सातत्याने कमी राहतील, असा प्रयत्न करतात. ग्राहकांच्या फायद्याचे धोरण राबविणे हे सगळे राजकारण शेतकऱ्यांभोवती खेळवून ग्राहकांची मते मिळवायची, हा उद्योग सुरू आहे. देशात पाचशेच्या आसपास शेतकरी संघटना आहेत. परंतु त्यांचा काही उपयोग शेतकऱ्यांना होत नाही. राज्य सरकार शेतकऱ्यांना पायाभूत सुविधा देण्यात कमी पडत आहे. गेली ६० वर्षात राज्य करूनही शेतकरी कंगाल राहून आत्महत्या करतोय. शेतकऱ्यांच्या थकीत वीज बिलाबाबत ऊर्जामंत्र्यांनी सरकारची ठाम भूमिका घेतलेली नाही. राज्यातील तीन पक्षाच्या सरकारमधे वीज बिल माफीवर एकमत नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, काँग्रेसचे ऊर्जामंत्री, राष्ट्रवादीचे नेते परस्परविरोधी बोलून शेतकऱ्यांमध्ये गोंधळ उडवत आहेत.

सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनी शेतकऱ्यांच्या थकीत वीज बिलात ५० टक्के माफी जाहीर केली. हे शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसण्यासारखे आहे. फार काळ शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष केले तर दिल्लीचे केंद्र सरकार सपाटून मार खाईल. त्याचबरोबर राज्यातील तीन पक्षीय सरकार नावालासुध्दा उरणार नाही, असेही पत्रकात म्हटले आहे.

- चौकट

प्रमुख मागण्या

१) शेतकऱ्यांना वीज, पाणी, रस्ते मोफत द्यावेत.

२) उत्पादन खर्चावर आधारित हमीभाव द्यावा.

३) शेतकऱ्यांचा फारच कळवळा असेल तर संपूर्ण कर्जमाफी करावी.

४) वीज बिल पूर्ण माफ करावे.