शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
7
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
8
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
9
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
10
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
11
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
12
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
13
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
14
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
15
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
16
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
17
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
18
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
19
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
20
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!

लॉकडाऊनमध्ये प्रवेशबंदी, आता मतांसाठी गावाला या !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:39 IST

कातरखटाव : खटाव तालुक्यातील कातरखटाव, एनकूळ, बोबाळे, तडवळे, बनपुरी, येरळवाडी, कनसेवाडी, कान्हरवाडी या भागातील ग्रामपंचायत निवडणूक प्रचाराचा धुरळा उडाला ...

कातरखटाव : खटाव तालुक्यातील कातरखटाव, एनकूळ, बोबाळे, तडवळे, बनपुरी, येरळवाडी, कनसेवाडी, कान्हरवाडी या भागातील ग्रामपंचायत निवडणूक प्रचाराचा धुरळा उडाला असून, प्रचार शिगेला पोहोचला आहे. कोरोनाकाळात लॉकडाऊनमध्ये गावबंदी करणारे उमेदवार, कार्यकर्ते, मतदानासाठी गावाला या म्हणून आता हात जोडून विनवणी करीत आहेत.

ग्रामीण भागातील अनेक लोक मुबंई, पुणे व इतर शहरांमध्ये कामानिमित्त वास्तव्यास आहेत. परंतु, कोरोना महामारीच्या काळात अडीच महिने लॉकडाऊन जाहीर करण्यात आला होता. सारे व्यवहार, वाहतूक, बंद होती. रुग्णांची वाढती संख्या लोकांच्या मनात भीती, अफवा पसरवत होत्या. त्यावेळी या लोकांना गावाकडे यायचे होते. तेव्हा गावाकडील नागरिकांना शहरातील नागरिकांची भीती वाटत होती. चाकरमानी गावाकडे येण्यासाठी धडपडत होता. परंतु, अनेक गावांमध्ये प्रवेशबंदी लादली गेली. त्यावेळी चाकरमानी चांगलेच त्रस्त झाले होते. गावातील कार्यकर्ते, नागरिकांना चाकरमानी परका वाटत असल्याचे विनोदी संदेश सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. आणि म्हणूनच, ‘गल्ली ते दिल्ली’ असे समीकरण असणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकांचे बिगुल वाजल्यामुळे मतांचा जोगवा मागण्यासाठी व मतांची जुळवाजुळव करण्यासाठी कार्यकर्ते, उमेदवारांना मुबंई, पुणे येथे जाऊन मतदारराजा कुठे आहे, ते शोधावे लागत आहे, ही वस्तुस्थिती आहे.

अशा तऱ्हेने तालुक्यासह कातरखटाव, एनकूळ, बनपुरी, तडवळे या हुकमी आणि मोठ्या गावांत निवडणूक चुरशीची होणार असून, ग्रामपंचायतींची सत्ता आपल्याच पक्ष व गटाला कशी मिळेल, यासाठी आ. जयकुमार गोरे, माजी आमदार प्रभाकर घार्गे, रणजितसिंह देशमुख, माजी आयुक्त प्रभाकर देशमुख यांची प्रतिष्ठा गनिमी काव्यानुसार पणाला लागणार आहे, असे दिसून येत आहे.

त्यामुळे उमेदवार नमस्कार, करीत असला तरी जिल्ह्याचे व तालुक्याचे लक्ष लागून राहिलेल्या कातरखटाव, एनकूळ, बनपुरी, येरळवाडी, तडवळे, या गावात मतदारराजा चमत्कार, घडवणार असे एकंदरीत चित्र दिसून येत आहे.

(चौकट)

दोन ग्रामपंचायती बिनविरोध तर काही ठिकाणी आटापिटा...धराधरी?

या भागातील मानेवाडी, डाळमोडी येथील ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या असून, गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत बोबाळे ग्रामपंचायत एकमताने बिनविरोध झाली होती. परंतु, यावेळी एकमत नसल्याने कार्यकर्त्यांत धराधरीचे रामायण घडले गेले तर दुसरीकडे अटीतटीच्या बनपुरी गावात दोन उमेदवारांच्या घोळामुळे निवडणूक लढवावी लागत आहे. त्यामुळे या भागातील निवडणुका रंगतदार वळणावर येऊन ठेपल्या आहेत. गावगाडा हाकताना आजी-माजी सरपंच, कार्यकर्ते, उमेदवाराच्या पायाला भिंगरी असल्याचे दिसून येत असून मी अमक्या वाॅर्डात आहे, मी तमक्या वाॅर्डात आहे, असे चित्र पहावयास मिळत आहे.