शहरं
Join us  
Trending Stories
1
Rohit Arya : थरारक! ८ कमांडोंची बाथरूममधून एन्ट्री, ३५ मिनिटांत...; १७ मुलांच्या रेस्क्यूची इनसाईड स्टोरी
2
Today Daily Horoscope : आजचे राशीभविष्य - ३१ ऑक्टोबर २०२५; विवाहेच्छुकांचे विवाह जुळतील, मित्रांकडून भेटवस्तू मिळतील
3
आमच्या जाहीरनाम्यातच घोषणा, ३० जून २०२६ पूर्वी शेतकऱ्यांची केली जाणार कर्जमाफी: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
4
मुंबईत ऑडिशनच्या नावे १७ मुलांसह २० जणांना ठेवले ओलिस; अपहरणकर्त्याचे एन्काऊंटर करत सर्वांची नाट्यमयरीत्या सुटका
5
दोन नोटिशींना प्रतिसाद नाही; उद्धव ठाकरे यांना आयोगाची कारणे दाखवा नोटीस
6
'गोंधळ कायम ठेवून निवडणुका म्हणजे मॅच फिक्सिंग'; राज ठाकरे यांचा आरोप, ईव्हीएम सेटिंगचे प्रात्यक्षिक
7
India Into Final : सात वेळच्या चॅम्पियनसमोर ८ वर्षांपूर्वीचा रुबाब! विक्रमी विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल
8
येस बँक घोटाळा : कपूर, अंबानी बैठका घेत; अधिकारी कार्यवाही करीत, सीबीआयकडून १३ जणांविरुद्ध गंभीर आरोप
9
चाकणकरांचे वक्तव्य हे आमच्या पक्षाचे म्हणणे नाही; अजित पवार यांची नाराजी
10
ऑडिशनमध्ये निवड झालेली मुले ग्रामीण भागातील; खिडकीतून आत जाऊन फिल्मी स्टाइलने सुटका
11
तिसरीपासून 'एआय' शिकणार मुलं; पुढील वर्षांपासून अंमलबजावणी, एक कोटी शिक्षकांना प्रशिक्षण
12
छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावर एकाचा हक्क नाही! मांजरेकरांच्या चित्रपटाला हायकोर्टाचा हिरवा कंदील
13
अमेरिकेत नोकरीस जाणे झाले आता अधिक कठीण; कर्मचाऱ्यांच्या स्वयंचलित मुदतवाढीची वर्क परमिट योजना बंद
14
सरकार शेतकरी कर्जमाफी कधीपर्यंत करणार? मुख्यमंत्री फडणवीसांनी बैठकीनंतर सांगितला प्लॅन
15
IND vs AUS : "ना फिफ्टीचं सेलिब्रेशन, ना सेंच्युरीचं! विजयी धाव घेताच जेमिमाला अश्रू अनावर; म्हणाली...
16
"मुख्यमंत्री करा म्हणून किती लाचारी करायची?"; राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचलं, चढवला हल्ला
17
क्रिकेटच्या देवाकडून जेमी-हरमनप्रीतला शाब्बासकी! ऐतिहासिक विजय युवी, एबी आणि गंभीरलाही भावला
18
Sangli Crime: ‘व्हाईट हाऊस हॉटेल’च्या बारमध्ये मित्रानेच चिरला गळा, तरुणाचा जागेवरच मृत्यू
19
Jemimah Rodrigues Century : शाब्बास जेमी! घरच्या मैदानात अविस्मरणीय शतकी खेळीसह लुटली मैफील
20
एकीकडे दिलासा, मात्र दुसरीकडे बच्चू कडू, राजू शेट्टी यांच्यासह हजारो शेतकरी आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल

नवीन महाबळेश्वर संधी आणि आव्हाने; चार भागात विभागला गेलाय प्रकल्प

By दीपक शिंदे | Updated: January 27, 2025 14:04 IST

दीपक शिंदे , उप वृत्तसंपादक, सातारा सातारा जिल्हा हा पर्यटनाच्यादृष्टीने अत्यंत अनुकूल असला तरी त्यापद्धतीने सुविधांची कोणतीच परिस्थिती याठिकाणी ...

दीपक शिंदे , उप वृत्तसंपादक, सातारासातारा जिल्हा हा पर्यटनाच्यादृष्टीने अत्यंत अनुकूल असला तरी त्यापद्धतीने सुविधांची कोणतीच परिस्थिती याठिकाणी नाही. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर भूमिपुत्र असल्याने त्यांनी नवीन महाबळेश्वरचा प्रकल्प पुन्हा एकदा मार्गी लावण्याचा प्रयत्न सुरू केला. यापूर्वी याच प्रकल्पाला विरोध झाल्याने त्याच्यावर फारसे काम झाले नव्हते. आता विरोध करणारी गावेही नवीन प्रकल्पात आमचा समावेश करा, असे सांगू लागली आहेत. तर पर्यावरणप्रेमींचा या प्रकल्पाला विरोध आहे. यामुळे नवीन महाबळेश्वरमध्ये काय होणार आणि नवीन महाबळेश्वरचे काय होणार असा प्रश्न सतत अनेकांना पडत असतो.

नवीन महाबळेश्वर प्रकल्प काय आहे हे प्रथमत: जाणून घेण्याची आवश्यकता आहे. नवीन महाबळेश्वरमध्ये २३५ गावांचा समावेश आहे. नवीन महाबळेश्वर प्रकल्प हा प्रामुख्याने चार भागात विभागला गेला आहे. त्यामध्ये उत्तरेकडील महाबळेश्वर, उत्तर पश्चिम भागातील जावळी, पूर्वस्थित सातारा आणि दक्षिणेकडील पाटण याचा समावेश आहे. या परिसरातील निसर्ग सौंदर्याचा पर्यटकांना लाभ घेता यावा यासाठी याठिकाणच्या जलाशयामध्ये बोटिंग, स्कूबा डाईंग, हाऊस बोट, स्टे होम, वॉटर स्पोर्ट असे विविध उपक्रम करण्याचे नियोजन आहे. त्यासाठी सुमारे १३ हजार कोटी रुपयांचा आराखडा तयार करण्यात आला आहे. यातील काही कामेही सुरू झाली आहेत.महाबळेश्वर आणि पाचगणी याठिकाणी देश आणि जगभरातून मोठ्या प्रमाणावर पर्यटक येत असतात. त्यामुळे या दोन्ही ठिकाणी मोठ्या प्रमाणावर गर्दी होते. काही लोक महाबळेश्वर, पाचगणीपेक्षा इतर ठिकाणी राहण्यासाठी आणि या ठिकाणी फिरण्यासाठी येण्याचे नियोजन करतात. पण, त्यांना आवश्यक त्या सुविधा मिळत नाहीत. त्यामुळे ते लवकर परत फिरतात. या पर्यटकांना तीन चार दिवस याच परिसरात थांबवून ठेवायचे असेल तर त्यांना तशा सुविधा आणि करमणुकीची साधने उपलब्ध करुन दिली पाहिजेत. हा एक भाग झाला तर त्याचवेळी पर्यावरण तज्ञांच्या मते या भागात मुळात लोक निसर्गाचा आनंद घेण्यासाठी येतात. त्यांना याचठिकाणच्या वातावरणात राहता आले पाहिजे, अशा सुविधा पर्यावरणाचे नुकसान न करता उपलब्ध करून दिल्या पाहिजेत, असाही मतप्रवाह आहे.दुसरीकडे नवीन महाबळेश्वरमुळे पाण्यात गेलेली जमीन आणि बुडालेले उत्पन्नाचे साधन यामुळे या भागातील लोकांना पुन्हा एकदा रोजगार मिळून मुंबई - पुण्याकडे रोजगारासाठी गेलेला माणूस पुन्हा गावाकडे येईल. गावे बहरतील आणि त्यांना आपल्या रोजगारासाठी इतरांकडे नोकरी करावी लागणार नाही, असे सांगितले जाते. तर या भागात आता मूळच्या लोकांच्या खूप कमी जमिनी राहिल्या आहेत. पुणे - मुंबईच्या व्यापाऱ्यांनी याठिकाणच्या जमिनी घेतल्यामुळे या प्रकल्पाचा फायदा त्यांना होणार आहे. स्थानिकांना होणार नाही, असाही एक मतप्रवाह आहे.

विकास आणि पर्यावरण

  • पर्यावरणतज्ज्ञ माधव गाडगीळ यांनी आपल्या सह्याद्री घाट संवर्धनाबाबत सादर केलेल्या अहवालात पश्चिम घाटाच्या संरक्षणासाठी अनेक बाबी मांडल्या आहेत. त्याचवेळी विकास आणि पर्यावरणाचे संरक्षण या दोन परस्पर विरोधी गोष्टी असल्याचेही सांगितले आहे.
  • ज्यावेळी एखाद्या भागाचा विकास होत असतो त्यावेळी त्याठिकाणच्या पर्यावरणाला धक्का पोहचत असतो हे त्यांनी स्पष्टच केले आहे. त्याचप्रमाणे जेव्हा या भागाचा पर्यटन विकास होणार तेव्हा इथल्या पर्यावरणालाही धोका पोहचू शकतो.

पर्यावरणाचे काय नुकसान होईल

  • रस्त्यासाठी झाडे तोडली जाणार,
  • मातीचे उत्खनन होणार,
  • पाण्यामुळे माती वाहून जाणार,
  • मूळची जमीन पाणी जाऊन भुसभुशीत होणार
  • या भागातील तांबडी जमीन पाणी सोडून देते. त्यामुळे भूस्सखलनासारख्या घटना घडू शकतात.

नवीन महाबळेश्वरमध्ये कोणत्या तालुक्यातील किती गावेसातारा ३४, पाटण ९५, जावळी ४६ व महाबळेश्वर तालुक्यातील ६० गावांचा समावेश या प्रकल्पात केला आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरMahabaleshwar Hill Stationमहाबळेश्वर गिरीस्थानtourismपर्यटन