शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

कोयनेतील पाणीसाठा ९४ टीएमसीजवळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2021 04:41 IST

सातारा : जिल्ह्याच्या पश्चिम भागात तुरळक पाऊस होत असून, कोयना धरणात ९३.६६ टीएमसी इतका साठा झाला आहे, तर जिल्ह्यातील ...

सातारा : जिल्ह्याच्या पश्चिम भागात तुरळक पाऊस होत असून, कोयना धरणात ९३.६६ टीएमसी इतका साठा झाला आहे, तर जिल्ह्यातील इतर प्रमुख धरणांतील विसर्ग पूर्णपणे बंद करण्यात आलेला आहे. सध्या सर्वच धरणात ८५ टक्क्यांवर पाणीसाठा झालेला आहे.

जिल्ह्याच्या पश्चिम भागात महिन्यापूर्वी धुवाधार पाऊस झाला होता. कोयना, नवजा, महाबळेश्वर, तापोळा, बामणोली या भागात तर तुफान वृष्टी झाली. यामुळे शेतीचे नुकसान झाले. तसेच रस्ते, पूल वाहून गेले. या पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले, तर या अतिवृष्टीमुळे जिल्ह्याच्या पश्चिम भागातील प्रमुख धरणांत मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक झाली. कोयना धरणात तर एका दिवसात १६ टीएमसीवर पाण्याची आवक झाली. कोयना धरणाच्या इतिहासातील हा एक विक्रम ठरला, तर कण्हेर, उरमोडी, धोम, बलकवडी, तारळी यासारख्या धरणांतही मोठ्या प्रमाणात पाणी आले. परिणामी धरणांमधून मोठ्या प्रमाणात विसर्ग करण्यात आला व पाणीपातळी नियंत्रित ठेवण्यात आली.

सध्या पश्चिम भागात पाऊस तुरळक होत आहे. प्रमुख धरणांत येणाऱ्या पाण्याची आवक मंदावली आहे, तर कोयना धरणात तुरळक आवक होत आहे. त्यामुळे गुरुवारी सायंकाळपासूनच धरणाच्या पायथा वीजगृहातून होणारा २१०० क्युसेक पाण्याचा विसर्ग बंद करण्यात आला आहे, तर १५ दिवसांपूर्वीपासूनच धरणाचे दरवाजे बंद आहेत.

रविवारी सकाळपर्यंत कोयनेला जून महिन्यापासून ३५७१ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. नवजाला आतापर्यंत ४६३१ मिलिमीटर पाऊस पडला आहे. त्याचबरोबर महाबळेश्वरला यावर्षी आतापर्यंत ४८०३ मिलिमीटर पर्जन्यमान नोंद झालेले आहे.

............................................................................