शहरं
Join us  
Trending Stories
1
Palghar Rains: पालघरमध्ये आज पावसाचा रेड अलर्ट; जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी!
2
ढोंगी पाकिस्तान! ज्या सैनिकाला ओळखही दाखवायला तयार नव्हते, त्यालाच दिला शहीदाचा दर्जा; आता म्हणतात... 
3
Daily Horoscope: प्रमोशन आणि पैसा दोन्ही मिळण्याचा योग; वाचा आजचे राशीभविष्य
4
कर्मचाऱ्यांना पदोन्नतीसाठी नवी अट; डिजिटल कोर्स उत्तीर्ण होणे आवश्यक
5
महाराष्ट्रधर्म थांबलाच नाही, साखळी कधी तुटली नाही ! मुख्यमंत्री फडणवीस यांच्या ‘महाराष्ट्रधर्म’ विशेष पॉडकास्टचा प्रारंभ
6
Ashadhi Ekadashi 2025: आषाढीच्या दुसर्‍या दिवशी घेतात शिळ्या विठोबाचे दर्शन; कारण...
7
रेल्वे इंजिन घसरल्याने हार्बर मार्गावर खोळंबा; पनवेलला जाणाऱ्या लाेकल साडेचार तास ठप्प
8
भारतीय तरुणांना नशेत बुडविण्याचे कारस्थान
9
मी मराठीतूनच शिकलो, मातृभाषेतून शिकल्याने विषयांची समज पक्की होते; सरन्यायाधीश भूषण गवई
10
छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा ‘सीए’त टॉपर; सीए फायनलचा निकाल जाहीर, मुंबईचा मानव शाह देशात तिसरा
11
ठाकरेंच्या एकतेमुळे मविआची एकता धोक्यात? काँग्रेसचा बदलला सूर; वेगळ्या चुलीची शक्यता
12
मतदारयाद्या पुनरावलोकनाच्या काही नियमांत सूट; बिहार निवडणूक; आता बीएलओंवर जबाबदारी
13
दोन ठाकरेंच्या एकत्र येण्याचे असे झाले प्लॅनिंग..!
14
गिलनं करून दाखवलं! जिथं पिढ्यानं-पिढ्या पराभव पाहिला तिथं टीम इंडियानं पहिला विजय मिळवला, अन्...
15
"महाराष्ट्र दिल्लीसमोर झुकवू पाहणाऱ्यांच्या पोटात दुखणारच"; विजयी मेळाव्यावरील टीकेला आदित्य ठाकरेंचे प्रत्युत्तर
16
ICAI CA Toppers 2025: महाराष्ट्राचा राजन काबरा सीए फायनलमध्ये अव्वल; २२ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात मिळवलं यश
17
बहीण करतीये कॅन्सरचा सामना; बॉलिंग करताना तिचा चेहरा डोळ्यासमोर दिसायचा! आकाश दीप म्हणाला...
18
अशोक सराफ कला क्षेत्राचे कोहिनूर, अभिनयाचे चालते बोलते विद्यापीठ; एकनाथ शिंदे यांचे गौरवोद्गार
19
"...तर दुसऱ्याच दिवशी घर रिकामे करेन"; सुप्रीम कोर्टाच्या 'त्या' पत्राला माजी सरन्यायाधीशांनी दिले उत्तर
20
महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसची स्वबळाची तयारी? पवार-ठाकरेंना धक्का देणार राहुल गांधी?

पूरग्रस्तांच्या मदतीसाठी एनडीआरएफचे पथक सातारा जिल्ह्यात दाखल

By नितीन काळेल | Updated: July 2, 2024 18:21 IST

पश्चिम भागात पाऊस वाढला : ३० जणांचा समावेश; पावसाळ्यात कार्यरत राहणार 

सातारा : जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर वाढत चालल्याने नद्यांच्या पाणीपातळीत वाढ होणार आहे. त्यामुळे मदतीसाठी एनडीआरएफचे (राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल) ३० जणांचे पथक जिल्ह्यात दाखल झाले आहे. हे पथक संपूर्ण पावसाळ्यात कार्यरत असणार आहे. तसेच आपत्तीच्या काळात मदतही करणार आहे.जिल्ह्यात तीन वर्षांपूर्वी धुवाधार पाऊस झाला होता. यामुळे कोयना, कृष्णा, नीरा आदी नद्यांच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली होती. तर काही नद्यांच्या पाण्याने धोक्याची पातळी ओलांडली होती. पाणी पात्राबाहेर पडलेले. त्याचबरोबर पश्चिम भागात अनेक ठिकाणी दरडी कोसळून गावावर आल्या होत्या. यामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले. त्यामुळे जिल्हा प्रशासन पावसाळ्यापूर्वी विविध उपाययोजना करते. तसेच नागरिकांच्या जीविताचीही काळजी घेते. यासाठी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाचे पथक बोलवण्यात येते. यावर्षीही हे पथक आले आहे.सध्या पथक कऱ्हाडमध्ये आहे. पावसाळ्याच्या काळात पथक कार्यरत राहणार आहे. तसेच पूरप्रवण आणि नागरिकांना धोका निर्माण होईल अशा ठिकाणी मदतीसाठी जाणार आहे. त्यातच कऱ्हाड येथे कोयना आणि कृष्णा नदीचा संगम होतो. त्यामुळे अतिवृष्टीत कृष्णा नदीला पूर येतो. अशा काळात या पथकाची मोठी मदत होणार आहे.जिल्हा प्रशासनाने नदीकाठची संभाव्य पूरप्रवण गावे निश्चित केली आहेत. यामध्ये सर्वाधिक गावे ही कऱ्हाड तालुक्यात ५५ आहेत. तर जिल्ह्यात १७२ गावांना पुराचा धोका राहतो. या गावांवर प्रशासनाचे लक्ष राहणार आहे. तसेच राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलही पूरस्थितीच्या काळात दक्ष असणार आहे.

पथकात दोन पोलिस निरीक्षक दर्जाचे अधिकारी..कऱ्हाडमध्ये दाखल झालेल्या राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या पथकात ३० जणांचा समावेश आहे. ही तुकडी पुणे येथून आलेली आहे. त्यांच्याबरोबर पूरस्थितीत मदत करण्यासाठी लागणारे साहित्यही आहे. या पथकात पोलिस निरीक्षक दर्जाचे दोन अधिकारी आहेत. टीम कमांडर सुजीत पासवान, निरीक्षक राजेंद्र कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पथक असेल. दरम्यान, जिल्हा प्रशासनाने मागील महिन्यातच नदीकाठच्या रहिवाशांसाठी पूरस्थितीतील धोका टाळण्यासाठी प्रशिक्षण घेतले होते. यामध्ये पोलिस, होमगार्ड आदी सहभागी झालेले.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरRainपाऊसfloodपूर