शहरं
Join us  
Trending Stories
1
इम्रान खान यांचे निधन? पाकिस्तान सरकारने दिली माहिती, मंत्र्याने तर यादीच वाचून दाखवली
2
शेतकरी कर्जवसुलीस एक वर्षाची स्थगिती; अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना राज्य सरकारचा दिलासा
3
Mumbai Video: वासनांध नजर, अश्लील हातवारे; मुंबईतील रेल्वे स्टेशनवर तरुणीने लगावल्या कानशि‍लात, व्हिडीओ व्हायरल
4
आईच्या नावे पोस्टाच्या 'या' स्कीममध्ये महिन्याला गुंतवा ₹४०००; मॅच्युरिटीवर मिळेल लाखोंचा फंड, पैसाही सुरक्षित
5
चार-पाच लोकांमध्ये झाली होती 'सीक्रेट डील'; शिवकुमार यांचा माघार घेण्यास नकार, काँग्रेस काय करणार?
6
पुण्यात तीन लाख, तर पिंपरी-चिंचवडमध्ये ९२ हजार बोगस मतदार; उद्धवसेनेचा आरोप
7
धर्मेंद्र यांची संपत्ती नको, फक्त 'ती' एक गोष्ट हवी; लेक अहाना देओलने व्यक्त केलेली इच्छा
8
Share Market Today: शेअर बाजारात जोरदार तेजी; Nifty वर्षभरानंतर नव्या उच्चांकाजवळ, बँक निफ्टीतही विक्रमी तेजी
9
आगीच्या ज्वाळा, धुराचे लोट, ४४ जणांचा मृत्यू... हाँगकाँगमध्ये गगनचुंबी इमारतीला आग (PHOTOS)
10
IND vs SA: गुवाहाटी कसोटी पराभवामुळे चाहते संतापले, गंभीरच्या तोंडावरच त्याला म्हणाले...
11
हर हर गंगे! 'तेरे इश्क मे'च्या प्रमोशनसाठी वाराणसीत पोहोचले धनुष-क्रिती; गंगा आरतीही केली
12
आता पोलिसही सुरक्षित नाहीत, बनावट व्हिजिलेंस अधिकारी करत होते ट्रॅफिट पोलिसांकडून वसुली, अखेरीस...  
13
नगरांची निवडणूक अन् वाजू लागले वादाचे नगारे; एकनाथ शिंदेंवर देवेंद्र फडणवीसांचा पलटवार
14
अमेरिकेत व्हाईट हाऊसजवळ गोळीबार झाल्याने खळबळ, नॅशनल गार्डचे दोन जवान जखमी, संशयित अटकेत  
15
आजचे राशीभविष्य, २७ नोव्हेंबर २०२५: व्यापार, धनलाभ आणि आरोग्य! आज तुमच्या राशीत काय आहे?
16
मविआची चार लाख मते कुजवण्याची रणनीती; विरोधकांना संधीच न देण्याची भाजपा-शिंदेसेनेची खेळी
17
राज्यात उदंड झाली फार्मसी कॉलेज, १० महाविद्यालयांमध्ये शून्य प्रवेश; रिक्त जागांमधील वाढ चिंताजनक
18
ज्येष्ठ शिवसैनिकांची फौज उद्धवसेनेसाठी मैदानात; निवडणुकीसाठी मतदार यादीचीही पडताळणी
19
Video: आमदार नीलेश राणेंनी केलं 'स्टिंग ऑपरेशन'; भाजपा पदाधिकाऱ्याच्या घरात पैशांची बॅग
20
‘ऑपरेशन सिंदूर’मधील शहीद जवानाच्या आईची हायकोर्टात याचिका; "अग्निवीर योजना भेदभावपूर्ण अन्..."
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रवादीत ठेकेदारी संस्कृती !

By admin | Updated: October 12, 2014 00:46 IST

पृथ्वीराज चव्हाण : कोरेगाव, वाई येथील सभांमध्ये घणाघाती हल्ला

कोरेगाव / वाई : ‘राज्याचे बजेट वार्षिक सात हजार कोटींचे असताना राष्ट्रवादीने तब्बल ८० हजार कोटींचे सिंंचनाचे प्रकल्प सुरू केले. योग्य नियोजन नाही, पुनर्वसन आणि वन विभागाच्या जमिनीचे प्रश्न जैसे थे ठेवत, केवळ टेंडरसंस्कृती आणत ठेकेदारी जोपासली. दहा वर्षांत ७२ हजार कोटी सिंंचनावर राष्ट्रवादीने खर्च केले; मात्र एक टक्कादेखील सिंंचन वाढले नाही. सत्तेसाठी वाट्टेल ते करणाऱ्या राष्ट्रवादीला मतपेटीतून जागा दाखवून द्या,’ असे आवाहन माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले. कोरेगावात काँग्रेसचे उमेदवार अ‍ॅड. विजयराव कणसे, तर वाईत मदन भोसले यांच्या प्रचारार्थ आयोजित संभामध्ये त्यांनी राष्ट्रवादी आणि भाजपवर घणाघाती हल्ला चढविला. दरम्यान, वाई येथील सभेत चव्हाण यांनी भाजपवर टीका केली. भाजपला महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण असणार, हे सांगता येत नाही. ते पंतप्रधान नरेंद्र मोदींचा चेहरा पुढे करून ही निवडणूक लढवत आहेत. शंभर दिवसांत परदेशातील काळा पैसा आणण्याची घोषणा करणाऱ्यांनी शंभर रुपये तरी आणले आहेत का, असा प्रश्नही त्यांनी केला.कोरेगावातील सभेत ते म्हणाले, ‘एकत्रित सरकार चालवत असताना राष्ट्रवादीने सरकारचा एकाएकी पाठिंंबा काढून घेतला. आम्हीदेखील स्वाभिमानी असल्याने तातडीने मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. राज्यात १५ दिवसांसाठी राष्ट्रपती राजवट आणण्याचे पाप राष्ट्रवादीने केले असून, त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे राज्याची सत्ता दिली आहे. एकप्रकारे भाजपला बळकट करण्याचे काम छुप्या आघाडीद्वारे राष्ट्रवादी करीत आहे. प्रादेशिक पक्ष हे सत्तेसाठी वाट्टेल ते करण्यास तयार असतात. केंद्रात आणि राज्यात आघाडीद्वारे सत्ता मिळविली.आता भाजपची केंद्रात सत्ता असल्याने तेथे काय मिळते का? हे पाहण्यासाठी राष्ट्रवादीने हा खाटाटोप केला.’ ‘आज राज्यात सर्वच प्रमुख पक्ष स्वबळावर लढत आहेत. प्रत्येकाला आता आपली ताकद १५ तारखेला कळणार आहे. शिवछत्रपतींचा वारसा घेऊन काम करीत असलेल्या काँग्रेसने महाराष्ट्राला वेगळी दिशा दिली आहे. हा पक्ष फुले, शाहू, आंबेडकर यांच्या विचाराने कार्यरत आहे. राष्ट्रवादीचा जन्म ज्यासाठी झाला होता, तो विषय आता संपला आहे. शरद पवार यांचे पुतणे अजित पवार यांना मुख्यमंत्रिपदाची स्वप्ने पडू लागली आहेत. त्यांनी आघाडीबाबत चर्चा सुरू असताना अचानकपणे तीस जागा वाढवून मागितल्या, आम्ही दहा जागा देण्यास तयारी दर्शविली होती; मात्र त्यांनी अचानकपणे अडीच वर्षे मुख्यमंत्रिपद ही मागणी केली, ती मान्य होणार नसल्याचे आम्ही स्पष्टपणे सांगताच त्यांनी आघाडी तोडली,’ असेही चव्हाण यांनी निदर्शनास आणून दिले. ‘कोरेगावात पाच वर्षे बाहेरच्या उमेदवाराचा पाहुणचार केला, त्यांना आता जाऊ द्या,’ असे म्हणत पृथ्वीराज चव्हाण यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार शशिकांत शिंंदे यांचे नाव न घेता टीका केली. दरम्यान, दोन्ही सभांना आ. आनंदराव पाटील, सुरेश कुऱ्हाडे, भीमराव पाटील, किरण बर्गे, अविनाश फाळके, शंकरराव गाढवे, नारायण पवार, बापूसाहेब शिंदे, गुरुदेव बरदाडे, नीलिमा भोसले, लक्ष्मीबाई कऱ्हाडकर आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी) (संबंधित वृत्त आतील पानावर)