शहरं
Join us  
Trending Stories
1
किश्तवाड येथे धरालीसारखी दुर्घटना, ढगफुटी होऊन आला पूर, १० जणांचा मृत्यू
2
'अमेरिकाच नाही, संपूर्ण जग तुमचे ऐकेल', गडकरींनी भारत विश्वगुरु बनण्याचा मास्टर प्लॅन सांगितला
3
मतदार यादीतून काढलेल्या ६५ लाख लोकांची नावे सार्वजनिक करा; SC चे निवडणूक आयोगाला निर्देश
4
ट्रम्प यांनी डेड इकॉनॉमी म्हटलेलं, आता अमेरिकेच्याच एजन्सीनं भारताचं रेटिंग केलं अपग्रेड
5
किश्तवाड ढगफुटी: फारुख अब्दुल्ला म्हणाले, "संपूर्ण देशाने देवाकडे प्रार्थना करावी, बचाव कार्यही कठीण!"
6
'लव्ह अँड वॉर', 'अल्फा'च नाही तर आलिया भट आणखी एका सिनेमाच्या तयारित, वाचा सविस्तर
7
नाशिकच्या दिंडोरी येथे जोरदार हादरा, २५ किमी परिसरात मोठा आवाज; नागरिक घाबरले, नेमकं काय घडले?
8
"मूल जन्माला घाला आणि ६ लाख रुपये मिळवा"; चीनला टक्कर देत 'या' देशाने केली मोठी घोषणा!
9
इथेनॉलनंतर आता डिझेलमध्ये बायोफ्युएल मिसळणार; गडकरींनी वादाच्या पार्श्वभूमीवर केली घोषणा
10
Independence Day 2025: काय योगायोग...! १९४७ ला तोच वार होता, जो उद्या १५ ऑगस्टला...; ७८ वर्षांनी...
11
२ मुलांना घेऊन आईनं मारली नदीत उडी; पतीच्या निधनानंतर दीराशी केले होते लग्न, मात्र...
12
तो कोहलीमुळं खचला! खरंच हेच असेल का पाकचा 'बब्बर शेर' प्रत्येक मॅचमध्ये 'ढेर' होण्यामागचं कारण?
13
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गुडन्यूज! ८वा वेतन आयोग कधी लागू होणार? सरकारचा मोठा खुलासा!
14
इन्स्टाग्रामवर १.२ मिलियन फॉलोअर्स, मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीनं केली अटक; कोण आहे 'ही' मॉडेल?
15
बस बनवणाऱ्या कंपनीला ₹५९४ कोटींचा नफा; शेअर खरेदीसाठी उड्या, ₹१२१ वर आला भाव
16
८८१ किमी केवळ १२ तासांत; ‘ही’ देशातील सर्वांत लांब अंतराची वंदे भारत, किती स्पीडने जाते?
17
२० वर्षे पगार दिला, पण नोकरीवर काही काम करू दिले नाही! नाराज महिला कंपनीविरोधात गेली कोर्टात, म्हणाली...
18
नीरज चोप्राची पत्नी हिमानी मोरचा मोठा निर्णय! टेनिसला कायमचा रामराम, 'या' व्यवसायात घेतली उडी
19
कोणत्या धर्माचं पालन करते सचिन तेंडुलकरची होणारी सून सानिया चांडोक? किती शिकलीये? जाणून घ्या
20
कबुतरखाना वाद: मध्यस्थीचा प्रस्ताव देणाऱ्या जैन मुनींना राज ठाकरेंचं थेट उत्तर; म्हणाले...

राष्ट्रवादीत ठेकेदारी संस्कृती !

By admin | Updated: October 12, 2014 00:46 IST

पृथ्वीराज चव्हाण : कोरेगाव, वाई येथील सभांमध्ये घणाघाती हल्ला

कोरेगाव / वाई : ‘राज्याचे बजेट वार्षिक सात हजार कोटींचे असताना राष्ट्रवादीने तब्बल ८० हजार कोटींचे सिंंचनाचे प्रकल्प सुरू केले. योग्य नियोजन नाही, पुनर्वसन आणि वन विभागाच्या जमिनीचे प्रश्न जैसे थे ठेवत, केवळ टेंडरसंस्कृती आणत ठेकेदारी जोपासली. दहा वर्षांत ७२ हजार कोटी सिंंचनावर राष्ट्रवादीने खर्च केले; मात्र एक टक्कादेखील सिंंचन वाढले नाही. सत्तेसाठी वाट्टेल ते करणाऱ्या राष्ट्रवादीला मतपेटीतून जागा दाखवून द्या,’ असे आवाहन माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले. कोरेगावात काँग्रेसचे उमेदवार अ‍ॅड. विजयराव कणसे, तर वाईत मदन भोसले यांच्या प्रचारार्थ आयोजित संभामध्ये त्यांनी राष्ट्रवादी आणि भाजपवर घणाघाती हल्ला चढविला. दरम्यान, वाई येथील सभेत चव्हाण यांनी भाजपवर टीका केली. भाजपला महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण असणार, हे सांगता येत नाही. ते पंतप्रधान नरेंद्र मोदींचा चेहरा पुढे करून ही निवडणूक लढवत आहेत. शंभर दिवसांत परदेशातील काळा पैसा आणण्याची घोषणा करणाऱ्यांनी शंभर रुपये तरी आणले आहेत का, असा प्रश्नही त्यांनी केला.कोरेगावातील सभेत ते म्हणाले, ‘एकत्रित सरकार चालवत असताना राष्ट्रवादीने सरकारचा एकाएकी पाठिंंबा काढून घेतला. आम्हीदेखील स्वाभिमानी असल्याने तातडीने मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. राज्यात १५ दिवसांसाठी राष्ट्रपती राजवट आणण्याचे पाप राष्ट्रवादीने केले असून, त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे राज्याची सत्ता दिली आहे. एकप्रकारे भाजपला बळकट करण्याचे काम छुप्या आघाडीद्वारे राष्ट्रवादी करीत आहे. प्रादेशिक पक्ष हे सत्तेसाठी वाट्टेल ते करण्यास तयार असतात. केंद्रात आणि राज्यात आघाडीद्वारे सत्ता मिळविली.आता भाजपची केंद्रात सत्ता असल्याने तेथे काय मिळते का? हे पाहण्यासाठी राष्ट्रवादीने हा खाटाटोप केला.’ ‘आज राज्यात सर्वच प्रमुख पक्ष स्वबळावर लढत आहेत. प्रत्येकाला आता आपली ताकद १५ तारखेला कळणार आहे. शिवछत्रपतींचा वारसा घेऊन काम करीत असलेल्या काँग्रेसने महाराष्ट्राला वेगळी दिशा दिली आहे. हा पक्ष फुले, शाहू, आंबेडकर यांच्या विचाराने कार्यरत आहे. राष्ट्रवादीचा जन्म ज्यासाठी झाला होता, तो विषय आता संपला आहे. शरद पवार यांचे पुतणे अजित पवार यांना मुख्यमंत्रिपदाची स्वप्ने पडू लागली आहेत. त्यांनी आघाडीबाबत चर्चा सुरू असताना अचानकपणे तीस जागा वाढवून मागितल्या, आम्ही दहा जागा देण्यास तयारी दर्शविली होती; मात्र त्यांनी अचानकपणे अडीच वर्षे मुख्यमंत्रिपद ही मागणी केली, ती मान्य होणार नसल्याचे आम्ही स्पष्टपणे सांगताच त्यांनी आघाडी तोडली,’ असेही चव्हाण यांनी निदर्शनास आणून दिले. ‘कोरेगावात पाच वर्षे बाहेरच्या उमेदवाराचा पाहुणचार केला, त्यांना आता जाऊ द्या,’ असे म्हणत पृथ्वीराज चव्हाण यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार शशिकांत शिंंदे यांचे नाव न घेता टीका केली. दरम्यान, दोन्ही सभांना आ. आनंदराव पाटील, सुरेश कुऱ्हाडे, भीमराव पाटील, किरण बर्गे, अविनाश फाळके, शंकरराव गाढवे, नारायण पवार, बापूसाहेब शिंदे, गुरुदेव बरदाडे, नीलिमा भोसले, लक्ष्मीबाई कऱ्हाडकर आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी) (संबंधित वृत्त आतील पानावर)