शहरं
Join us  
Trending Stories
1
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
2
Israel Iran War : "युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
3
तुकोबांच्या पालखीचे आज प्रस्थान, कोणत्या ठिकाणी कधी पोहोचणार? A टू Z माहिती
4
किती आहे तुमचा Cibil Score, लोन मिळवून देऊ शकतो का? समजून घ्या निरनिराळ्या रेंजचा अर्थ
5
अमेरिकेने पाठवली ३० लढाऊ विमाने, ट्रम्प यांनी इराणला दिला बिनशर्त शरणागतीचा प्रस्ताव, खामेनी खवळले, म्हणाले...
6
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पीएम किसानचा २० वा हप्ता 'या' तारखेला येणार? असे तपासा तुमचे नाव!
7
अमेरिकेनं टॅरिफ लावावा किंवा नाही, चीनवर फरक नाही.., जगासमोर उभं केलं हे मोठं संकट; भारताचं काय होणार?
8
ठाकरेंचा सुपुत्र बॉलिवूड गाजवणार, 'निशांची' सिनेमाचं पोस्टर रिलीज
9
AI Pandharpur Wari: आता पंढरीच्या वारीतही 'एआय दिंडी' पाहायला मिळणार!
10
Team India, IND vs ENG: इंग्लंडविरूद्धच्या पहिल्या कसोटीत 'या' तिघांचा Playing XI मधून होणार पत्ता कट, कॅप्टन गिल मोठा निर्णय घेणार
11
जयदीप अहलावतने दोन आठवड्यामध्ये अंधेरीत खरेदी केलं आणखी एक घर, किंमत आहे कोटींच्या घरात
12
Maharashtra Cabinet: आणीबाणीतील बंदीवानांचे मानधन दुप्पट
13
"हवे ते निर्बंध लादून दहशतवाद्यांना पाठिंबा देणाऱ्या देशांना बक्षीस देता, दुटप्पीपणा चालणार नाही"; PM मोदींचा इशारा
14
Air India Plane Crash: 'टेकऑफसाठी जास्त वेळ अन् ओव्हरलोडिंग', माजी वैमानिकाने दोन मुद्द्यांवर ठेवलं बोट
15
अनेक तर्कवितर्कांनंतर अखेर पंतप्रधान मोदी आणि कॅनडाच्या पंतप्रधानांची भेट, चर्चेत झाला मोठा निर्णय   
16
२५,३०,३५ किती वर्षांचे आहात तुम्ही; रिटायरमेंटवर ५ कोटी हवे असतील तर केव्हापासून, किती करावी लागेल गुंतवणूक?
17
Sant Tukaram Maharaj palkhi 2025: 'ज्ञानोबा तुकाराम'चा जयघोष; तुकोबांच्या पालखी प्रस्थानासाठी देहूनगरी सज्ज
18
सलग दुसऱ्या दिवशी शेअर बाजार 'धडाम'; Sensex २६९ अंकांच्या घसरणीसह उघडला, 'या' वृत्तानं दिलं टेन्शन
19
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
20
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!

राष्ट्रवादीला १४४ जागा हव्याच!

By admin | Updated: July 19, 2014 23:24 IST

निर्धार मेळावा : अजित पवार, सुनील तटकरे यांची काँग्रेसवर खरपूस टीका

सातारा : लोकसभा निवडणुकीत भाजपच्या त्सुनामी लाटेत आम्ही महाराष्ट्रात मित्रपक्ष काँग्रेसपेक्षा वरचढ ठरलो असल्याचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी सातारा येथे निर्धार मेळाव्यात ठणकावून सांगितले, तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी झाली तर आम्ही १४४ जागांवर ठाम राहणार असल्याचे स्पष्ट केले.सातारा येथे आज, शनिवारी राष्ट्रवादी काँग्रेसचा निर्धार मेळावा झाला. मेळाव्यात तटकरे आणि पवार यांच्याबरोबरच जलसंपदामंत्री शशिकांत शिंदे, राज्य नियोजन आयोगाचे कार्याध्यक्ष रामराजे नाईक-निंबाळकर यांनीही काँग्रेसवर खरपूस टीका केली.लोकसभा निवडणुकांचे विश्लेषण करतच तटकरे यांनी विधानसभेला कार्यकर्त्यांनी सतर्क राहून काम करण्याचे आवाहन केले. ते म्हणाले, ‘गुजरात विकासाचे मॉडेल चुकीच्या पद्धतीने मांडून जनतेची दिशाभूल केली. लोकांच्या मनात संभ्रम निर्माण केला. त्यांनी ‘अच्छे दिन’चा नारा दिला, मात्र गेल्या दोन महिन्यांतील त्यांच्या कामाचा आढावा लक्षात घेता ‘अच्छे दिन’ कुठे गेले, याचा शोध घ्यावा लागतो.’निर्धार मेळाव्यात प्रमुख मान्यवरांनी काँग्रेसकडून खच्चीकरण होत असल्याची तक्रार केली. त्याचा संदर्भ देत तटकरे म्हणाले, ‘राष्ट्रवादी काँग्रेस आमचा एक नंबरचा शत्रू असल्याचे जर काँग्रेसचे नेते म्हणत असतील, तर आम्हालाही त्याचा विचार करावा लागेल. सातारा जिल्ह्यात आमच्या कार्यकर्त्यांची पिळवणूक होत असेल तर आम्ही खपवून घेणार नाही. आपल्याला स्वबळावर राष्ट्रवादीचे सरकार आणावयाचे आहे. त्या अनुषंगाने आपण साऱ्यांनी मिळून सत्ता स्थापनेच्या निर्धाराने पावले टाकूया. आपल्याला सोशल मीडियावर भर द्यावा लागणार असून, त्याची सुरुवात साताऱ्यातून करूया, असे आवाहनही तटकरेंनी केले. (प्रतिनिधी)आम्ही व्यवहाराने जागा मागतोयआगामी विधानसभेसाठी आम्ही १४४ जागांवर ठाम असल्याचा पुनरुच्चार करतच अजित पवार यांनी काँग्रेसला सुनावले. ते म्हणाले, ‘लोकसभेला आमच्या चार जागा असल्या तरी तुमच्यापेक्षा दुप्पट आहेत. आम्ही व्यवहाराने जागा मागतोय, आमच्याही कार्यकर्त्यांनी आता किती दिवस फक्त कार्यकर्ता म्हणून काम करायचे. त्यांनाही आमदार म्हणून मिरवू द्या.’‘कऱ्हाड दक्षिण’चा विषय काँग्रेसचा‘कऱ्हाड दक्षिण’ विधानसभा मतदारसंघातून मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण लढणार असल्याचे त्यांच्या निदर्शनास आणून देताच त्यांनी अजून आमच्यात जागा वाटपाची चर्चा झाली नसल्याचे स्पष्ट केले. राष्ट्रवादीच्या वाट्याला आलेल्या मतदारसंघात उमेदवार कोण असेल, हा निर्णय आमचा आहे. ‘कऱ्हाड दक्षिण’ची जागा काँग्रेसची आहे. तेथे काँग्रेसचा उमेदवार कोण असावा, हा त्यांचा निर्णय असल्याचे सांगत त्यांनी यावर बोलणे टाळले.