शहरं
Join us  
Trending Stories
1
सतर्क राहा: कोकण, पश्चिम महाराष्ट्रात १८-१९ ऑगस्टला मुसळधार पाऊस; कुठे-कुठे 'रेड अलर्ट'?
2
अहिल्यानगरमध्ये फर्निचरच्या दुकानात अग्नितांडव; अख्खं कुटुंब संपलं, दोन चिमुकल्यांसह पाच जणांचा मृत्यू
3
Apple नं टम्प आणि चीनला दाखवला ठेंगा; भारतात आणखी एका प्रकल्पातून सुरू केलं iPhone चं उत्पादन
4
शेतकऱ्यांवर चिनी संकट! महत्त्वाच्या खनिजांवरील निर्यात कमी, रोखला खतांचाही पुरवठा
5
Stock Market Today: शेअर बाजारात तुफान तेजी, ७१८ अंकांच्या तेजीसह बाजार उघडला; Midcap आणि बँकिंग शेअर्समध्ये खरेदी
6
दुचाकीला धडक देऊन ट्रक ड्रायव्हर पळाला, पण AIने केली कमाल, पोलिसांनी ३६ तासांत पकडला
7
मुंबईची वर्षभराची तहान भागणार, मुसळधार पावसाने सातही जलाशये जवळपास फुल्ल
8
बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीआधी मतदारांच्या घरी पोहोचले पैसे; महायुतीच्या पॅनलवर मनसेचा गंभीर आरोप
9
'जय मल्हार'मध्ये खंडोबाची भूमिका साकारली, आता जेजुरीच्या पायथ्याशी देवदत्त नागे बांधतोय घर
10
४२ वर्षांच्या लढ्यानंतर कोल्हापूर सर्किट बेंच झाले आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या: सरन्यायाधीश
11
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळेल ₹१४,६६३ चं फिक्स्ड व्याज; पाहा कोणती आहे स्कीम
12
बेस्ट पतपेढी कोणाच्या ताब्यात? आज मतदान, उद्या फैसला! ठाकरे बंधूंच्या युतीची पहिली कसोटी
13
RTIच्या सराईतांचा खेळ आता खल्लास! १० हजार अपील फेटाळले; राज्य माहिती आयोगाचा चाप
14
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
15
पुन्हा निळ्या ड्रमाची दहशत, ड्रममध्ये सापडला तरुणाचा मृतदेह, पत्नी आणि तीन मुले बेपत्ता  
16
PF मधून १, २ की ३, किती वेळा काढू शकता पैसे? सतत काढण्यापूर्वी पाहा हा महत्त्वाचा नियम
17
‘कबुतर आ आ...’ कधी करावे? दाणे टाकण्यासंदर्भात पालिकेने मागवल्या सूचना; ई-मेल आयडीही दिला
18
मुंबईत इमारतीचा भाग कोसळला, तिघे जखमी; मुसळधार पावसात बचावकार्य सुरु
19
दहीहंडीच्या दिवशी वाहतूक पोलिसांनी फोडली कोट्यवधीच्या ‘दंडाची हंडी’; मुंबईत नियमांचे उल्लंघन
20
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल

राष्ट्रवादीला १४४ जागा हव्याच!

By admin | Updated: July 19, 2014 23:24 IST

निर्धार मेळावा : अजित पवार, सुनील तटकरे यांची काँग्रेसवर खरपूस टीका

सातारा : लोकसभा निवडणुकीत भाजपच्या त्सुनामी लाटेत आम्ही महाराष्ट्रात मित्रपक्ष काँग्रेसपेक्षा वरचढ ठरलो असल्याचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी सातारा येथे निर्धार मेळाव्यात ठणकावून सांगितले, तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी झाली तर आम्ही १४४ जागांवर ठाम राहणार असल्याचे स्पष्ट केले.सातारा येथे आज, शनिवारी राष्ट्रवादी काँग्रेसचा निर्धार मेळावा झाला. मेळाव्यात तटकरे आणि पवार यांच्याबरोबरच जलसंपदामंत्री शशिकांत शिंदे, राज्य नियोजन आयोगाचे कार्याध्यक्ष रामराजे नाईक-निंबाळकर यांनीही काँग्रेसवर खरपूस टीका केली.लोकसभा निवडणुकांचे विश्लेषण करतच तटकरे यांनी विधानसभेला कार्यकर्त्यांनी सतर्क राहून काम करण्याचे आवाहन केले. ते म्हणाले, ‘गुजरात विकासाचे मॉडेल चुकीच्या पद्धतीने मांडून जनतेची दिशाभूल केली. लोकांच्या मनात संभ्रम निर्माण केला. त्यांनी ‘अच्छे दिन’चा नारा दिला, मात्र गेल्या दोन महिन्यांतील त्यांच्या कामाचा आढावा लक्षात घेता ‘अच्छे दिन’ कुठे गेले, याचा शोध घ्यावा लागतो.’निर्धार मेळाव्यात प्रमुख मान्यवरांनी काँग्रेसकडून खच्चीकरण होत असल्याची तक्रार केली. त्याचा संदर्भ देत तटकरे म्हणाले, ‘राष्ट्रवादी काँग्रेस आमचा एक नंबरचा शत्रू असल्याचे जर काँग्रेसचे नेते म्हणत असतील, तर आम्हालाही त्याचा विचार करावा लागेल. सातारा जिल्ह्यात आमच्या कार्यकर्त्यांची पिळवणूक होत असेल तर आम्ही खपवून घेणार नाही. आपल्याला स्वबळावर राष्ट्रवादीचे सरकार आणावयाचे आहे. त्या अनुषंगाने आपण साऱ्यांनी मिळून सत्ता स्थापनेच्या निर्धाराने पावले टाकूया. आपल्याला सोशल मीडियावर भर द्यावा लागणार असून, त्याची सुरुवात साताऱ्यातून करूया, असे आवाहनही तटकरेंनी केले. (प्रतिनिधी)आम्ही व्यवहाराने जागा मागतोयआगामी विधानसभेसाठी आम्ही १४४ जागांवर ठाम असल्याचा पुनरुच्चार करतच अजित पवार यांनी काँग्रेसला सुनावले. ते म्हणाले, ‘लोकसभेला आमच्या चार जागा असल्या तरी तुमच्यापेक्षा दुप्पट आहेत. आम्ही व्यवहाराने जागा मागतोय, आमच्याही कार्यकर्त्यांनी आता किती दिवस फक्त कार्यकर्ता म्हणून काम करायचे. त्यांनाही आमदार म्हणून मिरवू द्या.’‘कऱ्हाड दक्षिण’चा विषय काँग्रेसचा‘कऱ्हाड दक्षिण’ विधानसभा मतदारसंघातून मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण लढणार असल्याचे त्यांच्या निदर्शनास आणून देताच त्यांनी अजून आमच्यात जागा वाटपाची चर्चा झाली नसल्याचे स्पष्ट केले. राष्ट्रवादीच्या वाट्याला आलेल्या मतदारसंघात उमेदवार कोण असेल, हा निर्णय आमचा आहे. ‘कऱ्हाड दक्षिण’ची जागा काँग्रेसची आहे. तेथे काँग्रेसचा उमेदवार कोण असावा, हा त्यांचा निर्णय असल्याचे सांगत त्यांनी यावर बोलणे टाळले.