शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; दहा वाजता मतमोजणीस होणार सुरुवात
2
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
3
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
6
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
7
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
8
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
9
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
10
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
11
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
12
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
13
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
14
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
15
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
16
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
17
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
18
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
19
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
20
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
Daily Top 2Weekly Top 5

‘एनसीइआरटी'ने दहावी अभ्यासक्रमातून उत्क्रांतीचा विज्ञान सांगणारा भाग वगळला, अंनिस राबवणार प्रबोधन अभियान

By नितीन काळेल | Updated: May 3, 2023 19:30 IST

सातारा : ‘एनसीइआरटीने दहावी अभ्यासक्रमातून उत्क्रांतीचा विज्ञान सांगणारा भाग वगळला आहे. त्यामुळे महाराष्ट्र ‘अंनिस’ याचा निषेध करत आहे. त्याचबरोबर ...

सातारा : ‘एनसीइआरटीने दहावी अभ्यासक्रमातून उत्क्रांतीचा विज्ञान सांगणारा भाग वगळला आहे. त्यामुळे महाराष्ट्र ‘अंनिस’ याचा निषेध करत आहे. त्याचबरोबर याचा निषेध कृतीतून व्यक्त करण्यासाठी ‘अंनिस’ ‘चला उत्क्रांती समजून घेऊया’ हे अभियान राबविणार आहे,’ अशी माहिती डाॅ. हमीद दाभोलकर यांनी दिली.याबाबत महाराष्ट्र ‘अंनिस’च्या वतीने डाॅ. हमीद दाभोलकर, प्रशांत पोतदार आणि वंदना माने यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे माहिती दिली आहे.यामध्ये म्हटले आहे की, एनसीइआरटीने दहावीच्या अभ्यासक्रमातून उक्रांतीचा विज्ञान सांगणारा भाग वगळल्याची माहिती समोर आली आहे. अनुवांशिकता आणि उत्क्रांती विषयी दहावीच्या अभ्यासक्रमात असलेला भाग वगळून त्याजागी केवळ अनुवांशिकता एवढाच भाग ठेवलेला आहे. अभ्यासक्रमातून उत्क्रांतीचे विज्ञान वगळण्याचा अंनिस निषेध करत आहे. कारण, पृथ्वीवर जीवसृष्टीची उत्पती कशी झाली याची शास्त्रीय मांडणी उत्क्रांतीच्या सिद्धांताद्वारे केली जाते.टप्प्याटप्प्याने एक पेशीय प्राणी त्यानंतर बहुपेशीय प्राणी, मानवाचे आधीच्या टप्प्यावरील माकड आणि सर्वात शेवटी मानव अशा टप्प्यांमधून मानवी उत्क्रांती कशी झाली यांची शास्त्रीय माहिती यामध्ये दिली जाते. पृथ्वीवर जीवसृष्टी निर्माण होण्यामागे कोणतीही विशिष्ट शक्ती नाही. उत्क्रांतीच्या प्रक्रियेतून ती झाली आहे. ही माहिती शालेय वयातील मुलांना पहिल्यांदा उत्क्रांतीच्या सिद्धांतातून मिळते.

मानवी जीवनावर प्रभाव टाकणाऱ्या अनेक अंधश्रद्धाची निर्मिती ही मानवी जीवनाचा उगम कसा झाला याची योग्य माहिती नसल्याने होतो. त्यामुळे उत्क्रांतीचा सिद्धांत शालेय अभ्यासक्रमातून शिकवल्याने विद्यार्थ्यांची मानवी जीवनाच्या उत्पत्तीमागे असलेल्या विज्ञानवादी भूमिकेशी तोंड ओळख होते. प्रत्यक्षात सहावी, सातवीच्या विद्यार्थ्याला याविषयी प्रश्न पडू लागतात. त्यामुळे तेव्हापासून टप्प्याटप्प्याने याविषयी माहिती शालेय अभ्यासक्रमातून येणे आवश्यक आहे. उत्क्रांतीचा सिद्धांत शालेय पुस्तकांमधून वगळल्यामुळे मुलांमध्ये विज्ञानवादी मानसिकता निर्माण होण्यात अडथळा निर्माण होणार आहे.भारतातील आणि परदेशातील अनेक विद्यापीठांमध्ये उत्क्रांती सिद्धांत जीव शास्त्रातील मुलभूत सिद्धांत म्हणून शिकवला जातो. उत्क्रांतीविषयी विशेष कोर्सही शिकवले जातात. या पार्श्वभूमीवर उत्क्रांतीचा सिद्धांत दहावीच्या अभ्यासक्रमातून वगळल्यामुळे दहावीनंतर विज्ञान शाखा घेणार नाहीत. त्या विद्याऱ्थांना उत्क्रांतीच्या सिद्धांताची माहिती मिळणार नाही. देशभरतील १८०० वैज्ञानिकांनी या गोष्टीला विरोध नोंदवला आहे. त्याला महाराष्ट्र अंनिस पाठींबा देत आहे, असेही या पत्रकात स्पष्ट केले आहे. या पत्रकावर अंनिस पदाधिकारी भगवान रणदिवे, डॉ. दीपक माने, हौसेराव धुमाळ, शंकर कणसे,, विलास भांदिर्गे, कुमार मंडपे आणि प्रमोदिनी मंडपे यांच्या सह्या आहेत.

चला उत्क्रांती समजून घेऊया अभियानातील मुद्दे...

  • उत्क्रांती विषयावर शालेय मुलांसाठी पुस्तिका प्रकाशन
  • विज्ञान शिक्षकांसाठी उत्क्रांती विषयावर कार्यशाळा
  • एनसीइआरटीला उत्क्रांती विषय शिक्षणात समाविष्ट करण्यासाठी पत्र लिहिण्याची मोहीम
  • महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात उत्क्रांती विषयावर मांडणी करणाऱ्या प्रशिक्षित वक्त्यांचे नेटवर्क उभे करणे
टॅग्स :Satara areaसातारा परिसर