शहरं
Join us  
Trending Stories
1
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
2
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
3
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
4
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
5
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
6
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
7
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
8
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
9
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
10
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
11
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
12
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
13
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
14
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
15
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
16
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
17
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
18
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
19
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
20
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!

‘एनसीइआरटी'ने दहावी अभ्यासक्रमातून उत्क्रांतीचा विज्ञान सांगणारा भाग वगळला, अंनिस राबवणार प्रबोधन अभियान

By नितीन काळेल | Updated: May 3, 2023 19:30 IST

सातारा : ‘एनसीइआरटीने दहावी अभ्यासक्रमातून उत्क्रांतीचा विज्ञान सांगणारा भाग वगळला आहे. त्यामुळे महाराष्ट्र ‘अंनिस’ याचा निषेध करत आहे. त्याचबरोबर ...

सातारा : ‘एनसीइआरटीने दहावी अभ्यासक्रमातून उत्क्रांतीचा विज्ञान सांगणारा भाग वगळला आहे. त्यामुळे महाराष्ट्र ‘अंनिस’ याचा निषेध करत आहे. त्याचबरोबर याचा निषेध कृतीतून व्यक्त करण्यासाठी ‘अंनिस’ ‘चला उत्क्रांती समजून घेऊया’ हे अभियान राबविणार आहे,’ अशी माहिती डाॅ. हमीद दाभोलकर यांनी दिली.याबाबत महाराष्ट्र ‘अंनिस’च्या वतीने डाॅ. हमीद दाभोलकर, प्रशांत पोतदार आणि वंदना माने यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे माहिती दिली आहे.यामध्ये म्हटले आहे की, एनसीइआरटीने दहावीच्या अभ्यासक्रमातून उक्रांतीचा विज्ञान सांगणारा भाग वगळल्याची माहिती समोर आली आहे. अनुवांशिकता आणि उत्क्रांती विषयी दहावीच्या अभ्यासक्रमात असलेला भाग वगळून त्याजागी केवळ अनुवांशिकता एवढाच भाग ठेवलेला आहे. अभ्यासक्रमातून उत्क्रांतीचे विज्ञान वगळण्याचा अंनिस निषेध करत आहे. कारण, पृथ्वीवर जीवसृष्टीची उत्पती कशी झाली याची शास्त्रीय मांडणी उत्क्रांतीच्या सिद्धांताद्वारे केली जाते.टप्प्याटप्प्याने एक पेशीय प्राणी त्यानंतर बहुपेशीय प्राणी, मानवाचे आधीच्या टप्प्यावरील माकड आणि सर्वात शेवटी मानव अशा टप्प्यांमधून मानवी उत्क्रांती कशी झाली यांची शास्त्रीय माहिती यामध्ये दिली जाते. पृथ्वीवर जीवसृष्टी निर्माण होण्यामागे कोणतीही विशिष्ट शक्ती नाही. उत्क्रांतीच्या प्रक्रियेतून ती झाली आहे. ही माहिती शालेय वयातील मुलांना पहिल्यांदा उत्क्रांतीच्या सिद्धांतातून मिळते.

मानवी जीवनावर प्रभाव टाकणाऱ्या अनेक अंधश्रद्धाची निर्मिती ही मानवी जीवनाचा उगम कसा झाला याची योग्य माहिती नसल्याने होतो. त्यामुळे उत्क्रांतीचा सिद्धांत शालेय अभ्यासक्रमातून शिकवल्याने विद्यार्थ्यांची मानवी जीवनाच्या उत्पत्तीमागे असलेल्या विज्ञानवादी भूमिकेशी तोंड ओळख होते. प्रत्यक्षात सहावी, सातवीच्या विद्यार्थ्याला याविषयी प्रश्न पडू लागतात. त्यामुळे तेव्हापासून टप्प्याटप्प्याने याविषयी माहिती शालेय अभ्यासक्रमातून येणे आवश्यक आहे. उत्क्रांतीचा सिद्धांत शालेय पुस्तकांमधून वगळल्यामुळे मुलांमध्ये विज्ञानवादी मानसिकता निर्माण होण्यात अडथळा निर्माण होणार आहे.भारतातील आणि परदेशातील अनेक विद्यापीठांमध्ये उत्क्रांती सिद्धांत जीव शास्त्रातील मुलभूत सिद्धांत म्हणून शिकवला जातो. उत्क्रांतीविषयी विशेष कोर्सही शिकवले जातात. या पार्श्वभूमीवर उत्क्रांतीचा सिद्धांत दहावीच्या अभ्यासक्रमातून वगळल्यामुळे दहावीनंतर विज्ञान शाखा घेणार नाहीत. त्या विद्याऱ्थांना उत्क्रांतीच्या सिद्धांताची माहिती मिळणार नाही. देशभरतील १८०० वैज्ञानिकांनी या गोष्टीला विरोध नोंदवला आहे. त्याला महाराष्ट्र अंनिस पाठींबा देत आहे, असेही या पत्रकात स्पष्ट केले आहे. या पत्रकावर अंनिस पदाधिकारी भगवान रणदिवे, डॉ. दीपक माने, हौसेराव धुमाळ, शंकर कणसे,, विलास भांदिर्गे, कुमार मंडपे आणि प्रमोदिनी मंडपे यांच्या सह्या आहेत.

चला उत्क्रांती समजून घेऊया अभियानातील मुद्दे...

  • उत्क्रांती विषयावर शालेय मुलांसाठी पुस्तिका प्रकाशन
  • विज्ञान शिक्षकांसाठी उत्क्रांती विषयावर कार्यशाळा
  • एनसीइआरटीला उत्क्रांती विषय शिक्षणात समाविष्ट करण्यासाठी पत्र लिहिण्याची मोहीम
  • महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात उत्क्रांती विषयावर मांडणी करणाऱ्या प्रशिक्षित वक्त्यांचे नेटवर्क उभे करणे
टॅग्स :Satara areaसातारा परिसर