शहरं
Join us  
Trending Stories
1
धगधगतं फ्रान्स! लाखो लोक रस्त्यावर उतरले, काही ठिकाणी दगडफेक; रेल्वे, मेट्रो, बस, शाळा बंद
2
Mumbai Crime: घाटकोपर रेल्वे स्थानकाबाहेर सापडला ३५ वर्षाच्या माणसाचा मृतदेह; कोणामुळे गेला जीव?
3
गोपीचंद पडळकरांचे वादग्रस्त विधान: अजित पवारांनी टोचले कान; म्हणाले, 'भाजपची जबाबदारी फडणवीसांची'
4
"आम्ही मित्र बनलो अन्..." १९ वर्षीय मॉडलनं का उचललं टोकाचं पाऊल?; बॅगेतील चिठ्ठीमुळे उघडलं रहस्य
5
रुममेटशी भांडण, पोलिसांनी थेट झाडल्या गोळ्या, अमेरिकेत भारतीय इंजिनियरचा मृत्यू  
6
बँक खात्यात पैसे नाही, टेन्शन कशाला? आता करा UPI पेमेंट, पुढच्या महिन्यात पैसे भरा; 'यांनी' आणलं जबरदस्त फीचर
7
आधी गोलंदाजीवर ठोकले गेले ५ षटकार, मग वडिलांचं निधन, श्रीलंकन क्रिकेटपटूवर कोसळला दु:खाचा डोंगर   
8
Nilon's Success Journey: लोणचं खायला घालून कंपनीनं कमावले ४०० कोटी; छोट्या किचनमधून झाली सुरुवात, आज परदेशातही आहे व्यवसाय
9
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानवर रात्री १.३० वाजताच स्ट्राइक का केले?; CDS चौहान यांचा खुलासा
10
फायद्याची बातमी! पेन्शनचा १००% पैसा टाका इक्विटीत; १ ऑक्टोबरपासून लागू होणार नवा नियम; पैसे कुठे आणि किती वाढत आहेत हे समजणे सोपे होणार
11
..तर महाराष्ट्रात एक नवीन 'खिचडी' पकेल! एकत्र राहण्यासाठी वरून खूपच दबाव आला तर बंडखोरीचे पेव फुटेल
12
आयफोन १७ च्या खरेदीवर ईएमआय किती येईल? जाणून घ्या बँक आणि कॅशबॅक ऑफर्स!
13
सात महिन्यांमध्ये राज्यात वाढले १४ लाख मतदार; राजकीय पक्षांकडून कोणताच आक्षेप नाही
14
iPhone 17: आयफोन १७ मालिकेची विक्री आजपासून सुरू; मुंबईतील अ‍ॅपल स्टोअरबाहेर ग्राहकांची मोठी गर्दी
15
सरकारचे आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर, वितरण २२ सप्टेंबर रोजी मुंबईत होणार; जाणून घ्या यादी
16
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा हल्लाबोल : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार मतचोरांना पाठीशी घालत असल्याचा आरोप, निवडणूक आयोगाचे उत्तर
17
आजचे राशीभविष्य, 19 सप्टेंबर 2025: धनलाभ होण्याचा योग; कोणत्या राशींसाठी आजचा दिवस आनंदाचा?
18
हिंडनबर्ग प्रकरणात अदानींना क्लीन चिट, ४४ पानी आदेशात सेबीने म्हटले; 'व्यवहार' लपवल्याचा पुरावा नाही
19
एका आठवड्यात खड्डे बुजवा, कंत्राटदारांवर कारवाई करा; उच्च न्यायालयाचे महापालिकांना आदेश, राज्यभरात १२ जणांचा मृत्यू
20
मराठा समाजाला मोठा दिलासा, मराठा समाजाला कुणबी जातीचा दर्जा देण्याविरोधातील याचिका फेटाळली

‘एनसीइआरटी'ने दहावी अभ्यासक्रमातून उत्क्रांतीचा विज्ञान सांगणारा भाग वगळला, अंनिस राबवणार प्रबोधन अभियान

By नितीन काळेल | Updated: May 3, 2023 19:30 IST

सातारा : ‘एनसीइआरटीने दहावी अभ्यासक्रमातून उत्क्रांतीचा विज्ञान सांगणारा भाग वगळला आहे. त्यामुळे महाराष्ट्र ‘अंनिस’ याचा निषेध करत आहे. त्याचबरोबर ...

सातारा : ‘एनसीइआरटीने दहावी अभ्यासक्रमातून उत्क्रांतीचा विज्ञान सांगणारा भाग वगळला आहे. त्यामुळे महाराष्ट्र ‘अंनिस’ याचा निषेध करत आहे. त्याचबरोबर याचा निषेध कृतीतून व्यक्त करण्यासाठी ‘अंनिस’ ‘चला उत्क्रांती समजून घेऊया’ हे अभियान राबविणार आहे,’ अशी माहिती डाॅ. हमीद दाभोलकर यांनी दिली.याबाबत महाराष्ट्र ‘अंनिस’च्या वतीने डाॅ. हमीद दाभोलकर, प्रशांत पोतदार आणि वंदना माने यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे माहिती दिली आहे.यामध्ये म्हटले आहे की, एनसीइआरटीने दहावीच्या अभ्यासक्रमातून उक्रांतीचा विज्ञान सांगणारा भाग वगळल्याची माहिती समोर आली आहे. अनुवांशिकता आणि उत्क्रांती विषयी दहावीच्या अभ्यासक्रमात असलेला भाग वगळून त्याजागी केवळ अनुवांशिकता एवढाच भाग ठेवलेला आहे. अभ्यासक्रमातून उत्क्रांतीचे विज्ञान वगळण्याचा अंनिस निषेध करत आहे. कारण, पृथ्वीवर जीवसृष्टीची उत्पती कशी झाली याची शास्त्रीय मांडणी उत्क्रांतीच्या सिद्धांताद्वारे केली जाते.टप्प्याटप्प्याने एक पेशीय प्राणी त्यानंतर बहुपेशीय प्राणी, मानवाचे आधीच्या टप्प्यावरील माकड आणि सर्वात शेवटी मानव अशा टप्प्यांमधून मानवी उत्क्रांती कशी झाली यांची शास्त्रीय माहिती यामध्ये दिली जाते. पृथ्वीवर जीवसृष्टी निर्माण होण्यामागे कोणतीही विशिष्ट शक्ती नाही. उत्क्रांतीच्या प्रक्रियेतून ती झाली आहे. ही माहिती शालेय वयातील मुलांना पहिल्यांदा उत्क्रांतीच्या सिद्धांतातून मिळते.

मानवी जीवनावर प्रभाव टाकणाऱ्या अनेक अंधश्रद्धाची निर्मिती ही मानवी जीवनाचा उगम कसा झाला याची योग्य माहिती नसल्याने होतो. त्यामुळे उत्क्रांतीचा सिद्धांत शालेय अभ्यासक्रमातून शिकवल्याने विद्यार्थ्यांची मानवी जीवनाच्या उत्पत्तीमागे असलेल्या विज्ञानवादी भूमिकेशी तोंड ओळख होते. प्रत्यक्षात सहावी, सातवीच्या विद्यार्थ्याला याविषयी प्रश्न पडू लागतात. त्यामुळे तेव्हापासून टप्प्याटप्प्याने याविषयी माहिती शालेय अभ्यासक्रमातून येणे आवश्यक आहे. उत्क्रांतीचा सिद्धांत शालेय पुस्तकांमधून वगळल्यामुळे मुलांमध्ये विज्ञानवादी मानसिकता निर्माण होण्यात अडथळा निर्माण होणार आहे.भारतातील आणि परदेशातील अनेक विद्यापीठांमध्ये उत्क्रांती सिद्धांत जीव शास्त्रातील मुलभूत सिद्धांत म्हणून शिकवला जातो. उत्क्रांतीविषयी विशेष कोर्सही शिकवले जातात. या पार्श्वभूमीवर उत्क्रांतीचा सिद्धांत दहावीच्या अभ्यासक्रमातून वगळल्यामुळे दहावीनंतर विज्ञान शाखा घेणार नाहीत. त्या विद्याऱ्थांना उत्क्रांतीच्या सिद्धांताची माहिती मिळणार नाही. देशभरतील १८०० वैज्ञानिकांनी या गोष्टीला विरोध नोंदवला आहे. त्याला महाराष्ट्र अंनिस पाठींबा देत आहे, असेही या पत्रकात स्पष्ट केले आहे. या पत्रकावर अंनिस पदाधिकारी भगवान रणदिवे, डॉ. दीपक माने, हौसेराव धुमाळ, शंकर कणसे,, विलास भांदिर्गे, कुमार मंडपे आणि प्रमोदिनी मंडपे यांच्या सह्या आहेत.

चला उत्क्रांती समजून घेऊया अभियानातील मुद्दे...

  • उत्क्रांती विषयावर शालेय मुलांसाठी पुस्तिका प्रकाशन
  • विज्ञान शिक्षकांसाठी उत्क्रांती विषयावर कार्यशाळा
  • एनसीइआरटीला उत्क्रांती विषय शिक्षणात समाविष्ट करण्यासाठी पत्र लिहिण्याची मोहीम
  • महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात उत्क्रांती विषयावर मांडणी करणाऱ्या प्रशिक्षित वक्त्यांचे नेटवर्क उभे करणे
टॅग्स :Satara areaसातारा परिसर