शहरं
Join us  
Trending Stories
1
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
2
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
3
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
4
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
5
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
6
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
7
बीडमध्ये कोळवाडीजवळ थरार! भरधाव डिझेल टँकरने रस्त्यावर घेतला पेट; प्रवाशांमध्ये दहशत
8
मंगळ ग्रह गायब झाला तर पृथ्वीचं काय होणार? संशोधनातून धक्कादायक माहिती आली समोर  
9
"गुलामाने प्रतिक्रिया द्यायची नसते हे त्यांना सांगा"; अधिवेशनात उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर घणाघात
10
विरोधी पक्षनेतेपदाबाबत उद्धव ठाकरे आक्रमक, सरकारची कोंडी करण्याची तयारी; स्पष्ट इशाराच दिला
11
“अधिवेशानाचे सत्ताधाऱ्यांना गांभीर्य नाही, ‘हम करे सो कायदा’ पद्धतीने…”: हर्षवर्धन सपकाळ
12
“संसदीय लोकशाहीत विविध पक्षांच्या संघटनेचे योगदान देखील महत्त्वाचे”: मंत्री चंद्रकांत पाटील
13
“बाबा आणि आत्याने आईला खूप मारलं'”; ढसाढसा रडत ४ वर्षांच्या लेकाचा धक्कादायक खुलासा
14
अक्षय खन्नाला आहेत दोन भाऊ, एक सख्खा अन् एक सावत्र, दोघांनीही बॉलिवूडमध्ये केलं काम
15
विराट कोहली, रोहित शर्माला कपिल देव यांचा अजब सल्ला, म्हणाले- "मला वाटतं की टीम इंडियात..."
16
कॅमेरा नसलेला 'आयफोन' बाजारात? खरेच असा फोन अस्तित्वात आहे का? ॲप्पलच बनविते...
17
या ठिकाणी अचानक पडले ७०० मोठे खड्डे, जमिनीत गाडला जातोय संपूर्ण परिसर, कारण काय?
18
“साधूसंत झाडावर राहणार का? एक दिवस लोक सरकारला ‘चले जाव’ म्हणतील”; अण्णा हजारे संतापले
19
मैत्रिणींचा सोनमला वाचवण्याचा प्रयत्न? राजा रघुवंशीच्या भावाचा खळबळजनक आरोप
20
टाटा-हिंडाल्कोसह 'या' शेअर्समध्ये बंपर तेजी! बाजारात सलग दुसऱ्या दिवशी गुंतवणूकदारांची चांदी
Daily Top 2Weekly Top 5

Satara: नवजाचे पर्जन्यमान चार हजारी; कोयना साठा ८५ टीएमसीजवळ

By नितीन काळेल | Updated: July 29, 2024 18:34 IST

जिल्ह्यात पाऊस सुरूच : २४ तासांत महाबळेश्वरला ९३ मिलिमीटर; वीरमधील विसर्ग घटला 

सातारा : जिल्ह्यात पाऊस सुरूच असून नवजाच्या पर्जन्यमानाने चार हजार मिलिमीटरचा टप्पा पार केला. तर कोयना, नवजाच्या पावसाचीही चार हजार मिलिमीटरकडे वाटचाल सुरू आहे. तर २४ तासांत सर्वाधिक पर्जन्यमान महाबळेश्वरला ९३ मिलिमीटर झाले. त्याचबरोबर कोयना धरणपाणलोट क्षेत्रातही पाऊस असल्याने साठा ८५ टीएमसीच्या उंबरठ्यावर पोहोचला आहे. तर वीर धरणातील विसर्ग कमी करण्यात आला आहे.जिल्ह्यात मागील १५ दिवसांपासून चांगला पाऊस पडत आहे. पूर्व भागातील माण, खटाव, फलटण, कोरेगाव तालुक्यातही पावसाने हजेरी लावल्याने खरीप हंगामातील पिकांना फायदा झाला आहे. तर पश्चिमेकडे कास, बामणोली, तापोळा, नवजा, कोयना, महाबळेश्वरला धुवाॅंधार पाऊस झाला. यामुळे प्रमुख धरणांत मोठ्या प्रमाणात पाणीसाठा झाला. परिणामी धरणातील पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी विसर्ग सुरू करावा लागला. सध्या पश्चिमेकडे पावसाचा जोर काहीसा कमी झाला आहे. तरीही धरणात पाण्याची आवक सुरूच आहे.

सोमवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत कोयनानगर येथे ७१ तर नवजाला ६७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. तर एक जूनपासून आतापर्यंत कोयनेला ३ हजार ४७६ तर नवजा येथे ४ हजार ५५ मिलिमीटर पाऊस पडला आहे. महाबळेश्वरलाही आतापर्यंत ३ हजार ७५५ मिलिमीटर पर्जन्यमान झाले. तर सध्या पावसाचा जोर कमी झाल्याने कोयना धरणात आवक घटली आहे. सकाळच्या सुमारास ३८ हजार क्यूसेक वेगाने पाणी येत होते. तर धरणात ८४.८५ टीएमसी पाणीसाठा होता. ८०.६२ टक्के धरण भरलेले आहे. त्याचबरोबर कोयनेतील विसर्ग कायम आहे. पायथा वीजगृहाची दोन्ही युनिट सुरू असून त्यातून २ हजार १०० आणि सहा दरवाजातून ३० हजार असा एेकूण ३२ हजार १०० क्यूसेक विसर्ग सुरू असून हे पाणी कोयना नदीत जात आहे.

वीरमधून १४ हजार क्यूसेक विसर्ग नीरा नदीपात्रात..पुणे जिल्ह्यातील वीर धरणपाणलोट क्षेत्रातही पाऊस सुरूच आहे. त्यामुळे मागील काही दिवसांपासून पाणी विसर्ग करण्यात येत आहे. त्यातच सध्या पावसाचा जोर कमी झाला असून धरणातील पाणीपातळी ५७९.४५ मीटरवर आहे. त्यामुळे सांडव्याद्वारे २३ हजार १८५ क्यूसेक असणारा विसर्ग कमी करण्यात आला. सोमवारी पहाटेपासून १३ हजार ९११ क्यूसेक वेगाने पाणी सोडले जात आहे. पावसाचे प्रमाण पाहून विसर्ग कमी किंवा जास्त करण्यात येणार आहे. तरीही नीरा नदीकाठावरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरRainपाऊसKoyana Damकोयना धरण