शहरं
Join us  
Trending Stories
1
देवेंद्र फडणवीसांची भविष्यवाणी खरी? EXIT POLL अंदाजानुसार राज ठाकरेंचा सर्वात मोठा पराभव
2
EXIT POLL मध्ये ठाकरे बंधूंना धक्का, संजय राऊतांचा खळबळजनक दावा; 'त्या' बैठकीत काय शिजलं?
3
अमेरिका-इराणमध्ये तणाव, इराणने हवाई क्षेत्र केले बंद, एअर इंडिया आणि इंडिगोने ट्रॅव्हल अ‍ॅडव्हायजरी केली जारी
4
भारतीय कोस्ट गार्डची कारवाई; भारतीय हद्दीत घुसखोरी करणाऱ्या पाकिस्तानी नौकेसह 9 ताब्यात
5
Municipal Election 2026 Exit Poll Live: मुंबईत ठाकरेंना झटका बसणार, युतीला किती जागा मिळणार?
6
PMC Election Exit Poll 2026: पुण्यात भाजपाच राहणार की, राष्ट्रवादी बसणार सत्तेत, कौल कुणाला?
7
Pune Election: मतदार येरवडा तुरुंगात, पण मतदान केंद्रावर त्याच्या नावावर झालं मतदान
8
मोठा दणका! निवडणूक ड्युटीवर 'दांडी' मारणाऱ्या १५५ कर्मचाऱ्यांवर छत्रपती संभाजीनगरात गुन्हा
9
BMC Election 2026 Exit Poll: ३ सर्व्हे ३ अंदाज...मुंबईत भाजपाच सर्वात मोठा पक्ष?; महायुतीची सत्ता येण्याचा एक्झिट पोल
10
'निवडणूक मतदान प्रक्रियेत क्रांतिकारी बदल झाले पाहिजेत'; सुधीर मुनगंटीवार यांनी स्पष्टच सांगितलं
11
TMC Election 2026 Exit Poll: ठाण्यात शिंदेसेना मारणार मुंसडी! उद्धवसेना, भाजपाला किती जागा मिळणार?
12
iPhone: आणखी स्वस्त झाला आयफोन; रिपब्लिक सेलआधीच मोठा धमाका! कुठं मिळतोय इतका स्वस्त?
13
उद्धव ठाकरेंनी आक्षेप घेताच निवडणूक अधिकाऱ्यांनी 'तो' निर्णय तात्काळ मागे घेतला, काय घडलं?
14
महाराष्ट्रातील 29 महापालिकांमध्ये कुठे, किती टक्के मतदान? मुंबईच्या निकालांकडे सर्वांचे लक्ष
15
"आशिष शेलारजी, आपण राज्याचे मंत्री आहात की निवडणूक आयोगाचे वकील?", काँग्रेसकडून प्रश्नांचा भडिमार, कोणत्या मुद्द्यांवर बोट?
16
 10 Minute Delivery: १० मिनिटांत डिलिव्हरी बंद, पण 'इन्सेंटिव्ह'साठी जीवघेणी शर्यत सुरूच! 
17
मतदान सुरू असतानाच जळगाव शहरात गोळीबार; प्रकरण काय, पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती
18
भयंकर, अटल आणि असह्य; लष्कराने 'ऑपरेशन सिंदूर'चा नवीन व्हिडीओ आला समोर, पाकिस्तानचा विध्वंस
19
Vijay Hazare Trophy 1st Semi Final : करुण नायरची कडक खेळी; पण Ex समोर शतकी डाव फसला अन्... (VIDEO)
20
दोन मुलांचा बाप अन् ६ वर्ष लहान... फुटबॉलच्या मैदानातील 'गोलमेकर'ला डेट करतेय नोरा फतेही!
Daily Top 2Weekly Top 5

निसर्ग सानिध्यात ‘जंगल बुक लायब्ररी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2019 22:33 IST

सातारा : सोशल मीडियाच्या प्रवाहात तरुण पिढी पुस्तकांपासून दूर चालली आहे. या तरुणाईमध्ये पुस्तकांची आवड निर्माण करून वाचन संस्कृती ...

सातारा : सोशल मीडियाच्या प्रवाहात तरुण पिढी पुस्तकांपासून दूर चालली आहे. या तरुणाईमध्ये पुस्तकांची आवड निर्माण करून वाचन संस्कृती अधिक समृद्ध व्हावी, या उद्देशाने साताऱ्यात ‘जंगल बुक लायब्ररी’ सुरू करण्यात आली आहे. विशेष म्हणजे सातारकरांना झाडा, वेलींच्या सानिध्यात वाचनाचा मनसोक्त आनंद लुटता येणार आहे. ‘हिरवाई’च्या प्रा. संध्या चौगुले यांच्या कल्पनेतून हा अनोखा उपक्रम साकारला जात आहे.वाचनामुळे आपली बौद्धिक क्षमता समृद्ध होतेय, शिवाय ज्ञानातही भर पडते. परंतु धकाधकीच्या जीवनात व सोशल मीडियाच्या प्रवाहात अनेकांना वाचनासाठी सवड मिळत नाही. त्यामुळे वाचन चळवळ समृद्ध करण्यासाठी काहीतरी करावे, अशी कल्पना प्रा. संध्या चौगुले यांच्या मनात आली आणि यातूनच निसर्गाच्या सानिध्यात ग्रंथालय सुरू करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. सहकाऱ्यांसह मित्र-मैत्रिणींनी त्यांच्या या कल्पनेबाबत सकारात्मकता दर्शविली. यानंतर ग्रंथालय सुरू करण्याची मोहीम सुरू झाली.हे ग्रंथालय एका बंद खोलीत नव्हे तर निसर्गाच्या सानिध्यात सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार सदरबझार येथील ‘हिरवाई’त झाडा-वेलींच्या सानिध्यात हे ग्रंथालय सुरू करण्यात आले. निसर्गाच्या सानिध्यात सुरू झालेल्या या गं्रथालयाला ‘जंगल बुक लायब्ररी’ असे नावही देण्यात आले आहे. ग्रंथालयाच्या उभारणीसाठी लागणाºया वस्तू, पुस्तके दान करण्याचे आवाहन सातारकरांना करण्यात आले होते.त्यानुसार अनेक वाचनप्रेमींनी आपल्याकडील पुस्तके या ग्रंथालयासाठी देऊ केली आहेत. कोणी बैठक व्यवस्थेसाठी टेबल, खुर्च्या, बेंच याचीही व्यवस्था केली आहे. दि. १ मे रोजी हे ग्रंथालय सातारकरांसाठी खुले होणार असून, सातारकरांना आता निसर्गाच्या सानिध्यात वाचनाचा आनंद लुटता येणार आहे. याचा लाभ घेण्याचे आवाहन केले जात आहे.वृत्तपत्रांपासून ग्रंथांपर्यंत‘जंगल बुक लायब्ररी’त वृत्तपत्रांपासून ते ग्रंथापर्यंत सर्व प्रकारची पुस्तके वाचकांसाठी उपलब्ध करण्यात आली आहेत. लहान मुलांनादेखील कविता, गोष्टीच्या पुस्तकांचा आस्वाद येथे घेता येणार आहे. पुढील टप्प्यात स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाºया युवकांसाठी अत्यावश्यक पुस्तकांची उपलब्धता केली जाईल, अशी माहिती प्रा. संध्या चौगुले यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.