शहरं
Join us  
Trending Stories
1
Rohini Aacharya: लालू प्रसाद यादवांच्या घरात ज्यांच्यामुळे सुरू झालं 'महाभारत', ते संजय यादव कोण?
2
मुंबईत मोठी दुर्घटना! भायखळ्यातील बांधकाम सुरू असलेल्या इमारतीजवळ मातीचा ढिगारा कोसळला; २ मजुरांचा मृत्यू, ३ जखमी
3
दिल्ली ब्लास्ट प्रकरण : आता पठानकोटमधून आणखी एका डॉक्टरला अटक, अल-फलाह विद्यापीठात केली होती नोकरी
4
IPL 2026: प्रितीच्या पंजाबनं ग्लेन मॅक्सवेलला दाखवला ठेंगा! कोच रिकी पाँटिंगनं सांगितली आतली गोष्ट
5
इराण देशभरातील लोकांच्या मोबाईल फोनवर 'इमरजन्सी अलर्ट' का पाठवत आहे?
6
अमेरिकेत महागाई वाढली, डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफवर घेतला यू-टर्न; भारताला मोठा फायदा होणार
7
जी मोटारसायकल चोरली, तिच्यावरच गेला जीव; मिरज रोडवर चोर ठार, कसा घडला अपघात?
8
Amravati Crime: छायाचा घरी येणाऱ्या विश्वंभरवर जडला जीव, पती प्रमोदची देवी दर्शनानंतर केली हत्या; लंघुशंकेसाठी थांबली अन्...
9
चुकूनही करू नका 'हे' काम, क्षणार्धात तुमचा मोबाईल फोन होऊ शकतो हॅक! गुगलने काय इशारा दिला?
10
नोकरी सोडून आयपीएस अधिकारी उतरले बिहार निवडणुकीच्या मैदानात; मराठमोळ्या लांडेंना किती मिळाली मते?
11
मशिदीचा पत्ता, मोबाइल SIM, थायलंड टूर अन्...! डॉ. शाहीन संदर्भात मोठा खुलासा; डॉ परवेझला कशासाठी नेलं होतं कानपूरला?
12
दिल्ली स्फोटापूर्वी उमर घाबरला होता, नवीन सीसीटीव्हीमध्ये खुलासा, दोन्ही फोन कुठे लपवले?
13
Ravindra Jadeja : जड्डूनं केली विक्रमांची 'बरसात'! WTC मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला
14
"रडायचं नाही लढायचं! बिहार निकालानं खचून जाऊ नका; मुंबई महापालिकेवर काँग्रेसचा झेंडा फडकवा"
15
Travel : नवीन वर्ष परदेशात सेलिब्रेट करायचा विचार करताय? 'या' देशांमध्ये होऊ शकते खिशाला परवडणारी ट्रीप!
16
'भाजपाला फायदा करून देण्याची सुपारी घेतलीय का?'; काँग्रेसच्या स्वबळाच्या निर्णयावर शरद पवार गट नाराज
17
कुटुंबासोबतचे संबंधच तोडले, लालू प्रसाद यादवांच्या मुलीने आरोप केलेले रझीम कोण, राजदमध्ये काय घडलं?
18
अल फलाह युनिव्हर्सिटीवर क्राईम ब्रांचचा बडगा, UGC च्या तक्रारीवरून २ FIR दाखल
19
"अल्लाह करे भारत..."; नौगाम ब्लास्टवर फारूक अब्दुल्ला यांचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाले?
20
Rohini Acharya: "मी राजकारण सोडतेय आणि कुटुंबासोबतचे संबंधही तोडत आहे", लालू प्रसाद यादवांच्या मुलीच्या पोस्टने खळबळ
Daily Top 2Weekly Top 5

कऱ्हाडला शासकीय विश्रामगृहालाच आंदोलनस्थळाचे स्वरूप !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2021 04:39 IST

कऱ्हाड : स्वाभिमानी शेतकरी संघटनेने एफआरपी प्रश्नी गुरुवारी सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या सह्याद्री सहकारी साखर कारखान्यावर धरणे आंदोलनाचा ...

कऱ्हाड :

स्वाभिमानी शेतकरी संघटनेने एफआरपी प्रश्नी गुरुवारी सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या सह्याद्री सहकारी साखर कारखान्यावर धरणे आंदोलनाचा इशारा दिला होता. मात्र, संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी व कार्यकर्त्यांना पोलिसांनी तत्पूर्वीच ताब्यात घेतल्याने ते आंदोलनस्थळी पोहोचू शकले नाहीत. दरम्यान, मंत्री बाळासाहेब पाटील व राजू शेट्टी यांच्यात शासकीय विश्रामगृहावर चर्चा झाली, पण तोवर शासकीय विश्रामगृहालाच आंदोलनस्थळाचे स्वरूप प्राप्त झाले होते.

साखर कारखानदारांनी शेतकऱ्यांना १४ दिवसांत एफआरपी रक्कम देणे कायद्याचा भाग आहे. मात्र, तरीही ती रक्कम दिली जात नाही. सहकारमंत्री बाळासाहेब पाटील अध्यक्ष असणाऱ्या सह्याद्री सहकारी साखर कारखान्यानेही एफआरपी दिली नाही. त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सह्याद्री कारखान्यावर गुरुवारी (दि. २५) धरणे आंदोलन करण्यासंदर्भात निवेदन दिले होते. त्यामुळे या आंदोलनाकडे साऱ्या राज्याचे लक्ष लागून राहिले होते.

दरम्यान, पोलिसांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांवर काल रात्रीपासूनच लक्ष ठेवले होते. त्यात राजू शेट्टी सांगलीवरून कऱ्हाडला आंदोलनासाठी येत असतानाच गुरुवारी सकाळी पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. त्यामुळे आंदोलक आंदोलनस्थळी पोहोचू शकले नाहीत.

राजू शेट्टी यांना ताब्यात घेतल्यानंतर पोलीस त्यांना कऱ्हाडच्या शासकीय विश्रामगृहावर घेऊन आले. ही माहिती स्वाभिमानी कार्यकर्त्यांना समजताच कार्यकर्तेही विश्रामगृहाबाहेर मोठ्या संख्येने जमले. विश्रामगृहात राजू शेट्टी व त्यांचे शिष्टमंडळ यांची मंत्री बाळासाहेब पाटील यांच्याबरोबर सुमारे अर्धा तास चर्चा झाली. एफआरपी न देणाऱ्या कारखान्यांवर त्वरित कारवाई करा. पैसे न मिळाल्याने शेतकरी मोठ्या अडचणीत आहे. अशातच वीज बिल न भरल्याने त्यांची वीज कनेक्शन तोडली जात आहेत. शेतकऱ्यांनी नेमकं काय करायचं, असा प्रश्न स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी सहकारमंत्र्यांना केला. सहकारमंत्र्यांनी आंदोलकांचे मत जाणून घेऊन एफआरपीबाबत मीही आग्रही आहे. ती न देणाऱ्यांवर कारवाईबाबत त्यांनी आश्वासित केले, पण त्यासाठी थोडा वेळ द्या, मी एक एप्रिलला आढावा घेतो. मग कारवाई करतो, असे सांगून मंत्री पाटील यांनी आंदोलकांचा निरोप घेतला.

चौकट:

आतमध्ये चर्चा बाहेर घोषणा ..

मंत्री बाळासाहेब पाटील व स्वाभिमानीचे नेते राजू शेट्टी यांच्यात मागण्यांबाबत विश्रामगृहात चर्चा सुरू होती, पण तोवर बाहेर कार्यकर्त्यांनी घोषणांनी परिसर दणाणून सोडला होता .त्यामुळे शासकीय विश्रामगृहाला आंदोलनस्थळाचे स्वरूप प्राप्त झाले होते. घोषणा ऐकून इतरांनीही तेथे गर्दी करायला सुरुवात केली होती. पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

चौकट:

म्हणे, आंदोलन दडपण्याचा प्रश्नच नाही !

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी चर्चेवेळी तुम्ही आमचे आंदोलन दडपत आहात, असा आरोप केला. त्यावर बोलताना मंत्री पाटील म्हणाले, तुमचा आरोप चुकीचा आहे. तसे असते तर मी तुम्हाला येथे भेटायला आलो असतो का ? मुळात तुम्ही २२ तारखेला आंदोलन करणार होता. ती तारीख का बदलली मला समजले नाही, असेही मंत्री पाटील म्हणाले.

फोटो:

कऱ्हाड येथे गुरुवारी शासकीय विश्रामगृहाबाहेर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती.