शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

Maharashtra Vidhan Sabha 2019 : राष्ट्रवादी अन् काँग्रेस हे बरबटलेले पक्ष : प्रमोद सावंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2019 15:39 IST

केंद्र व राज्यातील सरकार हे आरोप असलेले सरकार आहे तर काँग्रेस किंवा राष्ट्रवादी हे पक्ष आरोपांनी बरबटलेले आहेत. अशांना लोक परत लोक निवडून देणार नाहीत, असे प्रतिपादन गोवा राज्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी केले.

ठळक मुद्देराष्ट्रवादी अन् काँग्रेस हे बरबटलेले पक्ष : प्रमोद सावंतभाजपकडून अंत्योदय तत्त्वावरील राजकारण

कऱ्हाड : केंद्र व राज्यातील सरकार हे आरोप असलेले सरकार आहे तर काँग्रेस किंवा राष्ट्रवादी हे पक्ष आरोपांनी बरबटलेले आहेत. अशांना लोक परत लोक निवडून देणार नाहीत. कारण लोकांनी त्यांचे पंधरा ते वीस वर्षांचे राजकारण बघितले आहे. याउलट भारतीय जनता पक्षाचे राजकारण अंत्योदय तत्त्वावर चालणार आहे. आरोग्यासह इतर कारणांसाठी काढलेल्या सर्व योजना सर्व सामान्यांपर्यंत पोहोचण्यासाठी भाजप सरकार कार्य करत आहे, असे प्रतिपादन गोवा राज्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी केले.कऱ्हाड येथील वेणूताई चव्हाण स्मारक भवनमध्ये गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचा कॉफी विथ युवा संवाद हा कार्यक्रम शुक्रवारी पार पडला. यानंतर मुख्यमंत्री सावंत यांनी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर, नगराध्यक्षा रोहिणी शिंदे उपस्थित होत्या.प्रमोद सावंत म्हणाले, ह्यआर्थिक मंदी फक्त भारतात नसून ती सबंध जगभर आहे. याचाही विचार सर्वांनीच केला पाहिजे. जीएसटीमध्येही बदल केले गेले आहेत. पंतप्रधान तसेच अर्थमंत्र्यांकडून घेतल्या गेलेल्या विविध निर्णयाचा फायदा अर्थनीतीमध्ये देशाला व राज्याला होणार आहे. औद्योगिकीकरण होणे हे अत्यंत गरजेचं आहे. आपल्या देशात विकासाची अनेक साधने आहेत. त्याच्यावर लक्ष देणे गरजेचे आहे.

राफेल विमानाबाबत विरोधकांकडून अनेकवेळा आरोप केले गेलेत. सुरुवातीला खरेदीवरून आता पूजनवरून केले जात आहेत. दसऱ्याच्या दिवशी प्रत्येक जण हा आपापल्या घरी शस्त्रपूजन करत असतो. राफेल विमानाचं पूजन केलं म्हणून काय बिघडलं?

आज महाविद्यालयीन तरुण युवकांना विविध क्षेत्रात नोकरीच्या संधी मिळवून देण्याचं काम खऱ्या अर्थाने भाजप करीत आहे. भाजपाने तरुणांवर खूप मोठा विश्वास टाकला आहे. लवकरच तरुणांच्या मदतीने देश एक आर्थिक महासत्ता बनेल, असा विश्वास मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी व्यक्त केला.

टॅग्स :BJPभाजपाSatara areaसातारा परिसर