शहरं
Join us  
Trending Stories
1
'अमेरिकेसोबत काही मुद्दे सोडवायला हवेत', ट्रेड डील आणि टॅरिफबाबत जयशंकर यांचे मोठे विधान
2
IND W vs PAK W "म्हारी छोरियां छोरो से कम है के.." हरमनप्रीत ब्रिगेडनंही पाकची जिरवली!
3
नेपाळमध्ये हाहाकार... मुसळधार पावसाचा कहर! आतापर्यंत 51 जणांचा मृत्यू; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केलं दुःख, म्हणाले - भारत...!
4
Muneeba Ali Controversial Run Out : हुज्जत घालून पाक क्रिकेटच्या इज्जतीचा फालुदा; असं काय घडलं?
5
हिमालयात दार्जिलिंगपासून माऊंट एव्हरेस्टपर्यंत विध्वंस, ६० हून अधिक मृत्यू, कारण काय?
6
IND vs AUS : ३०० पारच्या लढाईत अभिषेक-तिलकनं तलवार केली म्यान; वादळी शतकासह प्रभसिमरन सिंगची हवा
7
'जेव्हा शिंदे CM आणि फडणवीस DCM होते तेव्हा...!', अमित शाह यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
8
प्रवाशांनी भरलेली विरार ते पालघर रो-रो बोट जेट्टीवर अडकली; हायड्रॉलिक पाईप तुटल्याने मनस्ताप
9
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
10
’अमित शाह महाराष्ट्रात आले पण नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत शब्दही बोलले नाहीत’, काँग्रेसची टीका   
11
Irani Cup 2025: नागपूरच्या मैदानात फुल्ल राडा! यश धुलला तंबूत धाडल्यावर ठाकूर त्याच्या अंगावर धावला (VIDEO)
12
ऑटो कंपनीची 'कमाल', गुंतवणूकदारांना केलं मालामाल...! 1 वर्षात पैसा डबल; सोमवारी दिसणार चमत्कार?
13
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
14
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
15
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
16
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 
17
सयाजी शिंदेंचा मोठा निर्णय, 'सखाराम बाईंडर'च्या १० प्रयोगांचे मानधन पूरग्रस्त शेतकऱ्यांना देणार
18
“धर्म-भाषा काहीही असो, आपण सर्व हिंदू आहोत; ब्रिटिशांनी आपल्यात फूट पाडली”- मोहन भागवत
19
"...तोपर्यंत मी तुरुंगात राहण्यास तयार आहे"; सोनम वांगचुक यांनी जोधपूरहून भावाकडे पाठवला मेसेज
20
INDW vs PAKW: अचानक मैदानात पसरला पांढरा धूर: भारत-पाक सामन्यात नेमकं काय घडलं?

राष्ट्रीय लोकअदालतीत ३ कोटी ३६ लाखांची वसुली

By admin | Updated: December 15, 2015 00:59 IST

अनिता नेवसे : दोन हजार ७३३ प्रकरणे निकाली

सातारा : ‘जिल्ह्यातील सर्व न्यायालयांमध्ये शनिवार, दि. १२ डिसेंबर रोजी जिल्हा विधी सेवा प्राधिकणातर्फे राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते. या राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये दोन हजार ७३३ प्रकरणे निकाली काढण्यात आले असून, तीन कोटी ३६ लाख नऊ हजार ९८८ रुपयांची विक्रमी वसुली करण्यात आली आहे,’ अशी माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सदस्य सचिव डॉ. अनिता नेवसे यांनी दिली.जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व वकील संघ यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा व सत्र न्यायालयात व ११ तालुका न्यायालयांच्या ठिकाणी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते. या राष्ट्रीय लोकअदालतीचे उद्घाटन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. एम. गव्हाणे यांनी केले. यावेळी जिल्हा व सत्र न्यायाधीश डी. डब्ल्यू. देशपांडे, जिल्हा न्यायाधीश ए. एन. पाटील, वर्षा मोहिते, व्ही. आर. कचरे, सर्व न्यायाधीश, वकील संघाचे अध्यक्ष अजय डांगे, जिल्हा सरकारी वकील एम. एन. कुलकर्णी, सरकारी वकील, बँका, विमा कंपन्यांचे पदाधिकारी तसेच सर्व यंत्रणांचे पदाधिकारी, पक्षकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.या राष्ट्रीय लोकअदालतीसाठी एकूण ११ पॅनेल तयार करण्यात आले होते. या पॅनेलमध्ये न्यायाधीश, वकील, प्राध्यापक यांच्या समन्वयामुळे मोठ्या रकमेची वसुली झाली. दिवाणी व फौजदारी प्रकरणे मिटविण्यासाठी पक्षकारांमध्ये मोठा उत्साह दिसून आला. ही राष्ट्रीय लोकअदालत यशस्वी करण्यासाठी सर्व न्यायीक अधिकारी, विधीज्ञ, सरकारी वकील, प्राध्यापक, पक्षकार, न्यायालयीन कर्मचारी, पोलीस कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)२६,४३७ वादपूर्व प्रकरणे प्रलंबितया राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये चलनक्षम दस्तऐवजांच्या १०७३ पैकी १९१, मोटार अपघात नुकसान भरपाईच्या २७१ पैकी ३४, वैवाहिक व कौटुंबीक वादाच्या ३६५ पैकी ४६, कामगार व औद्योगिक ६१ पैकी २० भूसंपादन ३२ पैकी ११, नगरपालिका घर मिळकतीची ९० पैकी २८, सहकार न्यायालयाची १९ पैकी १४, फौजदारी खटले व अपिले ४५७ पैकी ८०, दिवाणी दावे व अपिले ४७८ पैकी १३७, फौजदारी व किरकोळ गुन्ह्यांची प्रकरणे २०१ पैकी १६१, बँकांची वादपूर्व ११,१८८ पैकी १९७, वीज वितरण कंपनीकडील ६,९२१ पैकी ९६, भारत संचार निगम लिमिटेड व भ्रमणध्वनी कंपन्यांची १२,४०१ पैकी १०७५ इतकी प्रकरणे व ११ डिसेंबर रोजी राबविण्यात आलेल्या विशेष मोहिमेंतर्गत ८३५ पैकी ६०३ अशी एकूण २९,१७० वादपूर्व व प्रलंबित प्रकरणे ठेवण्यात आली होती. त्यापैकी २,७३३ प्रकरणे निकाली काढण्यात आली असून, २६, ४३७ वादपूर्व प्रकरणे प्रलंबित आहेत.