शहरं
Join us  
Trending Stories
1
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
2
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
3
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
4
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...
5
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
6
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
7
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
8
"एनआरसी सारखे षड्‍यंत्र..."; बिहारमधील मतदार यादीवरून ममता बॅनर्जी यांचा निवडणूक आयोगाला टोला
9
'अमेरिकेच्या थोबाडीत मारली...', युद्धविराम जाहीर केल्यानंतर खामेनी यांनी केला विजयाचा दावा
10
..त्यामुळे हिंदी सक्तीचे नकोच; राज्य शासनाने हट्ट सोडावा, शरद पवार यांचा सल्ला 
11
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
12
इतिहास घडला! 'ड्रॅगन'मधून शुभांशु शुक्ला आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचले, १४ दिवस करणार संशोधन
13
"हिंदी कुठल्याही भाषेची शत्रू नाही..."; भाषावादावर पुन्हा एकदा अमित शाह स्पष्ट बोलले
14
दोन दिग्गज एकत्र आले; अदानी-अंबानी यांच्यात मोठा करार, 'या' क्षेत्रात क्रांती घडणार...
15
"राज्यात मराठीच सक्तीची, पण..."; त्रिभाषा सूत्रावरून भाजपाने स्पष्ट केली भूमिका
16
काँग्रेस नेते शशी थरुर अचानक रशिया दौऱ्यावर; रशियन परराष्ट्र मंत्र्यांची घेतली भेट, कारण काय?
17
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
18
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
19
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
20
कुठल्याही वादापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज ठाकरेंचे संकेत; ६ जुलैला ठाकरे बंधू एकत्र येणार?

राष्ट्रीय लोकअदालतीत ३ कोटी ३६ लाखांची वसुली

By admin | Updated: December 15, 2015 00:59 IST

अनिता नेवसे : दोन हजार ७३३ प्रकरणे निकाली

सातारा : ‘जिल्ह्यातील सर्व न्यायालयांमध्ये शनिवार, दि. १२ डिसेंबर रोजी जिल्हा विधी सेवा प्राधिकणातर्फे राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते. या राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये दोन हजार ७३३ प्रकरणे निकाली काढण्यात आले असून, तीन कोटी ३६ लाख नऊ हजार ९८८ रुपयांची विक्रमी वसुली करण्यात आली आहे,’ अशी माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सदस्य सचिव डॉ. अनिता नेवसे यांनी दिली.जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व वकील संघ यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा व सत्र न्यायालयात व ११ तालुका न्यायालयांच्या ठिकाणी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते. या राष्ट्रीय लोकअदालतीचे उद्घाटन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. एम. गव्हाणे यांनी केले. यावेळी जिल्हा व सत्र न्यायाधीश डी. डब्ल्यू. देशपांडे, जिल्हा न्यायाधीश ए. एन. पाटील, वर्षा मोहिते, व्ही. आर. कचरे, सर्व न्यायाधीश, वकील संघाचे अध्यक्ष अजय डांगे, जिल्हा सरकारी वकील एम. एन. कुलकर्णी, सरकारी वकील, बँका, विमा कंपन्यांचे पदाधिकारी तसेच सर्व यंत्रणांचे पदाधिकारी, पक्षकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.या राष्ट्रीय लोकअदालतीसाठी एकूण ११ पॅनेल तयार करण्यात आले होते. या पॅनेलमध्ये न्यायाधीश, वकील, प्राध्यापक यांच्या समन्वयामुळे मोठ्या रकमेची वसुली झाली. दिवाणी व फौजदारी प्रकरणे मिटविण्यासाठी पक्षकारांमध्ये मोठा उत्साह दिसून आला. ही राष्ट्रीय लोकअदालत यशस्वी करण्यासाठी सर्व न्यायीक अधिकारी, विधीज्ञ, सरकारी वकील, प्राध्यापक, पक्षकार, न्यायालयीन कर्मचारी, पोलीस कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)२६,४३७ वादपूर्व प्रकरणे प्रलंबितया राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये चलनक्षम दस्तऐवजांच्या १०७३ पैकी १९१, मोटार अपघात नुकसान भरपाईच्या २७१ पैकी ३४, वैवाहिक व कौटुंबीक वादाच्या ३६५ पैकी ४६, कामगार व औद्योगिक ६१ पैकी २० भूसंपादन ३२ पैकी ११, नगरपालिका घर मिळकतीची ९० पैकी २८, सहकार न्यायालयाची १९ पैकी १४, फौजदारी खटले व अपिले ४५७ पैकी ८०, दिवाणी दावे व अपिले ४७८ पैकी १३७, फौजदारी व किरकोळ गुन्ह्यांची प्रकरणे २०१ पैकी १६१, बँकांची वादपूर्व ११,१८८ पैकी १९७, वीज वितरण कंपनीकडील ६,९२१ पैकी ९६, भारत संचार निगम लिमिटेड व भ्रमणध्वनी कंपन्यांची १२,४०१ पैकी १०७५ इतकी प्रकरणे व ११ डिसेंबर रोजी राबविण्यात आलेल्या विशेष मोहिमेंतर्गत ८३५ पैकी ६०३ अशी एकूण २९,१७० वादपूर्व व प्रलंबित प्रकरणे ठेवण्यात आली होती. त्यापैकी २,७३३ प्रकरणे निकाली काढण्यात आली असून, २६, ४३७ वादपूर्व प्रकरणे प्रलंबित आहेत.